मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवरायांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने... मित्रांनो

शशिकांत ओक ·

विटेकर 19/02/2014 - 12:57
आणि त्याखालील प्रतिक्रिया देखील वाचल्या. "बहुजनसमाजपालक कुळवाडीभूषण" वगैरे वाचून अंमळ मौज वाटली. "गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंतस " वर हा चांगला उपाय आहे. आवडण्यात आला आहे. बाकी 'स्(श)काळ " कडून अजून काय अपेक्षा असणार म्हणा ! वाढवा विद्वेष अजून , त्याशिवाय निवडणूक कशी जि़कता येईल? हिंदू समाजाइतका आत्मघातकी समाज जगाच्या पाठीवर दुसरा नाही !

हा सर्कारी शिवजैंन्ती हाय ना आज! म्हणजे इंग्रजी तारखेप्रमाणे महाराजांचा बड्डे आहे. हॅपी बड्डे डीयर शिवाजी म्हाराज हॅपी बड्डे टू यू. बाकी शिवाजी महाराजांची आठवण यायला आम्हाला शिवजयंती यावी लागत नाही.

आयुर्हित 19/02/2014 - 14:39
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।। शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।। सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग । राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।। याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष । या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।। शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे । कीर्तीरूपें ।।५।। निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।

शशिकांत ओक 20/02/2014 - 13:16
मित्रांनो, जन्मदिनी महाराजांच्या कर्तृत्वाचे स्मरण करायला प्रेरित करायचा प्रयत्न होता.

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 20/02/2014 - 13:47
शशिकांतजी; शालेय मराठीत थोर व्यक्तींचे पुतळे बनवले जाण्याच समर्थन करणारा लोकमान्य टिळकांचा एक लेख होता पाठ म्हणून होता त्यात टिळक म्हणतात थोरव्यक्तींचे पुतळे पहाणारे सर्वचजण प्रेरणा आणि आदर्श घेऊ शकतील असे नाही पण ज्याच्यात आदर्श घेण्याची क्षमता आहे त्याला ते (पुतळ्यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या व्यक्तीच कार्य) प्रेरणा देण्यास कारणी भूत होऊ शकतात. रेल्वे फलाटावर विवेकानंदांची खूप पुस्तके वर्षोन वर्षे विकली जातात त्या वाचकांपैकी प्रत्येक जण विवेकानंदांचे उपदेश अमलात आणू शकतो असे नाही पण त्याच वाचकांपैकी एक वाचक प्रेरणा घेऊन राळेगण सिद्धी सारख्या एखाद्या गावाच भवितव्य घडवण्यात मोलाच काम करू शकतो. तुम्ही काढलेल्या ह्या धाग्याने आता पावेतो सहाशे हिट कसे बसे चार एक प्रतिसाद मी काढलेल्या धाग्याने लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद साडे पाचशे हिट्स आणि दोन प्रतिसाद मिळवले. माझ्याच "(हिवाळ्यातील रात्रीभोजनासाठी ) ओल्या हळदीची लज्जतदार भाजी धाग्याने त्या पेक्षा कमी कालावधीत जास्त हिट्स आणि जास्त प्रतिसाद मिळवले. हि वस्तुस्थिती असून सुद्धा ओल्या हळदीची लज्जतदार भाजी लढण्याकरता फारतर कॅलरीज पुरवते. शिवाजी महाराजांबद्दलचे धागे चांगल्या कामासाठी झगडण्यासाठी लागणारी समाजोपयोगी प्रेरक शक्ती पुरवतात आणि ते अधिक महत्वाचे. दिपसे दिप जलाते चलो हि अखंड प्रक्रीया आहे यात आपण आपल्या सहभागाचा दिवा लावून तो प्रकाशमान होतानाच अजून एक दिवातरी लावेल याचा प्रयास करावयाचा. आपणास शिवजयंतीच्या शुभेच्छा

In reply to by माहितगार

शशिकांत ओक 21/02/2014 - 12:28
माहितगार, मिसळपाववरील आपल्या सारख्या एका तज्ज्ञाने आपला मन मोकळा प्रतिसाद दिल्याने विचार करायला लावणारे लेखन केल्याचे समाधान आहे. यासाठी आपले धन्यवाद. असाच आणखी एक प्रयत्न अधुन मधून नेताजींच्या सहवासात पुस्तकाचा प्रकरण रूपाने परिचय करून देत आहे. शिवाय 'माजा अस्तित्व' या तंजावूरी मराठी नावाची एक पॉडकास्ट काही दिवसांपासून ऐकत आहे त्याचा परिचय करून देणारा धागा टाकत आहे. जरूर प्रतिक्रिया द्यावी. हैयो हैयोंच्या माहितीतून व विकी पिडीयातून मला त्या स्थळी जाता आले. असो....

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 22/03/2014 - 11:35
पुर्वी आर के लक्ष्मणांचे कार्टून पाहिल्याचं स्मरतं... चित्रात एका नदीच्या पात्रावर दोन नवे कोरे पुल बांधून तयार आहेत.... काय आहे ... एक ऑर्डर इंग्रजीतून व दुसरी हिन्दीतून आल्याने दोन पुल बांधावे लागलेना... म्हणून तशीच अवस्था एकाच व्यक्तीचे दोनदा जन्मदिवस साजरे होताना पाहून वाटते.

kurlekaar 22/03/2014 - 15:19
"महाराजांच्या कर्तृत्वाचे स्मरण करायला प्रेरित करायचा प्रयत्न होता." शशिकांत टिळक म्हणतात थोरव्यक्तींचे पुतळे पहाणारे सर्वचजण प्रेरणा आणि आदर्श घेऊ शकतील असे नाही पण ज्याच्यात आदर्श घेण्याची क्षमता आहे त्याला ते प्रेरणा देण्यास कारणी भूत होऊ शकतात". माहितगार खूप छान. मला वाटतं रामदासांच्या “जाणता राजा’ या एका शब्दातच सारं कांही येतं.

विटेकर 19/02/2014 - 12:57
आणि त्याखालील प्रतिक्रिया देखील वाचल्या. "बहुजनसमाजपालक कुळवाडीभूषण" वगैरे वाचून अंमळ मौज वाटली. "गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंतस " वर हा चांगला उपाय आहे. आवडण्यात आला आहे. बाकी 'स्(श)काळ " कडून अजून काय अपेक्षा असणार म्हणा ! वाढवा विद्वेष अजून , त्याशिवाय निवडणूक कशी जि़कता येईल? हिंदू समाजाइतका आत्मघातकी समाज जगाच्या पाठीवर दुसरा नाही !

हा सर्कारी शिवजैंन्ती हाय ना आज! म्हणजे इंग्रजी तारखेप्रमाणे महाराजांचा बड्डे आहे. हॅपी बड्डे डीयर शिवाजी म्हाराज हॅपी बड्डे टू यू. बाकी शिवाजी महाराजांची आठवण यायला आम्हाला शिवजयंती यावी लागत नाही.

आयुर्हित 19/02/2014 - 14:39
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।। शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।। सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग । राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।। याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष । या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।। शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे । कीर्तीरूपें ।।५।। निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।

शशिकांत ओक 20/02/2014 - 13:16
मित्रांनो, जन्मदिनी महाराजांच्या कर्तृत्वाचे स्मरण करायला प्रेरित करायचा प्रयत्न होता.

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 20/02/2014 - 13:47
शशिकांतजी; शालेय मराठीत थोर व्यक्तींचे पुतळे बनवले जाण्याच समर्थन करणारा लोकमान्य टिळकांचा एक लेख होता पाठ म्हणून होता त्यात टिळक म्हणतात थोरव्यक्तींचे पुतळे पहाणारे सर्वचजण प्रेरणा आणि आदर्श घेऊ शकतील असे नाही पण ज्याच्यात आदर्श घेण्याची क्षमता आहे त्याला ते (पुतळ्यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या व्यक्तीच कार्य) प्रेरणा देण्यास कारणी भूत होऊ शकतात. रेल्वे फलाटावर विवेकानंदांची खूप पुस्तके वर्षोन वर्षे विकली जातात त्या वाचकांपैकी प्रत्येक जण विवेकानंदांचे उपदेश अमलात आणू शकतो असे नाही पण त्याच वाचकांपैकी एक वाचक प्रेरणा घेऊन राळेगण सिद्धी सारख्या एखाद्या गावाच भवितव्य घडवण्यात मोलाच काम करू शकतो. तुम्ही काढलेल्या ह्या धाग्याने आता पावेतो सहाशे हिट कसे बसे चार एक प्रतिसाद मी काढलेल्या धाग्याने लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद साडे पाचशे हिट्स आणि दोन प्रतिसाद मिळवले. माझ्याच "(हिवाळ्यातील रात्रीभोजनासाठी ) ओल्या हळदीची लज्जतदार भाजी धाग्याने त्या पेक्षा कमी कालावधीत जास्त हिट्स आणि जास्त प्रतिसाद मिळवले. हि वस्तुस्थिती असून सुद्धा ओल्या हळदीची लज्जतदार भाजी लढण्याकरता फारतर कॅलरीज पुरवते. शिवाजी महाराजांबद्दलचे धागे चांगल्या कामासाठी झगडण्यासाठी लागणारी समाजोपयोगी प्रेरक शक्ती पुरवतात आणि ते अधिक महत्वाचे. दिपसे दिप जलाते चलो हि अखंड प्रक्रीया आहे यात आपण आपल्या सहभागाचा दिवा लावून तो प्रकाशमान होतानाच अजून एक दिवातरी लावेल याचा प्रयास करावयाचा. आपणास शिवजयंतीच्या शुभेच्छा

In reply to by माहितगार

शशिकांत ओक 21/02/2014 - 12:28
माहितगार, मिसळपाववरील आपल्या सारख्या एका तज्ज्ञाने आपला मन मोकळा प्रतिसाद दिल्याने विचार करायला लावणारे लेखन केल्याचे समाधान आहे. यासाठी आपले धन्यवाद. असाच आणखी एक प्रयत्न अधुन मधून नेताजींच्या सहवासात पुस्तकाचा प्रकरण रूपाने परिचय करून देत आहे. शिवाय 'माजा अस्तित्व' या तंजावूरी मराठी नावाची एक पॉडकास्ट काही दिवसांपासून ऐकत आहे त्याचा परिचय करून देणारा धागा टाकत आहे. जरूर प्रतिक्रिया द्यावी. हैयो हैयोंच्या माहितीतून व विकी पिडीयातून मला त्या स्थळी जाता आले. असो....

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 22/03/2014 - 11:35
पुर्वी आर के लक्ष्मणांचे कार्टून पाहिल्याचं स्मरतं... चित्रात एका नदीच्या पात्रावर दोन नवे कोरे पुल बांधून तयार आहेत.... काय आहे ... एक ऑर्डर इंग्रजीतून व दुसरी हिन्दीतून आल्याने दोन पुल बांधावे लागलेना... म्हणून तशीच अवस्था एकाच व्यक्तीचे दोनदा जन्मदिवस साजरे होताना पाहून वाटते.

kurlekaar 22/03/2014 - 15:19
"महाराजांच्या कर्तृत्वाचे स्मरण करायला प्रेरित करायचा प्रयत्न होता." शशिकांत टिळक म्हणतात थोरव्यक्तींचे पुतळे पहाणारे सर्वचजण प्रेरणा आणि आदर्श घेऊ शकतील असे नाही पण ज्याच्यात आदर्श घेण्याची क्षमता आहे त्याला ते प्रेरणा देण्यास कारणी भूत होऊ शकतात". माहितगार खूप छान. मला वाटतं रामदासांच्या “जाणता राजा’ या एका शब्दातच सारं कांही येतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाचे संस्मरण सकाळ मधील अप्रतीम लेखाने या झाले. महाराजांच्या रयतेसाठी मनात असलेल्या सुयोग्य शासनाच्या संकल्पना साकार करायला आपल्याा सारख्या इतिहास संशोधकाने विविध प्रकारे प्रेरणा द्यावी. ही विनंती. काही वर्षांपूर्वी प्रताप गडावरील भेट व चर्चा यांच्या आठवणी ताज्या झाल्या. विंगकमांडर शशिकांत ओक. ... असे तिथे दिलेल्या प्रतिसादातून म्हटले आहे...

फायदा घ्या बजेटचा

आयुर्हित ·

आयुर्हित 18/02/2014 - 12:54
१७ फेब्रुवारी पासून जो नवीन माल(उत्पादन)कारखान्यातून बाहेर पडेल, त्यावरच हा फायदा होईल. जो साठा विक्रेते आधीपासून धरून बसले असतील, त्यावर हा फायदा होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित 18/02/2014 - 22:59
ओ नो.... मी समजू शकतो काय परिस्थितीतून जावे लागते ते, अक्षरश: तावून सुलाखून निघावे लागते ते. पार्टी म्हणजे एकत्र येऊन आनंद साजरा करणे एवढेच महत्त्वाचे आहे. काही हरकत नाही, नाराज होऊ नका. आपण दुसरे एखादे चांगले कारण शोधूया की, आनंद साजरा करण्याचे! धन्यवाद.

सुबोध खरे 18/02/2014 - 23:36
आनंद साजरा करण्याचे कारण शोधावे लागते ?आणि नाराज होण्याचे मला तर कोणतेच कारण दिसत नाही. उगाच कारण शोधण्याच्या लफड्यात कशाला पडताय ? वेळ आणि ठिकाण सांगा कट्टा करून टाकू हा का ना का.

आयुर्हित 18/02/2014 - 12:54
१७ फेब्रुवारी पासून जो नवीन माल(उत्पादन)कारखान्यातून बाहेर पडेल, त्यावरच हा फायदा होईल. जो साठा विक्रेते आधीपासून धरून बसले असतील, त्यावर हा फायदा होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित 18/02/2014 - 22:59
ओ नो.... मी समजू शकतो काय परिस्थितीतून जावे लागते ते, अक्षरश: तावून सुलाखून निघावे लागते ते. पार्टी म्हणजे एकत्र येऊन आनंद साजरा करणे एवढेच महत्त्वाचे आहे. काही हरकत नाही, नाराज होऊ नका. आपण दुसरे एखादे चांगले कारण शोधूया की, आनंद साजरा करण्याचे! धन्यवाद.

सुबोध खरे 18/02/2014 - 23:36
आनंद साजरा करण्याचे कारण शोधावे लागते ?आणि नाराज होण्याचे मला तर कोणतेच कारण दिसत नाही. उगाच कारण शोधण्याच्या लफड्यात कशाला पडताय ? वेळ आणि ठिकाण सांगा कट्टा करून टाकू हा का ना का.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून फ्रीज, टीव्ही, देशी बनावटीचे मोबाईल, छोट्या कार स्वस्त होणार आहेत. या अर्थसंकल्पात चिदंबरम यांनी अबकारी दर १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली तसेच छोट्या वाहनांसाठीचा अबकारी कर १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

काही दिवसांनी "अरे चूप कर, आब रूलायेगा क्या?" असे म्हणायची वेळ येईल असे वाटते.

विदेशी वचाळ ·

अर्धवटराव 12/02/2014 - 07:09
फार आतल्या गाठीचं राजकारण असावं का? प्रचाराला मुद्दे बनवण्याचं काम चालु झालय का? कसंही करुन केंद्राला/काँग्रेसला सरकारचा सपोर्ट काढायला भाग पाडण्याकरता हे सगळं असावं का? कि भ्रष्टाचाराला दिसेल तिथे जमेल तसं ठोकुन काढायचा प्रयत्न चाललाय? तसं असेल तर हे असं आत्मघातकी वागणं अक्षम्य आहे. जनसामान्यांचा आकांक्षा पराकोटीला पोचवणार्‍या पक्षाकडुन वेगळ्या वर्तनाची अपेक्षा आहे. कि आपणच आप ला परखण्यात कमि पडतोय?

कंजूस 12/02/2014 - 07:15
खरं म्हणजे बहुमत कोणालाच नव्हते . आली असती रा० राजवट . आपला पाठिंबा देणाऱ्या जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी ही नाटकं आहेत .

विकास 12/02/2014 - 10:10
केजरीवाल हे अत्यंत प्रामाणिक गृहस्थ आहेत. त्यांच्या विरोधात उगाच लोकं शंख करतात. त्यांना जे काही त्या त्या वेळेस वाटते ते तसे बोलतात. आज वाटलं शीला दिक्षित भ्रष्टाचारी आहेत तर तसे बोलतील, उद्या तसे नाही वाटले तर हर्ष वर्धनना पुरावा देण्यास सांगतील. जेंव्हा वाटले की निवडणूका लढवायच्या नाहीत, तेंव्हा नाही लढवल्या. पण नंतर निवडणुका जाहीर झाल्यावर लढवाव्याशा वाटल्या तर लढवल्या. असे अजून बरेच काही. पण तुम्हाला असे नाही का वाटत यातून त्यांचे निव्वळ पारदर्शक व्यक्तिमत्व दिसते म्हणून? जर हे मान्य असले तर ते जे काही निर्णय घेत आहेत, त्याला चुक कसे म्हणवते? :)

In reply to by विकास

विकासराव तुमच्याशी जरी अन्य वेळेला सहमत असलो तरी रिलायन्सचा अन्य घोटाळ्यांमधला सहभाग (२जी स्पेक्ट्रम, टोल रोड) पाहील्यानंतर ते सिलिंडरांचा भाव वाढवणार नाहीत असे वाटत नाही. एकाही मराठी नेत्यामधे दम नाही रिलायन्सला जाब विचारायचा. पुणे कोल्हापूर रस्त्यावर जी कामे अर्धवट बंद पडली आहेत ती रिलायन्सची आहेत बरीचशी आणि हा कांगावा टोल वसुली मुदतवाढ मिळावी म्हणूनच आहे. त्यामुळे अरविंदाचे या वेळेला नक्की अभिनंदन.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चिरोटा 12/02/2014 - 12:49
स्वतः धिरूभाईंनी त्या काळात राज्यातल्या सर्व मंत्र्यांना खिशात टाकले होते.राज्यात बर्‍यापैकी मलिदा मारल्यावर त्यांनी मोर्चा गुजरात्कडे ईतर राज्यांकडे वळवला.अंबानी पुत्र तोच कित्ता गिरवत आहेत.कॉन्ग्रेस व भाजपा, दोन्हीही पक्ष अडानी,अंबांनींचे मिंधे आहेत.अंबानी,अडानी दोन्हीही राजकिय आशीर्वादाने,पैसे चारून मोठे झालेले ग्रुप्स आहेत. अनेक टी.व्ही चॅनेल्समध्ये अंबांनीची गुंतवणूक असल्याने आता बातम्या दाबल्या जातील् व प्रिंट मिडियातून 'केजरीवाल' कम्युनिस्ट आहेत्,त्यांना औद्योगिक वाढ नको आहे असा प्रचार केला जाईल.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आनन्दा 12/02/2014 - 13:23
पुणे कोल्हापूर रस्त्यावर जी कामे अर्धवट बंद पडली आहेत ती रिलायन्सची आहेत बरीचशी
तुमचा गैरसमज आहे. सरकारने निविदा कढाल्या, काम सुरु झाले, आणि लक्श्यात आले की ज्या जमीनीवर आपण काम करत आहोत, ती जमीन अधिग्रहीत केलेलीच नाही. म्हाणून पूर्ण रस्त्याचे काम बंद आहे, अगदी कात्रज बायपासपासून.

In reply to by आनन्दा

असहमत. जी उड्डाणपुलांची कामे बंद आहेत ती पूर्वीच्याच मुख्य रस्त्यावर आहेत. काही ठिकाणी मुख्य रस्त्यात बोगद्यासारखे उभे ठोकळे आणि काही ठीकाणी केवळ मधले दोन खांब उभारून कामे बंद आहेत व बाजूने डायव्हर्जन आहेत. जाता जाता: कैलास भेळ आणि अन्य भेळवाले ज्यांच्याकडे भेळ खायला हुच्चभ्रू लोक गाड्या रस्त्यावर उभ्या करून थांबायचे त्यांच्या रस्त्यालगतच्या जागा ५-६ वर्षापूर्वीच अधिग्रहीत करून पैसे चुकते करून झाले होते. तरीही राजकीय आशिर्वादान त्यांची दुकाने रस्त्यालगतच होती. संस्कृती नावाच्या चिमुरडीच्या मृत्यूनंतर जी अतिक्रमणे हटवायची लाट आलि त्यात ती दुकाने उठवली गेली. त्यामुळे अरेच्चा जमिन अधिग्रहीतच केली नाही? असे झाले असेल असे वाटत नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकास 12/02/2014 - 20:14
माझा मुद्दा हा एकेंच्या सातत्याने चाललेल्या नौटंकीसंदर्भात आहे. तरी देखील... पुणे कोल्हापूर रस्त्यावर जी कामे अर्धवट बंद पडली आहेत ती रिलायन्सची आहेत बरीचशी आणि हा कांगावा टोल वसुली मुदतवाढ मिळावी म्हणूनच आहे. त्यामुळे अरविंदाचे या वेळेला नक्की अभिनंदन. अभिनंदन सोडल्यास, या मुद्याशी सहमत आहे. अभिनंदन देखील करेन जर खरेच काही तरी केलेले दिसले तर. आत्ता पर्यंतच्या त्यांच्या पब्लिसिटी स्टंट्स मुळे अजून तरी तसे वाटत नाही. मला कल्पना आहे की एफ आय आर दाखल केला आहे. माध्यमांच्या मते त्यात मुकेश अंबानींचे नाव नाही एकेंच्या मते ते आहे वगैरे. अंबानींचे नाव असणे / नसणे हा मामुली मुद्दा आहे. उद्या अंबानींचे नाव न आणता देखील रिलायन्सला चाप लावता आला तर ते खूप मोठे काम असेल असे वाटते. एकीकडे रिलायन्स, मोईली, देवरा यांच्याबद्द्ल ओरड करायची, आणि त्याच दिवशी दुसरीकडे ज्या लोकांनी आपच्या आंदोलनात सहभाग केला त्यांची थकबाकी माफ करण्याचे जाहीर करायचे. पहीले भ्रष्ट तर दुसरे कोण सज्जन? बरं ज्यांनी महागडी बिले आधी मुकाट्याने भरली त्यांचे काय? का त्यांनी झक मारली? यात मी रिलायन्स-मोईली-देवरा यांना ते भ्रष्ट नाहीत असे म्हणत नाही. त्यांच्याविरोधात (विशेष करून मंत्र्यांच्या विरोधात) जर अँटी करप्शन ब्युरोकडून एफ आय आर दाखल केला गेला असेल तर ते स्वागतार्हच आहे. पण त्यातून बाकी काही निष्पन्न होण्यापेक्षा "आमचा पाठींबा काढा" हा मुद्दा अधिक वाटत आहे. आणि हो, केजरीवाल यांच्या सगळ्या भुमिका मला निव्वळ माकडचेष्टा वाटतात. पण त्या तशा नसल्याचे सिद्ध होऊन, त्यातून खरेच जनतेचे कल्याण होत आहे असे दिसले आणि मी चूक ठरलो तर मला आनंदच होईल.

In reply to by विकास

नितिन थत्ते 12/02/2014 - 21:03
केंद्रसरकारच्या निर्णयाची चौकशी राज्यसरकार करू शकत नाही असे जेटली म्हणत आहेत. http://blogs.timesofindia.indiatimes.com/arun-jaitleys-blog/entry/can-a-state-government-investigate-a-decision-of-the-central-government

In reply to by नितिन थत्ते

विकास 12/02/2014 - 22:25
जेटली म्हणतात म्हणून नाही, पण प्रस्थापित कायदेच पाळायचेच नसले तर ते सरकार कसे काय? त्यांनी घटनेवर हात ठेवून शपथ घेतली का कानात बोटे घालून? जर कायदा चुकीचा असेल तर तो बदलण्यासाठी लोकशाहीत सत्ता संपादन करता येते. आप ने दिल्लीत सत्ता संपादन केले आहे. पण त्यांना निर्णय घेताना कायद्याने घेण्याऐवजी आवाजीने घेण्यात जास्त रस दिसत आहे. जशा निवडणुका जवळ येतील तसे त्यांच्या निर्णयासंदर्भातील आणि त्यांच्या परदेशी मिळकतीवरूनचे, भारती यांच्यावरील खटले वर येऊ लागतील असे वाटत आहे.

बरोब्बर जेव्हा आपचं सरकार आलं होतं तेव्हा एक दरवाढ झाली होती. त्याही पुढे जाऊन अजून एक दरवाढ दिल्लीच्या जनतेवर लादण्याचा यांचा डाव होता तो तूर्त तरी अरविंद केजरीवालनि नक्कीच attack is the best defense हे तत्व वापरून उधळला आहे. यामुळे ती नवीन होणारी दरवाढ तरी केली जाणार नाही.(अशी आशा करूया). आणि हि लोकं सहजासहजी सुधारणार नाहीत त्यामुळे अश्या मार्गांचा वापर जर जनतेच्या सुखासाठी होत असेल तर काय हरकत आहे.

मि कोण 12/02/2014 - 11:38
असहमत. लोकान्ना (तुम्हाला) अप्रमाणिक राजकारणी दिसत नाहित. पण .... One of my friend said "दुष्प्रवृत्त लोकांचा नंगानाच या देशाने गेली ६५-७० वर्षे पाहिला. त्यावर प्रतिक्रिया म्हणून आता सत्प्रवृत्त लोक थोडे आक्रमक झाले तर बिघडले कुठे? शेवटी हे सर्व ते देशाच्या दीर्घकालीन भल्यासाठीच करत आहेत, स्वार्थ म्हणून नव्हे. दिल्लीत जे चालू आहे ते प्रस्थापित राजकारण्यांना अराजक वाटणारच कारण त्यांना फक्त वैयक्तिक किंवा सामुहिक हितसंबंधांचे राजकारण कळते. देशहिताचे राजकारण कळण्याची आणि करण्याची त्यांची कुवत नाही."

विकास 14/02/2014 - 18:16
भाजपा - काँग्रेस चे थोडक्यात म्हणणे आहे की जर सांसदीय मार्गाने (पक्षी: घटनेनुसार राज्यपालांची परवानगी + दिल्लीमुळे केंद्राची परवानगी घेतल्यास) जर हे विधेयक विधानसभेच्या पटलावर ठेवले तर आम्ही पाठींबा देऊ. एकेंचे म्हणणे आम्हाल तशी करायची गरज वाटत नाही... थोडक्यात कायदा मधे आल्यास तो उल्लंघून पुढे जाऊ. हे चळवळ्या नाही तर घटनेची शपथ घेऊन झालेला मुख्यमंत्री म्हणतो. मग हेच मुख्यमंत्री बरखा दत्तला सांगणार की जर हे विधेयक मी आणू शकलो नाही तर राजीनामा देईन. आता ते दिलेला शब्द पाळतात का परत एस एम एस सारखा नवीक काहीतरी ड्रामा करतात ते बघायचे.

In reply to by विकास

नितिन थत्ते 14/02/2014 - 19:48
काँग्रेस काही पाठिंबा काढेना !! मग आता निदान नायब राज्यपाल तरी बडतर्फ करतात का ते पाहू असा विचार दिसतो.

In reply to by नितिन थत्ते

आतिवास 14/02/2014 - 20:00
'राजिनामा पत्र लिहिताहेत केजरीवाल साहेब सेक्रेटरियेटमध्ये बसून' अशी आता 'ब्रेकिंग न्यूज' (!) आहे 'टाईम्स'वर. समजा नायब राज्यपालांनी राजिनामा स्वी कारला, तरी 'काळजीवाहू' सरकार म्हणून 'आप'ला काम करावे लागेल का? ते किती काळापर्यंत? कायद्यानुसार काय तरतूद आहे?

In reply to by आतिवास

विकास 14/02/2014 - 20:50
एनडीटीव्ही, आयबीएन मधे आता बातम्या कुणाच्या देयच्या हे कळत नसल्याने डाउनसाईझ करण्याचा विचार चालू झाला आहे. :) एनीवे: कांगावखोरपणा सोडून यातून काही शिकले तर एके चांगले राजकारणी बनू शकतील - तेंव्हा त्यांना शुभेच्छा.

दुश्यन्त 14/02/2014 - 21:21
बरे झाले ड्रामा कंपनी गेली ते. रोज उठून एक तमाशा. काम करणे जमत नाही, फक्त तमाशा जमतो म्हणून लोकसभेला कुठल्या तोंडाने लोकांसमोर जायचे म्हणून हा पळपुटे पणा केला. मुख्यमंत्र्याला किती तरी अधिकार असतात. कायद्याच्या चौकटीत राहून किती तरी लोकोपयोगी कामे करता आले असते. मात्र हे न करता असैविधानिक मार्गाने बिल सभागृहात मांडायला गेले आणि सफल झाले नाही म्हणून राजीनामा दिला. लोकांनी यासाठी मते दिली होती का ?

मानला केजरीवालला, आर या पार ची लढाई, भ्रष्टाचार उखडायचाच आहे तर त्याचे समूळ उच्चाटन नाही तर मीच पडतो रिंगणातून बाहेर. भ्रष्टाचार्‍यांनीच घालून दिलेली बंधने पाळत लढण्यात अर्थ नाही, अश्याने देश आणखी ५० वर्षे सुधारतच राहील.. एखादी सामाजिक क्रांतीचीच गरज आहे, प्रश्न असा आहे की देशभरात एकाच वेळी ती होऊ शकते का.. केजरीवाल वा त्यांनी स्थापलेला पक्ष तिचे नेत्रुत्व करू शकतो का..

In reply to by तुमचा अभिषेक

अर्धवटराव 16/02/2014 - 09:01
व्यवस्थेत भ्रष्टाचार आहे कि व्यवस्था भ्रष्टाचारी आहे हा निर्णय प्रथम घेतला पाहिजे साहेबांनी. व्यवस्थेत भ्रष्टाचार असेल तर त्यांना व्यवस्था कंट्रोल करायची संधी मिळाली होती कि. दशकांचा भ्रष्टाचार एका दिवसात तर समाप्त झाला नसता, पण किमान एक वर्षभर तरी प्रयत्न करायचा. हे महाराज तर दुसर्‍या महिन्यातच पळाले. व्यवस्थाच भ्रष्टाचारी असेल तर कशाला निवडणुकीच्या भानगडीत पडायचं? दुसरा कुठला योग्य मार्ग असेल ना साहेबांकडे.

