विचार

पैठणी दिवस भाग-१

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in जनातलं, मनातलं
3 Aug 2017 - 7:48 pm

झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.

कथासाहित्यिकkathaaप्रवासशिक्षणमौजमजाविचारलेखअनुभवमतआरोग्यविरंगुळा

श्री महेश गिरी आणि श्री विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचे अभिनंदन.

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
1 Aug 2017 - 11:27 pm

वर्षां पासून "शिक्षणाचा अधिकार कायदा" रद्दबातल करावा आणि ९३वी घटनादुरस्ती रद्दबातल करावी ह्यावर आमचे बरेच काम चालू आहे.

ह्या संसदीय सत्रांत ह्या दृष्टीने बरीच प्रगती झाली (थोडी का असेना पण प्रगती आहे).

भाजपचे श्री महेश गिरी ह्यांनी खाजगी बिल आणून ९३वी घटनादुरुस्ती रद्दबातल करण्याची मागणी केली.

http://www.sadhana108.com/2017/07/23/mahesh-giri-bjp-shows-courage-no-one-mantris/

समाजविचार

भेट हवी की भेटवस्तू ?

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 Aug 2017 - 12:55 pm

सुमारे ४० वर्षांपूर्वीचे लग्नसमारंभ आठवतात का पाहा. लग्न लागल्यानंतर वधूवर मंचावर बसत आणि मग लोक त्याना भेटायला येत. तेव्हा लग्नाला आलेला प्रत्येक पाहुणा हा त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊनच येई. वधू आणि वराच्या बाजूस प्रत्येकी एक जवळचा माणूस वही घेऊन बसलेला असे. पाहुण्याने वर किंवा वधूच्या हातात ती वस्तू दिल्यावर ते ती बाजूस बसलेल्या माणसाकडे देत. मग तो त्या वस्तूची व्यवस्थित नोंद (कुणी दिली यासह) त्याच्या वहीत करत असे. एक प्रकारे हा माणूस वधू अथवा वरपक्षाचा ‘ रोखापाल’ च असे ! कार्यक्रम संपेपर्यंत तो हे काम चोख बजावी आणि अखेरीस तो सर्व ‘हिशेब’ ज्या त्या यजमानाच्या स्वाधीन करे.

संस्कृतीविचार

चॅलेंज भाग 1

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
1 Aug 2017 - 12:53 pm

तिघंही ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला कॅफेत पोहोचले. “ही अवनी तर कधीच वेळेवर येणार नाही. मीरा फोन कर तिला, बघ किती वेळ आहे” शौनकने वैतागून म्हटलं. हात खांद्यान्मागे ताणून आळस देत तो पुढे म्हणाला, “I am knackered. घरी जाऊन झोपायचंय मला.”
“कोणाला कापत होतास?” दिगंतने हसून विचारलं.
“कापायला वेळ लागत नाही रे, जोडायला वेळ लागतो” शौनकने उत्तर दिलं.
“अवनी अर्ध्या तासात पोहोचतेय. ट्रॅफिकमधे अडकलीये म्हणाली.” मीराने मोबाईल खाली ठेवत या दोघांना सांगितलं.

वाङ्मयकथासाहित्यिकविचारलेखविरंगुळा

मादाम तुसॉ ह्यांना पत्र

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
30 Jul 2017 - 11:46 am

माननीय व्यवस्थापक,
मादाम तुसॉ वॅक्स म्यूझियम,
मुक्काम पोस्ट लंडन

पत्र लिहिणेस कारण कि परवाची बातमी. तुम्ही आमच्या अतिशय लाडक्या मधुबाला चा मेणाचा पुतळा बनवणार आहात म्हणे! साक्षात विधात्याला पुन्हा इतकी सुंदर स्त्री घडवणे जमले नाही. त्याने माधुरी बनवून पाहिली, गेला बाजार कतरीना देखील केली. पण मधुबाला ची सर काही त्यांना आली नाही.

धोरणविचार

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
29 Jul 2017 - 2:04 pm

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

कलासंगीतधर्मकृष्णमुर्तीप्रकटनविचारआस्वाद

लहानपण देगा देवा!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
24 Jul 2017 - 12:54 pm

लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।।

तुकाराम महाराजांच्या या अभांगाच्या पहिल्या दोन ओळी अनेक मोठी माणसे म्हणताना आपण बघतो. विशेषतः जेव्हा जुने मित्र-मैत्रिणी भेटतात त्यावेळी जुने दिवस; लहानपणच्या आठवणी जागवल्या जातात; तेव्हा हमखास परत एकदा लहान व्हावं असं आपल्याला वाटतं. किंवा मग कामाचा, भावनांचा खूप भार होतो तेव्हा या जवाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन परत एकदा लहानपणच निरागस आणि जवाबदारी नसणार आयुष्य जगावं असं वाटतं.

मांडणीविचार

लोकल मधले लोकल्स.

रघुनाथ.केरकर's picture
रघुनाथ.केरकर in जनातलं, मनातलं
20 Jul 2017 - 3:05 pm

असाच एक कुठलासा सोमवार होता, संध्याकाळचे ६.३० होउन गेले होते, मी पावसाचं कारण सांगुन ऑफ़ीस मधुन मोठ्या उत्साहात लवकर पळालो होतो. पण स्टेशन वर येताच पावसानी त्यावर पाणी फ़िरवलं होतं. घाटकोपर स्टेशन च्या १ नंबर फ़लाटावर प्रवांशाचे उधाण आले होते. पहील्या प्रयत्नात गाडी मिळेल ह्याची शक्यताच नव्हती. किमान ३ -४ गाड्या सोडाव्या लागणार होत्या. ते कमी झाले म्हणुन की काय वरुन वरुण राजा बरसत होता. का कुणास ठावुक पण असे वाटतं होत की सगळे डाउन वाले प्रवासी फ़क्त स्लो लाइन वरुनच प्रवास करु इच्छीत होते.

हे ठिकाणजीवनमानमौजमजाप्रकटनविचारलेखअनुभव