वाङ्मय

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
24 Jan 2014 - 9:18 pm

अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.

(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)

तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

वावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतइतिहासवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रविज्ञानक्रीडाअर्थकारणशिक्षणमौजमजाविचारप्रतिसादआस्वादसमीक्षाबातमीमाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
22 Jan 2014 - 3:27 pm

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.

(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)

तर.. पुण्यात होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र करूया.

मी प्रतिसादातून सुरूवात करतो आहे.

काही मुद्दे..

वावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतइतिहासवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रविज्ञानक्रीडाअर्थकारणशिक्षणमौजमजाचित्रपटविचारप्रतिसादआस्वादसमीक्षाबातमीमाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
18 Jan 2014 - 11:52 am

१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत.

विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि राजा जैतपाळाचे तळे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Jan 2014 - 10:25 pm

विवेकसिंधु हा कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो.विवेकसिंधु ग्रंथाबद्दलच्या मराठी विकिपीडियाव्रील लेख अद्ययावत करताना विवेकसिंधूचे लेखन अंबेजोगाई, आंभोरा, फलटण,पैकी नेमके कुठे झाले हि चर्चा सध्या पुढे आली आहे. मराठी विकिपीडियाचे एक जाणते सदस्य त्या बद्दल सध्या चर्चा:विवेकसिंधु येथे विवीध संदर्भ उधृत करत आहेत.

हजार चुराशीर मा – महाश्वेतादेवी (अनु. अरुणा जुवेकर)

Atul Thakur's picture
Atul Thakur in जनातलं, मनातलं
12 Jan 2014 - 10:14 pm

एखादे तत्वज्ञान आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय? ते पटत असल्यास त्याचा आस्वाद जास्त चांगल्या तर्‍हेने घेता येईल काय? हा प्रश्न मला सुरुवातीला “हाजार चुराशीर मा” पुस्तक वाचण्याआधी पडला होता. मात्र महाश्वेतादेवींचे हे पुस्तक हाती पडल्यावर हे सारे प्रश्न विरुन गेले आणि एक अतिशय सुंदर पुस्तक वाचल्याची अनुभुती मिळाली. मला मिळालेले पुस्तक अनुवादीत होते मात्र त्याने फार काही फरक पडला असे वाटले नाही. अनुवाद केलेल्या अरुणा जुवेकर यांचा प्रत्यक्ष परिचय असल्याने आणि त्यांचा बंगाली भाषेचा प्रदीर्घ व्यासंग माहित असल्याने अनुवाद उत्तम असणारच याची खात्री होती.

वाङ्मयआस्वाद

गॉड पार्टीकल्स, समर्थ रामदास आणि गुगल ग्लास

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
12 Jan 2014 - 7:04 pm

दृश्य १:
कुठे आहे तुझा तो देव/जगदीश्वर? जर तो सर्वत्र आहे तर मला ह्या खांबात का दिसत नाही? असे म्हणत ज्यावेळेला हिरण्यकश्यपुने(भक्त प्रल्हाद च्या वडिलांनी) खांबावर गदेने वार केला व खरोखर त्यातून भगवान "नृसिंह अवतारात" प्रगट झाले. पुढे काय झाले ते सर्वश्रुत आहेच. संदर्भ :श्रीमद भागवत कथा

काय भक्त प्रल्हाद एक शास्त्रज्ञ होता गॉड पार्टीकल्स शोधणारा? कि हिरण्यकश्यपु?
ही निव्वळ साहित्यकथा समजायची कि काही गूढ लपले आहे त्यात?
"नृसिंहपुराण" यात काही मुलतत्वे सापडतील का?

साहित्यिक ख़ज़ीना

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
7 Jan 2014 - 7:47 am

कवितांचा शोध घेता घेता, खरे पाहता एका सुर्हुदाच्या ओळखीतून पुढील खजीना सापडला.

http://www.belvalkarhousing.com/

या साइट वरती "ऐसी अक्षरे" नावाच्या नियतकालिकाचे काही अंक सापडले. शांता शेळके , बोरकर , जी ए, अरुणा ढेरे अशा अनेकानेक नामवंत साहित्यिकांच्या कथा, कविता, ललीत असा ख़ज़ीनाच हाती लागला आहे. एक एक डाऊन लोड करत वाचत आहे.

वाङ्मयबातमी

मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
5 Jan 2014 - 11:28 pm

यापूर्वीचा भाग: कुणी घडवून महाभारत? (भाग १)

नारदमुनी उवाच:
गंगेसारखी सर्वांगसुंदर, कामनिपुण भार्या आणि उत्तम लक्षणांनी युक्त असा एकुलता एक पुत्र देवव्रत यांच्या वियोगाने शंतनु फार कष्टी झाला. अशी काही वर्षे गेल्यावर एक दिवस गंगा देवव्रताला घेऊन शंतनुकडे आली, आणि मुलाला बापाचे स्वाधीन करून वनात परतली. देवव्रत आता चांगला सुदृढ, बुद्धीमान तरूण झालेला होता. त्याच्यावर राज्याची धुरा टाकून शंतनु पुन्हा मृगया आणि भोगविलासात रमला.

संस्कृतीकलावाङ्मयमौजमजाप्रकटनविरंगुळा

चोरी झाल्याचा आनंद

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
31 Dec 2013 - 12:24 pm

घरी चोरी झाली तर आपल्याला दु:ख होते. चोरी का झाली? चोरी टाळता आली असती का? आपली लापरवाही अथवा लापरवाहीचे खापर घरातल्या कुणाच्या तरी डोक्यावर आपण फोडतोच. घरच्या सर्वाना चोरीपेक्षा चोरीचमुळे वाव-विवादांचा त्रास जास्त होतो. शिवाय पोलीस, शेजारी, मित्र-मंडळी इत्यादीचा ही त्रास होतोच. शेजार-पाजार्यांना फालतू चर्चे साठी एक विषय मिळतो.

वाङ्मयआस्वाद