शिशिर
- वसंतोत्सव
- ग्रीष्मोत्सव
- वर्षा
- शरदोत्सव
- हेमंत
- शिशिर ऋतू
थंडीने पूर्ण शहर धुक्यात विसावलेलं असत.तेव्हा बालभारतीची बा.सी.मर्ढेकरांची “पितात सारे गोड हिवाळा “ ही कविता मला आठवते.अशा धुक्यात हरवलेली रम्य पहाट आनंद देते.
थंडीने पूर्ण शहर धुक्यात विसावलेलं असत.तेव्हा बालभारतीची बा.सी.मर्ढेकरांची “पितात सारे गोड हिवाळा “ ही कविता मला आठवते.अशा धुक्यात हरवलेली रम्य पहाट आनंद देते.
कुठलाही प्रवास मला आवडतो. अगदी कमी अंतरावरचा रिक्षातला सुद्धा. काय एक एक नमुने दिसत असतात. पण फक्त नमुनेच पाहिले पाहिजेत असं नाही. आत्ताच मेट्रोने (पुण्यातली नाही, आधीच स्पष्ट करतो) प्रवास करताना एक खूपच गोड म्हणता येईल असं एक कुटुंब सोबत होतं. त्यात एक सर्वात गोड अशी मुलगी होती. वय असेल अंदाजे 5-6 वर्षे. इथे हैदराबादला परकर पोलकं घालणाऱ्या मुली सर्वत्र असतात. त्यामुळेच की काय छान दिसत होती. तिचा दादा असेल 10-12 वर्षाचा. तर तो तिला सारखं मास्क लावण्याविषयी टोकत होता. पण ह्या मुलीचे वरचे 4 दात पडले होते आणि त्याचा कोण आनंद तिला झाला होता!
पंचमीतले रंग सांडले
झाडांनी ते बघा झेलले
डोक्यावरती तुरे गुलाबी
धुंद होऊनी फाग नाचले
लुसलुशीत ही कवळी पाने
मोहरून गेली सर्वच राने
आंबोळ्या निंबोळ्या सवे खेळती
ओढून नुतन वस्त्रे गर्द पोपटी
कोण चितारी चित्र काढतो
रंगांची रागदारी मांडतो
कोकीळ मंजुळ कुजन करते
मन मुदित हिंदोळ्यावर झुलते
कसरत
२९-३-२०२२
गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.
मने,माणसाचे मन मोठे विचित्र आहे. माणूस एकटा दिसला तरी त्याचे मन कधीही एकटे नसते. त्याचा मी पणा,अहंकार, गर्व,पुर्वग्रह कायम त्याच्या सोबत असतात. माणूस एकटा असो वा समूहात या गोष्टी कधीही त्याची साथ सोडत नाहीत.
जॉर्ज शेल्लर यांनी म्हटले आहे, "माणसाला आपला अहंकार,मी पणा कधीही सोडून टाकता येत नाही, तो समोरच्याला लक्षात येईल एवढा स्पष्ट दिसत असतो".
क्लिफ्टन वेब हा अमेरिकन नट स्वत:बद्दल सांगताना म्हटतो," मी जिथे जिथे जातो तिथे मी पण सोबत असतो त्यामुळे सगळी मजा निघून जाते.
कणा
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा !
– कुसुमाग्रज
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे. पण त्याचवेळी तिकडे आफ्रिकेमध्ये मालीमधून फ्रेंच सैन्याला आपली मोहीम अर्ध्यावर सोडून माघार घ्यावी लागली आहे, तीही घटना जगात चर्चेचा विषय ठरली आहे. फ्रांसने आपली मोहीम गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच तेथील जिहादी गटांच्या कारवायांनी वेग घेतला आहे.
पटवर्धन सरांकडे आम्ही इंग्लिश विषयासाठी क्लासला जायचो. युनायटेड इंग्लिश स्कूल अर्थात आमच्याच शाळेतून खूप पूर्वी सर रिटायर्ड झालेले होते. शाळेत होते म्हणून सर नाहीतर त्यांना अण्णा म्हटलेलंच आवडायचं. बरीच मुलं त्यांना सर म्हणायच्या ऐवजी अण्णाच म्हणत. सर घरीच इंग्रजीचे क्लास घ्यायचे. फक्त 9 वी आणि 10 वी ची मुलं. सकाळी 7.30 ते 8.30 10 वीची बॅच, 8.30 ते 9.30 9 वीची बॅच आणि शेवटी 9.30 ते 10.30 परत एक दहावीची बॅच. एवढ्या तीनच बॅच दिवसभरात असायच्या. त्यांच्या घरातल्या त्या छोट्याश्या पडवीत हा क्लास चालायचा.एक वेळी जास्तीत जास्त 15 ते 17 मुलं माऊ शकतील एवढीच खोली होती ती.
माझ्या पुस्तकांच्या कपाटात
मूळाक्षरांशी ओळख झाल्यापासून कुणीकुणी घेऊन दिलेली,
मग असोशीने विकत घेतलेली,
देहभान विसरून वाचलेली,
पुन्हापुन्हा पारायणं केलेली,
बहुतांश मुखोद्गत झालेली,
वाचून मिटल्याला युगं उलटून गेलेली
हारीने मांडलेली
जिवापाड जपलेली
पुस्तकं
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत.