वाङ्मय

सेंसॉरशीप विषयी अवतरणे , अनुवाद आणि सुयोग्य मराठी शब्द इत्यादी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Nov 2014 - 10:07 am

मराठी विकिक्वोट या अवतरण/ (सु)वचन प्रकल्पातील सेंसॉरशीप विषयासंबंधी लेख अद्ययावत करण्याच्या दृष्टीने

१) सेंसॉरशीपसाठी सुयोग्य मराठी शब्द परिनिरीक्षण, अभ्यवेक्षण कि मराठी भाषेने सेंसॉरशीप शब्द स्विकारला आहे आणि म्हणून लेख शीर्षक सेंसॉरशीप असणेच बरे असेल.

२) खालील वाक्यांचे मराठी अनुवाद हवेत.

निळे फुलपाखरू - घरात घडलेली सत्य घटना.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
23 Nov 2014 - 1:10 pm

सुमार पंधरा-सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट, छोटस घर, घरा समोर लहानस आंगण. पेरूचे झाड, मधुमालतीची वेल आणिक गमल्यांमध्ये असलेले गुलाब. सकाळ- संध्याकाळ चिमण्यांची चिवचिव, त्यांना दाणा घालण कधी कधी येणाऱ्या फुल पाखरां मागे धावण मुलांचा छंद.

वाङ्मयलेख

कथा लेखन

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
18 Nov 2014 - 5:15 pm

चांगली कथा कशी लिहावी ?

"आजकाल काही लिहित का नाहीस रे ?" कूठल्यातरी वेगळ्याच विषयावर चर्चा चालु असताना गिरिजाने अचानकच हा प्रश्न विचारला .
" आजकाल काही लिहित का नाहीस रे ? आधी काही ना काहीतरी लिहित असायचास ? कशा का होईना वादग्रस्त का होइना गोष्टीबिष्टी लिहायचास ... आता एकदमच बंद केलेलं दिसतय ... लिहिना एखादी चांगली गोष्ट "

ह्या संवादावरुन डोक्यात विचार चक्र सुरु झाले . आधी सुचायचे ते जसे च्या तसे लिहुन काढायचो , पण आता ते चांगले होईल का ह्या विचाराने लिहायचे टाळतो . पण खरंच एखादी चांगली कथा कशी लिहावी ?

एक अडनिड गावाची गोष्ट... १

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
14 Nov 2014 - 9:44 pm

ही कथा आहे का? नाही ही कथा नाही, पण जे काही घडले होते ते एखाद्या कथेतीलच असते. तर किती बरं झाले असते. असं झाले असते, तसे झाले असते असे म्हणून आता काय उपयोग! जे घडायला नको होते ते घडले होते. देवासारखी माणसं शैतानागत वागली म्हणायची की भूताने झपाटली म्हणून तशी वागली ते त्या बिरोबालाच ठाऊक. पण जे काही घडलं भयंकर होते, असे कधी घडेल आणि त्या पापाची फळे अशी येथेच भोगावी लागतील, याची किंचित जरी कोणाच्या मनात शंका आली असती, तरी हा अनर्थ टळला असता. पण...

वाङ्मयकथाप्रकटनलेखविरंगुळा

मला आवडलेली पुस्तके:विनोदी साहित्य

पुस्तकमित्र's picture
पुस्तकमित्र in जनातलं, मनातलं
12 Nov 2014 - 4:45 pm

रामराम मंडळी!
अात्मचरित्रांच्या धाग्याला तुम्ही दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!या भागात अापल्या अावडत्या विनोदी पुस्तकांबद्दल बोलुया.
जगण्याची मजा घ्यायची असेल,ताणतणाव विसरायचे असतील तर विनोदी साहित्य वाचण्यासारखा इलाज नाही.सूचक,मार्मिक विनोद,रोजच्या जगण्यातल्या विसंगतींवर बोट ठेवुन स्मितहास्य निर्माण करणा-या विनोदापासुन पोट धरुन हसायला लावणारे विनोद अशा सर्व प्रकारचं विनोदी साहित्य विविध पुस्तकांतुन अापण वाचलं असेल.त्याबद्दल इथे लिहुया!

वाङ्मयआस्वाद

कमल घर (एक वात्रटपणा)

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
29 Oct 2014 - 7:50 am

कमल घर
चार एक वर्षांपूर्वी मी "उपक्रम"वर हायकूवर एक लेख लिहला होता.नेहमीच्या ५-७-५ या तंत्राची माहिती दिल्यावर कवी श्री. राजेश घासकडबी यांनी एक पृच्छा केली

कमल घर
बघ कमल घर
कमल बघ

वाङ्मयविरंगुळा

चेतन भगत आणि त्याची पुस्तकं

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
25 Oct 2014 - 9:57 pm

रेल्वे स्टेशनवरची पुस्तकांची दुकानं हा एक वेगळाच प्रकार आहे. नेहमीची वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांशिवाय इतरही बरीच ' इंटरेस्टिंग ' पुस्तकं तिथे दिसतात. स्पर्धा परीक्षांची पुस्तकं; काॅमिक्स; ' हाऊ टू ' प्रकारातली पुस्तकं; वशीकरण, इंद्रजाल, लाल किताब असले डोक्याला शाॅट असणारे प्रकार; पाककृती; चाणक्यनीती; अकबर-बिरबल वगैरे भरपूर मालमसाला या स्टाॅल्सवर बघायला मिळतो. एकाच ठिकाणी मुन्शी प्रेमचंद आणि सुरेंद्र मोहन पाठक सारख्या दोन टोकाच्या लेखकांच्या कादंब-या तुम्हाला रेल्वे स्टेशन स्टाॅलवरच सापडतील. ज्याला टाईमपास लिटरेचर म्हणून अभिजनवादी नाकं मुरडतात, त्यातलं बहुतांशी वाङ्मय इथे मिळतं.

वाङ्मयमत

भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
20 Oct 2014 - 4:07 pm

भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे.

हायकू - २

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
18 Oct 2014 - 11:23 am

हायकूवरील पहिल्या लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला व अनेकांनी स्वरचित हायकू दिले म्हणून आता दुसर्‍या भागात हायकूचा जरा खोलात विचार करू..पहिल्या लेखात सांगायचा राहिलेला एक सोपा नियम बघा पहिल्या-तिसर्‍या अथवा दुसर्‍या-तिसर्‍या ओळीत यमक पाहिजे. एकच यमक जुळवावयाचे असल्याने सोपे आहे. मराठीत ५-७-५ ही भानगडच नसल्याने प्रत्येक ओळीतील शब्दसंख्या कमी जास्त होते. हरकत नाही. पण त्या रचनेत "लय" पाहिजेच. स्वत:शीच गुणगुणले तरी लय आहे की काही बदल पाहिजे हे लगेच कळेल. शब्दसंख्या मर्यादित असल्याने त्यांची निवड करतांना जास्त काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक शब्दाच्या जवळच्या अर्थाच्या छटा दाखविणारे अनेक शब्द असतात.

वाङ्मयआस्वाद