मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

सल्ला हवा

शरद ·

प्रचेतस 05/03/2018 - 09:15
आपण एक स्वतंत्र लेख लिहून त्याचे खंडन करावे. :) (*तुम्हाला एका क्रिप्टिक लेखकाच्या उपनिषदांविषयीच्या गोलमाल विधानांविषयी सल्ला हवा आहे असे गृहित धरतो आहे :) )

इथे लोक व्यक्त होतात. प्रत्येक वेळी प्रत्येक जण पुर्ण व्यासंगी असेल , अभ्यास करुनच लिहीत असेल असे नाही. तो जे लिहितो ते त्याचे 'वाटणे' आहे, तो ते व्यक्त करतोय. ते अचूक असेल असे नाही...त्याला व्यक्त होवू द्या.. आपणही व्हा.. खास करुन 'जनातलं मनातलं' बद्दल मी हेच म्हणेन. कुणी अभ्यासपुर्ण लेख काथ्याकूटमध्ये लिहीत असेल (किंवा अभ्यासपुर्ण असल्याचा त्याचा दावा असेल ) तर तुम्ही नक्कीच कठोर समीक्षा करा.

जेम्स वांड 05/03/2018 - 12:58
हितं मिपा मालक, मिपा मालकनियुक्त संपादक, मिपा मालकनियुक्त साहित्य संपादक, ह्यांना लेखनाची मापं काढू वाटत नाहीत तर तुम्ही का म्हणे हा गोवर्धन पर्वत उचलताय उगीच्या उगीच?

किरण नाथ 05/03/2018 - 15:44
***प्रतिसादात सौम्य प्रश्न विचारून लेखकाला सुधारण्याची संधी देतो** सौम्यपणे सांगा व न ऐकल्यास सोडून द्या. जो ऐकत नाही त्याला पटवण्यात स्वतःला त्रास करून घेऊ नका.

पैसा 05/03/2018 - 16:49
इथे फक्त जंगलाचा कायदा चालतो. समोरचा माणूस कानाखाली आवाज काढेल याची शक्यता नसल्याने अतिशय गलिच्छ भाषा वापरता येते. डुकर मंडळींशी जवळ गेल्यास काय होऊ शकते याची कल्पना असली पाहिजे. त्यावरून पुढे त्याच्याशी कुस्ती खेळायची का नुसती काठी मारायची का 'गच्छ सूकर भद्रं ते ' म्हणून सोडून द्यायचे हे आपल्याला असलेला वेळ, खुमखुमी इत्यादींवर अवलंबून असते. अर्थात हे फक्त नाठाळ लोकांसाठी आहे. जे शांतपणे चर्चा करू शकतात आणि भाषा चांगली वापरतात त्यांच्याबद्दल काही प्रश्नच नाही. मग भले ते विरोधी मत का मांडेनात.

माहितगार 05/03/2018 - 17:13
प्रिय मित्रहो (आणि मुलींनो). नेहमी मी मित्रहो, यावर थांबतो पण आज मला सल्ला पाहिजे आहे व सर्व जगाला पुरातन काला॒पासून माहीत आहेच की सल्ला हा बायकांच देतात व बहुतेक वेळी तो योग्यच असतो !
आपल्या उपरोक्त मापाने (वाक्याने) आपण सल्ला द्याल तर बायकी ठराल, आपल्याला या लेखास कुणी सल्ला देईल तो बायकी ठरेल , किंवा आपले आणि इतरांचे सल्ले योग्य नसतील. आपल्याला सल्ला देऊ इच्छिणार्‍या पुरुषांनी बिचकावे असे उपरोक्त विधानाचे प्रयोजन आहे का ? पुरुषां विरुद्ध जेंडर डिस्क्रिमीनेशन करणारा मुद्दा क्लिअर होई पर्यंत सल्ला देऊ इच्छित नसलेला आणि या पुर्वीचे काही सल्ले दिले असल्यास वापस घेणारा माहितगार :)

याबाबत, मी पाळत असलेले काही नियम खाली देत आहे. ते तुम्हालाही उपयोगी वाटले तर आनंदच होईल : १. मिपा हे जगभरच्या आभासी (virtual) मराठी मित्रांसाठी, किमान सभ्यता (पक्षी : अधिकृत धोरण) पाळून व्यक्त होण्यासाठी बनवलेले व्यासपिठ आहे, असे म्हणता येईल. तेव्हा, तुम्ही मित्रांच्या घोळक्यात असताना एखाद्या लेखात आहेत तशी विधाने केली गेली तर, तुमची किमान सभ्यता पाळुन जशी प्रतिक्रिया असेल, तसेच इथेही व्यक्त व्हा. २. जाल हे आभासी माध्यम आहे. त्यामुळे, एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या आयडीवरून तिचे लिंग, वय, ज्ञान, अनुभव, इत्यादी जोखणे चुकीचे ठरू शकते. किंबहुना, जालावरच्या आयडीने तिच्या अश्या प्रकारच्या व्यक्तिगत वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करून आणि केवळ मजकुराकडेच लक्ष देऊन तुमचे मत व्यक्त करायला अलिखित परवानगी दिलेली असते. ३. तुमच्या प्रतिक्रियेवरचा त्या आयडीचा प्रतिसाद पाहून तुम्ही आपल्या नंतरच्या प्रतिसादांतिल मजकूराचे शब्द, रोख, स्पष्टक्तेपणा, इत्यादी जरूर तसे बदलू शकता. ४. दुसर्‍याचा लेख वाचून तुमच्या मनात आलेले मुद्दे, नीट समजावून देण्यासाठी, विस्तारने लिहायला हवे असे वाटले तर, मूळ लेखाचा संदर्भ देऊन किंवा न देताही, तुम्ही एक स्वतंत्र लेख प्रसिद्ध करू शकता. ५. (अ) लेखातले मुद्दे आणि/किंवा (पूर्वानुभवावरून) खुद्द लेखक तुम्हाला दखल घेण्याच्या पात्रतेचा वाटत नसला, आणि/किंवा (आ) पूर्वानुभवावरून, लेखकाचा प्रतिवाद करणे चिखलात कुस्ती करण्यासारखे होईल, अशी खात्री वाटत असेल तर त्या लेखनाला; अनुल्लेखाने किंवा फारतर एका त्रोटक प्रतिसादात त्या कारणाचा त्रोटक उल्लेख करून (उर्फ मिपाभाषेत, इग्नोरास्त्राने), मारणे हा सुद्धा एक परिणामकारक उपाय ठरू शकतो. :) ६. "जगातील सगळ्या विषयाचे किंवा अगदी एखाद्या विशिष्ट विषयाचे "अंतिम" ज्ञान आपल्याला झालेले नाही" आणि "जगातील सगळ्यांचे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली नाही", हे ज्ञान अश्यावेळी मनःशांती उत्तम अवस्थेत ठेवायला फार उपयोगी पडते, असा अनुभव आहे. तरीही, लेखकाने फारच वात आणला असला तर एखाद्या वेळेस चिखलात उतरून कुस्तीचा अनुभव घेणेही मजेशीर ठरू शकते. अन्यथा, अश्या परिस्थितीत, इतरांपैकी कोणी एक/अनेकजण अशी कुस्ती करतातच, असे अनुभव सांगतो. बांधावर बसून अश्या कुस्तीची मजा पाहण्यातही एक वेगळीच खुमारी असते ! =)) मिपासारखे मुक्त संस्थळ जालावरच्या समाजाचे प्रतिबिंब आहे, म्हणून त्यात समाजातिल बरे-वाईट दिसणारच ! त्यामुळे, "तुमची मनःस्थिती जराशीही बिघडावी इतकी नावडत्या आयडींची पात्रता नाही" अशी खूणगाठ मनाशी बांधून, आपल्याला आवडणार्‍या/पटणार्‍या आयडींबरोबरच्या संवादाची मजा उपभोगावी.

