सहावि सातवित असेन..बहुतेक
सहावि सातवित असेन..बहुतेक
उन्हाळयाच्या सुट्या चालु झाल्या होत्या..
आमचे १०-१२ मित्रांचे टोळके बाळ पुंडलीक मित्राच्या वाड्यात दंगा करायला जमले होते...
वाडा चौसोपि व.मोठा. .. आत एक विठ्ठल मंदिर हि होते..सभामंडपात सारे जमलो होतो..
गप्पा चालु होत्या.. "अन आपण नाटक करु यात का?".चंद्या घाटपांडे म्हणाला..
सा~यांनी कल्पना उचलुन धरली.. पण कोणचे? .कुणालाच सुचेना
शेवटी "तुच एखादे नाटुकले लिहि..असा मला आग्रह झाला..
मित्रांच्या विश्वासाचा अन अज्ञानाचा फायदा घेत मी पण हो म्हटले..
रात्री विचार करीत अश्वथाम्याच्या कथेवर एक छोटे नाटुकले लिहिले...