राजकारण

मिट्ट

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
24 Feb 2014 - 8:40 pm

गेल्या महीन्यापासून बघण्याचे डोक्यात असलेला एक माहितीपट बघायची संधी मिळाली... भारतीय निवडणुकांच्या हंगामात अमेरीकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एका राजकारण्याच्या व्यक्तीगत वर्तनाची एक झलक बघताना नकळत तुलना होते. अर्थात येथे कुठे कुणाला आदर्श समजत नसून आपण कुठले वर्तन मिस करत आहोत इतकेच डोक्यात येते...

नाट्यराजकारणप्रकटनमाध्यमवेध

भाई नाहीतर भाभी!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
21 Feb 2014 - 4:33 am

जातिवंत भ्रष्टाचारी, नराधम, असंस्कृत, गलिच्छ लालूप्रसाद यांनी भ्रष्टाचाराच्या आणि घराणेशाहीच्या कलंकांना एक नवी उंची गाठून दिली यात मला तरी शंका वाटत नाही. स्वतःला तुरुंगात (अर्थात व्ह्यायपी कोठडीत जिथे तुरुंग अधिक्षक स्वतः तंबाखू मळून द्यायचे म्हणतात!) डांबल्यावर न डगमगता आपल्या अर्धांगीला मुख्यमंत्री बनवले.
पुण्याचे सुप्रसिद्ध भ्रष्टाचारी सुरेशभाई कलमाडी हेही लोकसभा लढवण्यास उत्सुक आहेत. पण काँग्रेसने त्यांना पक्षातून निलं बित केले आहे. त्यामुळे तसे होणे अवघड वाटते आहे. मग आता त्यांची भार्या मीराभाभी अर्थात पुण्याच्या राबडीदेवी आता इच्छुकांच्या रिंगणात उतरल्या आहेत.

शिवरायांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने... मित्रांनो

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
19 Feb 2014 - 12:16 pm

मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाचे संस्मरण सकाळ मधील अप्रतीम लेखाने या झाले. महाराजांच्या रयतेसाठी मनात असलेल्या सुयोग्य शासनाच्या संकल्पना साकार करायला आपल्याा सारख्या इतिहास संशोधकाने विविध प्रकारे प्रेरणा द्यावी. ही विनंती.
काही वर्षांपूर्वी प्रताप गडावरील भेट व चर्चा यांच्या आठवणी ताज्या झाल्या. विंगकमांडर शशिकांत ओक.
... असे तिथे दिलेल्या प्रतिसादातून म्हटले आहे...

धोरणसमाजराजकारणसद्भावना

मिस्टर प्रामाणिक

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
15 Feb 2014 - 11:08 am

मी अत्यंत प्रामाणिक आहे बरं! आपल्या देशातलाच काय, या जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे मी! त्यामुळेच तर या भ्रष्टाचारी राक्षसांकडून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी मी पक्ष स्थापन केला. माझा पक्ष मोठ्या संख्येने निवडून आल्याबरोबर लगेच सत्तेचे दलाल सावध झाले. सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केला. मला माहितच होते ते. ते आतून कसे एक आहेत, हेच तर मला जनतेला दाखवून द्यायचे होते. माझे सरकार स्थापन झाल्याबरोबर मला आणि माझ्या माणसांना किती काम करु आणि किती नको असे झाले. रोजच्या रोज आम्ही कामांचा फडशा पाडायला सुरवात केली. सरकारी नियम हे आपणच केलेले असतात नं?

संस्कृतीमुक्तकसमाजराजकारणप्रतिक्रियामतविरंगुळा

उध्वस्त इराक

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
12 Feb 2014 - 4:57 pm

२००३ सालच्या १९ मार्च रोजी भल्या पहाटे अमेरिकी विमानांनी बघदादवर आग ओकायला सुरुवात केली आणि २१ दिवसात बघदाद वर संपूर्ण ताबाही मिळवला! २००३ च्या मे महिन्यात युद्ध संपले, पुढे सात महिन्यांनी लपून बसलेला सद्दाम सापडला,३० डिसेंबर २००६ च्या सकाळी सहा वाजता सद्दामला दीडशे शियांची निर्घुण कत्तल केल्याच्या आरोपावरून फासावर लटकवलं. जल्लोष झाला, आता इराकचे प्रश्न सुटले या विषयावर जगातल्या दिग्गज नेत्यांची भाषणे झाली.

समाजजीवनमानराहणीअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियासमीक्षामाहिती

पुन्हा टोलचा घोळ!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
11 Feb 2014 - 11:34 pm

राज ठाकरे पुण्यात गरजले ते निव्वळ टोलचा मुद्दा घेऊनच. त्या सभेचे कवित्व सभेच्या जागेपासून सुरु झाले होते.
कुण्या वरिष्ठ राष्ट्रवादी नेत्याच्या मध्यस्थीमुळे सपचे पटांगण सभेला मिळाले अशी कुजबूज होती.
सरकारी टाळक्यात नारळ हाणण्याची रांगडी भाषा केली गेली तरी शिवसेनेला असेच वाटते आहे की सरकारने फूस देऊन मनसेला हे खोटे अवसान आणायला सांगितले आहे. ह्यात काही अर्थ नाही असे शिवसेनेला वाटते.
http://saamana.com/2014/February/11/agralekh.htm

पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला - झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
7 Feb 2014 - 2:57 pm

तू मोजल्या होत्या तारा नभांतल्या
मी-ना वेचले हिरेमोती त्यातऱ्हा आरोपातल्या
भूलवतात त्या अजूनी भेटी खणातल्या
जाणोनिया मानवी मतांची चांदीकेली
अविरत वेचिताना शेठांना चैनीतल्या
जाऊ कसा निघोनी पाऊल अडखळे
जनी-मी मलंग व्यवहार देही भावनांचे

पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला
झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या

तळटीप :

नमस्कार

हझलहास्यकविताविडंबनसमाजराजकारण

शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा 'आप'चा आदेश...

विनोद१८'s picture
विनोद१८ in काथ्याकूट
6 Feb 2014 - 10:24 pm

नमस्कार मिपाकरहो....!!

मी आत्ता नुकतीच एक बातमी दै. लोकसत्ता'मध्ये वाचली, कदाचित आपणही ती वाचली असेल. 'आप' ने शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. येत्या दिवसात त्याचे दिल्लीच्या एकन्दरीत राजकारणावर काय परिणाम होतील ?? यावर विचारमन्थन व्हावे असे वाटते, सदर बातमीचा दुवा खाली देत आहे.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-government-moves-against-...

विनोद१८

१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
3 Feb 2014 - 7:47 am

नमस्कार
आपणा सर्वांनाच माहिती आहे की १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी एक दुर्दैवी घटना होती. पाकीस्तान आणि बांग्लादेशात विभक्त झालेले प्रदेश भारतात उद्या परत आले तर तेही आपल्याला हवेच आहे. जर जर्मनीच पुर्नएकीकरण होऊ शकत व्हिएतनामच होऊ शकत तर भिविष्यातल्या कोणत्यातरी शुभ मुहूर्तावर एक ना एक दिवस पाकीस्तान आणि बांग्लादेशही भारतात येतील अशी आशा करता येईलच. या धाग्याच्या उद्दीष्टाकरता हे शांततामय मार्गाने होत आहे अस गृहीत धरून चालू (इतर मार्गांच्या चर्चेकरता वेगळा धागा काढला जाण्यास माझी ना नाही.)