Nitin Palkar 06/03/2018 - 15:23
'सल्ला हवा आहे' असे शिर्षक वाचून मोठ्या सुर्सुरीने आम्ही हा लेख (किंवा जे काही आहे ते) वाचायला घेतला. कारण कुणालाही सल्ला देण्याची पात्रता आमच्याकडे आहे अशी शोलेतील बसंती प्रमाणे आमची ठाम खात्री आहे. परंतु वाच्नन्ति तुम्हाला सल्ल्याची आवश्यकता नसून कुणीतरी "उगी उगी ...." असे म्हणण्याची गरज आहे असे आम्हांस वाटते. तस्मात अति विचार करून स्वतःच्या मेंदूस शिन करून घेऊ नये हा सल्ला. कळावे क्षोभ नसावा.

प्रचेतस 05/03/2018 - 09:15
आपण एक स्वतंत्र लेख लिहून त्याचे खंडन करावे. :) (*तुम्हाला एका क्रिप्टिक लेखकाच्या उपनिषदांविषयीच्या गोलमाल विधानांविषयी सल्ला हवा आहे असे गृहित धरतो आहे :) )

इथे लोक व्यक्त होतात. प्रत्येक वेळी प्रत्येक जण पुर्ण व्यासंगी असेल , अभ्यास करुनच लिहीत असेल असे नाही. तो जे लिहितो ते त्याचे 'वाटणे' आहे, तो ते व्यक्त करतोय. ते अचूक असेल असे नाही...त्याला व्यक्त होवू द्या.. आपणही व्हा.. खास करुन 'जनातलं मनातलं' बद्दल मी हेच म्हणेन. कुणी अभ्यासपुर्ण लेख काथ्याकूटमध्ये लिहीत असेल (किंवा अभ्यासपुर्ण असल्याचा त्याचा दावा असेल ) तर तुम्ही नक्कीच कठोर समीक्षा करा.

जेम्स वांड 05/03/2018 - 12:58
हितं मिपा मालक, मिपा मालकनियुक्त संपादक, मिपा मालकनियुक्त साहित्य संपादक, ह्यांना लेखनाची मापं काढू वाटत नाहीत तर तुम्ही का म्हणे हा गोवर्धन पर्वत उचलताय उगीच्या उगीच?

किरण नाथ 05/03/2018 - 15:44
***प्रतिसादात सौम्य प्रश्न विचारून लेखकाला सुधारण्याची संधी देतो** सौम्यपणे सांगा व न ऐकल्यास सोडून द्या. जो ऐकत नाही त्याला पटवण्यात स्वतःला त्रास करून घेऊ नका.

पैसा 05/03/2018 - 16:49
इथे फक्त जंगलाचा कायदा चालतो. समोरचा माणूस कानाखाली आवाज काढेल याची शक्यता नसल्याने अतिशय गलिच्छ भाषा वापरता येते. डुकर मंडळींशी जवळ गेल्यास काय होऊ शकते याची कल्पना असली पाहिजे. त्यावरून पुढे त्याच्याशी कुस्ती खेळायची का नुसती काठी मारायची का 'गच्छ सूकर भद्रं ते ' म्हणून सोडून द्यायचे हे आपल्याला असलेला वेळ, खुमखुमी इत्यादींवर अवलंबून असते. अर्थात हे फक्त नाठाळ लोकांसाठी आहे. जे शांतपणे चर्चा करू शकतात आणि भाषा चांगली वापरतात त्यांच्याबद्दल काही प्रश्नच नाही. मग भले ते विरोधी मत का मांडेनात.

माहितगार 05/03/2018 - 17:13
प्रिय मित्रहो (आणि मुलींनो). नेहमी मी मित्रहो, यावर थांबतो पण आज मला सल्ला पाहिजे आहे व सर्व जगाला पुरातन काला॒पासून माहीत आहेच की सल्ला हा बायकांच देतात व बहुतेक वेळी तो योग्यच असतो !
आपल्या उपरोक्त मापाने (वाक्याने) आपण सल्ला द्याल तर बायकी ठराल, आपल्याला या लेखास कुणी सल्ला देईल तो बायकी ठरेल , किंवा आपले आणि इतरांचे सल्ले योग्य नसतील. आपल्याला सल्ला देऊ इच्छिणार्‍या पुरुषांनी बिचकावे असे उपरोक्त विधानाचे प्रयोजन आहे का ? पुरुषां विरुद्ध जेंडर डिस्क्रिमीनेशन करणारा मुद्दा क्लिअर होई पर्यंत सल्ला देऊ इच्छित नसलेला आणि या पुर्वीचे काही सल्ले दिले असल्यास वापस घेणारा माहितगार :)

याबाबत, मी पाळत असलेले काही नियम खाली देत आहे. ते तुम्हालाही उपयोगी वाटले तर आनंदच होईल : १. मिपा हे जगभरच्या आभासी (virtual) मराठी मित्रांसाठी, किमान सभ्यता (पक्षी : अधिकृत धोरण) पाळून व्यक्त होण्यासाठी बनवलेले व्यासपिठ आहे, असे म्हणता येईल. तेव्हा, तुम्ही मित्रांच्या घोळक्यात असताना एखाद्या लेखात आहेत तशी विधाने केली गेली तर, तुमची किमान सभ्यता पाळुन जशी प्रतिक्रिया असेल, तसेच इथेही व्यक्त व्हा. २. जाल हे आभासी माध्यम आहे. त्यामुळे, एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या आयडीवरून तिचे लिंग, वय, ज्ञान, अनुभव, इत्यादी जोखणे चुकीचे ठरू शकते. किंबहुना, जालावरच्या आयडीने तिच्या अश्या प्रकारच्या व्यक्तिगत वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करून आणि केवळ मजकुराकडेच लक्ष देऊन तुमचे मत व्यक्त करायला अलिखित परवानगी दिलेली असते. ३. तुमच्या प्रतिक्रियेवरचा त्या आयडीचा प्रतिसाद पाहून तुम्ही आपल्या नंतरच्या प्रतिसादांतिल मजकूराचे शब्द, रोख, स्पष्टक्तेपणा, इत्यादी जरूर तसे बदलू शकता. ४. दुसर्‍याचा लेख वाचून तुमच्या मनात आलेले मुद्दे, नीट समजावून देण्यासाठी, विस्तारने लिहायला हवे असे वाटले तर, मूळ लेखाचा संदर्भ देऊन किंवा न देताही, तुम्ही एक स्वतंत्र लेख प्रसिद्ध करू शकता. ५. (अ) लेखातले मुद्दे आणि/किंवा (पूर्वानुभवावरून) खुद्द लेखक तुम्हाला दखल घेण्याच्या पात्रतेचा वाटत नसला, आणि/किंवा (आ) पूर्वानुभवावरून, लेखकाचा प्रतिवाद करणे चिखलात कुस्ती करण्यासारखे होईल, अशी खात्री वाटत असेल तर त्या लेखनाला; अनुल्लेखाने किंवा फारतर एका त्रोटक प्रतिसादात त्या कारणाचा त्रोटक उल्लेख करून (उर्फ मिपाभाषेत, इग्नोरास्त्राने), मारणे हा सुद्धा एक परिणामकारक उपाय ठरू शकतो. :) ६. "जगातील सगळ्या विषयाचे किंवा अगदी एखाद्या विशिष्ट विषयाचे "अंतिम" ज्ञान आपल्याला झालेले नाही" आणि "जगातील सगळ्यांचे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली नाही", हे ज्ञान अश्यावेळी मनःशांती उत्तम अवस्थेत ठेवायला फार उपयोगी पडते, असा अनुभव आहे. तरीही, लेखकाने फारच वात आणला असला तर एखाद्या वेळेस चिखलात उतरून कुस्तीचा अनुभव घेणेही मजेशीर ठरू शकते. अन्यथा, अश्या परिस्थितीत, इतरांपैकी कोणी एक/अनेकजण अशी कुस्ती करतातच, असे अनुभव सांगतो. बांधावर बसून अश्या कुस्तीची मजा पाहण्यातही एक वेगळीच खुमारी असते ! =)) मिपासारखे मुक्त संस्थळ जालावरच्या समाजाचे प्रतिबिंब आहे, म्हणून त्यात समाजातिल बरे-वाईट दिसणारच ! त्यामुळे, "तुमची मनःस्थिती जराशीही बिघडावी इतकी नावडत्या आयडींची पात्रता नाही" अशी खूणगाठ मनाशी बांधून, आपल्याला आवडणार्‍या/पटणार्‍या आयडींबरोबरच्या संवादाची मजा उपभोगावी.

