पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.
तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५
वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता
स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा
कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे
फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.
कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?
(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)
मुंबईच्या ट्रेन मध्ये लेडीज डब्यात दुनियाभरच्या लेडीज ना आवश्यक अशा गोष्टी विकायला येतात. अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत. मी सतत नेलपेंट्स / कानातले/अंगठ्या / रुमाल्स / केसांनच्या क्लिप्स अशा गोष्टी नेहमीच लेडीज डब्यातूंनच खरेदी केल्या आहेत . त्यात विशेष अस काही नाही.
दोन वर्षांपूर्वी नणंद म्हणाली,”हल्ली न् बऱ्याच वेळा मी माच्छिन्द्रगडावर जाऊन आले. खूप छान वाटतं तिथे.”
“म्हणजेकुठे ग?” या माझ्या पृच्छेवर तिने सविस्तर उत्तर दिले.
माझ्या एका मित्राच्या ऑफ़िसमध्ये एका मंडळाचे काही कार्यकर्ते गणेशोत्सवात सी सी टि व्ही संदर्भात चर्चा करण्यास आले होते.
पण अजून फ़्लेक्स स्टार अध्यक्ष आले नव्हते म्हणून ते गप्पा मारत बसले होते.
कार्यकर्ता नं 1- आपण ह्या वर्षी काहितरी वेगळा देखावा करुया.
कार्यकर्ता नं 2- आयला खरच आपण कायतर वेगळे केल पाह्यजे. साले ते वरच्या मंडळाचा तो अमर्या लय भाव खातो.
का. 1- आं काय? अमर्या साला त्याचा काय संबंध?
का. 2- तसं नाय
ते काय करतय नगरसेवकाच्या हापीस वर पडीक असतय ना मग तिथ कामासाठी आलेले त्याला ओळखत्यात मग वर्गणीच्या येळेला सालं चांगल्या पावत्या फ़ाडतय.
साधरणपणे १० वर्षापुर्वी पर्यंत आपल्यातील बहुतेक जण व काही ठिकाणी आतासुध्दा काही जण सार्वजनिक शौचालय वापरत आहेत.
तेंव्हा त्या शौचालयात काही कलाकृती व गावातील,आळीतील भानगडी,वाद एकतर्फी प्रेमाची जाहिरात वाचायला मिळत असे.
एवढेच नाही त्या बातम्या अपडेट करणारे व त्या चविने वाचणारे,पाहणारे आज बहुसंख्येने व्हाट्स अप वर व उरले सूरलेले ईतर सोशल नेटवर्कवर आजही आहेत.
खरेच या महाभागांमुळे आपण किती डिजिटल झालो आहोत हे समजते आहे.
असेच गप्पा टप्पा करायला चौकातल्या मित्रांमध्ये बसलो विषय असेच नेहमीचे दिल्ली पासून गल्ली पर्यंतचे होते.
असेच बोलता बोलता वादग्रस्त विषय आला विषय तसा भरपूर बोलण्याचा असल्याने गरमागरम चर्चा सुरु झाली बोलता बोलता नेहमी प्रमाणे डावे, उजवे व तटस्थ असे गृप पडले. विषय वाढता वाढता वाद होतील असे वाटल्यावर आम्ही दोघा तिघांनी तेथून कल्टी मारली.
चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबलो असता एखादा विषय कसा वेगळे वळण घेतो यावर आम्ही बोलत होतो.त्यावर अशा गोष्टी कशा वेगळे वळण घेतात यावर उदाहरण म्हणून एक मित्र बोलला...
लोक किती काही म्हणोत . कि बाहेर राहून आल्यावर फक्त घरचंच जेवण चांगलं लागतं किंवा आईच्या हातचा वरण भात किंवा बाबांच्या हातचा तिखट जाळ झुणका. या सगळ्याची किंमत जरी बाहेर राहिल्यावर समजते . तरीही , घर सोडून दुसऱ्या गावात राहायला गेलं कि एक कला आपल्याआपण शिकतो . ती म्हणजे चांगली खायची ठिकाणे शोधणे.
जिद्द, आत्मविश्वास या गोष्टी शोधायच्या असतील तर थोरांची आत्मचरित्रच वाचावी लागतात, त्यांचे शब्द ऐकावे लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या माणसांशी केलेल्या संवादातूनही अशा मूल्यांची ओळख होते. असाच एक माणूस मला भेटला. हा माणूस म्हणजे आमच्या कँटीन स्टाफ मधला एक जण.
ताई आणि भाऊजी उद्या येणार म्हणून फोन आला होता. मग काय आईला काय करू नी काय नको असं झालेलं. एक तर जावई पहिल्यांदाच घरी येत होते. त्यात त्यांना रजा नसल्यामुळे सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणार होते. तसेही बाइक वरून एक तासाचा रस्ता होता. त्यामुळे घरातून निघताना ताई फोन करणार होती. म्हणजे आम्ही तयारीत राहणार होतो. स्वागत, पाहुणचार शेजार पाजारी भेट, दुपारचं जेवण त्यानंतर घटकाभर विश्रांती, संध्याकाळी गावदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन, अन सहा- साडेसहाला प्रस्थान असा भरगच्च कार्यक्रम आई ने तयार करून ठेवला होता.