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 24/02/2014 - 22:13
ते विधेयक पाठिंबा देणार्या पक्षाच्या क्रुपाशिर्वादाने फेटाळ्ले गेल्यावर राजीनामा देणे नैतिक्तेला धरून आहे. असेच वाटते.

श्रीगुरुजी 16/02/2014 - 15:28
केजरीवाल हे प्रामाणिक आहेत की नाटकी या प्रश्नापेक्षा त्यांनी आणलेले जनलोकपाल विधेयक मंजूर होणे आवश्यक होते. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यापासून नगरसेवकापर्यंत कोणत्याही राजकारण्याला राज्यपालांची परवानगी, सभापतीची परवानगी, राष्ट्रपतीची परवानगी अशी कवचकुंडले न देता थेट खटला भरून न्यायालयात खेचण्याची व्यवस्था असणारा कायदा असणे आवश्यक आहे. पराकोटीचा भ्रष्टाचार करूनसुद्धा अशोक चव्हाण, मायावती, मनमोहन सिंग इ. मंडळी या कवचकुंडलामुळेच आजपर्यंत वाचली आहेत. जनलोकपाल आले असते तर निदान दिल्लीपुरते तरी या भ्रष्टाचारी मंडळींची कवचकुंडले जाऊन त्यांना न्यायालयात खेचता आले असते.

डँबिस००७ 25/02/2014 - 10:39
काल,परवा पासुन मुंबईत चुकीच्या जागी पार्क केलेली गाडी पोलिस व टोईंग वाले कसे त्या गाडीची वाट लावत होते ह्याचा व्हिडीओ मिडियात आलाय. फक्त २०० रु मिळवण्यासाठी टोईंगवाले त्या गाडी चा दरवाजा लोखंडी सळ्या घालुन ज बर दस्तीने उघड ण्याचा प्रय त्न करताना ह्या व्ही डीयो मध्ये दाखवलय. जेव्हां त्या व्हीडी यो घेणार्याने विचारल की अस गाडी उघडण कायदेशी र आहे काय ? त्यावर पोलिस विचारतोय हि तुझी गाडी आ हे ? नाही ना मग चालू लाग ! २००९ मध्ये झालेल्या न्यायालईन सुनावणीत खालील बाबी समोर आल्या, १. वहातुक पोलिसांनी चुकीच्या जागी लावलेली गाडी कोणत्या कारणानी टो करून न्यावी हे स्पष्ट नाही. २. टोईंग कंत्राटदार निवडीचे कुठचेही निकष नाहीत. ३. २००९ पर्यंत असलेले ६ कंत्राटदार पोलिसांचे नातेवाईक आहेत. ४. २००९ पर्यंत ह्या कंत्राटदारां नी २.६ कोटी रुपये कमावले होते. ५. टोईंग करताना गाडी ला झालेल नुकसान कोणिही भरुन देत नाही, त्याला इंशुरंस क्लेमही करता येत नाही. ६. फक्त २००रु कमवण्यासाठी टोईंग वाले कसेही गाड्या उ चलतात, परीणामी वाहन मालकाला २०००-३००० रु चा फटका बसु शकतो. संदर्भ: टाइंम्स ऑफ ईंडीया २५ फेब्रु २०१४ वहातुक पोलिसांच्या खासगी वाहन टोईंग

In reply to by डँबिस००७

मदनबाण 25/02/2014 - 10:58
या टोइंगवाल्यांचा {स्थानिक भाषेत टोचनवाले} असा अनुभव आला आहे,पैसे उकळण्यासाठी वाट्टेल ते करतात. माझ्या मते गेली १० वर्ष ही महाराष्ट्राच्या दॄष्टीने काळी वर्ष सिद्ध झाली आहेत.आपले राजकारणी इतके मस्तवाल झाले आहेत की ते आता कोणालाही आवरेनासे झाले आहेत... देश तर खड्ड्यात गेलाच आहे,पण महाराष्ट्र तर गाडला गेला आहे. :(

अर्धवटराव 12/02/2014 - 07:09
फार आतल्या गाठीचं राजकारण असावं का? प्रचाराला मुद्दे बनवण्याचं काम चालु झालय का? कसंही करुन केंद्राला/काँग्रेसला सरकारचा सपोर्ट काढायला भाग पाडण्याकरता हे सगळं असावं का? कि भ्रष्टाचाराला दिसेल तिथे जमेल तसं ठोकुन काढायचा प्रयत्न चाललाय? तसं असेल तर हे असं आत्मघातकी वागणं अक्षम्य आहे. जनसामान्यांचा आकांक्षा पराकोटीला पोचवणार्‍या पक्षाकडुन वेगळ्या वर्तनाची अपेक्षा आहे. कि आपणच आप ला परखण्यात कमि पडतोय?

कंजूस 12/02/2014 - 07:15
खरं म्हणजे बहुमत कोणालाच नव्हते . आली असती रा० राजवट . आपला पाठिंबा देणाऱ्या जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी ही नाटकं आहेत .

विकास 12/02/2014 - 10:10
केजरीवाल हे अत्यंत प्रामाणिक गृहस्थ आहेत. त्यांच्या विरोधात उगाच लोकं शंख करतात. त्यांना जे काही त्या त्या वेळेस वाटते ते तसे बोलतात. आज वाटलं शीला दिक्षित भ्रष्टाचारी आहेत तर तसे बोलतील, उद्या तसे नाही वाटले तर हर्ष वर्धनना पुरावा देण्यास सांगतील. जेंव्हा वाटले की निवडणूका लढवायच्या नाहीत, तेंव्हा नाही लढवल्या. पण नंतर निवडणुका जाहीर झाल्यावर लढवाव्याशा वाटल्या तर लढवल्या. असे अजून बरेच काही. पण तुम्हाला असे नाही का वाटत यातून त्यांचे निव्वळ पारदर्शक व्यक्तिमत्व दिसते म्हणून? जर हे मान्य असले तर ते जे काही निर्णय घेत आहेत, त्याला चुक कसे म्हणवते? :)

In reply to by विकास

विकासराव तुमच्याशी जरी अन्य वेळेला सहमत असलो तरी रिलायन्सचा अन्य घोटाळ्यांमधला सहभाग (२जी स्पेक्ट्रम, टोल रोड) पाहील्यानंतर ते सिलिंडरांचा भाव वाढवणार नाहीत असे वाटत नाही. एकाही मराठी नेत्यामधे दम नाही रिलायन्सला जाब विचारायचा. पुणे कोल्हापूर रस्त्यावर जी कामे अर्धवट बंद पडली आहेत ती रिलायन्सची आहेत बरीचशी आणि हा कांगावा टोल वसुली मुदतवाढ मिळावी म्हणूनच आहे. त्यामुळे अरविंदाचे या वेळेला नक्की अभिनंदन.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चिरोटा 12/02/2014 - 12:49
स्वतः धिरूभाईंनी त्या काळात राज्यातल्या सर्व मंत्र्यांना खिशात टाकले होते.राज्यात बर्‍यापैकी मलिदा मारल्यावर त्यांनी मोर्चा गुजरात्कडे ईतर राज्यांकडे वळवला.अंबानी पुत्र तोच कित्ता गिरवत आहेत.कॉन्ग्रेस व भाजपा, दोन्हीही पक्ष अडानी,अंबांनींचे मिंधे आहेत.अंबानी,अडानी दोन्हीही राजकिय आशीर्वादाने,पैसे चारून मोठे झालेले ग्रुप्स आहेत. अनेक टी.व्ही चॅनेल्समध्ये अंबांनीची गुंतवणूक असल्याने आता बातम्या दाबल्या जातील् व प्रिंट मिडियातून 'केजरीवाल' कम्युनिस्ट आहेत्,त्यांना औद्योगिक वाढ नको आहे असा प्रचार केला जाईल.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आनन्दा 12/02/2014 - 13:23
पुणे कोल्हापूर रस्त्यावर जी कामे अर्धवट बंद पडली आहेत ती रिलायन्सची आहेत बरीचशी
तुमचा गैरसमज आहे. सरकारने निविदा कढाल्या, काम सुरु झाले, आणि लक्श्यात आले की ज्या जमीनीवर आपण काम करत आहोत, ती जमीन अधिग्रहीत केलेलीच नाही. म्हाणून पूर्ण रस्त्याचे काम बंद आहे, अगदी कात्रज बायपासपासून.

In reply to by आनन्दा

असहमत. जी उड्डाणपुलांची कामे बंद आहेत ती पूर्वीच्याच मुख्य रस्त्यावर आहेत. काही ठिकाणी मुख्य रस्त्यात बोगद्यासारखे उभे ठोकळे आणि काही ठीकाणी केवळ मधले दोन खांब उभारून कामे बंद आहेत व बाजूने डायव्हर्जन आहेत. जाता जाता: कैलास भेळ आणि अन्य भेळवाले ज्यांच्याकडे भेळ खायला हुच्चभ्रू लोक गाड्या रस्त्यावर उभ्या करून थांबायचे त्यांच्या रस्त्यालगतच्या जागा ५-६ वर्षापूर्वीच अधिग्रहीत करून पैसे चुकते करून झाले होते. तरीही राजकीय आशिर्वादान त्यांची दुकाने रस्त्यालगतच होती. संस्कृती नावाच्या चिमुरडीच्या मृत्यूनंतर जी अतिक्रमणे हटवायची लाट आलि त्यात ती दुकाने उठवली गेली. त्यामुळे अरेच्चा जमिन अधिग्रहीतच केली नाही? असे झाले असेल असे वाटत नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकास 12/02/2014 - 20:14
माझा मुद्दा हा एकेंच्या सातत्याने चाललेल्या नौटंकीसंदर्भात आहे. तरी देखील... पुणे कोल्हापूर रस्त्यावर जी कामे अर्धवट बंद पडली आहेत ती रिलायन्सची आहेत बरीचशी आणि हा कांगावा टोल वसुली मुदतवाढ मिळावी म्हणूनच आहे. त्यामुळे अरविंदाचे या वेळेला नक्की अभिनंदन. अभिनंदन सोडल्यास, या मुद्याशी सहमत आहे. अभिनंदन देखील करेन जर खरेच काही तरी केलेले दिसले तर. आत्ता पर्यंतच्या त्यांच्या पब्लिसिटी स्टंट्स मुळे अजून तरी तसे वाटत नाही. मला कल्पना आहे की एफ आय आर दाखल केला आहे. माध्यमांच्या मते त्यात मुकेश अंबानींचे नाव नाही एकेंच्या मते ते आहे वगैरे. अंबानींचे नाव असणे / नसणे हा मामुली मुद्दा आहे. उद्या अंबानींचे नाव न आणता देखील रिलायन्सला चाप लावता आला तर ते खूप मोठे काम असेल असे वाटते. एकीकडे रिलायन्स, मोईली, देवरा यांच्याबद्द्ल ओरड करायची, आणि त्याच दिवशी दुसरीकडे ज्या लोकांनी आपच्या आंदोलनात सहभाग केला त्यांची थकबाकी माफ करण्याचे जाहीर करायचे. पहीले भ्रष्ट तर दुसरे कोण सज्जन? बरं ज्यांनी महागडी बिले आधी मुकाट्याने भरली त्यांचे काय? का त्यांनी झक मारली? यात मी रिलायन्स-मोईली-देवरा यांना ते भ्रष्ट नाहीत असे म्हणत नाही. त्यांच्याविरोधात (विशेष करून मंत्र्यांच्या विरोधात) जर अँटी करप्शन ब्युरोकडून एफ आय आर दाखल केला गेला असेल तर ते स्वागतार्हच आहे. पण त्यातून बाकी काही निष्पन्न होण्यापेक्षा "आमचा पाठींबा काढा" हा मुद्दा अधिक वाटत आहे. आणि हो, केजरीवाल यांच्या सगळ्या भुमिका मला निव्वळ माकडचेष्टा वाटतात. पण त्या तशा नसल्याचे सिद्ध होऊन, त्यातून खरेच जनतेचे कल्याण होत आहे असे दिसले आणि मी चूक ठरलो तर मला आनंदच होईल.

In reply to by विकास

नितिन थत्ते 12/02/2014 - 21:03
केंद्रसरकारच्या निर्णयाची चौकशी राज्यसरकार करू शकत नाही असे जेटली म्हणत आहेत. http://blogs.timesofindia.indiatimes.com/arun-jaitleys-blog/entry/can-a-state-government-investigate-a-decision-of-the-central-government

In reply to by नितिन थत्ते

विकास 12/02/2014 - 22:25
जेटली म्हणतात म्हणून नाही, पण प्रस्थापित कायदेच पाळायचेच नसले तर ते सरकार कसे काय? त्यांनी घटनेवर हात ठेवून शपथ घेतली का कानात बोटे घालून? जर कायदा चुकीचा असेल तर तो बदलण्यासाठी लोकशाहीत सत्ता संपादन करता येते. आप ने दिल्लीत सत्ता संपादन केले आहे. पण त्यांना निर्णय घेताना कायद्याने घेण्याऐवजी आवाजीने घेण्यात जास्त रस दिसत आहे. जशा निवडणुका जवळ येतील तसे त्यांच्या निर्णयासंदर्भातील आणि त्यांच्या परदेशी मिळकतीवरूनचे, भारती यांच्यावरील खटले वर येऊ लागतील असे वाटत आहे.

बरोब्बर जेव्हा आपचं सरकार आलं होतं तेव्हा एक दरवाढ झाली होती. त्याही पुढे जाऊन अजून एक दरवाढ दिल्लीच्या जनतेवर लादण्याचा यांचा डाव होता तो तूर्त तरी अरविंद केजरीवालनि नक्कीच attack is the best defense हे तत्व वापरून उधळला आहे. यामुळे ती नवीन होणारी दरवाढ तरी केली जाणार नाही.(अशी आशा करूया). आणि हि लोकं सहजासहजी सुधारणार नाहीत त्यामुळे अश्या मार्गांचा वापर जर जनतेच्या सुखासाठी होत असेल तर काय हरकत आहे.

मि कोण 12/02/2014 - 11:38
असहमत. लोकान्ना (तुम्हाला) अप्रमाणिक राजकारणी दिसत नाहित. पण .... One of my friend said "दुष्प्रवृत्त लोकांचा नंगानाच या देशाने गेली ६५-७० वर्षे पाहिला. त्यावर प्रतिक्रिया म्हणून आता सत्प्रवृत्त लोक थोडे आक्रमक झाले तर बिघडले कुठे? शेवटी हे सर्व ते देशाच्या दीर्घकालीन भल्यासाठीच करत आहेत, स्वार्थ म्हणून नव्हे. दिल्लीत जे चालू आहे ते प्रस्थापित राजकारण्यांना अराजक वाटणारच कारण त्यांना फक्त वैयक्तिक किंवा सामुहिक हितसंबंधांचे राजकारण कळते. देशहिताचे राजकारण कळण्याची आणि करण्याची त्यांची कुवत नाही."