Nitin Palkar 06/03/2018 - 15:23
'सल्ला हवा आहे' असे शिर्षक वाचून मोठ्या सुर्सुरीने आम्ही हा लेख (किंवा जे काही आहे ते) वाचायला घेतला. कारण कुणालाही सल्ला देण्याची पात्रता आमच्याकडे आहे अशी शोलेतील बसंती प्रमाणे आमची ठाम खात्री आहे. परंतु वाच्नन्ति तुम्हाला सल्ल्याची आवश्यकता नसून कुणीतरी "उगी उगी ...." असे म्हणण्याची गरज आहे असे आम्हांस वाटते. तस्मात अति विचार करून स्वतःच्या मेंदूस शिन करून घेऊ नये हा सल्ला. कळावे क्षोभ नसावा.
प्रिय मित्रहो (आणि मुलींनो). नेहमी मी मित्रहो, यावर थांबतो पण आज मला सल्ला पाहिजे आहे व सर्व जगाला पुरातन काला॒पासून माहीत आहेच की सल्ला हा बायकांच देतात व बहुतेक वेळी तो योग्यच असतो ! तर काय सांगत होतो, मला आज एक सल्ला हवा आहे. मी येथे भरपूर लिहतो व ( पाककृती सोडून) वाचतोही. काही वेळेला वाटते की लेखकाने लिहलेले चुकीचे आहे. अनेकदा खात्री असते. कमी वेळी खात्री नसते.त्यावेळी मी गप्प बसतो व जाणत्यांनी लिहलेले शोधण्याचा प्रयत्न करतो. Quits. i पण ज्यावेळी माझी ठाम खात्री असते की लिहलेले चूक आहे त्यावेळी काय करावे हा प्रश्न निर्माण होतो. मला तीन मार्ग असतात. (1) विसरून जाणे.

प्रिय मायमराठी

शिव कन्या ·
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.

प्रवास

शिव कन्या ·
प्रवास तो म्हणाला, ‘मोना, प्लान चेंज! अब हम रेलसे नहीं, driving करके जायेंगे!’ त्याने गाडी बाहेर काढली, तेव्हा ती तिच्या कोषातून बाहेर पडली . गाडी शहरातील धूळधूर अंगावर घेत, गर्दीतून वाट काढू लागली. गाडी शहराबाहेर आली, त्याला तरतरीत वाटू लागले.....

कमलताल

शिव कन्या ·

पलाश 30/12/2017 - 02:29
सुरेखआणि चित्रदर्शी. आजही, आवाजाचा कंटाळा आला कि तुझे मौन आठवते. काही असुंदर दिसले, कि तुझे राजीव रूप आठवते.... आणि तोडलेली फुले पाहिली, कि तुझ्यात खोल रुजलेले असंख्य पद्म आठवतात. हे फारच आवडलं.

पलाश 30/12/2017 - 02:29
सुरेखआणि चित्रदर्शी. आजही, आवाजाचा कंटाळा आला कि तुझे मौन आठवते. काही असुंदर दिसले, कि तुझे राजीव रूप आठवते.... आणि तोडलेली फुले पाहिली, कि तुझ्यात खोल रुजलेले असंख्य पद्म आठवतात. हे फारच आवडलं.
(ताल = सरोवर) प्रिय कमलताल, मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते. कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ. अशीच चालून चालून दुपार उलटली. ते चालणे फार लयदार असे. उंच उंच झाडांतून जाणारी नागमोडी वाट.

मजूर

शिव कन्या ·
मजूर .... 'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो. मागच्या वर्षी सुरु झालं होतं हे बांधकाम. बरोब्बर एका वर्षात ही उंचच उंच इमारत उभी राहिली. तसे मला इथे येऊन दोन वर्ष झाली ...... हं, वर्षदोनवर्षं होताच घरी जायला मी काय इंजिनीअर नाही. झालो असतो का इंजिनियर? १२ वी पर्यंत नेटाने शिकलोच. पण गरिबी, भूक........

लिहायचं वेगळच होतं पण...

शाली ·

सुखीमाणूस 19/12/2017 - 15:25
एकदम रसरशीत लेख. छान वाटल वाचताना. डोळे पाणावले. लेखावर एक समाधानाची साय आहे ती भावली. तुम्ही भाग्यवान आहात.

सुंदर मनाला भिडणारे मनोगत ! साधी सोपी, जसे आहे तसे सांगणारी लेखनशैली वाचता वाचता तुमच्या जगात ओढून नेते !! अगदी आदर्श आईवडील लाभले आहेत तुम्हाला. काही खास आवडलेले... अकारण कुणावर रागावण्याने, चिडचीड केल्याने, शक्य असुनही कुणाला मदत करायचा कंटाळा केल्या मुळे तिला ऊपास मोडल्यासारखा वाटायचा. आमची वरात मुर्ती निवडायला जायची. बहुतेकदा एकमत होई. नाहीच झाले तर अप्पा कुठली तरी भडक रंगाची मुर्ती निवडायचे. मग आम्ही घाई करुन आमच्यातले मतभेद दुर करायचो आणि आवडलेल्या मुर्तींपैकी एका मुर्तीवर एकमताने फुले टाकायचो. मग दहा दिवस अप्पा भलतेच खुशीत असत. त्यांनी कधी शिवाशीव पाळली नाही पण हौस म्हणुन सोवळं नेसून पुजा करत. पण अप्पांनी देवाकडे कधी काही मागीतलं नाही. त्यांचं म्हणनं असे "आपण देवाची लेकरे, लेकराला काय हवं ते त्याला न सांगता कळतं. आपलं हित आपल्याला नाही कळत, त्याला कळतं, त्यामुळे योग्य ते तो देतोच न मागता. आपण फक्त छानपैकी थॅंक यू म्हणायचं मनापासुन." या दिवसात अप्पांचा आणि बाप्पांचा सदैव संवाद चाले. त्यात कुठलाही दंभ, नाटक, मुद्दामहून करनं नसे. अत्यंत सहजते हे चाले. कामावर जाताना "चला, येतो देवा." म्हणत आईबरोबर बाप्पांनाही विचारत. ती मुर्ती नसेच आमच्यासाठी. पाहूणे आलेत घरी असं समजून सगळे व्यवहार चालत. हे तर खास श्रीयुत यनावाला यांनी वाचावे असे आहे. कर्मठ-कठोर नास्तिक, परखडपणचा अतिरेक करून, आपल्या जीवनातले छोटेछोटे पण फार महत्वाचे आनंद कसे मुकतात, हे समजून घेणे सोपे होईल. लिहायचं वेगळंच होतं तुम्हाला... पण हे लिहिलंय ते सुद्धा खासच लिहीलंय ! आता जे मूळातून लिहायचं ठरवलं होतं तेही लिहून टाका... तेसुद्धा वाचायची उत्सुकता आहे ! :)

सिद्धार्थ ४ 19/12/2017 - 15:50
बऱ्याच दिवसांनी मनाला भिडेल असे काही तरी वाचायला मिळाले. तुम्ही तुमचे लेखन थांबवू नका.

