साहिर
कवि माझा मित्र होता.
मित्राच्या शब्दावर जीव टांगून ठेवायची आपली नेहेमीच तयारी होती.
तो म्हणाला
" मेरी वफ़ा का शौक़ से तू इम्तहान ले "*
मी माझ्या प्रार्थनेत ही ओळ उधार घेतली
आणि विधात्याने पण मान्य केली.
आता झालेल्या परवडीची दाद मागायला मित्र पण हाताशी नाही.
कविची आणि बावीची खोली न मापता जे त्यांना जवळ करतात ,
त्यांना बुडून मरणे ह्या खेरीज शिक्षेचे वेगळे कलम लावण्याची काय गरज आहे. ?
* साहिरच्या कविता आणि गाणी या संबंधी या निमीत्ते काही चर्चा व्हावी .
*संजोपरावांचे आभार.