८६ वर्षांचं तारुण्य हरपलं!
आदरणीय सर –
कोणी म्हणेल की आता तर सर गेले मग आता त्यांना पत्र लिहून कसं चालेल? पण आमच्यासाठी तुम्ही गेला नाहीत सर. आपल्या धडाडीने कर्तृत्व गाजविणाऱ्या असामान्य लोकांच्या बाबतीत लौकीकार्थाची फुटपट्टी लावायचीच नसते. स्वतःच्या मृत्यूने नाहीशी होतात ती सामान्य माणसं. तुमच्यासारखी माणसं तर हयातीत आणि मरणानंतर लोकांच्या हृदयात विराजमान असतात. अशी माणसं कधी मरत नाहीत.
सॅटर्डे क्लबच्या संस्थापकाला शनिवारीच आपल्या जवळ बोलावून साक्षात मृत्यूनेच तुम्हाला मानवंदना दिली सर.