नाखु 19/12/2017 - 16:30
पितृछत्र मी चौथीत असताना हरपले आणि आजी आजोबां सहवास फक्त ३-४ वर्षे लाभला पण त्यांनी दिलेल्या निर्व्याज प्रेमाचं व्याज अजून मिळतेय अज्ञात हातांचा अनंत ऋणानुबंध असलेला कर्जदार नाखु पांढरपेशा

In reply to by गामा पैलवान

शाली 20/12/2017 - 10:45
अगदी बरोरबर आहे गामाजी. हे आपणच जाणीवपुर्वक केलं पाहीजे. जर आपण गांभीर्याने नाही घेतले तर पुढची पिढी आपल्याला बोल लावल्याशिवाय रहाणार नाही हे नक्की. धन्यवाद.

जागु 20/12/2017 - 12:30
कितकितीत्ती सुंदर आणि मनापासून ओघवले लेखन केले आहे. मलाही माझे बालपण आठवले. काहीसे असेच मिळतेजुळते. खुप छान लेखन शैली आहे. लिहत रहा.

शब्दानुज 20/12/2017 - 16:11
लेखावर १५ -२५ प्रतिक्रिया असल्या (लेखकाच्या वगळून ) की तो उत्तम आहे असे समजावे. ती अपेक्षा अर्थातच पुर्ण झाली., आम्ही ९५ च्या पिढीतले.. बहुधा याच काळात स्थित्यांतरास वेग आला असावा (अभिमन्यूप्रमाणेच आम्ही लहानपणापासुन अंगठे चोखत चौफेर नजर ठेवत होतो. ) अगदी सुरवातीला एकमेकांना गोट्या देण्यापासुन ते हॉटस्पॉट देण्यापर्यंत आम्ही बदललो. पण आपण काही गमावत आहोत हे तेव्हा जाणवत होतेच फक्त आत्ताच्या लहान मुलांना ते तेवढे जाणवत नाही. कारण बहुधा त्यांच्यासाठी सगळं आधीपासुन असेच चालू होते.

शाली 20/12/2017 - 18:37
शब्दानुज, तुमची पिढीच हे करू शकते.विसाव्या मजल्यावर रहात असलो तरी सोसायटीच्या गार्डनमधे फुलपाखरं येतात, वेलींना कळ्या लागतात, त्याची फुले होतात. सगळं पाहू शकता, पिल्लांना दाखवू शकता. जसे आपण तशी आपली पिल्ले. आपण बदललो, आपल्या प्रायोरेटीज बदलल्या की त्यांच्याही बदलतात. आपण काही गमावत आहो असं वाटणं यात सगळं काही आलं.

लई भारी 01/05/2018 - 13:50
आणि खूप भिडलं! तुमचा अलीकडचा लेख बघून हा शोधून काढला :) अजून लिहा. पुलेशु!

सोत्रि 02/05/2018 - 11:39
मी कधी त्याच्याकडे तर कधी त्याच्या आईकडे आळीपाळीने पहात राहीले काही क्षण आणि अचानक मला त्या माय-लेकारांची खुप किव वाटायला लागली. लग्नामुळे 'एम फील' मधेच सोडून नवऱ्याच्या मागे गेली पाच सहा वर्ष देशोदेशी फिरणारी ती आई आणि तिचं स्मार्ट फोन लिलया हाताळणारं गोड, स्मार्ट पिल्लू यांच्या विषयी माझ्या मनात अतीव कणव दाटून आली.
इथून पुढचा भाग सुंदर लिहीलाय. पण वरचा कोट केलेला भाग आणि गतकाळातील आठवणी यांचा संबंध पटला नाही. तुमच्या वडीलांनी टिव्ही आणलाच ना? ती काळाची जशी गरज होती तशीच नविन गॅजेट्स ही आजच्या काळातली गरज आहे. कीव वगैरे काही यायला नको. तुम्ही टीव्ही बघत जो वेळ घालवला तो तुमच्या आधिच्या पीढीने नाही घालवला. पण म्हणून तुम्ही किती मोठा बालपणाचा ठेवा मीस करणार किंवा तुमच्या वडीलांनी त्यांच्या बालपणाची तुलना तुमच्या बालपणाशी केली असती तर टीव्ही आणलाच नसता. अशी तुलना करून कीव वगैरे येऊ द्यायची नसते. मनाचे विभ्रम असतात ते. - (जे सांगायचंय तेच लिहीलेला) सोकाजी

श्वेता२४ 03/05/2018 - 13:23
खूपच छान लिहीलय तुम्ही अगदी भावनावश करणारं. सोत्रि यांच्या मताशी मिही सहमत असले तरी एखादा लेख वाचताना त्याची लिखाणाची शैली उत्तम जमुन आली असेल तर मला त्यातले विचार किती पटण्यासारखे आहेत वगैरे विचार करावासा वाटत नाही. तुमचे लिखाण वाचताना प्रत्येकजण स्वताच्या बालपणीच्या काळात फेरफटका मारुन येऊन सुखावला असणार आणि हेच तुमच्या लिखाणाचे यश आहे. असेच छान लिखाण वाचायला मिळो.

बाप होण्यासाठी फारसं काही करावं लागत नाही आणि वडील होण्यासाठी काय काय करायचं हे सुधरत नाही. अशा लेखांमधून शिकायला मिळतंय. धन्यवाद! लिहीत राहा.

सुखीमाणूस 19/12/2017 - 15:25
एकदम रसरशीत लेख. छान वाटल वाचताना. डोळे पाणावले. लेखावर एक समाधानाची साय आहे ती भावली. तुम्ही भाग्यवान आहात.

सुंदर मनाला भिडणारे मनोगत ! साधी सोपी, जसे आहे तसे सांगणारी लेखनशैली वाचता वाचता तुमच्या जगात ओढून नेते !! अगदी आदर्श आईवडील लाभले आहेत तुम्हाला. काही खास आवडलेले... अकारण कुणावर रागावण्याने, चिडचीड केल्याने, शक्य असुनही कुणाला मदत करायचा कंटाळा केल्या मुळे तिला ऊपास मोडल्यासारखा वाटायचा. आमची वरात मुर्ती निवडायला जायची. बहुतेकदा एकमत होई. नाहीच झाले तर अप्पा कुठली तरी भडक रंगाची मुर्ती निवडायचे. मग आम्ही घाई करुन आमच्यातले मतभेद दुर करायचो आणि आवडलेल्या मुर्तींपैकी एका मुर्तीवर एकमताने फुले टाकायचो. मग दहा दिवस अप्पा भलतेच खुशीत असत. त्यांनी कधी शिवाशीव पाळली नाही पण हौस म्हणुन सोवळं नेसून पुजा करत. पण अप्पांनी देवाकडे कधी काही मागीतलं नाही. त्यांचं म्हणनं असे "आपण देवाची लेकरे, लेकराला काय हवं ते त्याला न सांगता कळतं. आपलं हित आपल्याला नाही कळत, त्याला कळतं, त्यामुळे योग्य ते तो देतोच न मागता. आपण फक्त छानपैकी थॅंक यू म्हणायचं मनापासुन." या दिवसात अप्पांचा आणि बाप्पांचा सदैव संवाद चाले. त्यात कुठलाही दंभ, नाटक, मुद्दामहून करनं नसे. अत्यंत सहजते हे चाले. कामावर जाताना "चला, येतो देवा." म्हणत आईबरोबर बाप्पांनाही विचारत. ती मुर्ती नसेच आमच्यासाठी. पाहूणे आलेत घरी असं समजून सगळे व्यवहार चालत. हे तर खास श्रीयुत यनावाला यांनी वाचावे असे आहे. कर्मठ-कठोर नास्तिक, परखडपणचा अतिरेक करून, आपल्या जीवनातले छोटेछोटे पण फार महत्वाचे आनंद कसे मुकतात, हे समजून घेणे सोपे होईल. लिहायचं वेगळंच होतं तुम्हाला... पण हे लिहिलंय ते सुद्धा खासच लिहीलंय ! आता जे मूळातून लिहायचं ठरवलं होतं तेही लिहून टाका... तेसुद्धा वाचायची उत्सुकता आहे ! :)

सिद्धार्थ ४ 19/12/2017 - 15:50
बऱ्याच दिवसांनी मनाला भिडेल असे काही तरी वाचायला मिळाले. तुम्ही तुमचे लेखन थांबवू नका.

नाखु 19/12/2017 - 16:30
पितृछत्र मी चौथीत असताना हरपले आणि आजी आजोबां सहवास फक्त ३-४ वर्षे लाभला पण त्यांनी दिलेल्या निर्व्याज प्रेमाचं व्याज अजून मिळतेय अज्ञात हातांचा अनंत ऋणानुबंध असलेला कर्जदार नाखु पांढरपेशा

In reply to by गामा पैलवान

शाली 20/12/2017 - 10:45
अगदी बरोरबर आहे गामाजी. हे आपणच जाणीवपुर्वक केलं पाहीजे. जर आपण गांभीर्याने नाही घेतले तर पुढची पिढी आपल्याला बोल लावल्याशिवाय रहाणार नाही हे नक्की. धन्यवाद.

जागु 20/12/2017 - 12:30
कितकितीत्ती सुंदर आणि मनापासून ओघवले लेखन केले आहे. मलाही माझे बालपण आठवले. काहीसे असेच मिळतेजुळते. खुप छान लेखन शैली आहे. लिहत रहा.

शब्दानुज 20/12/2017 - 16:11
लेखावर १५ -२५ प्रतिक्रिया असल्या (लेखकाच्या वगळून ) की तो उत्तम आहे असे समजावे. ती अपेक्षा अर्थातच पुर्ण झाली., आम्ही ९५ च्या पिढीतले.. बहुधा याच काळात स्थित्यांतरास वेग आला असावा (अभिमन्यूप्रमाणेच आम्ही लहानपणापासुन अंगठे चोखत चौफेर नजर ठेवत होतो. ) अगदी सुरवातीला एकमेकांना गोट्या देण्यापासुन ते हॉटस्पॉट देण्यापर्यंत आम्ही बदललो. पण आपण काही गमावत आहोत हे तेव्हा जाणवत होतेच फक्त आत्ताच्या लहान मुलांना ते तेवढे जाणवत नाही. कारण बहुधा त्यांच्यासाठी सगळं आधीपासुन असेच चालू होते.

शाली 20/12/2017 - 18:37
शब्दानुज, तुमची पिढीच हे करू शकते.विसाव्या मजल्यावर रहात असलो तरी सोसायटीच्या गार्डनमधे फुलपाखरं येतात, वेलींना कळ्या लागतात, त्याची फुले होतात. सगळं पाहू शकता, पिल्लांना दाखवू शकता. जसे आपण तशी आपली पिल्ले. आपण बदललो, आपल्या प्रायोरेटीज बदलल्या की त्यांच्याही बदलतात. आपण काही गमावत आहो असं वाटणं यात सगळं काही आलं.

लई भारी 01/05/2018 - 13:50
आणि खूप भिडलं! तुमचा अलीकडचा लेख बघून हा शोधून काढला :) अजून लिहा. पुलेशु!

सोत्रि 02/05/2018 - 11:39
मी कधी त्याच्याकडे तर कधी त्याच्या आईकडे आळीपाळीने पहात राहीले काही क्षण आणि अचानक मला त्या माय-लेकारांची खुप किव वाटायला लागली. लग्नामुळे 'एम फील' मधेच सोडून नवऱ्याच्या मागे गेली पाच सहा वर्ष देशोदेशी फिरणारी ती आई आणि तिचं स्मार्ट फोन लिलया हाताळणारं गोड, स्मार्ट पिल्लू यांच्या विषयी माझ्या मनात अतीव कणव दाटून आली.
इथून पुढचा भाग सुंदर लिहीलाय. पण वरचा कोट केलेला भाग आणि गतकाळातील आठवणी यांचा संबंध पटला नाही. तुमच्या वडीलांनी टिव्ही आणलाच ना? ती काळाची जशी गरज होती तशीच नविन गॅजेट्स ही आजच्या काळातली गरज आहे. कीव वगैरे काही यायला नको. तुम्ही टीव्ही बघत जो वेळ घालवला तो तुमच्या आधिच्या पीढीने नाही घालवला. पण म्हणून तुम्ही किती मोठा बालपणाचा ठेवा मीस करणार किंवा तुमच्या वडीलांनी त्यांच्या बालपणाची तुलना तुमच्या बालपणाशी केली असती तर टीव्ही आणलाच नसता. अशी तुलना करून कीव वगैरे येऊ द्यायची नसते. मनाचे विभ्रम असतात ते. - (जे सांगायचंय तेच लिहीलेला) सोकाजी

श्वेता२४ 03/05/2018 - 13:23
खूपच छान लिहीलय तुम्ही अगदी भावनावश करणारं. सोत्रि यांच्या मताशी मिही सहमत असले तरी एखादा लेख वाचताना त्याची लिखाणाची शैली उत्तम जमुन आली असेल तर मला त्यातले विचार किती पटण्यासारखे आहेत वगैरे विचार करावासा वाटत नाही. तुमचे लिखाण वाचताना प्रत्येकजण स्वताच्या बालपणीच्या काळात फेरफटका मारुन येऊन सुखावला असणार आणि हेच तुमच्या लिखाणाचे यश आहे. असेच छान लिखाण वाचायला मिळो.

