संस्कृती

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
18 Nov 2013 - 12:10 am

"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

संस्कृतीकलाधर्मपाकक्रियाइतिहाससमाजऔषधोपचारशिक्षणमौजमजासद्भावनाआस्वादलेखअनुभवमतवादविरंगुळा

नवे व्यवसाय

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
14 Nov 2013 - 10:04 am

शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानराहणीप्रकटनलेखअनुभव

संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

उद्दाम's picture
उद्दाम in काथ्याकूट
9 Nov 2013 - 7:30 pm

भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.

http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India

भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.

मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
9 Nov 2013 - 1:35 pm

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

संस्कृतीकलाधर्मइतिहाससमीक्षा

नियोग ही परंपरा असलेला समाज आणि विकी डोनर सिनेमा ची गरज !

कुमारकौस्तुभ's picture
कुमारकौस्तुभ in काथ्याकूट
5 Nov 2013 - 7:37 pm

विकी डोनर सिनेमा

विकी डोनर या चित्रपटात असे पात्र दाखविले आहे की ज्याचा व्यवसाय पैसे घेउन वीर्य विकणे हा आहे. आणि त्याच्या वीर्याचा वापर अपत्यहीन जोडप्यांना मुल व्हावे यासाठी केला जातो.या चित्रपटाद्वारे एक संदेश देण्यात आला आहे की अशा प्रकारे आपले वीर्य विकणे यात काहीही गैर नाही आणि याने अपत्यहीन जोडप्यांच्या आयुष्यात मुल यायचा मार्ग मोकळा होतो आणि त्यांचे जीवन आनंदी होते. चित्रपटाच्या शेवटी सर्वजण यातील नायकाच्या या कामाचे कौतुक करतात व त्याचा स्विकार करतात व चित्रपट वीर्यदान कशी चांगली गोष्ट आहे हे त्याचा अंगिकार केला पाहीजे हे ठसवितो.

हरवलेला विद्यर्थ

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
4 Nov 2013 - 4:44 pm

आपण रोज किती व्यक्तींना भेटतो; नव्या, जुन्या, नको, हव्या, अनोळखी, ओळखीच्या. कितींशी बोलतो, हसतो, काही देतो, घेतो. या प्रत्येकाच्या मनावर आपला ठसा, आपली ओळख कोरली जाते ते आपल्या वागण्यातून. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत, त्याच्या मनात आपली प्रतिमा, आपल्याबद्दल त्याचे विचार वर आपल्याशी त्याचं पुढचं प्रत्येक वागणं; हे आपण त्याच्याशी कसे वागलो, वागतो, यावरून ठरत जातं. आणि हे सूत्र व्यक्ती, तिचा सामाजिक दर्जा, तिची आर्थिक पत, जात, कुळ, धर्म, या सगळ्या गोष्टींपासून अबाधित आहे.

धोरणसंस्कृतीसमाजलेखअनुभवमत

सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
3 Nov 2013 - 8:42 pm

मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे.

संस्कृतीइतिहाससमाजप्रवासभूगोलमौजमजाअनुभवचौकशीविरंगुळा

पहीली आंगोळ

sश्रिकान्त's picture
sश्रिकान्त in जनातलं, मनातलं
2 Nov 2013 - 1:15 pm

आज दीवाळी. दीपावली म्हणल की स्रवात आदी लक्षात येते ती पहीली आंगोळ. काय थाट आसतो तीचा, बगा ना इतर वेळी आंगोळ करण्यात आणी दीवाळींच्या पहील्या आंगोळीत कीतीफरक असतो. इतर वेळी लोक करतात म्हणुन आपल आंगोळ करायची, साला तोच रेगुलर साबण घासघास घासायच पाणी ओतायच की झाली आंगोळ. पण दीवाळींची पहीली आंगोळ म्हणजे... सारवलेल आंगण, त्यात रांगोळी वर पाट ठेवलेल असत. पहाटेच मस्त वातावरण, आंगाळा सुहासीक ऊटण लावल जात. खास दीवाळी साठीच नवीन साबन काडलेला आसतो, मग तेे लाउन आंगोळ करायची, त्या नंतर आई कींव्हा बहीण ओवाळते तो क्षण सारच तअत सोहला आसतो.त्यानंतर देवा पुढे नमस्कार करुन फराळांवर ताव मारणे सार काही अद्भुत.

संस्कृती