(शशक-एक पायाचा कावळा)
फांदिवरी बसून
तो स्वमग्न होता
इच्छा आकांक्षाचा
हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली
परी न तो बधला
छळावयास तुम्हां
येईन फिरून वदला
पोटात कोकताना
कावले गुर्जी जेंव्हा
काढून दर्भ काक,
म्हणाले......
मिटवून हिशोब टाक
फांदिवरी बसून
तो स्वमग्न होता
इच्छा आकांक्षाचा
हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली
परी न तो बधला
छळावयास तुम्हां
येईन फिरून वदला
पोटात कोकताना
कावले गुर्जी जेंव्हा
काढून दर्भ काक,
म्हणाले......
मिटवून हिशोब टाक
चेन्नई - रामेश्वरम् - मदुरै २०२५
गेल्या काही वर्षांपासून खगोलात काही नाविन्यपूर्ण घटना घडत आहेत. म्हणजे आपल्या सूर्यमालेत बाहेरून येणाऱ्या काही वस्तू. २०१७ पासून, आपल्याला फक्त तीनच अशा वस्तू माहीत झाल्या आहेत ज्या दूर अंतराळातून आपल्या सूर्यमालेत आल्या आहेत.
वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय."
सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले? त्यानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले.
ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली.
त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा.
पुढचे शब्द गविं आहेत.
मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता.
संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ...
एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते. रक्तगट नव्हे, मंडळ.
दुचाकी वाहने, विशेषत: बुलेट, हिच्यावर तर खूनखराबा किंवा टोळीयुद्ध हवेच.
#पुरोगामी सुधारणावादी लेखन
#बहुजन हिताय बहुजन सुखाय
______
४ मोअर शॉट्स प्लीज, स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार !!
______
'४ मोअर शॉट्स प्लीज!' ही Amazon Prime Video वरील एक लोकप्रिय वेब सिरीज आहे जी नुकतीच पाहण्यात आली. ही सीरियल जी केवळ मनोरंजनापलीकडे जाऊन आधुनिक भारतीय महिलांच्या जीवनातील अनेक पैलूंचा वेध घेते. ही मालिका म्हणजे आजच्या स्त्रीच्या भावनांचा, तिच्या संघर्षाचा, तिच्या स्वप्नांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या 'मुक्त हुंकारा'चा आरसा आहे.
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.
तो-आई,तांदळाची खीर कर ना!
"हात मेल्या दळभद्री कुठला!"
वडील दुसर्या गावी नोकरीवर होते.सुट्टीवर येताना रातराणीचा अपघात झाला.
मोठा मुलगा म्हणून जे काही सांगितलं ते करत गेला.
"बाई,आज आमच्या घरी चौदावा आहे,मी शाळेत येवू शकणार नाही".
न सांगता घरी राहीला असता तरी कुणी काही म्हणले नसते.
तांदळाची खीर वाढताना आईचा बांध फुटला. भर पंक्तीत त्याला बदडला.
लहान होता तरी मोठे व्हावे लागले.
उद्ध्वस्त घडी बसवायला अर्धे आयुष्य गेले.
अचानक,म्हातारी आई गेली.
ही घटना सन 1974 ची . . .
जागं मन हे, अर्धवट मिटल्या डोळ्यांत
देकार्तेच्या का शंकेचा पोकळ गोंधळ.
'मी विचार करतो, म्हणून मी आहे'?
पण हे विचार कुणाचे?
एका ॲपच्या नोटिफिकेशनचे?
अस्सल आरसा असूनही
पडझडलेल्या प्रतिमेचा भुगा
रात्री बेरात्री चिवडत बसणे
जसा नित्शेच्या 'माणसाच्या'
अशक्यप्राय स्वप्नाचा उपहास.
मोबाईलच्या काळोख्या स्क्रीनवर
मेलेली बोटं नाचतात,
एक अदृश्य तारांगण,
पण त्यात ना चंद्र, ना प्लॅटोच्या गुहेतून
बाहेर पडण्याचा मार्ग.
टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे.