नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग २

लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परिचय - नेताजींचे सहवासात भाग २ .. भाग 2 प्रस्तावना - ... पु. ना. ओकांच्या नेताजींचे सहवासात पुस्तकाचा मुकुटमणी आहे प्रकरण १० हे. त्यात बाबत प्रस्तावनेत तिखट उल्लेख आहे. ‘इसापनीती, पंचतंत्र अथवा हितोपदेश इत्यादि ग्रंथ जसे काऊ-चिऊच्या गोष्टी सांगण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाहीत तद्वत प्रस्तूत ग्रंथही केवळ मनोरंजनासाठी लिहिलेला नाही.

~देवा आता हार मान तू~

लेखनविषय:
~देवा आता हार मान तू~ देवा आता हार मान तू बघुनी खालचे तांडव सारे दिलास जन्म मानवास तू पण झाले सगळे वानर साले उभा केला तुला देवळात अन उद्बत्तीचे सुवास वारे तुझ्याच पायावरती सजले मांसाचे ते ढेर सारे तुला छीनले दगडातुनी अन तुझे कोरले देह सारे हाती चिपळ्या नास्तिकांच्या मुखी मात्र तुझे नाव रे उद्गाता तू चराचराचा उरी तुझ्या हा विश्व भार रे तुला जमीनीत गाढण्याआधी देवा आता तू खाली धाव रे देवा आता हार मान तू गेले अस्तित्व राहिले नारे गाभारेही वाहून जातील वाहण्याआधी तू खाली धाव रे ~वैभव कुलकर्णी ~

~आज मला शब्द व्हायचय~

लेखनविषय:
~आज मला शब्द व्हायचय~ आज मला शब्द व्हायचय पुस्तकात बसून अर्थात न्हायचय मग अरण असो कि सल असो सगळ्यांनी फक्त मलाच पहाचय ……. आज मला शब्द व्हायचय कधी कोणाच्या आठवणीत तर कधी कोणाच्या बातवणीत खरच मला कवितेत जायचंय शब्द बनून ओठांवर रहायचय ……. आज मला शब्द व्हायचय भूक माझी फारच थोडी फक्त मला अर्थांना खायचय रेघा रेघांचे शरीर फक्त सल्लज्ज अश्या एका ओळीत रहायचय ……. आज मला शब्द व्हायचय प्रेम पत्र असो मी मृत्यूपत्र असो मला कुन्या काळजात शिरायचं गेलो जरी मी पाण्यात वाहून एक अर्थ म्हनून मला उरायचं …….आज मला शब्द व्हायचय ~वैभव कुलकर्णी ~

' माझ्या सासुबै ! ' -पूढे

लेखनविषय:
लेखनप्रकार
' माझ्या सासुबै ! ' ____________________________________/\______________________________________ त्या दिवशी मी जाम खुश होते .बामच्या बाटलीचीहि गरज पडली नाहि .. रोजच्या कचकचीवर सुचलेल्या ऊपायांवर एवढी खुश होते कि चिडुन ३६ च्या आकड्यात असणारे आम्ही दोघे ६३ च्या आकड्यात आलो होतो :) तब्बल आठवडाभर सासुबैंचा जवळुन अभ्भ्यास केला तेव्हा लक्षात आलं कि सासुबै आरामप्रिय आणि स्तुतिप्रिय प्राण्यात मोडतात. अश्या व्यक्तिंना त्यांच्या कलेने घेवुनच आपल्या कलेत आणावं लागतं . मला त्यांना नाराज करायचं नव्हतं.

संस्कार

लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी आई नेहमी म्हणत असते, "काय हल्लीची मुलं हुशार झाली आहेत, आम्ही ऐकल्या नाहीत आणी पहिल्या नाहीत अश्या गोष्टी काय सहजपणाने वापरतात, आदित्य जो खेळ खेळतो फोनवर तो खेळायचा मी विचार सुद्धा करू शकत नाहीं.” असं काही ऐकलं कि मला मात्र खूप गोंधळून जायला होतं, कि हल्लीच्या मुलांचं कौतुक करावं कि ते जगत असलेल्या परिस्थितीची कीव करावी? मला तर कधी कधी वाटतं कि आईवडील मुलांना वेळ देण्याच्या कटकटीतुन सुटका करून घेण्यासाठी त्यांना हि सगळी खेळणी देत असावेत किंवा मुलाच्या मित्रा कडे आहे, म्हणजे त्याच्या कडे असलेच पाहिजे, ह्या भावनेतून देत असावेत, ह्याला पियर प्रेशर असं म्हणतात.