विकास 14/02/2014 - 18:16
भाजपा - काँग्रेस चे थोडक्यात म्हणणे आहे की जर सांसदीय मार्गाने (पक्षी: घटनेनुसार राज्यपालांची परवानगी + दिल्लीमुळे केंद्राची परवानगी घेतल्यास) जर हे विधेयक विधानसभेच्या पटलावर ठेवले तर आम्ही पाठींबा देऊ. एकेंचे म्हणणे आम्हाल तशी करायची गरज वाटत नाही... थोडक्यात कायदा मधे आल्यास तो उल्लंघून पुढे जाऊ. हे चळवळ्या नाही तर घटनेची शपथ घेऊन झालेला मुख्यमंत्री म्हणतो. मग हेच मुख्यमंत्री बरखा दत्तला सांगणार की जर हे विधेयक मी आणू शकलो नाही तर राजीनामा देईन. आता ते दिलेला शब्द पाळतात का परत एस एम एस सारखा नवीक काहीतरी ड्रामा करतात ते बघायचे.

In reply to by विकास

नितिन थत्ते 14/02/2014 - 19:48
काँग्रेस काही पाठिंबा काढेना !! मग आता निदान नायब राज्यपाल तरी बडतर्फ करतात का ते पाहू असा विचार दिसतो.

In reply to by नितिन थत्ते

आतिवास 14/02/2014 - 20:00
'राजिनामा पत्र लिहिताहेत केजरीवाल साहेब सेक्रेटरियेटमध्ये बसून' अशी आता 'ब्रेकिंग न्यूज' (!) आहे 'टाईम्स'वर. समजा नायब राज्यपालांनी राजिनामा स्वी कारला, तरी 'काळजीवाहू' सरकार म्हणून 'आप'ला काम करावे लागेल का? ते किती काळापर्यंत? कायद्यानुसार काय तरतूद आहे?

In reply to by आतिवास

विकास 14/02/2014 - 20:50
एनडीटीव्ही, आयबीएन मधे आता बातम्या कुणाच्या देयच्या हे कळत नसल्याने डाउनसाईझ करण्याचा विचार चालू झाला आहे. :) एनीवे: कांगावखोरपणा सोडून यातून काही शिकले तर एके चांगले राजकारणी बनू शकतील - तेंव्हा त्यांना शुभेच्छा.

दुश्यन्त 14/02/2014 - 21:21
बरे झाले ड्रामा कंपनी गेली ते. रोज उठून एक तमाशा. काम करणे जमत नाही, फक्त तमाशा जमतो म्हणून लोकसभेला कुठल्या तोंडाने लोकांसमोर जायचे म्हणून हा पळपुटे पणा केला. मुख्यमंत्र्याला किती तरी अधिकार असतात. कायद्याच्या चौकटीत राहून किती तरी लोकोपयोगी कामे करता आले असते. मात्र हे न करता असैविधानिक मार्गाने बिल सभागृहात मांडायला गेले आणि सफल झाले नाही म्हणून राजीनामा दिला. लोकांनी यासाठी मते दिली होती का ?

मानला केजरीवालला, आर या पार ची लढाई, भ्रष्टाचार उखडायचाच आहे तर त्याचे समूळ उच्चाटन नाही तर मीच पडतो रिंगणातून बाहेर. भ्रष्टाचार्‍यांनीच घालून दिलेली बंधने पाळत लढण्यात अर्थ नाही, अश्याने देश आणखी ५० वर्षे सुधारतच राहील.. एखादी सामाजिक क्रांतीचीच गरज आहे, प्रश्न असा आहे की देशभरात एकाच वेळी ती होऊ शकते का.. केजरीवाल वा त्यांनी स्थापलेला पक्ष तिचे नेत्रुत्व करू शकतो का..

In reply to by तुमचा अभिषेक

अर्धवटराव 16/02/2014 - 09:01
व्यवस्थेत भ्रष्टाचार आहे कि व्यवस्था भ्रष्टाचारी आहे हा निर्णय प्रथम घेतला पाहिजे साहेबांनी. व्यवस्थेत भ्रष्टाचार असेल तर त्यांना व्यवस्था कंट्रोल करायची संधी मिळाली होती कि. दशकांचा भ्रष्टाचार एका दिवसात तर समाप्त झाला नसता, पण किमान एक वर्षभर तरी प्रयत्न करायचा. हे महाराज तर दुसर्‍या महिन्यातच पळाले. व्यवस्थाच भ्रष्टाचारी असेल तर कशाला निवडणुकीच्या भानगडीत पडायचं? दुसरा कुठला योग्य मार्ग असेल ना साहेबांकडे.

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 24/02/2014 - 22:13
ते विधेयक पाठिंबा देणार्या पक्षाच्या क्रुपाशिर्वादाने फेटाळ्ले गेल्यावर राजीनामा देणे नैतिक्तेला धरून आहे. असेच वाटते.

श्रीगुरुजी 16/02/2014 - 15:28
केजरीवाल हे प्रामाणिक आहेत की नाटकी या प्रश्नापेक्षा त्यांनी आणलेले जनलोकपाल विधेयक मंजूर होणे आवश्यक होते. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यापासून नगरसेवकापर्यंत कोणत्याही राजकारण्याला राज्यपालांची परवानगी, सभापतीची परवानगी, राष्ट्रपतीची परवानगी अशी कवचकुंडले न देता थेट खटला भरून न्यायालयात खेचण्याची व्यवस्था असणारा कायदा असणे आवश्यक आहे. पराकोटीचा भ्रष्टाचार करूनसुद्धा अशोक चव्हाण, मायावती, मनमोहन सिंग इ. मंडळी या कवचकुंडलामुळेच आजपर्यंत वाचली आहेत. जनलोकपाल आले असते तर निदान दिल्लीपुरते तरी या भ्रष्टाचारी मंडळींची कवचकुंडले जाऊन त्यांना न्यायालयात खेचता आले असते.

डँबिस००७ 25/02/2014 - 10:39
काल,परवा पासुन मुंबईत चुकीच्या जागी पार्क केलेली गाडी पोलिस व टोईंग वाले कसे त्या गाडीची वाट लावत होते ह्याचा व्हिडीओ मिडियात आलाय. फक्त २०० रु मिळवण्यासाठी टोईंगवाले त्या गाडी चा दरवाजा लोखंडी सळ्या घालुन ज बर दस्तीने उघड ण्याचा प्रय त्न करताना ह्या व्ही डीयो मध्ये दाखवलय. जेव्हां त्या व्हीडी यो घेणार्याने विचारल की अस गाडी उघडण कायदेशी र आहे काय ? त्यावर पोलिस विचारतोय हि तुझी गाडी आ हे ? नाही ना मग चालू लाग ! २००९ मध्ये झालेल्या न्यायालईन सुनावणीत खालील बाबी समोर आल्या, १. वहातुक पोलिसांनी चुकीच्या जागी लावलेली गाडी कोणत्या कारणानी टो करून न्यावी हे स्पष्ट नाही. २. टोईंग कंत्राटदार निवडीचे कुठचेही निकष नाहीत. ३. २००९ पर्यंत असलेले ६ कंत्राटदार पोलिसांचे नातेवाईक आहेत. ४. २००९ पर्यंत ह्या कंत्राटदारां नी २.६ कोटी रुपये कमावले होते. ५. टोईंग करताना गाडी ला झालेल नुकसान कोणिही भरुन देत नाही, त्याला इंशुरंस क्लेमही करता येत नाही. ६. फक्त २००रु कमवण्यासाठी टोईंग वाले कसेही गाड्या उ चलतात, परीणामी वाहन मालकाला २०००-३००० रु चा फटका बसु शकतो. संदर्भ: टाइंम्स ऑफ ईंडीया २५ फेब्रु २०१४ वहातुक पोलिसांच्या खासगी वाहन टोईंग

In reply to by डँबिस००७

मदनबाण 25/02/2014 - 10:58
या टोइंगवाल्यांचा {स्थानिक भाषेत टोचनवाले} असा अनुभव आला आहे,पैसे उकळण्यासाठी वाट्टेल ते करतात. माझ्या मते गेली १० वर्ष ही महाराष्ट्राच्या दॄष्टीने काळी वर्ष सिद्ध झाली आहेत.आपले राजकारणी इतके मस्तवाल झाले आहेत की ते आता कोणालाही आवरेनासे झाले आहेत... देश तर खड्ड्यात गेलाच आहे,पण महाराष्ट्र तर गाडला गेला आहे. :(
लेखनविषय:
लेखनप्रकार
आप ने केन्द्र सरकारवरच निशाना साधला हे काय वाचतो आहे मी. आप ने फ आई आर दाखल करून त्यात दोन केंद्रीय मंत्री आणी अंबानी साहेबांना गुंतावले आहे? काल पार्यंत आप च्या चळ्यांना माकड चाळे म्हणून मजेत पाहत होतो. आता वाटत आहे की माकडाच्या हातात कोलित दिले की काय? जवू देत म्हणा. अती झाले आणी हसू आले. पण व्यवस्था नीट लावायला निघालेली ही माणसे स्वताहा अगदीच अव्यवस्थित आहेत असे वाटते. निर्णया घेण्याचा घटनाडत्त अधिकार ज्या पदास आहे, त्या पदावरच्या व्यक्तीस असे कोर्टात खेचता येते का? आता आधीच गजबजलेल्या कोर्टात आणखीन केस येतील. मग मी तुला, तू त्याला आणी तो मला असे करत साखळी केस तयार होतील.

ओला रुमाल

विनायक प्रभू ·

झकासराव 22/01/2014 - 09:44
क्रमश : :( बा द वे, एक जुनी मराठी सिरियल आठवली. त्यात वेगवेगळे भाग असायचे. असाच एक पत्त्याचा भाग होता. पण त्याची स्टोरी वेगळी होती.

आतिवास 22/01/2014 - 09:59
विशेष काही कळलं नाही (म्हणजे कथानायकाला गंडवलं गेलं हे कळलं, पण त्याव्यतिरिक्त आणखी काही असल्यास कळलं नाही). बघू, पुढच्या भागात कदाचित काही कळेल मला!

आदूबाळ 22/01/2014 - 12:34
दोन शंका: - सरदारजीला द्यायचे पैसे लोणावळ्याने टाकले होते ना? मग ते लोणावळ्यालाच परत द्यायला पाहिजेत - नंबर सरदारजीला का दिला? - शो ला ६००० लागत असतील तर देणे ७००० चे कसे? (आधीचे डाव कथानायक प्लसमध्ये होता.) पुभाप्र. (हा बुक्का सात हजारापेक्षा जास्त आहे असं वाटतंय.)

प्यारे१ 22/01/2014 - 12:40
>>> क्रमशः मस्तच सर! ओल्या रुमालाखाली कोंबडा सापडला की पंख फडफडावयला येत नाहीत त्यामुळं पळता येत नाही नि पटकन सापडतो.

जर शेवटच्या डावात कथानायकाकडे १,२,३(sequence) असे पत्ते होते आणि सरदारजीकडे २,३,५ असे पत्ते होते तर कथानायक जिंकायला हवा होता. मग कथानायक कसे काय पैसे देणे लागत होता?

कारण.... मी आणि माझा मित्र , १९९१ साली नागपूर ते मुंबई , गीतांजली एक्सप्रेसने येत होतो.आमच्या समोर ३ व्यापारी होते.वर्धा स्टेशन ते पुलगांव येईपर्यंत असेच ३ जण आले. त्यातला एक सरदारजी होता.आधी रमी आणि नंतर ३ पत्ती चालू करून , बडनेरा येईपर्यंत त्या ३ही व्यापारांना त्यांनी ४०/४५ हजराला गंडा घातला.

झकासराव 22/01/2014 - 09:44
क्रमश : :( बा द वे, एक जुनी मराठी सिरियल आठवली. त्यात वेगवेगळे भाग असायचे. असाच एक पत्त्याचा भाग होता. पण त्याची स्टोरी वेगळी होती.

आतिवास 22/01/2014 - 09:59
विशेष काही कळलं नाही (म्हणजे कथानायकाला गंडवलं गेलं हे कळलं, पण त्याव्यतिरिक्त आणखी काही असल्यास कळलं नाही). बघू, पुढच्या भागात कदाचित काही कळेल मला!

आदूबाळ 22/01/2014 - 12:34
दोन शंका: - सरदारजीला द्यायचे पैसे लोणावळ्याने टाकले होते ना? मग ते लोणावळ्यालाच परत द्यायला पाहिजेत - नंबर सरदारजीला का दिला? - शो ला ६००० लागत असतील तर देणे ७००० चे कसे? (आधीचे डाव कथानायक प्लसमध्ये होता.) पुभाप्र. (हा बुक्का सात हजारापेक्षा जास्त आहे असं वाटतंय.)

प्यारे१ 22/01/2014 - 12:40
>>> क्रमशः मस्तच सर! ओल्या रुमालाखाली कोंबडा सापडला की पंख फडफडावयला येत नाहीत त्यामुळं पळता येत नाही नि पटकन सापडतो.

जर शेवटच्या डावात कथानायकाकडे १,२,३(sequence) असे पत्ते होते आणि सरदारजीकडे २,३,५ असे पत्ते होते तर कथानायक जिंकायला हवा होता. मग कथानायक कसे काय पैसे देणे लागत होता?

कारण.... मी आणि माझा मित्र , १९९१ साली नागपूर ते मुंबई , गीतांजली एक्सप्रेसने येत होतो.आमच्या समोर ३ व्यापारी होते.वर्धा स्टेशन ते पुलगांव येईपर्यंत असेच ३ जण आले. त्यातला एक सरदारजी होता.आधी रमी आणि नंतर ३ पत्ती चालू करून , बडनेरा येईपर्यंत त्या ३ही व्यापारांना त्यांनी ४०/४५ हजराला गंडा घातला.
लेखनविषय:
"चो, एक प्रॉब्लेम आहे, जरा मदत हवी आहे".़ कथानायक, वय ५५, सर्व काही व्यवस्थित. वयाचा टप्पा, जिथे पुढे काय चा कायमचा छळवाद. "हा प्रॉब्लेम झाला तो कोइमतुर एक्सप्रेस मधे, पूणे ते लोणावळा मधे" हम्म "मी माझा नंबर एका पॅसेंजर ला दीला आहे" बर मग? "त्याला मी ७००० देणे लागतो" ???. "अरे पत्यात हरलो" ३ पत्ती? "हो" अगदी सुरुवाती पासुन, डिटेल्स सांग. "ऑफीस च्या ़कामानिमित्त पूण्याला गेलो १५ मिनीटात काम झाले. १० लाखाची ऑर्डर्‍र मिळाली. अ‍ॅड्रीनलीन लेवल जरा जास्तच होती. ३एसी मधे बसलो. टी.सी बरोबर मांडवली पण झाली. शिवा़जी नगर आउटर गाडी थांबली होती.

बंबईसे आया मेरा दोस्त

आयुर्हित ·

In reply to by प्यारे१

तुमच्यामुळे मला 'ट्विटर कथा' मराठीत लिहीण्याची कल्पना मिळाली. वरच्या प्रतिसादातलं 'कसं ना' एवढं काढून टाकलं की एक कथा झाली.

