वाह ! उत्तम लेखन !
चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले.
आपला सायंटिफिक अॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले !
मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति !
ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले !
बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे !
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत !
आणि हो ,
जीवेत "शरदः" शतम !
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित.
तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा!
या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.
शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत.
या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा.
सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच.
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल.
माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील.
स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा.
आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे.
वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो.
आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच.
कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले.
आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना.....
संदीप खरे यांच्या कवितेत सारखं,
अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा....
बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते.
काळ देहासी आला खाऊ
आम्हीं आनंदे नाचू गाऊ......
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे)
बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते.
त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते.
-- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे.
--- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.
टिकटिकतेकिंवा कसे.....
झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे.
'बाकीबाब' , यांचा भक्त.
आयुष्याची आता झाली उजवणी
येतो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्याचे दार उघडावे
पांडुरंग हरी,वासुदेव हरी.
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे.
आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे.
फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे.
काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही.
पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.
काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल.
तशीच शरीराला पण सवय लागेल.
Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.
+++ अगदी.
रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात.
ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते.
-- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते.
-- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे.
मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_
तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग.
हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.
हे अगदी योग्यच.
पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे.
थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे.
-- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे.
वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत.
सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.
वाह ! उत्तम लेखन !
चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले.
आपला सायंटिफिक अॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले !
मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति !
ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले !
बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे !
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत !
आणि हो ,
जीवेत "शरदः" शतम !
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित.
तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा!
या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.
शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत.
या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा.
सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच.
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल.
माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील.
स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा.
आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे.
वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो.
आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच.
कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले.
आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना.....
संदीप खरे यांच्या कवितेत सारखं,
अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा....
बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते.
काळ देहासी आला खाऊ
आम्हीं आनंदे नाचू गाऊ......
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे)
बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते.
त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते.
-- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे.
--- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.
टिकटिकतेकिंवा कसे.....
झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे.
'बाकीबाब' , यांचा भक्त.
आयुष्याची आता झाली उजवणी
येतो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्याचे दार उघडावे
पांडुरंग हरी,वासुदेव हरी.
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे.
आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे.
फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे.
काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही.
पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.
काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल.
तशीच शरीराला पण सवय लागेल.
Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.
+++ अगदी.
रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात.
ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते.
-- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते.
-- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे.
मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_
तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग.
हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.
हे अगदी योग्यच.
पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे.
थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे.
-- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे.
वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत.
सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे.
महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे :
योगश्चित्तवृत्तिनिरोध:
('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे).
अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध:
( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय)
आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही.
अनेक आभार
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही.
अनेक आभार
रोज किती पाणी प्यावे?
शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे
रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे
रोज किती पाणी प्यावे?
शेती आणि शरीरांची गरज
यांचे गणित नाही जुळली तर
इतर अपव्यय टाळून
लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व
ईतर चार जणांना पटवून
शरीराची गरज भागेल तेवढे
यु-ट्यूबवर ह्यासंबंधी एक विडिओ बघितला होता, आता अजून उत्सुकता चाळवते आहे, एकदा जाऊन यायला हवं तिकडं. गेटवे वरून फेरीने अलिबाग अन येताजाता कधीतरी बोगी वोगीला जेवण असा काहीसा कार्यक्रम आखावा लागेल.
यु-ट्यूबवर ह्यासंबंधी एक विडिओ बघितला होता, आता अजून उत्सुकता चाळवते आहे, एकदा जाऊन यायला हवं तिकडं. गेटवे वरून फेरीने अलिबाग अन येताजाता कधीतरी बोगी वोगीला जेवण असा काहीसा कार्यक्रम आखावा लागेल.
अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईला गेलो असताना तिथे एका नव्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पदार्थ चाखण्याचा आनंद घेता आला. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील त्याच माझ्या वेगळ्या अनुभवाविषयी...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 18 क्रमांकाच्या फलाटाच्या बाहेरच्या बाजूला Bogie-Wogie हे अनोखे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू झालेले हे मध्य रेल्वेवरील पहिलेच चाकांवरील रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट चालवण्याचे कंत्राट Bogie-Wogie या रेस्टॉरंट चालकाला मिळाले आहे.
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची
चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.
त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) .
सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे.
( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.)
(सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे.
एप्रिल महिन्याचे अखेरचे दिवस असतात.
सुट्यांची चाहूल लागलेली असते आणि अंगाच्या काहिलीचीही.
`तो` आग ओकायला लागलेला असतो.
अशात एक थंड झुळूक पिवळसर मंद गोड सुगंध घेऊन येते. गावातला कुणी काका/मामा हातात एक मळक्या रंगाची पिशवी घेऊन आलेला असतो.
असा नातेवाईक नशीबात नसला, तर आपणच बाजारात काहीतरी घेऊन येताना एखाद्या कोपऱ्यावर सुरकुतलेल्या चेहऱ्याची एखादी म्हातारी समोर भरलेली टोपली घेऊन आपल्याकडेच आशेने बघत बसलेली दिसते.
गुरुजींकडे भरपूर अन्भव आहे, व्यवस्थित लिहिलं तर ते उत्तम लेखन पाडू शकतील.
असं वल्लीसेठ, अनौपचारिक बैठकीत बोलल्याचं आठवतं.
बाय द वे, लेखनाला उत्तम सुरुवात. येत राहा, लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
सगळच अर्थहीन आहे, बालीशपणा आणि बळबळ इनोद निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न, विशेष म्हणजे तुमचे काही धागे सोडले तर हा तुमचा बालीशपणा वारंवार दिसून येतो,
पूर्वी कुणीतरी तुम्हाला तुमच्या त्या बालिश स्मायल्यान्बद्दल ठणकावले होते आणि ते सारखे सारखे स्पांडू-पांडू चा जप केल्याबद्दल पण कानपिचक्या दिल्या होत्या.
असो वयक्तिक काहीही नाही पण अप्पाच्या मिसळीबद्दल लिहिणारा अतृप्त आत्मा जास्ती भावतो म्हणून बोललो. ;)
वाटलंच होत आत्म्कुन्थान टाईप काहीतरी बालिश उत्तर येईल म्हणून कारण तुमच्याकडे उत्तर द्यायला काही नाही हे मला माहिती होत. :)
असो तुमच्या धाग्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेसेच आहे म्हणा ते पाचकळ आणि बालिश ;)
अत्रुप्त आत्मा,
तुम्ही जिला टणाटण मेंदूफ्राय संघटना म्हणता तिने बरीच उपयुक्त पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यापैकी हे एक : धर्माचे आचरण आणि रक्षण
दुवा : https://sanatanshop.com/product/marathi-abiding-by-and-protection-of-dharma/
जमल्यास वाचा म्हणून सुचवेन.
आ.न.,
-गा.पै.
अंधश्रद्धायुक्त "गोष्टींना" आधुनिक काळातील गोष्टींचा मुलामा देऊन त्यालाच "सुधारणा" म्हणत उदरनिर्वाह करण्याची दांभिकता हे खरे "आत्मकुंथन" होय.
तुमचा प्रतिसाद या लेखाशी आणि त्यावरील माझ्या प्रतिसादापुरता मर्यादीत ठेवला असता तर वरील ओळी खरडल्या नसत्या. मात्र तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्याच मेंदूतून निघालेला "आत्मकुंथन" शब्द वापरला त्यामुळे मला नाईलाजाने हे लिहावे लागले.
अत्रुप्त आत्मा,
एक शंका आहे. हे आत्मकुंथन ही नेमकी काय भानगड आहे? नाय म्हणजे मला काय म्हणायचे आहे की, स्वत:चे स्वत:लाच कुंथावे लागते ना? मग आत्म हा उपसर्ग कशासाठी?
कुंथण्याचे उपकंत्राट देण्यासंबंधी मी तरी कधी काही ऐकले नाही. तुम्हांस काही माहिती असल्यास कृपया विदित करावी. 'अत्रुप्त आत्मा' या तुमच्या सदस्यनामाचा आत्मकुंथनाशी काहीतरी संबंध असावा असे वाटते आहे. तेव्हा जिज्ञासूंचे शंकानिरसन कराच, ही प्रेमळ विनंती.
आ.न.,
-गा.पै.
गुरुजींकडे भरपूर अन्भव आहे, व्यवस्थित लिहिलं तर ते उत्तम लेखन पाडू शकतील.
असं वल्लीसेठ, अनौपचारिक बैठकीत बोलल्याचं आठवतं.
