मानस -रामनवमी उत्सव सन १९०५
मानस -रामनवमी उत्सव सन १९०५
स्थळ: थोरले राम मंदिर, गोंदवले
वेळ- सकाळी ६ची
मानस -रामनवमी उत्सव सन १९०५
स्थळ: थोरले राम मंदिर, गोंदवले
वेळ- सकाळी ६ची
मी नाही कुणाचा बाप
मी नाही कुणाचा आजा
रंग बदलतो मी वारंवार
कुंपणावरचा सरडा जसा
मी न कुणाचे खातो, ल्यातो
तो श्रीराम आम्हांला देतो
लळा जिव्हाळा नाती गोती
मी वेशीवर टांगून रहातो
नाही कुणाची पर्वा, आशा
नाही पुसले म्हणून निराशा
स्वानंदाचे टाळ घेऊन हाती
जगतो मी माझीच मिराशी
दिशा-कोन ढळले, सावरले,
...अथांग उरले,
रेणुबंध खिळखिळले, जुळले,
...अजोड उरले,
नक्षत्रे विझली, झगमगली,
...ओजस उरले,
चित्रलिपी अडली, उलगडली,
...अव्यक्त उरले,
अज्ञेयाच्या उंबरठ्यावर ज्ञात थबकले,
अदृष्ट दिसले.
इकिगाई
अर्थपूर्ण जगण्याचा सराव म्हणजे ईकिगाई
कॉफी___2
माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.
मानस - धुळवड
एक सांगू? उत्तरात नं, अलगद एक प्रश्न ठेवून द्यावा..
बासुंदीच्या वाटीवर कसं हलकं केसर पेरतो ना तसा.
मग संवादाला लाघवी स्वाद येतो, मोहक रंग चढतो,
दिवसभर चेह-यावर कळत नकळतसं एक हसू खेळत रहातं!
म्हणून तर! एक तरी प्रश्न उत्तरात असूच द्यावा ...
कारण हम्म् शी हम्म् असं किती वेळ चालणार?
स्माईली ला स्मायली असं किती वेळ खेळणार?
मारून मुटकून कवितेच्या, सुविचारांच्या मोळ्या तरी कुणी किती बांधणार ?
त्यापेक्षा उत्तरात अलगद एक प्रश्न असूच'च' द्यावा ...
मग कारण मिळतं, अकारण दार खटखटवायचं.
नाहीतर "बोलू की नको, आत्ता की मग? आवडेल की नाही?
काल पोराने ऑनलाईन मागवलेला अँपल चा एअरपोड आला. चेक करू म्हटले तर काय तंत्रज्ञान प्रगत झाले आहे याचा प्रत्यय आला. त्यात नॉइज कॅन्सलेशन चा पर्याय होता .आता नॉइज कॅन्सलेशन म्हणजे त्या एअरपोड मध्ये अशी काही रचना असेल कि ते कानात फिट बसतील अन बाहेरचा गोंगाट कमी होईल अशी माझी भाबडी समजूत.पण या एअरपोड ने तीला मूठमाती दिली.कारण कानात बसवल्या बसवल्या जेव्हा नॉइज कॅन्सलेशन चे ऑप्शन निवडले अन एकदम प्रचंड शांतता पसरली. बापरे हे मात्र जबरीच होते अन संगीत हि एकदम शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळत होते.अर्थातच इंग्लिश गाणी..आजूबाजूला असलेला गोंधळ कणभरही जाणवत नव्हता.मी प्रचंड प्रभावित झालो.