In reply to by आदूबाळ

मला धागा वाचून वाटलं, सगळ्यांनी आपापल्या लहानपणापासून आत्तापर्यंत काय बदल झाले हे मर्यादित शब्दात लिहायचं असं धाग्याचं रूप आहे. म्हणून मी पण अंमळ आखूड प्रयत्न केला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 22/01/2014 - 21:21
सगळ्यांनी आपापल्या लहानपणापासून आत्तापर्यंत काय बदल झाले हे मर्यादित शब्दात लिहायचं असं धाग्याचं रूप आहे. कल्पना चांगली आहे. मी लगेच लिहायचा विचार केला पण "मर्यादीत शब्द" ही संकल्पना अजून समजतच नाही. कदाचीत मी अजून त्यासाठी लहान असेन. म्हणून मी पण अंमळ आखूड प्रयत्न केला. मी चुकून आखूडच्या ऐवजी आखडू वाचले, त्याबद्दल क्षमस्व.

In reply to by विकास

मी चुकून आखूडच्या ऐवजी आखडू वाचले, त्याबद्दल क्षमस्व.
नाही. क्षमा मागूच नका. आखूड हा शब्द वापरण्यामागे हा पण एक हेतू होताच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 22/01/2014 - 22:48
नाही. क्षमा मागूच नका. असे वाचल्यावर आखडू कसे म्हणणार? खरचं आमच्या सातवीतल्या बाईंनी बरोबर सांगितले होते की "आखडू म्हणू नये", ते एकदम आठवले.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 23/01/2014 - 03:50
मला केवढा अभिमान वाटतो हो, मला कोणी आखडू, स्नॉब वगैरे म्हटल्यावर! म्हणूनच असे जेंव्हा मी म्हणत नाही तेंव्हा मी वास्तवीक तुमच्यावर टिका करत असतो! ;)

चित्रगुप्त 22/01/2014 - 09:06
छान. आवडले. 'लवकर निजे, लवकर उठे' यावर पूर्वीचा एक धागा आहे, आणि त्यावर प्रतिसादांची धमाल आहे. उदाहरणार्थ, बॅटमॅन यांचा काव्यमय (पृथ्वी वृत्तातील) प्रतिसादः निजे लवकरी उठे चटशिरी, तयाला खरी | मिळेल धनबुद्धिसंपद बहू, टनाने जरी | नुरे निजसखी तयाजवळि हो, करी दे तुरी | पळोनि इतरांस डेटित बसे, बला ही खरी || आणि आमचे शार्दुलविक्रिडातील हे कवन ( चालः मंगलाष्टकाची) झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती मूळ धाग्याचा दुवा: (कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.) http://misalpav.com/node/24817

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 22/01/2014 - 19:46
झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती
हे अधिक गोळीबंद झालेय. चित्रांसोबत शब्दचित्रांतही आपला हातखंडा आहे चित्रगुप्त सर.

In reply to by चित्रगुप्त

सूड 22/01/2014 - 20:42
>>झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती हे झक्कासच !! :))))

Atul Thakur 22/01/2014 - 09:30
पण आता तरी यात बदल करावा लागणार आहे असे वाटते. कारण आमची न शिकलेली आजी, खूप मोठ्ठे तत्वज्ञान सांगत होती, हे पटायला २०१४ साल उजाडावे लागले आणि मनात असलेले भारतीय संस्कृतीचे महत्व अजूनही वाढले. म्हणजे २०१४ मध्ये नक्की काय घडलं की ज्यामुळे आपल्याला आपल्या मध्ये बदल घडवावा असं वाटलं हे जाणण्याची उत्सुकता आहे. बाकी एवढेसे मॅटर आणि क्रमशः????? बात कुछ जमी नही.

मनीषा 22/01/2014 - 10:59
छान ! छान !! भारतीय संस्कृती खरच महान आहे. तुमचा संकल्प सिद्धिस जावो ही सदिच्छा ! (पुढचा संकल्प याच लेखात सांगीतला असता तरी चालले असते)

चिरोटा 22/01/2014 - 11:19
मस्त्.टोपणनावावरून आपण लवकर निजून लवकर उठणारे,सूर्यनमस्कार घालणारे,च्यवनप्राश खाणारे वाटला होतात.

'जीवशास्त्रीय घड्याळ' हीच संकल्पना यासंदर्भात लागू पडते . त्याचप्रमाणॅ पहाटे ३ च्या वेळी झोप आर ई एम अवस्थेतली झोप म्हणजेच साखरझोप असते... यावेळेला अनेक क्रिएटीव्ह / सुखद भावना जाग्रुत करणारे हार्मोन स्रवतात ,असे मागे वाचलेले होते.

In reply to by मंदार कात्रे

मदनबाण 23/01/2014 - 22:37
त्याचप्रमाणॅ पहाटे ३ च्या वेळी झोप आर ई एम अवस्थेतली झोप म्हणजेच साखरझोप असते... जवळपास ३+ वर्ष अशी { रामदास काकांच्या शब्दात सांगायचे झाले तर ग्रेव्हवयार्ड शिफ्ट}शिफ्ट केली आहे ! म्हणजे १:४०/४५ ड्रायव्हर फोन करायचा... साब,गाडी आ गया है| माझ्या मोबल्यात २:०० एम चा अलार्म सेट असायचा. १५ मिनीटात अंघोळ करुन खाली यायचे,कुत्र्यांच्या तावडीतुन स्वतःला वाचवुन स्वतःला गाडीत ढकलायचे...ऑफिस येई पर्यंत त्याच्याशी सतत बोलत रहायचे ! नाहीतर भाऊ स्टेअरिंगवर झोपणार याची खात्री ! ३:१५ ला हॅन्डऑव्हर घ्यायचा व ३:३० ला आयपी फोन भारतात ट्रान्सफर करायचा की शिफ्ट सुरु... दर ५ दिवसांनी शिफ्ट बदलायची ! तरी अजुन जिवंत आहे.

सकाळी 6 ते 7 - 1 कप चहा, 1 फळ, स्वतः:चे आन्हिक आवरणे स. 7 ते 7।। - 12 सूर्यनमस्कार, 200 ते 500 दोरीच्या उड्या....
पण तो सगळा प्रोग्रॅम या वयोगटासाठी आहे:
स. 11।। ते 5।। - शाळा
आणि या वेळा पाळायच्या असतील :
रात्री 10 ते सकाळी 6 - झोप
तर हा आयटम :
मैत्रिणींबरोबर बाहेर जाणे, ....
त्यात बसणे नाही!

मनात असलेले भारतीय संस्कृतीचे महत्व अजूनही वाढले.
यावरून भारतीय संस्कृतीचं महत्त्व कसं वाढलं हे कळत नाही. कारण इतर संस्कृतींमध्येही अशाच म्हणी आहेत. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy, and wise.

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 23/01/2014 - 23:30
हात्तेरेकी. अहो गुर्जी त्या इंग्रजांनी आपल्या इथूनच ती म्हण चोरली आहे. सांगतो कसं ते. भारतात इंग्रज पहिल्यांदा बंगालात स्थिरावले. बंगाल पूर्वेला असल्याने तिकडे सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होतो. शिवाय बंगाल प्रांत सुपीकता आणि समृद्धीसाठी फेमस होता. म्हणून ती म्हण तशी तयार झाली. म्हणजे व्हा तुम्ही वेल्दी वैग्रे, आम्ही येतोच तुम्हाला लुटायला असं त्यात अभिप्रेत आहे ;)

पैसा 28/01/2014 - 19:40
diary चांगली सवय लावून घेतल्याबद्दल ही सप्रेम भेट. आता डायरी लिहायचीही सवय ठेवा.

सुबोध खरे 28/01/2014 - 21:13
http://www.firstpost.com/india/no-indian-standard-time-assam-will-turn-its-clocks-ahead-by-an-hour-1318993.html. लवकर उठल्यामुळे आणि लवकर निजल्यामुळे आपण सूर्याची उर्जा आणि प्रकाश फुकट घालवतो. जर हेच आपले घड्याळ एक तासाने पुढे केले तर विजेचा होणारा बराच अपव्यय टळेल. हे विशेषतः पुर्ण वेळ सूर्यप्रकाश असणार्या भारतासारख्या देशात आहे. अमेरिकेत त्याचा फारसा फायदा होणार नाही असे त्यांचे आकडे दर्शवितात. क्रमश

आयुर्हित 28/01/2014 - 22:12
खूप चांगला पण वेगळा मुद्दा आहे! हा फक्त आसाम/पूर्वेकडच्या राज्यामध्ये लागू होऊ शकणारा day light saving चा मुद्दा आहे. मी सांगतो तो मुद्दा: भारतीय संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे लवकर उठल्यामुळे आणि लवकर निजल्यामुळे समस्त मानव जातीवर होणारे फायदे हे आरोग्यदायी, ज्ञानवर्धक व त्यामुळे संपत्तीवर्धक देखील आहेत. याचा जर सर्वांनी फायदा घेतला तर पुढच्या १० वर्षात कमीत कमी २००कोटी लोकांचे होऊ घातलेले आजार टळतील.

In reply to by प्यारे१

तुमच्यामुळे मला 'ट्विटर कथा' मराठीत लिहीण्याची कल्पना मिळाली. वरच्या प्रतिसादातलं 'कसं ना' एवढं काढून टाकलं की एक कथा झाली.

In reply to by आदूबाळ

मला धागा वाचून वाटलं, सगळ्यांनी आपापल्या लहानपणापासून आत्तापर्यंत काय बदल झाले हे मर्यादित शब्दात लिहायचं असं धाग्याचं रूप आहे. म्हणून मी पण अंमळ आखूड प्रयत्न केला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 22/01/2014 - 21:21
सगळ्यांनी आपापल्या लहानपणापासून आत्तापर्यंत काय बदल झाले हे मर्यादित शब्दात लिहायचं असं धाग्याचं रूप आहे. कल्पना चांगली आहे. मी लगेच लिहायचा विचार केला पण "मर्यादीत शब्द" ही संकल्पना अजून समजतच नाही. कदाचीत मी अजून त्यासाठी लहान असेन. म्हणून मी पण अंमळ आखूड प्रयत्न केला. मी चुकून आखूडच्या ऐवजी आखडू वाचले, त्याबद्दल क्षमस्व.

In reply to by विकास

मी चुकून आखूडच्या ऐवजी आखडू वाचले, त्याबद्दल क्षमस्व.
नाही. क्षमा मागूच नका. आखूड हा शब्द वापरण्यामागे हा पण एक हेतू होताच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 22/01/2014 - 22:48
नाही. क्षमा मागूच नका. असे वाचल्यावर आखडू कसे म्हणणार? खरचं आमच्या सातवीतल्या बाईंनी बरोबर सांगितले होते की "आखडू म्हणू नये", ते एकदम आठवले.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 23/01/2014 - 03:50
मला केवढा अभिमान वाटतो हो, मला कोणी आखडू, स्नॉब वगैरे म्हटल्यावर! म्हणूनच असे जेंव्हा मी म्हणत नाही तेंव्हा मी वास्तवीक तुमच्यावर टिका करत असतो! ;)

चित्रगुप्त 22/01/2014 - 09:06
छान. आवडले. 'लवकर निजे, लवकर उठे' यावर पूर्वीचा एक धागा आहे, आणि त्यावर प्रतिसादांची धमाल आहे. उदाहरणार्थ, बॅटमॅन यांचा काव्यमय (पृथ्वी वृत्तातील) प्रतिसादः निजे लवकरी उठे चटशिरी, तयाला खरी | मिळेल धनबुद्धिसंपद बहू, टनाने जरी | नुरे निजसखी तयाजवळि हो, करी दे तुरी | पळोनि इतरांस डेटित बसे, बला ही खरी || आणि आमचे शार्दुलविक्रिडातील हे कवन ( चालः मंगलाष्टकाची) झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती मूळ धाग्याचा दुवा: (कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.) http://misalpav.com/node/24817

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 22/01/2014 - 19:46
झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती
हे अधिक गोळीबंद झालेय. चित्रांसोबत शब्दचित्रांतही आपला हातखंडा आहे चित्रगुप्त सर.

In reply to by चित्रगुप्त

सूड 22/01/2014 - 20:42
>>झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती हे झक्कासच !! :))))

Atul Thakur 22/01/2014 - 09:30
पण आता तरी यात बदल करावा लागणार आहे असे वाटते. कारण आमची न शिकलेली आजी, खूप मोठ्ठे तत्वज्ञान सांगत होती, हे पटायला २०१४ साल उजाडावे लागले आणि मनात असलेले भारतीय संस्कृतीचे महत्व अजूनही वाढले. म्हणजे २०१४ मध्ये नक्की काय घडलं की ज्यामुळे आपल्याला आपल्या मध्ये बदल घडवावा असं वाटलं हे जाणण्याची उत्सुकता आहे. बाकी एवढेसे मॅटर आणि क्रमशः????? बात कुछ जमी नही.

मनीषा 22/01/2014 - 10:59
छान ! छान !! भारतीय संस्कृती खरच महान आहे. तुमचा संकल्प सिद्धिस जावो ही सदिच्छा ! (पुढचा संकल्प याच लेखात सांगीतला असता तरी चालले असते)

चिरोटा 22/01/2014 - 11:19
मस्त्.टोपणनावावरून आपण लवकर निजून लवकर उठणारे,सूर्यनमस्कार घालणारे,च्यवनप्राश खाणारे वाटला होतात.

'जीवशास्त्रीय घड्याळ' हीच संकल्पना यासंदर्भात लागू पडते . त्याचप्रमाणॅ पहाटे ३ च्या वेळी झोप आर ई एम अवस्थेतली झोप म्हणजेच साखरझोप असते... यावेळेला अनेक क्रिएटीव्ह / सुखद भावना जाग्रुत करणारे हार्मोन स्रवतात ,असे मागे वाचलेले होते.

In reply to by मंदार कात्रे

मदनबाण 23/01/2014 - 22:37
त्याचप्रमाणॅ पहाटे ३ च्या वेळी झोप आर ई एम अवस्थेतली झोप म्हणजेच साखरझोप असते... जवळपास ३+ वर्ष अशी { रामदास काकांच्या शब्दात सांगायचे झाले तर ग्रेव्हवयार्ड शिफ्ट}शिफ्ट केली आहे ! म्हणजे १:४०/४५ ड्रायव्हर फोन करायचा... साब,गाडी आ गया है| माझ्या मोबल्यात २:०० एम चा अलार्म सेट असायचा. १५ मिनीटात अंघोळ करुन खाली यायचे,कुत्र्यांच्या तावडीतुन स्वतःला वाचवुन स्वतःला गाडीत ढकलायचे...ऑफिस येई पर्यंत त्याच्याशी सतत बोलत रहायचे ! नाहीतर भाऊ स्टेअरिंगवर झोपणार याची खात्री ! ३:१५ ला हॅन्डऑव्हर घ्यायचा व ३:३० ला आयपी फोन भारतात ट्रान्सफर करायचा की शिफ्ट सुरु... दर ५ दिवसांनी शिफ्ट बदलायची ! तरी अजुन जिवंत आहे.

सकाळी 6 ते 7 - 1 कप चहा, 1 फळ, स्वतः:चे आन्हिक आवरणे स. 7 ते 7।। - 12 सूर्यनमस्कार, 200 ते 500 दोरीच्या उड्या....
पण तो सगळा प्रोग्रॅम या वयोगटासाठी आहे:
स. 11।। ते 5।। - शाळा
आणि या वेळा पाळायच्या असतील :
रात्री 10 ते सकाळी 6 - झोप
तर हा आयटम :
मैत्रिणींबरोबर बाहेर जाणे, ....
त्यात बसणे नाही!

मनात असलेले भारतीय संस्कृतीचे महत्व अजूनही वाढले.
यावरून भारतीय संस्कृतीचं महत्त्व कसं वाढलं हे कळत नाही. कारण इतर संस्कृतींमध्येही अशाच म्हणी आहेत. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy, and wise.

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 23/01/2014 - 23:30
हात्तेरेकी. अहो गुर्जी त्या इंग्रजांनी आपल्या इथूनच ती म्हण चोरली आहे. सांगतो कसं ते. भारतात इंग्रज पहिल्यांदा बंगालात स्थिरावले. बंगाल पूर्वेला असल्याने तिकडे सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होतो. शिवाय बंगाल प्रांत सुपीकता आणि समृद्धीसाठी फेमस होता. म्हणून ती म्हण तशी तयार झाली. म्हणजे व्हा तुम्ही वेल्दी वैग्रे, आम्ही येतोच तुम्हाला लुटायला असं त्यात अभिप्रेत आहे ;)

पैसा 28/01/2014 - 19:40
diary चांगली सवय लावून घेतल्याबद्दल ही सप्रेम भेट. आता डायरी लिहायचीही सवय ठेवा.

सुबोध खरे 28/01/2014 - 21:13
http://www.firstpost.com/india/no-indian-standard-time-assam-will-turn-its-clocks-ahead-by-an-hour-1318993.html. लवकर उठल्यामुळे आणि लवकर निजल्यामुळे आपण सूर्याची उर्जा आणि प्रकाश फुकट घालवतो. जर हेच आपले घड्याळ एक तासाने पुढे केले तर विजेचा होणारा बराच अपव्यय टळेल. हे विशेषतः पुर्ण वेळ सूर्यप्रकाश असणार्या भारतासारख्या देशात आहे. अमेरिकेत त्याचा फारसा फायदा होणार नाही असे त्यांचे आकडे दर्शवितात. क्रमश

आयुर्हित 28/01/2014 - 22:12
खूप चांगला पण वेगळा मुद्दा आहे! हा फक्त आसाम/पूर्वेकडच्या राज्यामध्ये लागू होऊ शकणारा day light saving चा मुद्दा आहे. मी सांगतो तो मुद्दा: भारतीय संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे लवकर उठल्यामुळे आणि लवकर निजल्यामुळे समस्त मानव जातीवर होणारे फायदे हे आरोग्यदायी, ज्ञानवर्धक व त्यामुळे संपत्तीवर्धक देखील आहेत. याचा जर सर्वांनी फायदा घेतला तर पुढच्या १० वर्षात कमीत कमी २००कोटी लोकांचे होऊ घातलेले आजार टळतील.
मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते! पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”

तुझी 'माया'च बाकी .......

psajid ·

आयुर्हित 16/01/2014 - 19:09
दिलीस कल्पना वाईटाची जरी क्षणिक मोह झाला !! किती छान लिहितोस! सर्वांना असी विवेकशील माया मिळो हीच प्रार्थना त्या सर्वेश्वराला!! बोचकरलं परिस्थितीने परी खंत नव्हती जगण्याला, गेलो सामोरे त्याला अन दुःखाचा पराजय केला !! बहोत खुब! खूप छान! लढाऊ वृत्तीच हवी जीवन जगतांना, हेच खरे! दोन बदल सुवावेसे वाटतात: १) जीव कासावीस झाला धडपडून उठतांना, तुझी ‘माया’च बाकी जीवन उणं होताना !! यात यमक साधले जाईल असे वाटते. २) उन्मादात जगणं व्हावं साजिद पेटावं उमेदीला, जिद्दीला मायेची जोड हवी जीवन सफल करण्याला !! असे जर कवीचे नाव पद्यात आले तर कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहते. चू.भू.दे.घे. आपला मिपास्नेही :आयुर्हीत

पैसा 21/01/2014 - 21:54
शब्दयोजना जरा जास्त व्यवस्थित अशा वृत्तात करता आली तर बघा. म्हणजे चांगल्या कल्पनेचं सादरीकरण पण तसंच लयीत आणि मात्रांमधे बसणारं असेल तर जास्त छान. तुमची कविता मुक्तछंदात नाही त्यामुळे ती वृत्तबद्ध असावी ही सूचना आवडली तर पुढल्या वेळी अमलात आणून बघा!

आयुर्हित 16/01/2014 - 19:09
दिलीस कल्पना वाईटाची जरी क्षणिक मोह झाला !! किती छान लिहितोस! सर्वांना असी विवेकशील माया मिळो हीच प्रार्थना त्या सर्वेश्वराला!! बोचकरलं परिस्थितीने परी खंत नव्हती जगण्याला, गेलो सामोरे त्याला अन दुःखाचा पराजय केला !! बहोत खुब! खूप छान! लढाऊ वृत्तीच हवी जीवन जगतांना, हेच खरे! दोन बदल सुवावेसे वाटतात: १) जीव कासावीस झाला धडपडून उठतांना, तुझी ‘माया’च बाकी जीवन उणं होताना !! यात यमक साधले जाईल असे वाटते. २) उन्मादात जगणं व्हावं साजिद पेटावं उमेदीला, जिद्दीला मायेची जोड हवी जीवन सफल करण्याला !! असे जर कवीचे नाव पद्यात आले तर कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहते. चू.भू.दे.घे. आपला मिपास्नेही :आयुर्हीत

पैसा 21/01/2014 - 21:54
शब्दयोजना जरा जास्त व्यवस्थित अशा वृत्तात करता आली तर बघा. म्हणजे चांगल्या कल्पनेचं सादरीकरण पण तसंच लयीत आणि मात्रांमधे बसणारं असेल तर जास्त छान. तुमची कविता मुक्तछंदात नाही त्यामुळे ती वृत्तबद्ध असावी ही सूचना आवडली तर पुढल्या वेळी अमलात आणून बघा!
लेखनविषय:
तूच दिलीस साथ ढासळत्या मनाला, सावरलेस संकटात क्षणोक्षणी जीवनाला !! धडपडून उठतांना तो जीव कासावीस झाला, तुझी ‘माया’च बाकी जीवन उणं होताना !! ते पंख उबीचे अन दिलासा मनाला, दिलीस कल्पना वाईटाची जरी क्षणिक मोह झाला !! बोचकरलं परिस्थितीने परी खंत नव्हती जगण्याला, गेलो सामोरे त्याला अन दुःखाचा पराजय केला !! उन्मादात जगणं व्हावं आणि पेटावं उमेदीला, जिद्दीला मायेची जोड हवी जीवन सफल करण्याला !! - साजीद यासीन पठाण

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

आयुर्हित ·

अर्धवटराव 11/01/2014 - 01:25
आधि बच्चन साहेबांना गुजरात पर्यटनाचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर केलं... आणि आता सावरकरी कविता वाचन. मोदी पब्लीसीटी स्टंट करायल काय काय मार्ग अवलंबतोय.

In reply to by अर्धवटराव

ज्यात त्यात मोदी आणून आपली कावीळ जगजाहीर आणि आपला आयडी सार्थ करु नका. या बातमीचा आणि मोदींचा काय संबंध?

In reply to by मंदार दिलीप जोशी

अर्धवटराव 13/01/2014 - 21:11
जरा सत्य उघड केलं तर कसे कावतात मोदी समर्थक. मिपावर बरेच मोदीस्पॉन्सर्ड सदस्य असल्याचा हा पुरावा आहे.

In reply to by अर्धवटराव

विकास 13/01/2014 - 21:52
मिपावर बरेच मोदीस्पॉन्सर्ड सदस्य असल्याचा हा पुरावा आहे. अजून मला चेक आला नाही! प्रित भराराला सांगावे लागणार तर! ;)

In reply to by कवितानागेश

विकास 13/01/2014 - 18:10
मला तर वाटते आहे त्यांचा (म्हणजे अर्धवटरावांचा) अर्धा कल केजरीवाल यांच्याकडे असल्याने असा पब्लिसिटी स्टंट करत असावेत. ;)

In reply to by विकास

अर्धवटराव 13/01/2014 - 21:09
टिस्टा मॅड्मला केजरीवाल आणि मोदि या दोघांत साटेलोटे असल्याचे नवीन पुरावे सापडले आहेत...आता या दोघांची खैर नाहि.

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ 13/01/2014 - 21:22
जमायला हरकत नाही. हार्ड वर्क, टेम्परामेण्ट, परसिस्टन्स वगैरे शब्द घोटून घ्या! क्लास और फॉर्म में फरक होता हय गुरु! इमिटेशन टाळा. -प्यारेविहारी तोंड बघा. आम्हीही आहोत नी ते ही आहेत. - प्यारे ब ब्बरं तेही असो. फ्रस्ट्रेशन आलं की लोक असं करतात. - प्यारेमॅन पण मी काय म्हणतो म्हणजे असं आवश्यक असेल तरच असं करावं. - प्यारेकर पेठकर मी सैन्यात असताना काहीही न करता वादग्रस्त ठरलो ते साल होतं.... - प्यारेश खरे मी तर चार लेख आधीच्च सांगितलेलं! - ..... बाकी नंतर! थोडा बिझी आहे. ;)

In reply to by अर्धवटराव

विनोद१८ 14/01/2014 - 00:24
बाबारे म्हणुन खाजवुन खरुज काढलीच पाहीजे का नेहमी ??? का आणि कशासाठी एव्ह्डा आटापिटा करताय जिवाचा ??? त्या मोदीच्या तुम्ही गावीसुद्धा नसाल ??? ज्याना घ्यायची ते त्याची दखल नक्कीच घेतील आणि घेत आहेत. आज इतर जगाच्या तुलनेत आपल्या देशाची आजची राजकिय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती अभिमानास्पद व भूषणास्पद आहे असे वाटते का ?? कुठे चाललो आहोत याचे जरा भान असू नये हे अति झाले. हिच तुमच्या सत्याची कास काय ?? जरा तुमचे सत्य म्हणजे काय व कोणते हे विस्ताराने लिहीलेत तर बरे होइल. सर्वात वादग्रस्त आयडी व्हायला तुम्हाला मोदीची मदत / गरज घ्यावी लागते यातच सर्व आले. विनोद१८

In reply to by विनोद१८

प्यारे१ 14/01/2014 - 00:48
पण मी काय म्हणतो विनोदराव, जाऊ द्या ना? कशाला उगाच अर्धवटरावांच्या नादी लागायचं? त्यांना जे वाटतं तेच सत्य आहे असं वाटत असलं तरी सत्य वेगळं असणार असेल तर सत्य सत्यच राहील ना? सत्य अर्धवटरावांनी म्हटलं म्हणून बदलणार थोडीच्च आहे? बाकी हा माणूस नेहमीच काहीतरी खाजवून खरुज काढण्यासारखं करत असतो ह्या आपल्या निरीक्षणाशी आम्ही सहमत आहोत. चला जरा विदा द्या बघू पटकन! थेट सांगूनच टाकू त्यांना.

In reply to by प्यारे१

अर्धवटराव 14/01/2014 - 02:12
आणिबाणीची शिस्त आणि दूरसंचार, संगणकाचा पाया रोवला गेला म्हणुन आज मिपा उभं झालं. आणि इथे कौतुक कोणाचं, तर मोदीचं. वा रे न्याय.

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ 14/01/2014 - 02:25
तुम्ही तर बोलूच नका. मोदी परवडतात. पण तुम्ही काय ती आणीबाणीची शिस्त घेऊन बसलाय? संजय गांधी तुमचेच ना? करायची का कापाकापी विशिष्ट जागी? संगणक आणला म्हणून कौतुक नि त्याबरोबर भ्रष्टाचाराचा आलेला व्हायरस (बघा बघा काय यमक जुळलंय. संगणक- विषाणू वा !) त्याचं काय? केजरीवाल सचिवालयावर चढले की तुमचे राहुल जी (पारले जी सारखं वाचू नका. ज्युपिटरची कसली व्हेलॉसिटी ती? तसे जाल उडत) गाडीवर चढून बसले माहित्ये??? एकतर गाडीचं भाडं थकलेलं. त्यात हे पोचे काढायचा खर्च वाढला. कॅय्य चॅललंय कॅय्य?

In reply to by प्यारे१

अर्धवटराव 14/01/2014 - 02:50
जरा कुठे चार पैसे विडी-काडीला वापरले तर लागले चावायला. काय तर म्हणे भ्रष्टाचाराचा व्हायरस. खरं म्हणजे उच्चवर्णीयांनी मुद्दाम असे नियम बनवले कि कुठलिही प्रगती भ्रष्टाचारच वाटावी. मोदी ओबीसी आहेत हाच काय तर एक प्लस पॉईण्ट त्यांच्याकडे. त्यांनी आमच्या थोरल्या साहेबांना प्रधानमंत्री बनवण्याकरता प्रयत्न करायला हवे होते. राहुलजींसमोर संजयगांधींच्या महान त्यागाचा आदर्श आहे. म्हणुनच त्यांनी केजरीवालला एक चान्स द्यायची चतुर आणि पुरोगामी खेळी खेळली. उच्चवर्णाचा दंभ असल्यामुळे त्यात थोडी कमतरता राहिली हे मान्य... पण आता भगिनी प्रियंका आलि आहे सोबतीला. पण हे सगळं राजकारण समजणं आंधळ्या मोदीभक्तांना शक्य नाहि.

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ 14/01/2014 - 03:05
उच्च्वर्णीय? काय संबंध? काँग्रेसी कधी पासून असं बोलू लागले? ज्याच्याकडे जसे गुण असतील तसं होतात ना? तुमचे एन डी तिवारी गुणांवर च झाले ना मोठे? मोदी ओबीसी आहेत? आम्हास त्याच्याशी घेणं नाही. पहा जातीचं राजकारण खरं कोण करतंय ते! बाकी तुमचा अंतरात्म्याचा आवाज खालच्या गांधींपर्यंत पोचला का? तो ऐकूनच संधी दिली ना केजरीवाल ना? नाव काय म्हणे चतुर नि पुरोगामी. अहो खरे पुरोगामी मोदी आहेत मोदी. अहमदाबादपासून बेंगलोर ला पोटेक्शन दिलं पोटेक्शन. अमित शहांना ठाऊक आहे. आहात कुठं? व्हेअर आर यु? एका स्त्रीसाठी कोण करतं एवढं? तुमच्या राजधानी दिल्लीत काय काय होतं नि मोदींचं वागणं. इकडे बघा जरा. सुशासन सुशासन म्हणतात ते अजून काय? प्रियांका आली ती सोबतीला नाही काही, भावाला फीट आली की सावरायला आलीये ती. दिसला कागद की फाड, ह्याला मूर्ख म्हण, त्याला पुनर्विचार करायला सांग. चोच्याला आज आठवण आली लोकपाल ची. अक्षर बघितलं का अक्षर? २री क च्या मुलाचा पण अपमान होईल. १७६००० करोड म्हणजे चार पैसे वाटतात काय तुम्हाला? एस्टिमेटेड असू नाही तर काहीही, १७६ म्हणजे १७६. घो टाळा आहे म्हणजे आहे. जय भारत, जय भाई, जय बहन, जय मोदी! (उद्या ह्याच वेळी... तयारी करुन या!) =))

In reply to by प्यारे१

अर्धवटराव 14/01/2014 - 03:36
माझ्या एकाहि मुद्याला तुमच्याकडे उत्तर नाहि. म्हणुन तुम्ही असं चिडीवर उतरला आहात. अंतरात्म्याच्या आवाजाला खाली-वर असं दिशानिर्देशक परिमाण लावुन तुम्ही तुमचा भोंगळपणा सिद्ध केला आहे. सबब, तुमचे प्रतिसाद ग्राह्य धरता येणार नाहित. शेवटी मी जे म्हणातोय तेच सिद्ध झालं ना. मोदींच्या प्रचारकांनी कितीही आदळआपट केली तरी निकाल लागयचा तोच लागणार आहे.

