मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

माझ्या आठवणी

प्रणया ·
लेखनविषय:
मिटलेल्या नयनांची ओलावते पापणी आसवांनी सांगितले न दिसे तू मज या क्षणी मग आठवणींचा पाऊस पडू लागला मनी अन् अधरांवर हास्याची अलगद सुरु झाली पेरणी चालले होते चार पाऊले, पावलांवर तुझ्या ठेऊनी न उरले तुझे असे काही, मज तुझ्यात सामावुनी मग वाटले, तुझ्या निश्चयी पाऊलखुणांना साथ देत होती माझ्या पैंजणांची गाणी न पाहता मज चालताना, काय पाहिले मागे वळूनी न बोलताच तेव्हा, शब्दांचे काम केले भावनांनी काय उमगले बोलणे तुझे, ना जानो मज त्यावेळी पण वाटले हाती न घेता हात, जोडले भाग्यरेखांनी पाहता हे सारे, पारव्याची कुजबुज वाऱ्याच्या कानी कोणते नाते यांचे, विणले जात आहे रेशीमधाग्यांनी समजावे सारे मज, एवढ्यात नाही

माय गे माय...

प्राची अश्विनी ·
काव्यरस
सक्काळपासूनच्या कौतुकाने हरखलेली माय मराठी दमून भागून जरा ओसरीवर टेकली. डोक्यावरचं संदेशांचं, भाषणांचं, योजनांचं ओझं उतरवलं. गळ्यातले हारतुरे काढून बाजुला ठेवले. पिशवीतला श्रीखंडाच्या गोळ्यांचा डब्बा पुन्हा घडवंचीवर ठेवत पुटपुटली, "एवढा मोठा सोहोळा झाला ,सगळी पोरं जमली पण नातवंडं काही भेटली नाहीत. "

नव्या वादळी नाव हाकारतो

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
कुठे भेदूनि दाट अभ्रांस थोडा फिका चंद्र क्षणमात्र तेजाळतो निळी पेटती रेष रेखीत गगनी अनामिक उल्केस बोलावितो भणाणून आवर्त झोंबे शिडांसी सुकाणू दिशाहीन कैसे फिरे पुन्हा का अकस्मात तारा खुणेचा कुणाला न ठाऊक कोठे विरे जिभा अंध:कारास फुटती हजारो तशी गाज ह्या सागराची उठे रोरावती मत्त लाटा अनादि किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे उद्याच्या उषेचीच आता प्रतीक्षा उद्याच्याच सूर्यास मी जाणतो तमाची तमा नाही आता जराही नव्या वादळी नाव हाकारतो

जगणं कळेल तेव्हा ........

फिझा ·
लेखनविषय:
जगणं कळेल तेव्हा ... ........ रोजचा दिवस नव्याने उगवायचा पण जगायचं तसंच रोज रोज दिवसामागून दिवस अन कैक वर्ष कोरडेच पावसाळे अन बेचैन उन्हाळे कशासाठी ? जगण्यासाठी ? एक एक क्षण फक्त जगून निघालेला, प्रत्येक श्वास ओढून घेतलेला हा जगण्याचा अट्टहास तरी किती ? ना कुणी सखा ना कुणी सोबती एकट्याने चालायची ही अखंड वाट कशासाठी ? जगण्यासाठी ? उद्या कधी उगवूच नये अशी रात्र अंधार आत आहे कि बाहेर रुक्ष दुरून एखादं पाखरू कोलाहल करेल तर जिवंत आहोत असं जाणवेल त्या इवल्या जीवाचाही हेवा वाटावा कशासाठी ? जगण्यासाठी ?

भावनांचा मेळ

प्रणया ·
लेखनविषय:
जपून खेळायचे असतात शब्दांचे खेळ चुकतो ठोका हृदयाचा जेव्हा त्यात घालताच येत नाही भावनांचा मेळ जर नेहमीच मन हलके शब्दांनीच केले असते अंतरीच्या अबोल भावनांचे अर्थ नयनांच्या भाषेने कोणी सांगितलेच नसते म्हणे रुचतात गोड बोल, सात्विक चेहेरे मनाला सर्वांत आधी पण प्रेम तर त्यावरही करतो ज्याला पहिलेच नाही कधी गमावलेल्या गोष्टी शोधण्यातच आनंदाचे गुपित जर दडलेले असते जे नव्हतेच कधी आपले ते शोधण्यासाठी जीव झुरलेच नसते वाटते सोबत सर्वांना असावी प्रियजनांची नेहमी दुःखच विरहाचे स्वप्नांतही नकोसेच असते जर रोजच चांदण्यांचा साथीने चंद्रप्रकाशाने मनास न्हाऊ घातले असते तर सांगा ना तेव्हा कलेकलेने वाढलेल्या पु

