कहे कबीरा (२)
कहे कबीरा (२) कबीराचे विचार
कहे कबीरा (२) कबीराचे विचार
आपण रोज किती व्यक्तींना भेटतो; नव्या, जुन्या, नको, हव्या, अनोळखी, ओळखीच्या. कितींशी बोलतो, हसतो, काही देतो, घेतो. या प्रत्येकाच्या मनावर आपला ठसा, आपली ओळख कोरली जाते ते आपल्या वागण्यातून. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत, त्याच्या मनात आपली प्रतिमा, आपल्याबद्दल त्याचे विचार वर आपल्याशी त्याचं पुढचं प्रत्येक वागणं; हे आपण त्याच्याशी कसे वागलो, वागतो, यावरून ठरत जातं. आणि हे सूत्र व्यक्ती, तिचा सामाजिक दर्जा, तिची आर्थिक पत, जात, कुळ, धर्म, या सगळ्या गोष्टींपासून अबाधित आहे.
मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे.
आज दीवाळी. दीपावली म्हणल की स्रवात आदी लक्षात येते ती पहीली आंगोळ. काय थाट आसतो तीचा, बगा ना इतर वेळी आंगोळ करण्यात आणी दीवाळींच्या पहील्या आंगोळीत कीतीफरक असतो. इतर वेळी लोक करतात म्हणुन आपल आंगोळ करायची, साला तोच रेगुलर साबण घासघास घासायच पाणी ओतायच की झाली आंगोळ. पण दीवाळींची पहीली आंगोळ म्हणजे... सारवलेल आंगण, त्यात रांगोळी वर पाट ठेवलेल असत. पहाटेच मस्त वातावरण, आंगाळा सुहासीक ऊटण लावल जात. खास दीवाळी साठीच नवीन साबन काडलेला आसतो, मग तेे लाउन आंगोळ करायची, त्या नंतर आई कींव्हा बहीण ओवाळते तो क्षण सारच तअत सोहला आसतो.त्यानंतर देवा पुढे नमस्कार करुन फराळांवर ताव मारणे सार काही अद्भुत.
आली दिवाळी ! आपण नेहेमीप्रमाणेच लक्ष्मीपूजन करणार. तसेही आपण एरवी लक्ष्मीचीच पूजा-अर्चना करत असतोच. लहानपणापासून ह्या ना त्या स्वरूपात आपलं लक्ष्मीपूजन सुरूच असतं. बालपणी आपण परीक्षेतल्या मार्क्सरूपी लक्ष्मीच्या मागे धावतो. मग चांगल्या कॉलेजच्या, मग नोकरी, प्रमोशन, चांगला जोडीदार, चारचाकी गाडी, ३ बीएचके फ्लॅट, मुलांसाठी प्रतिष्ठित शाळा, सेकंड होम... ही यादी न संपणारीच असते.
सकाळी सकाळी तिकडे जायची वेळ झाली, कि मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे नाडी सोडण्याचं, बांधण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल ? कधी वापरली असेल ?
आणि कशी बनवली असेल ? ... विशेषतः पायजम्याचं कौतुक वाटतं हो ,च्यायला कोणच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी कापडाच्या दोन भोंगळ्या करून त्या एकमेकांना शिवून टाकायच्या, त्यात तंगड्या घुसवून मग हे झुंबाड खाली सरकून जाऊ नये, पण योग्य वेळी पटकन सरकवताही यावे, म्हणून त्यात नाडी घालावी, बांधावी, सोडावी ?
माझे बालपण एका गावात बागडण्यात गेले. गावात तसे सगळेच सण पूर्वी उत्साहाचे वाटायचे. त्यात दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण इतका मोठा की पूर्वी दिवाळीच्या स्वागताला प्रत्येक घर जवळजवळ महिनाभर आधी पासून तरी सज्ज असायचं. त्यातून गावातील घरांच्या दिवाळीसाठी शहराच्या तुलनेने जास्तच तयारी असायची. घराची रंगरंगोटी डागडूगी करून रंगरंगोटी करायची. घरासमोर अंगण असायचं. ते अंगण कुदळीने उखळायचे. पाणी शिंपडून चोपणीने चोपायचे. येणारे बारीक-सारीक दगडही काढून टाकायचे. अंगणाची पातळी एकसमान करावी लागत असे. चोपायचा कार्यक्रम दोन-तीन दिवस तरी चालायचा.
दूरचित्रवाणीवर मोती साबणाची जाहिरात पाहीली ? तीच ती "उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली… " म्हणत पळणाऱ्या मुलाची ! किती छान ना ? जाहिरात फक्त १५ ते २० सेकंदाची मात्र संस्कृतीची आठवण देणारी… आजची दिवाळी बदललेची जाणीव करून देणारी !
हिंदु धर्म आणि शाप
हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. स्मित शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.
गणेशोत्सवाची धामधूम संपली. आता नवरात्रीची सुरु झाली. नवरात्रीचा संदर्भ प्रभू रामचंद्राच्या चरित्रातील रावणवध व लंकाविजयाशी जोडला जातो, पण तो प्रामुख्याने जोडला जातो तो देवीमहात्म्याशी. ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवांप्रमाणे दुर्गा-लक्ष्मी-सरस्वती या तीन देवतांकडे आपल्या जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांचे कारकत्व जोडले गेले आहे. देवी दुर्गेची उमा, सती, पार्वती, काली, चंडी अशी अनेक रूपे, त्या त्या वेळी तिने केलेले मोठया, बलाढय राक्षसांचे निर्दालन किंवा घोर कठोर तपश्चर्या यांच्या कित्येक कथा-पुराणांतून वर्णन केल्या आहेत.