आमचे नामकरण.. (DISCLAIMER)

लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व मिपाकर मंडळींना नमस्कार. प्रथम फडणीस या माझ्या आयडीचे नामांतर होऊन आता ते नानबा करण्यात आलेले आहे. बाकी आयडी मागील व्यक्ती, विचार तेच आहेत. इकडे मिपावर आणि व्हॉट्स अ‍ॅप, चेपु इ इ. ठिकाणी मिपाकर मंडळींनी ठेवलेलं हे नाव. म्हटलं आता मिपावरसुद्धा याच नावाने वावरावं. :) म्हणून हा DISCLAIMER प्रपंच. -नानबा. (पूर्वाश्रमीचा प्रथम फडणीस)

पद्म पुरस्कार… सन्मान की खैरात ?

देशातल्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होते. लगेच त्यावरुन वाद होतात. काही काळ तरी आपली चांगली करमणूक होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘पद्म’ वरुन दक्षिणात्य गायिका एस. जानकी, कुस्तीवीर सुशीलकुमार यांच्या मानापमान सोहळ्याचीच जास्त चर्चा झाली. खरं तर त्यावेळीच म्हणजे जानेवारीत मी हा ब्लॉग लिहायला घेतला होता. पण नेहेमीप्रमाणेच आळस आणि पार्किन्सन्स लॉ या दोन्हींमुळे लिहिणं मागे पडलं. आता पद्म पुरस्कारांवरुन पुन्हा चर्चा सुरु आहे. पुरस्कार मिळालेले दिग्गज पद्मरत्न, या पुरस्कारांसाठी आपल्या घरच्यांचीच कशी शिफारस करतात वगैरे बातम्या सुरु झाल्या.

़जोजीमोजी

लेखनविषय:
लेखनप्रकार
"Almost perfect Puppy.You did not cover jojeemojee. By tomorrow some jojeemojee will intervene and she will loose her mojo. Your efforts for 45 minutes will be down the drain. And Hash Band will knock her down for one more within 6 months." साहेब कधी आले ते कळालेच नाही. जो बद्दल सांगायचे राहुनच गेले. चेस चा डाव होता. चेक मेट ची मूव झाली होती. आता फक्त उद्याची वाट बघणे हातात होते. पण जो जिंकला. फिलोमिना आली, नुसताच गर्भपात करुन गेली. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेला नाही म्हणाली. ७० च्या दशकातील कहाणी आज ही पुन्हा पुन्हा होते. ़ आजुबाजुचा जो कायम जिंकतो. फिलोमिनाच्या आयुष्याचा पट उधळत.

ऊसदर आंदोलन - सरकार आणि कारखानदार

लेखनविषय:
लेखनप्रकार
भारत हा मुख्यत्वे कृषिप्रधान देश आहे. आणि या देशातील बहुतांश लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह चालवतात. घामाबरोबर रक्त गाळून बळीराजा भारतातील लोकांची दोन वेळची भूक भागवतो. मात्र त्याच्या घामाचे योग्य दाम दिले जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला थोडा जास्त भाव मिळाला तर महागाई वाढली याच्या नावाखाली सगळीकडून ओरडा होतो. नोकरदार मध्यम वर्गीय, दुरचित्रवाणीचे प्रतिनिधी नुसता गोंधळ घालून सरकारवर आयातीसाठी दबाव आणतात आणि बळीराजाला त्याच्या मिळणाऱ्या नफ्यापासून वंचित ठेवतात. वास्तविक शेतकरी हा त्याच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पनावर आपली उपजीविका करत असतो.

हरवलेला विद्यर्थ

लेखनप्रकार
आपण रोज किती व्यक्तींना भेटतो; नव्या, जुन्या, नको, हव्या, अनोळखी, ओळखीच्या. कितींशी बोलतो, हसतो, काही देतो, घेतो. या प्रत्येकाच्या मनावर आपला ठसा, आपली ओळख कोरली जाते ते आपल्या वागण्यातून. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत, त्याच्या मनात आपली प्रतिमा, आपल्याबद्दल त्याचे विचार वर आपल्याशी त्याचं पुढचं प्रत्येक वागणं; हे आपण त्याच्याशी कसे वागलो, वागतो, यावरून ठरत जातं. आणि हे सूत्र व्यक्ती, तिचा सामाजिक दर्जा, तिची आर्थिक पत, जात, कुळ, धर्म, या सगळ्या गोष्टींपासून अबाधित आहे. आम्ही एक दिवस ऑफिसच्या कॅंटीनमधे जेवायला बसलो होतो. ‘मामा प्लेट लाना’, बाजूच्या टेबल वरील एका व्यक्तीने ऑर्डर सोडली.
Subscribe to धोरण