स्ट्रारबॉय
सध्या ज्या गाण्याने मला वेड लावलं आहे ते म्हणजे स्ट्रारबॉय चे द वि़केंड...
या चार्ट बस्टर गाण्याचे संगीत मनात पार घर करुन बसले आहे, तर जगात या गाण्याने अक्षरः धुमा़कुळ घातला आहे !
सध्या ज्या गाण्याने मला वेड लावलं आहे ते म्हणजे स्ट्रारबॉय चे द वि़केंड...
या चार्ट बस्टर गाण्याचे संगीत मनात पार घर करुन बसले आहे, तर जगात या गाण्याने अक्षरः धुमा़कुळ घातला आहे !
पांढरे हत्ती
आमच्या देशात शेतीच्या क्षेत्रात अनेक पांढरे हत्ती उभे राहीलेले आहेत. त्यांचा नेमका उपयोग काय हा प्रश्न सामान्य शेतकर्याला नेहमी पडतो.
या संस्थांना सरकारची आर्थिक मदत मिळते. चतुर्थ श्रेणी कर्मचार्यापासून अति उच्च पी. एचडी झालेले अधिकारी मिळतात. त्यांना सरकारकडून भरपूर पगार मिळतो. नोकरीनंतर पेन्शन मिळते. गाड्या बंगले याचाही खर्च सरकार करते. निरनिराळ्या परिसंवादांमधे देश विदेशात हे लोक भाग घेतात. त्याचा जाण्या येण्याचा खर्च या लोकांना करावा लागत नाही.
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही. मात्र, स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात हे दोनदा घडले आहे. सन १९९१ मध्ये उदार वित्तव्यवस्थेची पायाभरणी केली गेली तेव्हा आणि सद्य निश्चलनीकरणाच्या कारवाईच्या वेळी.
मात्र, या दोन्ही कारवायांत "स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे" हा मूळ मुद्दा असला तरी या दोन कारवायांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे, या दोन वेळांच्या परिस्थितीचे तुलनात्मक विश्लेषण करण्याचा मोह झाला आहे.
१९९१ ची कारवाई
आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो.
---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------
पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस.
.
.
गाव : विदर्भातलं एक खेड
वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी
पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास.
रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी."
शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले."
"न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा. लौकर जा लागते सकायची बस गेली का त वडाप नायतर कोणाच्या तरी गाडीवर जा लगीन मले शहरात."
(Disclaimer- खालील लेख वाचण्यापूर्वी जे लोक शंकर महाराजांचे किंवा अन्य कोणत्याही महाराजांचे निस्सीम वगैरे उपासक आहेत त्यांनी तो वाचू नये किंवा आपल्या जबाबदारीवर वाचवा. भावना वगैरे दुखावल्यास अस्मादिक जबाबदार नाहीत.)
आजच्या इंग्लिश मिड डे या वर्तमानपत्रात एक पुर्ण पानभर मुंबईच्या विविध भागात घडलेल्या तीन घरातल्या बातम्या आल्या आहेत. त्यात २ बातम्या मध्ये शाब्दिक वादामुळे संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोला जीवे मारले तर एका मध्ये कौटुंबिक वादामुळे वेगळे झालेल्या नवऱ्याला आपल्या मुलांना भेटु न दिल्याने नवऱ्याने घेतलेला स्वतःचा जीव. आपल्यासाठी तरी हि नुसतीच बातमीच, वाचावी आणि सोडुन द्यावी. पण थोडे लक्ष दिले तर लक्षात येईल या तिनी बातमी मध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे कुटुंब- नवरा आणि बायको. एका दिवसात तीन कुटुंब उध्वस्त झाली. त्या तीन कुटुंबातल्या लहानग्याचे पुढे काय? हे एक यक्ष प्रश्न असेल आता.
पुरोगामी - प्रतिगामी
शाकाहार मांसाहार असे म्हटले कि लगेच माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian? हा प्रश्न लोक विचारू लागतात. आणि त्यावर आपापली मतही अभिनिवेशाने मांडू लागतात. आता Non Vegetarian चं भाषांतर अ-शाकाहारी असे काहीतरी होईल, मांसाहारी नाही म्हणून मुद्दाम वरच्या प्रश्नात तसे लिहिलेले आहे.आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाण टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. (मला कधी कधी कळतच नाही आपल्या धर्माचं, म्हणजे एकादशी,चतुर्थीला भाज्या पण चालत नाहीत पण हे उपरोल्लेखित प्राणीजन्य पदार्थ चालतात.