वावर
माझे अपहरण
माझे अपहरण ...
मी पोते, सुतळी, दाभण घेऊन तयार आहे..
मी वाट पहात, दबा धरून बसलेय.
मला माझेच अपहरण करायचे आहे..
कुत्रा माग काढणार नाही,
भिकारी चुकून माझी एखादी खुण लक्षात ठेवणार नाही,
गाड्यावरचा भाजीवाला ओळख दाखवणार नाही,
शाळेत जाणारे पोर मला बघून हसणार नाही,
नाक्यावरचा फुटकळ तरुण मला बघून, न बघितल्यासारखा करणार नाही,
कुणी रिक्षावाला माझ्या अगदी जवळून रिक्षा नेणार नाही,
....... असे सगळे जुळून आले कि ,
मी माझेच अपहरण करेन ....
अन्न्नपुर्णा आणि अण्णा-२
आता ‘सातो दिन भगवानके, क्या मंगल क्या पीर’ असं असलं तरी कॉलेजच्या काळात शुक्रवारी संध्याकाळीच ‘रविवार’ चढायला लागायचा. आणि त्याचा हॅंगओव्हर मंगळवारपर्यंत टिकायचा. (वेगळा अर्थ काढू नका.) यादीच फार मोठी असे. रद्दीची दुकाने पालथी घालणे, पेपरची कात्रणे काढणे, अप्पा बळवंतला जावून ऊगाचंच पुस्तकांच्या दुकानात पुस्तके चाळणे, मित्राच्या रुमवर तबला-पेटी घेऊन मैफील रंगवणे. (कुणी काही म्हणो, आम्ही तिला मैफीलच म्हणायचो) शंकरच्या स्टुडीओत जावून मातीशी खेळणे असल्या अनेक भानगडी असायच्या. त्यामुळे कॉलेजच्या कामासाठी खऱ्या अर्थाने दोनच दिवस मिळायचे. बुधवार आणि गुरुवार. रविवारी जाग यायची तिच पसाऱ्यात.
अन्नपुर्णा आणि अण्णा
साल आठवत नाही. कॉलेजचे दिवस होते ईतकं सांगीतलं तरी पुरेसं होईल. 'ईंजीनिअर’ केलं की पोराचं आयुष्य मार्गी लागतं, आणि बोर्डींगला किंवा होस्टेलला पोरगं ठेवलं की त्याला शिस्त लागते असं आई-बापांना वाटायचा काळ होता तो. आई-बापही भाबडे होते त्या काळी. त्या मुळे आमची रवानगी सहाजीकच ईंजीनिअरींगला आणि बाड-बिस्तरा होस्टेलला जाऊन पडला. गाव, शाळा सुटलेली. शहर, कॉलेजची ओळख नाही. त्या मुळे सुरवातीच्या दिवसात कॉलेजच्या आवारात आणि सुट्टीच्या दिवशी पुण्याच्या अनोळखी रस्त्यांवरुन 'मोरोबा’सारखा चेहऱा करुन निरर्थक भटकायचो. मोरोबा म्हणजे आमचा घरगडी. निव्वळ शुंभ.
३५ रियाल
वेंकटने तीन हजार रियाल खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनवर पाहिले. सिगरेट क्रश केली. उठला. पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला, असं उद्या बॉसला दमात घेऊन सांगायचं, असा विचार करून तो पार्किंगकडे वळला.
*‘तो’ परत येईल...*
हॉलीवुडच्या नायिकेचा आशावाद
नवरा कसाहि असला तरी त्याच्याच सोबत आपलं संपूर्ण आयुष्य काढण्याची भाषा करणारी बायको, फक्त भारतीय चित्रपटांमधेच नव्हे, तर हॉलीवुडच्या चित्रपटांमधे सुद्धा नायिकांनी रंगवली आहे. नवरा बाहेरच्या बाईच्या नादी लागला तरी त्याची सेवा करून त्याला वठणीवर आणण्याची भाषा देखील प्रसंगी नायिका करतांना दिसतात. नवरा किती ही वाईट असला तरी आपल्या चित्रपटांचा शेवट मात्र गोड होतो. हॉलीवुडचं वेगळेपण इथेच ठळकपणे नजरेत भरतं.
मराठी भाषा दिन विशेषांकातील माझा लेख
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने 'झी युवा' ह्या साप्ताहिकाने विशेषांक काढला होता. त्यात सोशल मिडिया आणि युवा पिढीची मराठी ह्या विषयावर लेख लिहायची मला संधी मिळाली. तो लेख इथे देत आहे. कार्यबाहुल्यामुळे लेख टाकायला उशीरच झाला आहे. तरी, ह्या विषयाची जाण येण्यासाठी माझा मराठी ब्लॉग्स, संस्थाळं, फेसबुक कट्टे ह्यावरील वावर आणि प्रामुख्याने मिपावरील आमचे सुवर्णदिन फार्फार महत्वाचे ठरले आहेत.
--------------------------------------------
MYबोली मराठी
सद्ध्या महाराष्ट्रात आणि एकुणातच मराठीची परिस्थिती ही बर्याच जणांसाठी सांप्रत समयी घनघोर समस्य आहे.
सल्ला हवा
प्रिय मित्रहो (आणि मुलींनो). नेहमी मी मित्रहो, यावर थांबतो पण आज मला सल्ला पाहिजे आहे व सर्व जगाला पुरातन काला॒पासून माहीत आहेच की सल्ला हा बायकांच देतात व बहुतेक वेळी तो योग्यच असतो !
तर काय सांगत होतो, मला आज एक सल्ला हवा आहे. मी येथे भरपूर लिहतो व ( पाककृती सोडून) वाचतोही. काही वेळेला वाटते की लेखकाने लिहलेले चुकीचे आहे. अनेकदा खात्री असते. कमी वेळी खात्री नसते.त्यावेळी मी गप्प बसतो व जाणत्यांनी लिहलेले शोधण्याचा प्रयत्न करतो. Quits. i पण ज्यावेळी माझी ठाम खात्री असते की लिहलेले चूक आहे त्यावेळी काय करावे हा प्रश्न निर्माण होतो. मला तीन मार्ग असतात.
प्रिय मायमराठी
प्रिय मायमराठी,
तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी.
तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात.
प्रवास
प्रवास