बाय द वे, लेखनाला उत्तम सुरुवात. येत राहा, लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
सगळच अर्थहीन आहे, बालीशपणा आणि बळबळ इनोद निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न, विशेष म्हणजे तुमचे काही धागे सोडले तर हा तुमचा बालीशपणा वारंवार दिसून येतो,
पूर्वी कुणीतरी तुम्हाला तुमच्या त्या बालिश स्मायल्यान्बद्दल ठणकावले होते आणि ते सारखे सारखे स्पांडू-पांडू चा जप केल्याबद्दल पण कानपिचक्या दिल्या होत्या.
असो वयक्तिक काहीही नाही पण अप्पाच्या मिसळीबद्दल लिहिणारा अतृप्त आत्मा जास्ती भावतो म्हणून बोललो. ;)
वाटलंच होत आत्म्कुन्थान टाईप काहीतरी बालिश उत्तर येईल म्हणून कारण तुमच्याकडे उत्तर द्यायला काही नाही हे मला माहिती होत. :)
असो तुमच्या धाग्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेसेच आहे म्हणा ते पाचकळ आणि बालिश ;)
अत्रुप्त आत्मा,
तुम्ही जिला टणाटण मेंदूफ्राय संघटना म्हणता तिने बरीच उपयुक्त पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यापैकी हे एक : धर्माचे आचरण आणि रक्षण
दुवा : https://sanatanshop.com/product/marathi-abiding-by-and-protection-of-dharma/
जमल्यास वाचा म्हणून सुचवेन.
आ.न.,
-गा.पै.
अंधश्रद्धायुक्त "गोष्टींना" आधुनिक काळातील गोष्टींचा मुलामा देऊन त्यालाच "सुधारणा" म्हणत उदरनिर्वाह करण्याची दांभिकता हे खरे "आत्मकुंथन" होय.
तुमचा प्रतिसाद या लेखाशी आणि त्यावरील माझ्या प्रतिसादापुरता मर्यादीत ठेवला असता तर वरील ओळी खरडल्या नसत्या. मात्र तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्याच मेंदूतून निघालेला "आत्मकुंथन" शब्द वापरला त्यामुळे मला नाईलाजाने हे लिहावे लागले.
अत्रुप्त आत्मा,
एक शंका आहे. हे आत्मकुंथन ही नेमकी काय भानगड आहे? नाय म्हणजे मला काय म्हणायचे आहे की, स्वत:चे स्वत:लाच कुंथावे लागते ना? मग आत्म हा उपसर्ग कशासाठी?
कुंथण्याचे उपकंत्राट देण्यासंबंधी मी तरी कधी काही ऐकले नाही. तुम्हांस काही माहिती असल्यास कृपया विदित करावी. 'अत्रुप्त आत्मा' या तुमच्या सदस्यनामाचा आत्मकुंथनाशी काहीतरी संबंध असावा असे वाटते आहे. तेव्हा जिज्ञासूंचे शंकानिरसन कराच, ही प्रेमळ विनंती.
आ.न.,
-गा.पै.
चुलीवरच्या मिसळीची पाककृती
"तुम्च्या मिसळीची पाककृती आमाला पायजेल" अशी विचारणा आल्याने ही कृती देत आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने यात बदल करून घ्यावेत.
---
गरम असा दिवस पाहून ठेवावा. मग सर्वात आधी दुकानात जाऊन आवडती बियर बाटल्यांची एक थंडगार केस आणावी. आपल्या आवडीचे धम्माल मित्र-मैत्रिण लोक घरी बोलवावेत. मस्त बियर पीत गप्पा हाणता हाणता अगदी रंगात आल्या की, 'चला चुलीवरची मिसळ करायची का?' असे पिल्लू सोडावे. ही कल्पना बहुदा सर्वांना आवडतेच!
मग चूल पेटवण्याचे प्रयत्न सुरू करावेत. या वेळा पर्यंत सर्वांची 'किमान बियर पातळी' गाठलेली असेल तर उत्तम असते.
छान कविता.
बा द वे निर्महला सिथारामन यांना पाठवायला हवी ही कविता.
कारण त्यांच्या घरी त्या कांदा वापरत नाही, त्यामुळे त्या त्यांच्या डोक्यातील बटाटे काढून, त्याचा त्या घरी बराच उपयोग करू शकतील.
छान कविता.