सावरकरांची उर्दू गझल सापडली या संदर्भाची बातमी तशी जुनी आहे. गुगलवर सावरकरांची उर्दू गझल (urdu gazal by savarkar)हा विषय टाकला तर २८ जुलै २०१३ चे सहा संदर्भ मिळतात. एकाने तर हे वृत्त youtube वर दिले आहे.

उद्दाम 15/01/2014 - 10:32
आसिंधुसिंधुच्या भोकातून विश्वबंधुत्वाच्या सागरात उडी टाकल्याबद्दल सर्वांचे आभार

In reply to by अनिरुद्ध प

उद्दाम 17/01/2014 - 15:46
अरेरे तुम्ही अजून आतच बसलाय तर!

In reply to by उद्दाम

अनिरुद्ध प 17/01/2014 - 16:39
करणार तुम्ही बाहेरुन टाळे लावल्यावर दुसरे काय करु शकतो? ईतका दुस्वास बरा नव्हे हो वाट बघतोय कोणी वाचवायला येतो का ते.

विनोद१८ 17/01/2014 - 22:50
उद्दाम कि सद्दाम ?????
मला सान्गा सन्दर्भासहीत स्पष्टीकरण देउन हे ' आसिंधुसिंधुच्या भोकातून ' म्हणजे नेमके काय ??? नवीन शोध म्हणायचा का हा ?? आमच्या अल्पमतीला समजेल असे लिहीलेत तर बरे होइल. खुदा हाफीझ.. विनोद१८

In reply to by विनोद१८

सावरकरंनी जहाजाच्या भोकातून सागरात उडी घेतली त्याचा संदर्भ आहे .आसिंधुसिंधु म्हणजे, सिंधुबंदी' याचा अर्थ सिंधु नदी ओलांडायला धर्मात बंदी आहे त्याअर्थी.

विनोद१८ 17/01/2014 - 23:24
जहाजाच्या भोकातून सागरात उडी घेतली.
काय म्हणता जहाजाला भोक असते ?? त्यालाच 'आसिंधुसिंधुचे भोक' म्हणतात काय ?? असे असेल तर मग ते जहाज तरगते कसे, बुडत कसे नाही ?? कसे ते सान्गा ?? *unknw*
.आसिंधुसिंधु म्हणजे, सिंधुबंदी' [ याचा अर्थ सिंधु नदी ओलांडायला धर्मात बंदी आहे त्याअर्थी. ]
आता काय म्हणावे या कर्माला, मिपाकरहो ?? *dash1* *dash1*

आयुर्हित 24/01/2014 - 20:50
हम हि हमारे वाली है! अमिताभ प्रस्तावना आजच्या काळात सावरकरवाद हाच देशाला वाचवू शकतो ः डॉ. शरद ठाकर सीडी प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व हेते, त्यांनी केलेली क्रांती आणि कविता या दोन्ही जुळ्या बहिणी आहेत,त्यांनीच सावरकरांना अंदमानच्या काळकोठडीत जिवंत ठेवले, तिथूनच देशभर क्रांतीचा वणवा पेटवायला भाग पाडले, त्यांचे विचार आणि सावरकरवाद हाच लांडगे आणि बकऱयांप्रमाणे जीवन जगणाऱया देशातील नागरिकांना वाचवू शकतो, असे परखड विचार ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. शरद ठाकर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू गझला आणि हिंदी गीतांवर आधारित हम ही हमारे वाली हैं, सीडीचे अनावरण स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर व कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या संकल्पनेतून तसेच स्वरबद्ध झालेल्या या गीतांना प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचे निवेदन लाभले आहे. त्याचे संगीत दिग्दर्शन स्वराधीश भरत बलवल्ली यांनी केले असून समायोजन सुप्रसिद्ध संगीतकार कै. अनिल मोहिले यांचे आहे. नामवंत गायक सुरेश वाडकर, शंकर महादेवन, डॉ. जसपिंदर नेरूला, शान, जावेद अली, साधना सरगम, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आदींनी ही गाणी गायली आहेत. अंदमानच्या जेलमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा आणि कविता हेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कवच होते. त्यांना कविता सुचणे हे,त्यांच्यातील कणखर स्वभावाचे प्रतीक आहे. त्यांच्याजागी दुसरा कुणी असता तर खचून गेला असता आणि आत्महत्या देखील केली असती. सावरकर अदंमानातून बाहेर आलेले दिसले ते कवितांमुळे. त्यांच्या प्रत्येक कवितेत स्वातंत्र्याची उर्मी आणि बाहेर येऊन हिंदुस्थानासाठी काम करण्याची इच्छा दिसून येते, सायंघंटा या कवितेत त्यांनी घंटा वाजल्यानंतर कैदेतील एक दिवस संपला तसा माझ्या मातृभूमीचा पारतंत्र्यातला देखील एक दिवस संपला, अशी कल्पना त्यांना सुचली आणि एकेका दिवसाची फौज साचून ती भारतभूमीला स्वतंत्र करेल, असे त्यांना वाटत होते आणि ते प्रत्यक्षातदेखील आले, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरुण साधू यांनी दिली. मराठी विश्वात विदेशात लिहलेली पहिली कविता, पहिली कादंबरी, पहिला पत्रकारिता ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. वयाच्या 9 व्या वर्षी पहिली कविता त्यांनी राष्ट्रभक्तीवर केली. अंदमानाच्या प्रतिकूल परिस्थितीतदेखील त्यांनी कविता केल्या त्या नव्या समाजाच्या निर्मितीसाठी. यांच्या कवितांमध्ये समाजनिर्माणाचा स्वर होता. त्यांनी अशा कवितांच्या 10 हजार ओळी भिंतींवर लिहल्या. सोबतच्या सुटका होणा-या कैद्याकडून पाठांतर करून त्या भारतीयांपर्यंत पोहचवल्या. स्वातंत्र्याच्या काळात त्यांनी लिहलेल्या कविता हा नंतरचा भारत कसा असावा, याबाबतचे त्यांचे विवेचन होते. राजकारणात भाग न घेण्याची अट असतानाही त्यांनी रत्नागिरीच्या नजरकैदेत कविता केल्या आणि देशभक्त निर्माण केले. त्यामुळेच त्यांना एक वेगळे महत्त्व आहे, पतितपावन मंदिराच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्यनिवारणाचे कार्य केले. असे विचार ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ सचदेव यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा शस्त्रसज्जता, आधुनिकतावाद आणि विज्ञानवाद नव्या पिढीला कळू लागला आहे. त्यामुळेच त्यांना त्यांचे विचार समर्पक वाटावेत तसेच त्यांच्या आवडीच्या माध्यमातून ते त्यांच्यात रुजावेत, त्यांनी ते गुणगुणावे आणि स्वातंत्र्यवीरांच्या विचारांना अधिक बळकटी मिळावी,यासाठी संगीताचेदेखील माध्यम उपयोगात आणण्याच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार झाल्याचे स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी सांगितले. स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी पास्ताविक केले. त्यावेळी त्यांनी स्मारकाचे कार्य केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे उद्दिष्ट असून आजच्या या सीडीचे प्रकाशन ही त्यातील एक महत्वाची पायरी असल्याचे सांगितले. सावरकरांची गीते ही क्रांतीचा मंत्र देण्यासाठी तसेच देशभक्तीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी चिरंतर आहेत, त्यामुळे त्यांना स्वरबद्ध करण्याचा विचार मनात आला. क्रांतीची ज्योत सळसळत्या रक्तात पेटवायची असेल तर संगीत हेच प्रभावी माध्यम आहे आणि सावरकरांच्या शब्दांत ती प्रचंड ताकद आहे, त्यामुळेच या कविता चिरंतर राहतील, यादृष्टीने करण्यात आलेला हा एक प्रयत्न असल्याचे् स्वराधीश भरत बलवल्ली यांनी सांगितले. सावरकांचे गीत गाण्याची संधी आपल्याला मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे विनम्र प्रतिपादन प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी केले. या कार्यक्रमास प्रसिद्ध दिग्दर्शक वेद राही, इतिहासकार निनाद बेडेकर, खासदार भारतकुमार राऊत, कार्याध्यक्ष रणजित सावरकर,स्मारकाचे पदाधिकारी तसेच सावरकरभक्त व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश वाडकर, जसपिंदर नेरूला, वैशाली सामंत, भरत बलवल्ली, साधना सरगम यांनी या सीडीतील गायलेली गीते सादर केली. पूर्वी भावे व गुरूराज कोरगांवकर यांनी बहारदार नृत्यं सादर केली. धन्यवाद सावरकर स्मारक कळावे, लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत

अर्धवटराव 11/01/2014 - 01:25
आधि बच्चन साहेबांना गुजरात पर्यटनाचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर केलं... आणि आता सावरकरी कविता वाचन. मोदी पब्लीसीटी स्टंट करायल काय काय मार्ग अवलंबतोय.

In reply to by अर्धवटराव

ज्यात त्यात मोदी आणून आपली कावीळ जगजाहीर आणि आपला आयडी सार्थ करु नका. या बातमीचा आणि मोदींचा काय संबंध?

In reply to by मंदार दिलीप जोशी

अर्धवटराव 13/01/2014 - 21:11
जरा सत्य उघड केलं तर कसे कावतात मोदी समर्थक. मिपावर बरेच मोदीस्पॉन्सर्ड सदस्य असल्याचा हा पुरावा आहे.

In reply to by अर्धवटराव

विकास 13/01/2014 - 21:52
मिपावर बरेच मोदीस्पॉन्सर्ड सदस्य असल्याचा हा पुरावा आहे. अजून मला चेक आला नाही! प्रित भराराला सांगावे लागणार तर! ;)

In reply to by कवितानागेश

विकास 13/01/2014 - 18:10
मला तर वाटते आहे त्यांचा (म्हणजे अर्धवटरावांचा) अर्धा कल केजरीवाल यांच्याकडे असल्याने असा पब्लिसिटी स्टंट करत असावेत. ;)

In reply to by विकास

अर्धवटराव 13/01/2014 - 21:09
टिस्टा मॅड्मला केजरीवाल आणि मोदि या दोघांत साटेलोटे असल्याचे नवीन पुरावे सापडले आहेत...आता या दोघांची खैर नाहि.

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ 13/01/2014 - 21:22
जमायला हरकत नाही. हार्ड वर्क, टेम्परामेण्ट, परसिस्टन्स वगैरे शब्द घोटून घ्या! क्लास और फॉर्म में फरक होता हय गुरु! इमिटेशन टाळा. -प्यारेविहारी तोंड बघा. आम्हीही आहोत नी ते ही आहेत. - प्यारे ब ब्बरं तेही असो. फ्रस्ट्रेशन आलं की लोक असं करतात. - प्यारेमॅन पण मी काय म्हणतो म्हणजे असं आवश्यक असेल तरच असं करावं. - प्यारेकर पेठकर मी सैन्यात असताना काहीही न करता वादग्रस्त ठरलो ते साल होतं.... - प्यारेश खरे मी तर चार लेख आधीच्च सांगितलेलं! - ..... बाकी नंतर! थोडा बिझी आहे. ;)

In reply to by अर्धवटराव

विनोद१८ 14/01/2014 - 00:24
बाबारे म्हणुन खाजवुन खरुज काढलीच पाहीजे का नेहमी ??? का आणि कशासाठी एव्ह्डा आटापिटा करताय जिवाचा ??? त्या मोदीच्या तुम्ही गावीसुद्धा नसाल ??? ज्याना घ्यायची ते त्याची दखल नक्कीच घेतील आणि घेत आहेत. आज इतर जगाच्या तुलनेत आपल्या देशाची आजची राजकिय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती अभिमानास्पद व भूषणास्पद आहे असे वाटते का ?? कुठे चाललो आहोत याचे जरा भान असू नये हे अति झाले. हिच तुमच्या सत्याची कास काय ?? जरा तुमचे सत्य म्हणजे काय व कोणते हे विस्ताराने लिहीलेत तर बरे होइल. सर्वात वादग्रस्त आयडी व्हायला तुम्हाला मोदीची मदत / गरज घ्यावी लागते यातच सर्व आले. विनोद१८

In reply to by विनोद१८

प्यारे१ 14/01/2014 - 00:48
पण मी काय म्हणतो विनोदराव, जाऊ द्या ना? कशाला उगाच अर्धवटरावांच्या नादी लागायचं? त्यांना जे वाटतं तेच सत्य आहे असं वाटत असलं तरी सत्य वेगळं असणार असेल तर सत्य सत्यच राहील ना? सत्य अर्धवटरावांनी म्हटलं म्हणून बदलणार थोडीच्च आहे? बाकी हा माणूस नेहमीच काहीतरी खाजवून खरुज काढण्यासारखं करत असतो ह्या आपल्या निरीक्षणाशी आम्ही सहमत आहोत. चला जरा विदा द्या बघू पटकन! थेट सांगूनच टाकू त्यांना.

In reply to by प्यारे१

अर्धवटराव 14/01/2014 - 02:12
आणिबाणीची शिस्त आणि दूरसंचार, संगणकाचा पाया रोवला गेला म्हणुन आज मिपा उभं झालं. आणि इथे कौतुक कोणाचं, तर मोदीचं. वा रे न्याय.

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ 14/01/2014 - 02:25
तुम्ही तर बोलूच नका. मोदी परवडतात. पण तुम्ही काय ती आणीबाणीची शिस्त घेऊन बसलाय? संजय गांधी तुमचेच ना? करायची का कापाकापी विशिष्ट जागी? संगणक आणला म्हणून कौतुक नि त्याबरोबर भ्रष्टाचाराचा आलेला व्हायरस (बघा बघा काय यमक जुळलंय. संगणक- विषाणू वा !) त्याचं काय? केजरीवाल सचिवालयावर चढले की तुमचे राहुल जी (पारले जी सारखं वाचू नका. ज्युपिटरची कसली व्हेलॉसिटी ती? तसे जाल उडत) गाडीवर चढून बसले माहित्ये??? एकतर गाडीचं भाडं थकलेलं. त्यात हे पोचे काढायचा खर्च वाढला. कॅय्य चॅललंय कॅय्य?

In reply to by प्यारे१

अर्धवटराव 14/01/2014 - 02:50
जरा कुठे चार पैसे विडी-काडीला वापरले तर लागले चावायला. काय तर म्हणे भ्रष्टाचाराचा व्हायरस. खरं म्हणजे उच्चवर्णीयांनी मुद्दाम असे नियम बनवले कि कुठलिही प्रगती भ्रष्टाचारच वाटावी. मोदी ओबीसी आहेत हाच काय तर एक प्लस पॉईण्ट त्यांच्याकडे. त्यांनी आमच्या थोरल्या साहेबांना प्रधानमंत्री बनवण्याकरता प्रयत्न करायला हवे होते. राहुलजींसमोर संजयगांधींच्या महान त्यागाचा आदर्श आहे. म्हणुनच त्यांनी केजरीवालला एक चान्स द्यायची चतुर आणि पुरोगामी खेळी खेळली. उच्चवर्णाचा दंभ असल्यामुळे त्यात थोडी कमतरता राहिली हे मान्य... पण आता भगिनी प्रियंका आलि आहे सोबतीला. पण हे सगळं राजकारण समजणं आंधळ्या मोदीभक्तांना शक्य नाहि.

