बखरींची सांगी अन पुराणातली वांगी
तर्क क्रमांक (अर्ग्यूमेंट) १)
मुळात अबकडकालीन पुरावेच कमी आहेत. त्यामुळे निष्कर्ष आणि संदर्भ केवळ नंतर उपलब्ध झालेल्या बखरीतुन आणि दस्तावेजातुनच मिळु शकतात. जर तत्कालीन (प्रमाण) दस्तावेजच फक्त मान्य करायचे झाले तर बर्याच राजांचे अस्तित्वच नाकारायला लागेल आणि खुद्द अबकड-राजांबद्दल फार कमी माहिती मिळते. आणि मग त्या प्रवाहात तुम्हाला बर्याच सरदारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करावी लागेल. बखरीतील स्वतःला पाहिजे तेवडीच माहिती सलेक्टीव्हली नाकारणे बाकी स्विकारणे न्याय्य (फेअर) नाही. म्हणून बखरींमधील सर्व माहिती स्विकारली पाहिजे.