मुक्या पाखरा

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
मुक्या पाखरा नको जाऊ तिच्या गावी ओघळणाऱ्या आसवांना प्रीत ना ठावी स्वप्नातले चांदणे विखुरले सभोवती जखमांवरची मेहंदी पुन्हा रंगून जाती कंठात माझ्या फुटती ओळखीचे हुंदके उमलत्या स्पर्शांचे रंग झाले फिके गंध तुझे गेले वेचून वारे जळत्या वेदनांचे उठले काळजात शहारे

अभ्यास चालू आहे

डॉ.नितीन अण्णा ·
लेखनविषय:
पुन्हा नव्या दमाने जातो कधी हसाया दुखणे जुनेच पुन्हा मग लागते दुखाया करून फस्त कणसे उडून गेले पक्षी होतील चालू आता ह्या गोफणी फिराया येतील न ते नक्की घेवून लिंबूपाणी उंची उपोषणाची जाया नको ही वाया सांभाळ लक्तरे तू धडूते तुझ्या कुडीची अभ्यास चालू आहे त्याची गोधडी शिवाया क्रांतीचे गीत आता ओठात घे तुझ्याही झाल्या अति या गझला झाल्या पुऱ्या रुबाया - नितीन अण्णा

मातृभाषा

शिव कन्या ·
तू काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत हळूहळू लिहित जातोस, तेव्हा मी तुझे राजस हात लोभस डोळे पहात राहते. तुझ्यात इतका जीव का गुंतावा? तू माझ्या हातांचे देवनागरी चुंबन घेऊन म्हणावे, मातृभाषा कि काय तिच्यातच जीव अडकतो बघ, आई गंssss म्हटल्याशिवाय प्राणसुद्धा जात नाही.... शाईचे बोट धरुन तू परत रात्रीच्या शांतप्रहरी काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत तुझेमाझे हितगुज हळूहळू लिहित राहतोस... शिवकन्या

पुन्हा एक स्वातंत्र्यासाठी..!!

परशुराम सोंडगे ·
लेखनविषय:
***************** अजून एका स्वांतञ्यासाठी....!! ************************* मातीची महती गात. तुक्याचे अभंग घोकत. रक्ताचं पाणी करतं नुसता घाम गाळत राहूनचं रान हिरवं गार करायचं पण मातीचं तरी मोल असत का आमच्या जिण्याला तुमच्या बंगल्यातल्या कुत्र्या इतकं ही नशिबवानअाणि महत्वाचं अाम्ही असू नाही तरी या देशाचा शेतकरीराजा अाहे असं समजून हा देश क्रषीप्रधान अाहे म्हणून नुसत्या टिरी बडवून का घ्यायच्या? शेती तंत्रज्ञान , नवीन शोध,कार्यशाळा वैगेर असे खास थाट करून भाषण छान होतील पण रान नसतात पिकत अशा क्रत्रीम अवसानाने अाणि हे समजून घ्या तज्ञाच्या मेंदूला राबवून नाही निघत घाम नि रक्ताचे ही नाही होत पाणी घ

काही त्रिवेणी रचना...

राघव ·
लेखनविषय:
काव्यरस
सहज विचार करतांना उतरलेले हे काही शब्द.. ============ सांगायचं कसं अन् लिहायचं कसं.. मनांतलं शब्दांत मांडायचं कसं? त्या अग्नीपंखाचा तुटक्या पंखांना सवाल, "आता उडायचं कसं?" ============ लहान मुलं आणि त्यांची निरागसता.. वेड लावणारं त्यांचं निष्पाप मन.. पारिजाताच्या फुलांसारखं नितळ विश्व! ============ प्रयत्नांची कास सोडू नये.. कामनांची आस धरू नये.. ईच्छा अर्पण करावी.. निष्काम कर्म करावं.. गुंतागुंत आणि परस्परविरोध ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात! ============ केवढाली कपाटं आणि पुस्तकांची आरास..