राजकारण

प्रजासत्ता की प्रजा’सट्टा’

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
27 Jan 2014 - 8:09 am

२६ जानेवारी. एक असा दिवस, ज्या दिवशी १९५० साली भारत, एक प्रजासत्ता म्हणून उदयास आला. एक असा दिवस ज्या दिवशी भारताची आपली अशी घटना, आपलं संविधान लागू झालं, आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळाले. मतदानाचा हक्क मिळाला. प्रत्येक भारतीय नागरिकावर एक जबाबदारी आली. राष्ट्र घडवण्याची, राष्ट्राचा उद्धार करण्याची.

आपल्याला सगळं कसं,साधं सोपं पाहिजे …

घन निल's picture
घन निल in जे न देखे रवी...
24 Jan 2014 - 1:48 pm

राज्य करणारे करतात निषेध…
पण सैनिक मात्र ,जीवानिशी जतो …
शहीद होणं , हुतात्मा होणं म्हणजे नेमक काय ?
शेवटी मृत्यूच तो ….
नाही का ?

मग आपण सजवतो त्यांची प्रेतं …
गुंडाळतो आपल्या तिरंग्यात ….
आणि जमलंच, तर थोडा संताप व्यक्त करत
जोडतो आपले हात …
आदरा खातर …

मरताना खरंच ,त्याला वेदना झाल्या असतील का हो?
आपला गाव,आई-बाप ,मित्राची हाक,बायकोचं हसू छकुलीचं रुसू …
यातलं काही आठवलं असेल ?
खरं खरं सांगा …

समाजजीवनमानराजकारण

मौत का सौदागर कुणाला म्हणावे मग?

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in काथ्याकूट
24 Jan 2014 - 12:57 pm

गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदींना काही वर्षांपूर्वी मौत का सौदागर म्हटल्याने सोनिया गांधींवर चौफेर टीका झाली. मग रीतसर सारवासारव करण्यात आली. नुकतेच एका काँग्रेसी मंत्र्याने पंतप्रधान नरभक्षक नको असे खळबळजनक विधान केले.

राष्ट्रीय राजकारणावरचा प्रादेशिक अस्मितांचा प्रभाव

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
24 Jan 2014 - 8:19 am

लोकसभा प्रेडिक्शन्सच्या दृष्टीनेइंडिया टूडे या मासिकाचा ओपिनीयन पोल आला आहे. ओपिनीयन पोल्स अंदाज बरोबर चूक निघू शकतात आणि अजून मध्ये बरेच महिनेही आहेत.

कोंग्रेस चे राजकारण आणि रामदेवबाबा, अण्णा, केजरीवाल वगैरे...

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
23 Jan 2014 - 3:06 pm

(मी एक कोन्स्पिरसी थिअरी मांडत आहे. सर्वांनी सहमत व्हावेच असे नाही.)
सध्या आम आदमी पार्टीने सर्वच मीडिया हायजॅक केला आहे.
सोमनाथ भारती प्रकरणात देखील दोन्ही प्रकारच्या बाजू समोर येतच आहेत. मला सध्या वेगळा प्रश्न पडला आहे.

प्रचाराची रणधुमाळी

सचीन's picture
सचीन in जनातलं, मनातलं
18 Jan 2014 - 6:17 pm

२०१४ च्या लोकसभा निवडणुका आता ४ महिन्यांवर आल्यात. सर्व पक्षात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराचे पारडे सारखे खाली वर होत आहे. ह्या निवडणुकींचा निकाल काय लागेल ह्याबाबत साऱ्या देशात उत्सुकता आहे.कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल का? आप ह्या निवडणुकीत काय चमत्कार घडवेल? तिसरी आघाडी सत्तेवर येईल का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हि निवडनुकी नंतरच मिळतील.

आपने जे राजकारणात यशस्वी पदार्पण केले नि दिल्लीची सत्ता मिळवली त्याने देशाच्या राजकारणात नाही म्हटले तेरी थोडा फार फरक पडणारच पण तो किती पडणार हे होण्यासाठी निवडणूक होण्याची वाट बघणे भाग आहे.

राजकारणलेख

वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
18 Jan 2014 - 11:52 am

१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत.

पँथर गेला !

मारकुटे's picture
मारकुटे in जनातलं, मनातलं
15 Jan 2014 - 12:31 pm

प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Namdeo-dhasal/...

राजकारणप्रकटन

विचीत्र आणि दु:खद वर्तन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
14 Jan 2014 - 11:17 am

ठाण्यात प्लेग्रूप (बालगट) शाळेच्या बसची एका कुत्र्यास धडक बसली म्हणे. त्या नंतर कुत्र्यास धडक बसल्याने संतप्त झालेल्या युवकांनी म्हणे शाळेच्या बसची मोडतोड केली म्हणे.