बाप होण्यासाठी फारसं काही करावं लागत नाही आणि वडील होण्यासाठी काय काय करायचं हे सुधरत नाही. अशा लेखांमधून शिकायला मिळतंय. धन्यवाद! लिहीत राहा.
नातेवाईकांकडे लग्नकार्याला जायचा योग आला. नेहमीचेच वातावरण. बऱ्याच दिवसांनी भेटलेले नातेवाईक. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर ऊत्साह. खळखळून हसनं. बरचसं खरं, थोडंफार खोटंही. एकमेकांच्या चौकशा, ख्याली खुशाली वगैरे. लहाण मुलांची धावाधाव, यजमानांची तारांबळ, पाहूण्यांच्या फर्माईशी, पंगतीतले आग्रह, या सगळ्यात अगदिच विसंगत वाटनारी केटरर्सची निर्विकार वाढपी मंडळी. एकूण वातावरणात छान ऊत्साह भरला होता. मी ही जरा बाजूला दोन खुर्च्या ओढून आत्याची मुलगी सुरभीबरोबर बोलत बसले होते. बोलत म्हणजे हातात सरबताचा ग्लास खेळवत श्रवण भक्ती करीत होते नेहमी प्रमाणे. मला हे अगदी ऊत्तम जमतं. आवडतही.

राजाची नियत

शिव कन्या ·

गामा पैलवान 02/12/2017 - 22:37
शिव कन्या, तुमची कथा फार आवडली. पुढे राजाने काय केलं असेल त्यावर कथा वाढवेन म्हणतो. राजा चपापला. आपल्या मनात असे लुबाडणुकीचे विचार आलेच कसे असा त्याला प्रश्न पडला. एव्हढे नेकदिल होतो आपण आणि मध्येच अवदसा कुठून आठवली आपल्याला? मग शेवटी त्याने प्रधानाच्या कानावर ही हकीकत घातली. दुसऱ्या दिवशी या समस्येची उकल झाली पाहिजे असं बजावलं. प्रधान घरी आला. त्याने आपली दाढी खाजवली. काही सुचेना. मग डोळे मिटून काही घटका विचार केला. तरीपण समस्येचा थांग लागेना. मग तुंदिलतनु पोटावरून (स्वत:च्याच) हात फिरवला. आस्ते आस्ते हात फिरवतांना अचानक त्याची ट्यूब पेटली. दुसऱ्या दिवशी त्याने राजाची भेट घेतली. म्हणाला की मला तुमच्या मनातले चोरीचे विचार कुठून उत्पन्न झाले त्याचा छडा मला लागला आहे. राजा आनंदला. प्रधान म्हणाला की त्याचं काय आहे राजेसाहेब, आपल्या राज्यात पप्पूपक्ष नामे एक राजकीय पक्ष आहे. त्यात भ्रष्ट लोकांची खोगीरभरती झालेली आहे. ही लोकं सदैव खाण्यात मग्न असतात. जेव्हा खात नसतात तेव्हा कसं खाता येईल याच्या विचारांत गढलेले असतात. प्रस्तुत काळी त्यांना खायला मिळंत नसल्याने त्यांचा बहुतांश वेळ खाण्याच्या गोष्टींची दिवास्वप्ने बघण्यात जातो आहे. त्यामुळे सृष्टी खाद्यविचारांनी संपृक्त झालीये. असाच एक दूषित खाद्यविचार तुमच्या मनांत घर करून राहिला. तोही इतक्या बेमालूमपणे की तुम्हांस त्याची जाणीवही झाली नाही. एकंदरीत पप्पूपक्षाचे लोकं मोठ्या हुशारीने खातात बरंका. यावर राजाने पप्पूपक्षमुक्त राज्य बनवायची प्रतिज्ञा केली व प्रधानाला त्यासाठी योजना आखण्याचे आदेश दिले. आ.न., -गा.पै.

पगला गजोधर 09/12/2017 - 16:02
शेवटी तात्पर्य काय, "राजाने राजधर्म पाळण्यात कसूर करू नये..." मी नै म्हणत, राजघराण्यातील साध्याला वानप्रस्थाश्रमातील एक जुने मुनी म्हणत होते....

गामा पैलवान 02/12/2017 - 22:37
शिव कन्या, तुमची कथा फार आवडली. पुढे राजाने काय केलं असेल त्यावर कथा वाढवेन म्हणतो. राजा चपापला. आपल्या मनात असे लुबाडणुकीचे विचार आलेच कसे असा त्याला प्रश्न पडला. एव्हढे नेकदिल होतो आपण आणि मध्येच अवदसा कुठून आठवली आपल्याला? मग शेवटी त्याने प्रधानाच्या कानावर ही हकीकत घातली. दुसऱ्या दिवशी या समस्येची उकल झाली पाहिजे असं बजावलं. प्रधान घरी आला. त्याने आपली दाढी खाजवली. काही सुचेना. मग डोळे मिटून काही घटका विचार केला. तरीपण समस्येचा थांग लागेना. मग तुंदिलतनु पोटावरून (स्वत:च्याच) हात फिरवला. आस्ते आस्ते हात फिरवतांना अचानक त्याची ट्यूब पेटली. दुसऱ्या दिवशी त्याने राजाची भेट घेतली. म्हणाला की मला तुमच्या मनातले चोरीचे विचार कुठून उत्पन्न झाले त्याचा छडा मला लागला आहे. राजा आनंदला. प्रधान म्हणाला की त्याचं काय आहे राजेसाहेब, आपल्या राज्यात पप्पूपक्ष नामे एक राजकीय पक्ष आहे. त्यात भ्रष्ट लोकांची खोगीरभरती झालेली आहे. ही लोकं सदैव खाण्यात मग्न असतात. जेव्हा खात नसतात तेव्हा कसं खाता येईल याच्या विचारांत गढलेले असतात. प्रस्तुत काळी त्यांना खायला मिळंत नसल्याने त्यांचा बहुतांश वेळ खाण्याच्या गोष्टींची दिवास्वप्ने बघण्यात जातो आहे. त्यामुळे सृष्टी खाद्यविचारांनी संपृक्त झालीये. असाच एक दूषित खाद्यविचार तुमच्या मनांत घर करून राहिला. तोही इतक्या बेमालूमपणे की तुम्हांस त्याची जाणीवही झाली नाही. एकंदरीत पप्पूपक्षाचे लोकं मोठ्या हुशारीने खातात बरंका. यावर राजाने पप्पूपक्षमुक्त राज्य बनवायची प्रतिज्ञा केली व प्रधानाला त्यासाठी योजना आखण्याचे आदेश दिले. आ.न., -गा.पै.

पगला गजोधर 09/12/2017 - 16:02
शेवटी तात्पर्य काय, "राजाने राजधर्म पाळण्यात कसूर करू नये..." मी नै म्हणत, राजघराण्यातील साध्याला वानप्रस्थाश्रमातील एक जुने मुनी म्हणत होते....
राजाची नियत आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई. एकदा फिरता फिरता एका गावात पोहचला. तहान लागली होती. दूर एक लहानसे घर दिसले. घरा भोवती ऊसाचा मोठा मळा होता. तिथे गेला. एक म्हातारी सामोरी आली. त्याने प्यायला पाणी मागितले. ती शेतात गेली. एक उस तोडला. उभ्या कांडक्यावर आडवा कोयता मारला. एक मोठा ग्लास भर रस निघाला. राजा बघतच राहिला! उसावर कोयता मारायचा अवकाश कि लगेच एवढा रस! रस पिऊन राजा तृप्त झाला. त्याने विचारले, ‘माई, हा काय जादूचा ऊस आहे का? इतका रस?

राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.

शिव कन्या ·

In reply to by माहितगार

शिव कन्या 02/12/2017 - 07:44
तामिळनाडूत काही घडत असेल तर मला नाही माहित. त्याचा काही संबंध नाही. पण विंट्रेस दाखवलात, धन्यवाद.

