मुक्तक
एकटा जीव सदाशिव
अनोळखी शहरात 'एकट्याने' वास्त्यव्य करणं पण कधी कधी सुखाचं असतं. अट एकच खिसा भरलेला हवा. खर्च केलाच पाहिजे असं बंधन नाही पण चिंता नसावी. मग मन मारायची गरज उरत नाही. मन मानेल तसं निश्चिन्तपणे भटकवता येतं. मनाचा व्यायाम हा वेगळा न झेपणारा गहन विषय, आतातरी नको.
तर अनोळखी शहरात 'एकट्याने' आल्यावर life कसं शांत होतं. सुपरफ़ास्ट चालणारी गाडी एकदम पॅसेंजर होते. सुट्टीचा दिवस तर रेंगाळत रेंगाळत निघून जातो. धावपळीत अडकलेल्या जीवाला उसंत मिळते.
वेळ कसा Invest करावा याचा Sense असलेल्या एखाद्याला तर पर्वणीच वाटावी. काय छंद जोपासायचे ते जोपासा. कोणाचाच अडथळा नाही.
बाईपण भारी देवा
साक्षी
झुंजूमुंजूचे नभोनाट्य
क्षितिजावर रंगत जावे
सूर्यबिंब दवबिंदूंमधले
अलगद खुडून घ्यावे
त्या बिंदूंची रेष केशरी
लवलवती बनवावी
मावळतीची चांदणनक्षी
तिने हळू डहुळावी
स्पर्शाने अलवार विस्कटून
अवघी चांदणनक्षी-
-विरघळेल, त्या विरघळण्याला
एक विदेही साक्षी
विझणार्या सूर्यास्तबिंदूना
पश्चिम क्षितिजी टिपण्या
रिक्त ओंजळीत भरून घ्याव्या
मावळत्या चांदण्या
गतप्रभ नक्षत्रे अन् त्यातील
अगणित ह्या चांदण्या
तेज शिंपडित क्षितिजाखाली
जातील गात विराण्या
(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)
प्रेर्ना - मातीचे पाय
पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते
मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल
मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या
अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?
प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि
जीऐ मराठीतील मैलाचा दगड - जन्म शताब्दी वर्ष
दिव्याचे तेज, डोळ्यांचे वेज
कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी
कविता वाचीत आहे?
माझी उन्हे मावळली आहेत
माझी फुले कोमेजली आहेत
कालचा प्रकाश कालचा सुवास
मात्रा वेलांटीत शोधीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी
कविता वाचीत आहे?
आजची फुले आजच्या उन्हात
पाखरांचा शब्द पिकला रानात
माझी कविता तिथे वाचा
जिथे ती दिनरात घडत आहे
नराधम
नराधम
आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२.
पंढरीची वारी
महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. एकादशीची लगबग ,पहाटे उठून सगळ्यांनी दूरदर्शनवर विठ्ठल महापूजा भक्तीभावाने पाहणे.अशा अनेक आठवणी मांडता येतील.जाणतेपणा आल्यावर आषाढी वारी कुतुहलाने,अभ्यासाने,शिस्तबद्धता जाणण्यासाठी अनुभवण्याची आस लागतेच.संत साहित्याचा अभ्यास करणारे डॉ.सदानंद मोरे यांनी या विषयी अनेक प्रकारे जागरुकता सामान्यापुढे सोप्या भाषेत मांडला आहे आणि ते कायम यावर काम करत आहेत.अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात.
और तुम्हारे कंधे का तील..
तुझ्या नजरेतलं लाडीssक आमंत्रण स्विकारून,
गालावरच्या मिरीमिठाचा तो खरखरीत स्पर्श अनुभवत,
थोsडं खाली उतरलं की तुझ्या खांद्यावरचा तो एक धीटसा तीळ, खुणवून बोलवणारा.
त्याला आंजारायचं गोंजारायचं आणि मग तुझ्या पाठीवरून अजून खाली जायचं.
कंबरेवरच्या जुन्या व्रणांवर हळूच ओठ टेकवले की उमटणारी थरथर मुरवून घ्यायची अंगभर..
आणि मग ओठांनीच जोडत बसायचे तुझे सगळे तीळ.
अगदी निवांत...
जर थकले तर क्षणभर विसावायला असतोच की तुझ्या खांद्यावरचा तो हक्काचा तीळ..
....
मधेच मान वर करून पहावं तर मिशीतल्या मिशीत हसत
आभाळभर मायेनं मलाच निरखणारा तू..
आठ्या
प्रेरणा : ओळखा पाहू
कॉलेजात
झब्बा, जीन्स अन कोल्हापूरी
चप्पल घालून निवांत
हिरवळ पहात
गप्पा मारत
कट्ट्यावर बसायचो ते दिवस
अचानक आठवले अन
चला बरेच दिवसांत
कोल्हापूरी चप्पल आणली नाही
म्हणुन आणावी असे ठरवतो तोच...
बाबा, मला नवे बुट आणायचे आहेत पैसे द्या जरा
म्हणून पोराने हुकुम सोडला