3 Idiots
सकाळी कुठेतरी 3 Idiots बद्दलचा एक लेख वाचला. आता तो धागा नेमका सापडत नाहीये.
लेख फारसा पटला नाही. त्यात एका प्रतिक्रियेत out of the box जाऊन काही करावं, आपल्याला आवडेल तेच करावं किंवा करून पहावं अशा काहीशा आशयाची एक प्रतिक्रिया होती ती मात्र पटली.
शिवाय त्यातल्या संवादातून चतूर एकटा यशस्वी आहे आणि बाकीचे फरहान वगैरे फेल आहेत हे जे चित्र रंगवलं आहे ते चुकीचं आहे. लता मंगेशकरने, सचिनने मेहनत घेतली पण फरहानने त्याच्या वाईल्ड फोटोग्राफीत तेवढी मेहनत घेतलीच नाही असंच का गृहीत धरलं गेलंय?