रानरेडा 22/11/2017 - 00:22
देव आपल्या कृपेचा राणी जतन करा आमच्या प्रख्यात राणी देवा, राणीचे रक्षण कर विजयी तिला पाठवा आनंदी आणि तेजस्वी आपल्यावर राज्य करण्यासाठी दीर्घकाळ देवा, राणीचे रक्षण कर परमेश्वरा, आमच्या देवा, तिच्या शत्रूंना सोडचिठ्ठी द्या आणि त्यांना फॉल करा त्यांच्या राजकारणाचा भंग करा त्यांच्या विनोदी युक्त्या हरवून टाक आमच्या निराशा आम्ही आपली खात्री आहे देव आम्हाला सर्व वाचवतो स्टोअरमध्ये तुमची सर्वोत्तम भेटवस्तू तिच्या ओतणे खूश वर दीर्घकाळ ती राज करू शकते ती आमच्या नियमांचे रक्षण करू शकते आणि कधीही आम्हाला कारण द्या हृदय आणि आवाज गाण्यासाठी देवा, राणीचे रक्षण कर या देशात केवळ नाही परंतु, देवाने त्याची कृपा कळविली किनारापासून किनाऱ्यापर्यंत प्रभु, राष्ट्रे पाहा त्या माणसांकडे बंधू असले पाहिजे आणि एक कुटुंब तयार करा एकही रन नाही प्रत्येक गुप्त शत्रु पासून मारेकर्यांकडून फुंकणे देवा, राणीचे रक्षण कर आपले हात बळकावणे ब्रिटनच्या फायद्यासाठी आमच्या आई, राजकुमार आणि मित्र देवा, राणीचे रक्षण कर भगवान मार्शल वेड मंजूर आपल्या पराक्रमी मदत करून मे करू शकता विजय आणणे तो शांत बसू शकते आणि जोराचा प्रवाह सारखा बंडखोर स्कॉट्स चिरडणे देव राजा जतन

मला वाटतं गरीब असो वा श्रीमंत .. लहानपणी दु:ख, संकटे आणि वेदनांपासून कितीही दूर राहिलं तरी मोठेपणी या गोष्टी आपल्या जीवनात हळूहळू प्रवेश करतातच असा काहीसा या कथेचा अर्थ असावा.

In reply to by माहितगार

शिव कन्या 02/12/2017 - 07:44
तामिळनाडूत काही घडत असेल तर मला नाही माहित. त्याचा काही संबंध नाही. पण विंट्रेस दाखवलात, धन्यवाद.

रानरेडा 22/11/2017 - 00:22
देव आपल्या कृपेचा राणी जतन करा आमच्या प्रख्यात राणी देवा, राणीचे रक्षण कर विजयी तिला पाठवा आनंदी आणि तेजस्वी आपल्यावर राज्य करण्यासाठी दीर्घकाळ देवा, राणीचे रक्षण कर परमेश्वरा, आमच्या देवा, तिच्या शत्रूंना सोडचिठ्ठी द्या आणि त्यांना फॉल करा त्यांच्या राजकारणाचा भंग करा त्यांच्या विनोदी युक्त्या हरवून टाक आमच्या निराशा आम्ही आपली खात्री आहे देव आम्हाला सर्व वाचवतो स्टोअरमध्ये तुमची सर्वोत्तम भेटवस्तू तिच्या ओतणे खूश वर दीर्घकाळ ती राज करू शकते ती आमच्या नियमांचे रक्षण करू शकते आणि कधीही आम्हाला कारण द्या हृदय आणि आवाज गाण्यासाठी देवा, राणीचे रक्षण कर या देशात केवळ नाही परंतु, देवाने त्याची कृपा कळविली किनारापासून किनाऱ्यापर्यंत प्रभु, राष्ट्रे पाहा त्या माणसांकडे बंधू असले पाहिजे आणि एक कुटुंब तयार करा एकही रन नाही प्रत्येक गुप्त शत्रु पासून मारेकर्यांकडून फुंकणे देवा, राणीचे रक्षण कर आपले हात बळकावणे ब्रिटनच्या फायद्यासाठी आमच्या आई, राजकुमार आणि मित्र देवा, राणीचे रक्षण कर भगवान मार्शल वेड मंजूर आपल्या पराक्रमी मदत करून मे करू शकता विजय आणणे तो शांत बसू शकते आणि जोराचा प्रवाह सारखा बंडखोर स्कॉट्स चिरडणे देव राजा जतन

मला वाटतं गरीब असो वा श्रीमंत .. लहानपणी दु:ख, संकटे आणि वेदनांपासून कितीही दूर राहिलं तरी मोठेपणी या गोष्टी आपल्या जीवनात हळूहळू प्रवेश करतातच असा काहीसा या कथेचा अर्थ असावा.
राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ. [ही एक रूपककथा. लावू तितके अर्थ. करू तसा विचार.] एक होती राणी एलिझाबेथ. दुसरी होती साधी एलिझाबेथ. दोघींचाही आपापल्या मामांवर भारी जीव होता. मामांचाही त्यांच्यावर. एके दिवशी घरात अचानक गर्दी दिसू लागली. गर्दीतच मामा झोपलेला दिसला. शेलाट्या अंग काठीचा मामा एकदम जाडसर दिसू लागला. त्याच्या अंगा खांद्यावर कसली कसली हारफुलं घातली जाऊ लागली. साधी एलिझाबेथ मामाजवळ जायचा हट्ट धरते. राणी एलिझाबेथ सगळे प्रोटोकॉल्स सांभाळत, मूक अश्रू गाळीत उभी राहते. जराशाने आपले कोणच ऐकत नाही म्हटल्यावर, साधी एलिझाबेथ रडून रडून हलकल्लोळ माजवते.

दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ

आदिजोशी ·

पुंबा 17/11/2017 - 15:44
ज्जे बात!! आता, अंडी चांगलीच दवणीय व्हायलीत राव... हे पण अंडं आवडलं.

तेजस आठवले 17/11/2017 - 18:26
फारच छान! पुढील वाक्ये अगदी दवणीय झाली आहेत.
शरीरासोबतच मनात साचलेलं, साठून राहिलेलंही वाहून जायला हवं
तसंच आयुष्याचंही असायला हवं. नको त्या आठवणींचा पसारा गुंडाळून, दु:खद आठवणींची जळमटं काढून, ठळक आणि आयुष्य उजळ करणार्‍या गोष्टीच लक्षात ठेवायला हव्या.
आयुष्यातील सुंदर क्षण वेचून ठिपक्यांची रांगोळी रेखाटायची, की जे आपलं नव्हतंच ते न मिळाल्याच्या काल्पनीक दु:खात हातात असलेल्या सुखक्षणांकडे दुर्लक्ष करून आयुष्याच्या हसर्‍या फुलांवर शेण फिरवायचं, हे आपल्याच हातात आहे.
शेवटच्या ओळींमध्ये तर आकाशगंगेएवढ्या विचारांना जणू एका लहानश्या अंड्यात बंदिस्त करून ठेवल्यासारखं वाटतंय :)
अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं. आठवणींची अंडी मात्र उबवू नये.
पण न जाणो कधी स्वतःच्याच प्रतिभेची टाचणी लागून ते अंडे फुटले तर मग फारसा विचार न करता सरळ झणझणीत भुर्जी करणेच श्रेयस्कर. मुळात माझ्या प्रतिभेचा वारू चौखूर उधळलेला असताना माझ्या लेखनाने दगडालाही मी पाझर फोडतो तर ते अंडे ना फुटल्याशिवाय राहील का ?(उगाच नाही मला साहित्यातील रडका बुकल म्हणत! डिहायड्रेशन झालेल्या माणसाच्या शरीरात एकवेळ पाणी शिल्लक नसेल पण माझे साहित्य वाचल्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रू येणार हे मात्र नक्की!)
दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
हे वपु वाटतंय.

