संस्कृती

सुदामा

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
29 Aug 2013 - 12:04 pm

काय वर्णन करू, त्या पामराचे
सदनी दारिद्र्य, अठरा विश्वाचे
जाहला गृहस्थ, पाश गरिबीचा
स्मरे परंतु मेळा, गोकुळाचा ll १ ll

दशा वाईट, भविष्य होय अंध
उदर भरण्या, रोजचा आक्रंद
स्मरणात तरी, होता गोपालवृंद
इच्छा पाहण्या, पुन्हा तो मुकुंद ll २ ll

करुनी विचार, निश्चय केलासे
मनोमनी स्मरण, माधवाचे
भेटस्वरूप काय, मित्रास न्यावे?
कल्लोळ मनी, त्यास काय आवडावे ll ३ ll

घरात नाही, एकही उपलब्ध दाणा
कृष्णाचा मित्र, उगीच का रे म्हणा !
शिळे पोहे पुरचुंडी, घेतली शेवटी
त्याच्या ठायी, तीच शक्य होती ll ४ ll

संस्कृती

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
28 Aug 2013 - 9:50 pm

आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते. असो.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिज्ञा, दाभोळकरांचा मारुती आणि सान्ताक्लॉज

पुष्कर जोशी's picture
पुष्कर जोशी in काथ्याकूट
25 Aug 2013 - 6:13 pm

भारत माझा देश आहे।
सर्व भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि

बादशाही...!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
22 Aug 2013 - 1:44 am

आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो,आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली. "बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो. आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....!

संस्कृतीजीवनमानआस्वादविरंगुळा

विश्व स्वधर्मसूर्ये पाहो

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
21 Aug 2013 - 9:31 am

खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत.

संस्कृतीधर्मभाषासमाजजीवनमानराहणीशिक्षणप्रकटन

रक्षा बंधन स्पेशल...

पुष्कर जोशी's picture
पुष्कर जोशी in काथ्याकूट
20 Aug 2013 - 5:08 pm

मी पा वर एकही लेख नाही असे कसे ..... त्यामुळेच ...

आज रक्षा बंधन मराठीत राखी पौर्णिमा हो...
भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण..
ज्याने घर्माची बंधने कधीच तोडली आहेत ...
इतिहासात सापडेल....
मुख म्हणजे आज बहिणीने भावाला ओवाळायचे आणि भावाने तिला गिफ्ट द्यायचे... आणि म्हणायचे मी तुझी आजन्म रक्षा करेन असे आजचे आधुनिक स्वरूप... ह्याचाशीच मिळता जुळता सन म्हणजे भाऊबीज सेम म्हणजे ओवाळणी गिफ्ट वगैरे ....

पण ...

सद्याच्या परिस्थितीत मला काही प्रश्न पडलेत ...

यात्रा जत्रा काल आणि आज

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in जनातलं, मनातलं
19 Aug 2013 - 7:37 pm

जम्मू मधील सैन्य छावणीत (Caluchak) एक रात्र राहण्याचा योग २००२ साली आला होता. तेथील सर्व धर्म पार्थना स्थळ विशेष लक्षात राहिले ते तेथे भेटलेल्या एका धर्मगुरू मुळे. आज उत्तराखंड मधील आपत्ती नंतर त्यांची पुन्हा आठवण झाली. आमच्या अमरनाथ यात्रेला शुभेच्या देताना त्यांनी जे प्रबोधन केले तसे प्रबोधन भारतातील कोणी धर्मगुरू करेल का?
काय सांगितले होते त्या अवलियाने ?

संस्कृतीलेख

गंधांच्या स्मृती स्मृतींचे गंध.

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in जनातलं, मनातलं
19 Aug 2013 - 1:05 am

भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीचे व. पु. नी केलेले "जिंदादिल' रसग्रहण ऐकत पडलो होतो. "आहे स्मृतींचा गंध येथे....... असा शेर ऐकता ऐकता डोळा लागला. जाग आल्यावर स्मृतींचा गंध ,गंधांच्या स्मृती असे उलट सुलट काहीतरी आठवू लागले.आणि अचानक अनेक गंधांच्या आठवणी जाग्या झाल्या. अगदी पहिला स्मृती गंध आला तो मधुमालतीचा. अगदी लहानपणीच या फुलाशी परिचय झाला. खेडच्या लक्ष्मी नारायण मंदिरा भोवती बागडण्यात सारे लहानपण गेले. घराकडून देवळाकडे जाण्याच्या वाटेवर मार्च एप्रिल महिन्यात मधुमालती बहरलेली असायची. राम नवमीचे दिवस आले कि दिवस रात्र देवळातच असायचो. जाता येता मधुमालतीचा सुवास यायचा.

संस्कृतीसाहित्यिक