संस्कृती

महाराष्ट्र दिन २०१६ लेखमाला

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
8 Apr 2016 - 2:31 am

नमस्कार,

समस्त मिपाकरांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!!

तर या नवीन वर्षात नवीन उपक्रम घेऊन येत आहोत १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने.

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा।

अशा आपल्या महाराष्ट्र देशाच्या काल आज आणि उद्याचा आढावा, महाराष्ट्राचे देशाला योगदान हे या निमित्ताने मिपावर यावे या हेतूने साहित्य संपादक मंडळ घोषित करत आहे महाराष्ट्र दिन २०१६ लेखमाला.

या उपक्रमात खालील विषयावर लेख लिहून मिपाकर भाग घेऊ शकतात.

संस्कृती

ताल

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
3 Apr 2016 - 9:37 pm

ठाक ठण्ण ठाक आवाजाने विजू उठला, भीमसू बारक्या पितळी हातोडीनं संबळ ठोकत होता. बापाला कितींदा सांगितलं अंधाराचं दिवाबत्ती तर कर म्हणून. आयकायचं रक्तातच नाही. गार पाणी डोक्यावर ओतून विजूने कापडं हुडकायला सुरुवात केली. शाळेचा गणवेशाच्या चड्डीवरच मंडळाने दिलेला शर्ट घालूस्तवर भीमश्या कवड्यानी सजलेली अन कुंकवानं माखलेली पडशी घेऊन बाहेर झाला. पहाटेच्या अंधारातच बापलेकानी देवळाच्या बाहेरुन हात जोडले. देवडीचा चिंचोळा जिना चढून बसताच गाभारा उजळलेला दिसला. हरीभटजी काकड्याला सुरुवात करायला अन चौघडा वाजायला गेली ५० वर्शं तरी खंड पडलेला नव्हता.
..

संस्कृतीप्रकटन

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
1 Apr 2016 - 5:46 pm

नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली.

संस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयसाहित्यिकराजकारणप्रकटनलेखमतविरंगुळा

अजून एक बार..

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
29 Mar 2016 - 10:41 pm

गेल्या उन्हाळ्यातली एक दुपार. टळटळत होते. बाईक घेउन निघालं.
एरवी गावात आंब्या-चिंचेखालची पोरं किंवा आईस्क्रीम-कुल्फीवाला सोडल्यास विशेष लगबग नसेल. बळीराजा रानावनात झोपलेलं. दुपारचे दोन वाजत आलेलं. रस्त्यावर चिटपाखरु नव्हते. गाव नेहमीसारखंच आळसावलेलं. संध्याकाळी अजून काही कामे होती. म्हणून या भेटीकरता दुपारच उत्तम म्हणून निवडलेलं.

मॅडम एका बसस्टॉपवर बसलं होतं. मला बघताच स्माईल करत उठलं. कानातले हेडफोन काढून मोबाईल पर्समध्ये ठेवलं. 'हाय' म्हणून हस्तांदोलन केलं चक्क. (असो..!)

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतमौजमजाआस्वादलेखविरंगुळा

पर्वचा

विद्यार्थी's picture
विद्यार्थी in जनातलं, मनातलं
28 Mar 2016 - 7:28 am

आम्ही लहान असताना घरातील वयस्कर मंडळी (बहुतेकवेळा आजी) दिवेलागणीला आमच्याकडून पर्वचा म्हणून घेत असे. पर्वचा झाल्यानंतर मराठी वार, मराठी महिने, मराठी तिथी वैगेरे घोकून घेतले जाई. जसे मोठे झालो तसे त्यात पाढेसुद्धा सुरु झाले होते.

पर्वचा म्हणण्याची परंपरा अलीकडे लोपच पावली आहे असे म्हणता येईल (अगदी माझा मुलगासुद्धा हे काही करत नाही आणि घरात आजी-आजोबा नसणे हे कारण त्यामागे असू शकते.)

संस्कृती

द्रौपदी वस्त्र हरण

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
27 Mar 2016 - 11:14 am

आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही.

संस्कृतीविरंगुळा

मेट्रो प्रवासात मनुस्मृति वर चर्चा - ब्राम्हण आणि शुद्र

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
25 Mar 2016 - 11:01 am

आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल.

संस्कृतीआस्वाद

पूर्वी

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
23 Mar 2016 - 11:17 am

पूर्वी म्हणे जग फार फार छान होत
पिंपळाला सोन्याचं खर खर पान होत

पूर्वी म्हणे विमान आमचे आकाशात उडायचे
धनुष्याच्या लढाईनंतर तिथून फुलं पडायचे
बाण घेवून आमचे ऋषी समुद्राला नडायचे
साध्याश्या गाईसाठी पण राजाशी लढायचे

पूर्वी म्हणे शेतात सकस अन्न पिकायचे
बालपणी बचावलेले शंभर वर्ष टिकायचे
एका एका गर्भाचे शंभर क्लोन करायचे
मोठे मोठे राजे साध्या क्षयाने मरायचे

आत्ता आत्ता चाळीत माणुसकी नांदत होती
रोज सकाळी नळावर पाण्यासाठी भांडत होती
आपल्या वाट्याची मिलो प्रेमाने कांडत होती
भरलेल्या एसटीमधून गावो गाव सांडत होती

संस्कृती

आंतरजातीय विवाह

निकुंज's picture
निकुंज in जनातलं, मनातलं
22 Mar 2016 - 10:08 am

काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला.

धोरणमांडणीसंस्कृतीइतिहासप्रकटनविचारप्रतिक्रियासमीक्षाअनुभवमतसल्लामाहिती

होळी रे होळी

विद्यार्थी's picture
विद्यार्थी in जनातलं, मनातलं
20 Mar 2016 - 11:11 am

चहा पिताना नजर सहजच कालनिर्णयवर पडली आणि बुधवारी होळी आहे हे लक्षात आले आणि मन लहानपणच्या आठवणींमध्ये गेले.

"चला रे होळीची वर्गणी गोळा करूयात", देशपांड्यांचा मिलिंद ओरडला. "किती मागायची वर्गणी यावर्षी? पंचवीस रुपये मागूयात, माहितीयेना मागच्या वर्षी पैसे कमी पडले होते?" मिल्या बोलतच होता.

"ए मिल्या तुझा बाप दहा रुपये द्यायला खळखळ करतो आणि तू पंचवीस रुपयांच्या गोष्टी करतोयस", माझा टोमणा. "वीस रुपये मला ठीक वाटतात". ठरले तर मग, यावर्षी वीस रुपये वर्गणी. चार चार जणांनी कॉलनीतली एक एक इमारत वाटून घेतली.

संस्कृती