कल्पका:
नास्ति भारत: देश: यत्र कल्पका: सन्ति दुर्लभा:।
अपमानिता: यदा नित्यं प्रगतीस्तत्र कथं भवेत्॥
--राजीव उपाध्ये
नास्ति भारत: देश: यत्र कल्पका: सन्ति दुर्लभा:।
अपमानिता: यदा नित्यं प्रगतीस्तत्र कथं भवेत्॥
--राजीव उपाध्ये
केस पांढरे तरी हा
डाय लावतो हिरवा
पाखरांनो सावधान
घुमे टेचात पारवा
केस पांढरे तरी हा
डाय गुलाबी लावतो
पाखरांनो उडलात
तरी पिसे हा मोजतो
केस पांढरे तरी हा
काळा कलप लावतो
पाखरांनो सावध हा
दाणे दुरून टाकतो
केस पांढरे तरी हा
अंतर्यामी अतरंगी
पाखरांनो नका भिऊ
निर्विष याची हो नांगी
(#)माझ्यासारख्या विविधरंगी केश-भूषित साठी-पार युवकांनी कृपया हलक्यात घ्यावे :)
निघा निघा चिऊताई
सारीकडे काँक्रीटले
दाणा पाणी हरवले
शहरी ह्या
विषारी धुरके आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही
उरलेली पाखरे ही
भयसूचनांचे गाणे
गाऊनी टिपती दाणे
अखेरचे
झोपू नका अशा तुम्ही
वाचविण्या मृत्युक्षणी
येईल का मग कोणी
बाळाला ह्या
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
बाळासकट ती जाई
कायमची!
बालपण......
साखर झोपेच्या वळणावर
अंदोलत स्वप्न हिंदोळ्यावर
बांग कुणाची येता कानी
विरून गेली सारी कहाणी
तरूणपण......
विझल्या साऱ्या चांदणठिणग्या
बघा बघा ती पहाटफुटणी
छोट्या टीचभर खळगीसाठी
धरावी आता वाट ही कुठली
दगड मातीच्या रस्त्यामधूनी
दिसेल काही अमोघ अद्भूत
धावत होतो उर फुटोस्तर
हाती आले मृगजळ सुंदर
म्हातारपण......
झाली आता चांदणसंध्या
चक्क कळाले भ्रमनिरास होणे
ओलांडून क्षितिजाचे कुंपण
उरले फक्त मार्गस्थ होणे
प्रेरर्णा
दिपक पवार साहेब याची कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे,
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा
सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा.
बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती
फुललेली ही फुले केसात तू माळून जा
शब्द तू,संगीत तू,
नको रे नको
नको म्हटलं ना
नको
नक्को ना. नको.
अं हं
न
नको
न न
नको
नक्को ना रे
नको
ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा
जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा
सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया
वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया
अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला
घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला
जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले
कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले
भेदिले शुन्यमंडळा, रिता केला भाता अभिमन्युचा
राहीला न वाली कोणी राहीला न भ्राता.....
२-९-२०२२
रोज किती पाणी प्यावे?
शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे
रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे
रोज किती पाणी प्यावे?
शेती आणि शरीरांची गरज
यांचे गणित नाही जुळली तर
इतर अपव्यय टाळून
लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व
ईतर चार जणांना पटवून
शरीराची गरज भागेल तेवढे
पुरूष एक वाल्या कोळी
आयुष्यभर विणतो जाळी
पापाचा घडा मात्र
शेवटी त्याच्याच भाळी
जाळ्यात शिकार फसेल
म्हणून वाट बघत बसतो
कर्तव्य पुर्तीचा भ्रम
उगाच जपत आसतो
पुरूष एक वाल्या कोळी.....
तहान नाही भूक नही.
बसला होता नाक्यावर
डोक आलं जाग्यावर
जेव्हाआप्तानीं मारलं फाट्यावर
नारायण नारायण जाप करी
नारदाची आली स्वारी
ऐकुन विनंती वाल्याची
म्हणती,त्रेता मधे एकच होता
पुरूष एक वाल्या कोळी......
कलीयुगी सारेच वाल्या
एवढे राम कोठून आणू
नाही केवट नाही राम
ज्याचे ओझे त्यालाच घाम
शब्दांची कर्णफुले
प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी
ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले