वाङ्मय
टिकले तुफान काही
टिकले तुफान काही
ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही
निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही
देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही
संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही
उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही
तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही
कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही
कुणी घडवून आणले 'महाभारत'?
मदनकेतु उवाच:
प्रेमचंदांची "ईदगाह"
मी आठवीत असताना, त्यावेळी दूरदर्शनवर मेट्रो नावाचं एक चॅनेल असायचं त्यावर दर सोमवारी, संध्याकाळी सहा वाजता एक मालिका लागायची - "सुनो कहानी". त्या मालिकेचं शीर्षकगीत मला अजूनही आठवतेय "ना कोई राजा ना कोई राणी दिल कहता है दिल की जुबानी। … सुनो कहानी"
जिमी (पूर्वार्ध)
नव्या नोकरीचा पहिला दिवस नेहेमीच जरा भीतीदायक असतो. काम जमेल का? सहकारी कसे असतील? हजार प्रश्न. त्या नोकरीच्या वेळी तर धोपटमार्गा सोडून मुद्दाम बिकट वाटेची वहिवाट करायला घेतली होती. आमच्या सत्तावन पिढ्यांत कोणी हॉटेलात नोकरी केली नव्हती. मीही तसा कारकुनी पेशात असल्यामुळे करण्याची शक्यता नव्हतीच, पण या हॉटेलाने नोकरी देऊ केली, म्हटलं बघूया तरी कसं असतंय.
संशयास्पदरीत्या चहा प्यायल्याबद्दल अटक...............
कोल्हापुर पोलीसानी एका ४९ वयीन इसमास संशयास्पद रीत्या चहा पिण्याअबद्दल अटक केली. त्याबद्दल न्यायालयाने त्याना फटकारले आनि संशयास्पदरीत्या चहा कसा पितात ते दाखवुन द्या असेही सांगितले.
मटा मधील बातमीचा भाग कॉपी करतोय
" संशयास्पदरित्या चहाचे घुटके घेतल्याचे कारण देत ४९ वर्षीय इसमाला अटक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. 'चहा कसा प्यावा याबद्दल कोणताही कायदा काहीही सांगत नाही. प्रत्येकाची चहा पिण्याची वेगळी स्टाईल असू शकते. त्यात संशय घेण्यासारखे आणि चुकीचे काय आहे,' असा सवालही न्यायालयाने केला".
बसा की एकदा खुर्ची वरती
कसला राव विचार करता
बसा की एकदा खुर्ची वरती
तोडा आकाशीचे तारे
पूर्वा हौस जनतेची.
विजेची बिल कमी करा
मुफ्त मध्ये पाणी द्या
दाखविलेले स्वप्न जनतेला
तोडू नका हो राव तुम्ही.
पुकारते ही खुर्ची कसी
होऊ नका हो वनवासी
औलीयाची श्रापित वाणी
करू नका हो पुन्हा खरी.
औलिया: निजामुद्दीन औलिया "दिल्ली दूर आहे- असा त्यांनी बादशाहला श्राप दिला होता". तो खरा ठरला. तेंव्हा पासून ही म्हण प्रचलित आहे.
दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका
दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका
इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥
पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥
तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान
प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत.
लाल निळ्या रंगाचा इंगा
लाल निळ्या रंगाचा इंगा
तंजावूरच्या तमिल विश्वविद्यालयाचा भव्य प्रांगण. ओकसर व मी तेथील मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटच्या हेडना भेटायला आम्ही जूनच्या घामफोडू गरमीत डॉ. अदियमन यांच्या ऑफिसचा शोध घेत दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो; चौकटीच्या बुशकोटातील व्यक्ती म्हणते झाले, 'येस व्हाट डू यू वांट?
' कम टू मीट यू सार.. '
ओके. टेल...