बा द वे निर्महला सिथारामन यांना पाठवायला हवी ही कविता.
कारण त्यांच्या घरी त्या कांदा वापरत नाही, त्यामुळे त्या त्यांच्या डोक्यातील बटाटे काढून, त्याचा त्या घरी बराच उपयोग करू शकतील.
बाटाट्याचे उपयोग
स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा
अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता ||
माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा ||
"
खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे
तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे
नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच
तोटा ||
कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव
चढ्या दराने गंजले सारे रंकराव
आता मला आला आहे मान मोठा ||
कधीही मी कामी येई जेव्हा नसे भाजी ताजी
कोणत्याही भाजीत मिसळून जाण्या मी राजी
बहुगुणी असा सगळ्या भाज्यांत शहाणा मोठा ||
माझी करा रस्सा भाजी सुकी भाजी मटार बटाटा भाजी
किंवा करा मिक्
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी,
sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा
अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))
@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!
आगोबा मोड ऑन ..
सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय"
या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे
स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड
प्रमुख वक्ते,चौकट राजा
विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर
निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार
(बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते)
वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी,
sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा
अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))
@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!
आगोबा मोड ऑन ..
सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय"
या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे
स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड
प्रमुख वक्ते,चौकट राजा
विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर
निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार
(बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते)
वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत
पारंपरिक बायकांच्यात,
एक गोष्ट कॉमन असते.
आई झाल्यावर त्यांच्यातली,
बायको बरीचशी मरते.
सगळ लक्ष मुलांकडे,
त्यांचं सुख पहिलं!
नवरा म्हणजे शंकराची पिंडी,
वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं!
''अग तुला काही होतय का ?
मी स्वंयपाक करू का ? "
" तुम्ही स्वयं - पाक'च करता!
तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! )
"कशाला मरतेस?
पैसा ताई,
प्रतिसादाबद्दल खूप आभार तुमच्या सारख्या जेष्ठ सदस्याने आणि लेखिकेने नवीन सभासदांना प्रतिसाद देणे हे आमचे भाग्य आहे. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद.
पैसा ताई,
प्रतिसादाबद्दल खूप आभार तुमच्या सारख्या जेष्ठ सदस्याने आणि लेखिकेने नवीन सभासदांना प्रतिसाद देणे हे आमचे भाग्य आहे. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद.
आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.
उठ मावळ्या फोडू चल नळ्या
कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या
चल मदिरालयी तु घुस
ये सोडूनि घास फूस
कोंबड्यासम केस रंगविसी
कोंबडीस मग का तू वर्जिशी
६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस
ये सोडूनि घास फूस
वय का आपुले असे मोजिले
चार पेग जर रिते तू केले
यौवन भासेल तूस
ये सोडूनि घास फूस
वाह ! उत्तम लेखन !
छान.
अनुभव छान लिहिला आहे, सर्व
संतुलित...
In reply to संतुलित... by कर्नलतपस्वी
@ कर्नल साहेब, 'वैश्विक स्तर', योगी - भोगी - रोगी' वगैरे ...
बायोलॉजिकल घड्याळ व्यवस्थित...
लेख आवडला.
जबराव जबराव जबराव
जबराव जबराव जबराव
जबराव जबराव जबराव
जबराव जबराव जबराव
जबराव जबराव जबराव
बिघडली वाटते
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद
हे सर्व SIP सदृश्य...
तरी आहाराविषयक इतर खबरदारी
@गवीभौ बरोबर सहमतच
In reply to @गवीभौ बरोबर सहमतच by कर्नलतपस्वी
+++ अगदी.
In reply to +++ अगदी. by गवि
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो.
In reply to मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. by चित्रगुप्त
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी
In reply to तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी by गवि
@ गवि, आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचा शोध घेणे
+१
In reply to +१ by Bhakti
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
सतत प्रतिसाद उडत असल्यामुळे
डाळिंब, केळे, दही .... सायकल चालवणे
असा प्रयोग आणखी कुणी करून बघितला का ?
In reply to असा प्रयोग आणखी कुणी करून बघितला का ? by चित्रगुप्त
शुभेच्छा !
रक्तात वाढलेले होमोसिस्टीन....
आहार विषयक प्रयोगांवरील
चला, कर्मणुकीसाठी का होईना, पब्लिक वाचतंय.