भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल
भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल: DRDO ची मोठी कामगिरी
भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल: DRDO ची मोठी कामगिरी
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात.
पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात.
मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप
https://youtu.be/oq35bx7ktEM?si=SHdxD8Kmglr2iXD5
माझी उत्तरे
प्रश्न १ - समझौत्याची घोषणा भारत आणि पाक यांच्या ऐवजी त्रयस्थ पक्षाने करणे केव्हाही हितावह. जो पक्ष समझौत्याची भाषा करतो तो कमकुवत मानला जाऊ शकतो. भारताने अशी घोषणा केली असती तर पाकला आयते कोलीत मिळाले असते.
ओथंबल्या नभाखाली
भारलेली हवा
सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये
सैरभैर थवा
गर्जणारा मेघ शिंपे
सृजनाचा ठेवा
वीज ओढी कड्यावर
ओरखडा नवा
काजव्यांच्या ठिणग्यांचा
पानोपानी दिवा.
आरस्पानी स्वप्नी सांगे
शकुनाचा रावा,
"दृष्टावल्या भवताला
काळी तीट लावा "
एक चिमणी, दोन चिमणी,
तीन चिमण्या आल्या दारी,
पटापटा चोचीमध्ये,
धान्य घेऊन गेल्या घरी ।।
आजी म्हणाली चिमणी बाई,
आज का ग तुझी घाई ?,
चिमणी म्हणाली टाकून दाणा,
आज जायचयं एका लग्नाला ।।
घरी जाते, नाश्ता करते,
घालते पोरांना ही जेवायला,
पोरांची नाटकं रोज नवी,
कशी पुरवावी सांगा मजला? ।।
आजी म्हणाली खरंए बाई,
खाण्याची नाटकं नवी नाही,
तुला उद्या देईन पोळी
पोरांना दे करून गोळी ।।
तिकडून आली आजीची नात,
रोजचं नवं गाणं गात,
आश्चर्याने आजीला म्हणते कशी,
चिमणीची भाषा कळते कशी? ।।
वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे
प्रस्तावना
कॉर्पल पांडे — ह्या नावामागे केवळ एक वायुसैनिक नव्हे, तर एक सच्चा देशभक्त, एक कवी मनाचा चित्रकार, माणुसकीची जाण असलेला निष्ठावान कार्यकर्ता, अशी एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस आहे. माझ्या हवाई दलातील काळात मदतीचा हात मागितला. दिलेल्या मदतीचे त्याने सोने केले. त्यांच्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत. त्यांची निष्ठा, कार्यतत्परता, आणि माणुसकीची ऊब — या सर्वांचे प्रतिबिंब या चार भागांमध्ये मी जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.
‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट नुकताच १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ढवळे आणि माने या दोन्ही कुटुंबांच्या धमाल प्रेमकहाण्या रंगवण्यात आल्या आहेत. गोष्ट अशी आहे की, ढवळे घराण्यात सई ताम्हणकर (नीता) आणि समीर चौघुले (मकरंद) हे दांपत्य सुखात राहत असून त्यांची मुलगी मीनाक्षी (जुई भागवत) आहे. माने घराण्यात प्रसाद ओक (गिरीश) आणि ईशा डे (रागिणी) हे दुसरे जोडपं असून त्यांचा मुलगा ओंकार (तेजस राऊत) आहे. मीनाक्षी आणि ओंकार यांच्या प्रेमातून दोन्ही घरांची लग्न तयारी सजते; पण लग्नाच्या पहिल्या सोहळ्यात एक धक्का बसतो – प्रसाद आणि सई हे भूतकाळातले प्रेमी होते!
“The Killers” ही अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी १९२७ साली लिहिलेली एक गाजलेली प्रसिद्ध कथा आहे.
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.
एक ढू आय डी द्या मज आणून
शिंपीन तो मी स्व प्रतिसादाने
खोडून काढीन सारी वचने
सार्या धाग्यांची वाट मी लावीन
टिका टिप्पणी,चाले चौफेर लेखणी
बृहस्पती,वाचस्पती,बाजीसम या रणी
सारे ज्ञात मज,स्व प्रज्ञेचा मी धणी
भल्या भल्यांची वाट लावतो, क्षणोक्षणी