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ 14/01/2014 - 03:05
उच्च्वर्णीय? काय संबंध? काँग्रेसी कधी पासून असं बोलू लागले? ज्याच्याकडे जसे गुण असतील तसं होतात ना? तुमचे एन डी तिवारी गुणांवर च झाले ना मोठे? मोदी ओबीसी आहेत? आम्हास त्याच्याशी घेणं नाही. पहा जातीचं राजकारण खरं कोण करतंय ते! बाकी तुमचा अंतरात्म्याचा आवाज खालच्या गांधींपर्यंत पोचला का? तो ऐकूनच संधी दिली ना केजरीवाल ना? नाव काय म्हणे चतुर नि पुरोगामी. अहो खरे पुरोगामी मोदी आहेत मोदी. अहमदाबादपासून बेंगलोर ला पोटेक्शन दिलं पोटेक्शन. अमित शहांना ठाऊक आहे. आहात कुठं? व्हेअर आर यु? एका स्त्रीसाठी कोण करतं एवढं? तुमच्या राजधानी दिल्लीत काय काय होतं नि मोदींचं वागणं. इकडे बघा जरा. सुशासन सुशासन म्हणतात ते अजून काय? प्रियांका आली ती सोबतीला नाही काही, भावाला फीट आली की सावरायला आलीये ती. दिसला कागद की फाड, ह्याला मूर्ख म्हण, त्याला पुनर्विचार करायला सांग. चोच्याला आज आठवण आली लोकपाल ची. अक्षर बघितलं का अक्षर? २री क च्या मुलाचा पण अपमान होईल. १७६००० करोड म्हणजे चार पैसे वाटतात काय तुम्हाला? एस्टिमेटेड असू नाही तर काहीही, १७६ म्हणजे १७६. घो टाळा आहे म्हणजे आहे. जय भारत, जय भाई, जय बहन, जय मोदी! (उद्या ह्याच वेळी... तयारी करुन या!) =))

In reply to by प्यारे१

अर्धवटराव 14/01/2014 - 03:36
माझ्या एकाहि मुद्याला तुमच्याकडे उत्तर नाहि. म्हणुन तुम्ही असं चिडीवर उतरला आहात. अंतरात्म्याच्या आवाजाला खाली-वर असं दिशानिर्देशक परिमाण लावुन तुम्ही तुमचा भोंगळपणा सिद्ध केला आहे. सबब, तुमचे प्रतिसाद ग्राह्य धरता येणार नाहित. शेवटी मी जे म्हणातोय तेच सिद्ध झालं ना. मोदींच्या प्रचारकांनी कितीही आदळआपट केली तरी निकाल लागयचा तोच लागणार आहे.

सावरकरांची उर्दू गझल सापडली या संदर्भाची बातमी तशी जुनी आहे. गुगलवर सावरकरांची उर्दू गझल (urdu gazal by savarkar)हा विषय टाकला तर २८ जुलै २०१३ चे सहा संदर्भ मिळतात. एकाने तर हे वृत्त youtube वर दिले आहे.

उद्दाम 15/01/2014 - 10:32
आसिंधुसिंधुच्या भोकातून विश्वबंधुत्वाच्या सागरात उडी टाकल्याबद्दल सर्वांचे आभार

In reply to by अनिरुद्ध प

उद्दाम 17/01/2014 - 15:46
अरेरे तुम्ही अजून आतच बसलाय तर!

In reply to by उद्दाम

अनिरुद्ध प 17/01/2014 - 16:39
करणार तुम्ही बाहेरुन टाळे लावल्यावर दुसरे काय करु शकतो? ईतका दुस्वास बरा नव्हे हो वाट बघतोय कोणी वाचवायला येतो का ते.

विनोद१८ 17/01/2014 - 22:50
उद्दाम कि सद्दाम ?????
मला सान्गा सन्दर्भासहीत स्पष्टीकरण देउन हे ' आसिंधुसिंधुच्या भोकातून ' म्हणजे नेमके काय ??? नवीन शोध म्हणायचा का हा ?? आमच्या अल्पमतीला समजेल असे लिहीलेत तर बरे होइल. खुदा हाफीझ.. विनोद१८

In reply to by विनोद१८

सावरकरंनी जहाजाच्या भोकातून सागरात उडी घेतली त्याचा संदर्भ आहे .आसिंधुसिंधु म्हणजे, सिंधुबंदी' याचा अर्थ सिंधु नदी ओलांडायला धर्मात बंदी आहे त्याअर्थी.

विनोद१८ 17/01/2014 - 23:24
जहाजाच्या भोकातून सागरात उडी घेतली.
काय म्हणता जहाजाला भोक असते ?? त्यालाच 'आसिंधुसिंधुचे भोक' म्हणतात काय ?? असे असेल तर मग ते जहाज तरगते कसे, बुडत कसे नाही ?? कसे ते सान्गा ?? *unknw*
.आसिंधुसिंधु म्हणजे, सिंधुबंदी' [ याचा अर्थ सिंधु नदी ओलांडायला धर्मात बंदी आहे त्याअर्थी. ]
आता काय म्हणावे या कर्माला, मिपाकरहो ?? *dash1* *dash1*

आयुर्हित 24/01/2014 - 20:50
हम हि हमारे वाली है! अमिताभ प्रस्तावना आजच्या काळात सावरकरवाद हाच देशाला वाचवू शकतो ः डॉ. शरद ठाकर सीडी प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व हेते, त्यांनी केलेली क्रांती आणि कविता या दोन्ही जुळ्या बहिणी आहेत,त्यांनीच सावरकरांना अंदमानच्या काळकोठडीत जिवंत ठेवले, तिथूनच देशभर क्रांतीचा वणवा पेटवायला भाग पाडले, त्यांचे विचार आणि सावरकरवाद हाच लांडगे आणि बकऱयांप्रमाणे जीवन जगणाऱया देशातील नागरिकांना वाचवू शकतो, असे परखड विचार ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. शरद ठाकर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू गझला आणि हिंदी गीतांवर आधारित हम ही हमारे वाली हैं, सीडीचे अनावरण स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर व कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या संकल्पनेतून तसेच स्वरबद्ध झालेल्या या गीतांना प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचे निवेदन लाभले आहे. त्याचे संगीत दिग्दर्शन स्वराधीश भरत बलवल्ली यांनी केले असून समायोजन सुप्रसिद्ध संगीतकार कै. अनिल मोहिले यांचे आहे. नामवंत गायक सुरेश वाडकर, शंकर महादेवन, डॉ. जसपिंदर नेरूला, शान, जावेद अली, साधना सरगम, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आदींनी ही गाणी गायली आहेत. अंदमानच्या जेलमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा आणि कविता हेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कवच होते. त्यांना कविता सुचणे हे,त्यांच्यातील कणखर स्वभावाचे प्रतीक आहे. त्यांच्याजागी दुसरा कुणी असता तर खचून गेला असता आणि आत्महत्या देखील केली असती. सावरकर अदंमानातून बाहेर आलेले दिसले ते कवितांमुळे. त्यांच्या प्रत्येक कवितेत स्वातंत्र्याची उर्मी आणि बाहेर येऊन हिंदुस्थानासाठी काम करण्याची इच्छा दिसून येते, सायंघंटा या कवितेत त्यांनी घंटा वाजल्यानंतर कैदेतील एक दिवस संपला तसा माझ्या मातृभूमीचा पारतंत्र्यातला देखील एक दिवस संपला, अशी कल्पना त्यांना सुचली आणि एकेका दिवसाची फौज साचून ती भारतभूमीला स्वतंत्र करेल, असे त्यांना वाटत होते आणि ते प्रत्यक्षातदेखील आले, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरुण साधू यांनी दिली. मराठी विश्वात विदेशात लिहलेली पहिली कविता, पहिली कादंबरी, पहिला पत्रकारिता ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. वयाच्या 9 व्या वर्षी पहिली कविता त्यांनी राष्ट्रभक्तीवर केली. अंदमानाच्या प्रतिकूल परिस्थितीतदेखील त्यांनी कविता केल्या त्या नव्या समाजाच्या निर्मितीसाठी. यांच्या कवितांमध्ये समाजनिर्माणाचा स्वर होता. त्यांनी अशा कवितांच्या 10 हजार ओळी भिंतींवर लिहल्या. सोबतच्या सुटका होणा-या कैद्याकडून पाठांतर करून त्या भारतीयांपर्यंत पोहचवल्या. स्वातंत्र्याच्या काळात त्यांनी लिहलेल्या कविता हा नंतरचा भारत कसा असावा, याबाबतचे त्यांचे विवेचन होते. राजकारणात भाग न घेण्याची अट असतानाही त्यांनी रत्नागिरीच्या नजरकैदेत कविता केल्या आणि देशभक्त निर्माण केले. त्यामुळेच त्यांना एक वेगळे महत्त्व आहे, पतितपावन मंदिराच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्यनिवारणाचे कार्य केले. असे विचार ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ सचदेव यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा शस्त्रसज्जता, आधुनिकतावाद आणि विज्ञानवाद नव्या पिढीला कळू लागला आहे. त्यामुळेच त्यांना त्यांचे विचार समर्पक वाटावेत तसेच त्यांच्या आवडीच्या माध्यमातून ते त्यांच्यात रुजावेत, त्यांनी ते गुणगुणावे आणि स्वातंत्र्यवीरांच्या विचारांना अधिक बळकटी मिळावी,यासाठी संगीताचेदेखील माध्यम उपयोगात आणण्याच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार झाल्याचे स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी सांगितले. स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी पास्ताविक केले. त्यावेळी त्यांनी स्मारकाचे कार्य केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे उद्दिष्ट असून आजच्या या सीडीचे प्रकाशन ही त्यातील एक महत्वाची पायरी असल्याचे सांगितले. सावरकरांची गीते ही क्रांतीचा मंत्र देण्यासाठी तसेच देशभक्तीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी चिरंतर आहेत, त्यामुळे त्यांना स्वरबद्ध करण्याचा विचार मनात आला. क्रांतीची ज्योत सळसळत्या रक्तात पेटवायची असेल तर संगीत हेच प्रभावी माध्यम आहे आणि सावरकरांच्या शब्दांत ती प्रचंड ताकद आहे, त्यामुळेच या कविता चिरंतर राहतील, यादृष्टीने करण्यात आलेला हा एक प्रयत्न असल्याचे् स्वराधीश भरत बलवल्ली यांनी सांगितले. सावरकांचे गीत गाण्याची संधी आपल्याला मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे विनम्र प्रतिपादन प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी केले. या कार्यक्रमास प्रसिद्ध दिग्दर्शक वेद राही, इतिहासकार निनाद बेडेकर, खासदार भारतकुमार राऊत, कार्याध्यक्ष रणजित सावरकर,स्मारकाचे पदाधिकारी तसेच सावरकरभक्त व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश वाडकर, जसपिंदर नेरूला, वैशाली सामंत, भरत बलवल्ली, साधना सरगम यांनी या सीडीतील गायलेली गीते सादर केली. पूर्वी भावे व गुरूराज कोरगांवकर यांनी बहारदार नृत्यं सादर केली. धन्यवाद सावरकर स्मारक कळावे, लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत
गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली. जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!! "एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.

कारण जीवन हे लोणचं आहे...

भिकापाटील ·

In reply to by प्यारे१

धन्या 01/01/2014 - 20:21
'आतातरी' सोडा रे त्याला.
एक शेर आठवला: गुल गया, गुलशन गया, गयी होठोंकी लाली अब तो पिछा छोड उसका, वोह हो गयी बाल बच्चोंवाली

खेडूत 31/12/2013 - 14:37
याच लोणच्याचं एक पाकीट जीमेल वरून आलं आहे. पण अजून फोडलं नाही! :)

तिमा 01/01/2014 - 17:57
जीवनभाऊंना काँपिटिशन आहे. लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते या दोन ओळी वाचून सदगदित झालो.

In reply to by प्यारे१

धन्या 01/01/2014 - 20:21
'आतातरी' सोडा रे त्याला.
एक शेर आठवला: गुल गया, गुलशन गया, गयी होठोंकी लाली अब तो पिछा छोड उसका, वोह हो गयी बाल बच्चोंवाली

खेडूत 31/12/2013 - 14:37
याच लोणच्याचं एक पाकीट जीमेल वरून आलं आहे. पण अजून फोडलं नाही! :)

तिमा 01/01/2014 - 17:57
जीवनभाऊंना काँपिटिशन आहे. लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते या दोन ओळी वाचून सदगदित झालो.
लेखनविषय:
कधी गोड, कधी तिखट आहे कधी खारट, कधी तुरट आहे कारण जीवन हे लोणचं आहे...||१|| ... लोणचं पूर्ण मुरल्यावर चांगला लागतं खाल्ल्यावर जीवन पूर्ण जगल्यावर टेकतो आपण मरणावर ||२|| लोणचं करण्यासाठी जसे विविध प्रकार जीवनातल्या पैलूंचे हि निरनिराळे प्रकार लोणचं जसं testy लागतं तसच जीवन हे फार कष्टी असतं कारण जीवन हे लोणचं आहे....||३|| लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते लोणचं जसं कधी ना कधी संपतं तसंच आपलं जीवनहि कधी ना कधी संपतं कारण जीवन हे लोणचं आहे....||४|| लोणचं हे खाण्यासाठी असतं पण जीवन हे जगण्यासाठी असतं लोणच्याला जसं स्वाद असतो तसं आपल्या जीवनाला एक आस्वाद असतो कारण जीवन

थोडं थोडं जगून घे

वैभवकुमारन ·
लेखनविषय:
(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे) "गड्या थोडं थोडं जगून घे" किती पळशी पैश्यामागे नको पैश्याचे अरण हे पैश्यावाचून गरीबाची तू शांत झोप ती बघून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. बघ आकाशी निळे रंग हे बघ पक्ष्यांचे खुले छंद हे एकच पक्षी थव्यातला तो डोळ्यात तुझ्या भरून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. नकोच विचार वयाचा तो नकोच विचार भयाचा तो उरात बालपण भरूनिया तू मनात दंगा करून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. येतील दु:ख असंख्य कधी वाहील डोळी नीर नदी कधीतरी मग अथांग सागर उधाणलेला बघून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं

असे होणारच

वैभवकुमारन ·
लेखनविषय:
दु:ख येता झेपाउनी उरी अश्रु नयनातुनी येनारच कठोर असले काळीज कितीही एखादया वाराला ते भीनारच जव हळवा वीचार रुतेल आंतरी अधुन मधुन तो कळ देनारच जेव्हा वादळ उठेल विचाराचे मनी एक वीचार दूर गावी न्हेनारच तळपती आठवाची आग जागेपनी आगीत लपेटून घेनारच