नाखु 17/11/2017 - 18:34
या गुलाबजाम लेखात दवणीय पाक ठायीठायी आहे

सुबोध खरे 17/11/2017 - 18:51
बाकी आजचा सुविचार भारी आहे आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते.

शित्रेउमेश 28/11/2017 - 16:11
||| अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं. आठवणींची अंडी मात्र उबवू नये. ||| बापरे खूपच भन्नाट

पद्मावति 28/11/2017 - 16:22
मस्तं लिहिताय :) मी पुर्वी कधीतरी वाचलेला हा सुवीचार--- 'घर म्हणजे एक पिझाबॉक्स असतो. त्यातले कुटुंबीय म्हणजे पिझाचे तुकडे. दिसायला वेगळे आणि त्रिकोणी असु देत पण शेवटी असतात सगळे एकाच गोल पिझ्याचा भाग' =))

पुंबा 17/11/2017 - 15:44
ज्जे बात!! आता, अंडी चांगलीच दवणीय व्हायलीत राव... हे पण अंडं आवडलं.

तेजस आठवले 17/11/2017 - 18:26
फारच छान! पुढील वाक्ये अगदी दवणीय झाली आहेत.
शरीरासोबतच मनात साचलेलं, साठून राहिलेलंही वाहून जायला हवं
तसंच आयुष्याचंही असायला हवं. नको त्या आठवणींचा पसारा गुंडाळून, दु:खद आठवणींची जळमटं काढून, ठळक आणि आयुष्य उजळ करणार्‍या गोष्टीच लक्षात ठेवायला हव्या.
आयुष्यातील सुंदर क्षण वेचून ठिपक्यांची रांगोळी रेखाटायची, की जे आपलं नव्हतंच ते न मिळाल्याच्या काल्पनीक दु:खात हातात असलेल्या सुखक्षणांकडे दुर्लक्ष करून आयुष्याच्या हसर्‍या फुलांवर शेण फिरवायचं, हे आपल्याच हातात आहे.
शेवटच्या ओळींमध्ये तर आकाशगंगेएवढ्या विचारांना जणू एका लहानश्या अंड्यात बंदिस्त करून ठेवल्यासारखं वाटतंय :)
अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं. आठवणींची अंडी मात्र उबवू नये.
पण न जाणो कधी स्वतःच्याच प्रतिभेची टाचणी लागून ते अंडे फुटले तर मग फारसा विचार न करता सरळ झणझणीत भुर्जी करणेच श्रेयस्कर. मुळात माझ्या प्रतिभेचा वारू चौखूर उधळलेला असताना माझ्या लेखनाने दगडालाही मी पाझर फोडतो तर ते अंडे ना फुटल्याशिवाय राहील का ?(उगाच नाही मला साहित्यातील रडका बुकल म्हणत! डिहायड्रेशन झालेल्या माणसाच्या शरीरात एकवेळ पाणी शिल्लक नसेल पण माझे साहित्य वाचल्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रू येणार हे मात्र नक्की!)
दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
हे वपु वाटतंय.

नाखु 17/11/2017 - 18:34
या गुलाबजाम लेखात दवणीय पाक ठायीठायी आहे

सुबोध खरे 17/11/2017 - 18:51
बाकी आजचा सुविचार भारी आहे आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते.

शित्रेउमेश 28/11/2017 - 16:11
||| अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं. आठवणींची अंडी मात्र उबवू नये. ||| बापरे खूपच भन्नाट

पद्मावति 28/11/2017 - 16:22
मस्तं लिहिताय :) मी पुर्वी कधीतरी वाचलेला हा सुवीचार--- 'घर म्हणजे एक पिझाबॉक्स असतो. त्यातले कुटुंबीय म्हणजे पिझाचे तुकडे. दिसायला वेगळे आणि त्रिकोणी असु देत पण शेवटी असतात सगळे एकाच गोल पिझ्याचा भाग' =))
आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते. अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे. रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते. प्रत्येक सकाळ ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते. रोज नवं आयुष्य. नवी बायको/नवरा, नवी नोकरी, नवे आई-बाप, नवे शेजारी, नवे मित्र, नवे कपडे... साबण मात्र जुनाच असावा. शरीरावर चढलेली पुटं घालवण्याचं पुण्यकर्म साबणच करतो.

ऐसपैस अंगण

जागु ·

In reply to by टवाळ कार्टा

..व्याख्या आहे दवणीयची ? अवांतरः सानेगुरुजीय, पुलदेय, वपुकाळीय व दवणीय लेखनशैलींचा तौलनिक वा स्वतंत्र अभ्यास कोणी कुठे केला आहे का?

जागु 07/11/2017 - 10:17
याला दवणीय म्हणावे का? एवढी पात्रता नाही हो माझी. पण धन्यवाद. हा ह्याला जागूमय्/जागूणीय म्हणू शकता :)) :)) पद्मावती धन्यवाद. प्रविण तुम्ही भाग्यवान आहात. माझ्याकडे पण अंगण आहे पण मॉडर्न. लाद्या लावलेल. त्याला त्या सारवलेल्या अंगणाची सर नाही.

पप्पु अंकल 07/11/2017 - 13:13
बेलापुरला, माझ्या घरी सुद्धा अगदी असेच सारे काही होते. आमच्या अंगणात गावातिल कित्येकांचे साखरपुडे व लग्न झाली. ते रटरट्णारे मटण, टोपलीत गाळला जाणारा भात, चुलीवर खापरिवर केलेली भाकर सारे काही आठवले. आता अंगण गेलं, घर गेल building उभी राहीली. जुन्या आठवणीने हळवा झालेला, व सध्या CIDCO GES च्या खुराड्यात रहाणारा पप्पू अंकल

अभिदेश 07/11/2017 - 22:13
खरा दवणीय लेख. खरंतर हेच ४थे अंडे म्हणून प्रकशित करायला हरकत नाही. हा. घ्या. -- :)

In reply to by टवाळ कार्टा

..व्याख्या आहे दवणीयची ? अवांतरः सानेगुरुजीय, पुलदेय, वपुकाळीय व दवणीय लेखनशैलींचा तौलनिक वा स्वतंत्र अभ्यास कोणी कुठे केला आहे का?

जागु 07/11/2017 - 10:17
याला दवणीय म्हणावे का? एवढी पात्रता नाही हो माझी. पण धन्यवाद. हा ह्याला जागूमय्/जागूणीय म्हणू शकता :)) :)) पद्मावती धन्यवाद. प्रविण तुम्ही भाग्यवान आहात. माझ्याकडे पण अंगण आहे पण मॉडर्न. लाद्या लावलेल. त्याला त्या सारवलेल्या अंगणाची सर नाही.

पप्पु अंकल 07/11/2017 - 13:13
बेलापुरला, माझ्या घरी सुद्धा अगदी असेच सारे काही होते. आमच्या अंगणात गावातिल कित्येकांचे साखरपुडे व लग्न झाली. ते रटरट्णारे मटण, टोपलीत गाळला जाणारा भात, चुलीवर खापरिवर केलेली भाकर सारे काही आठवले. आता अंगण गेलं, घर गेल building उभी राहीली. जुन्या आठवणीने हळवा झालेला, व सध्या CIDCO GES च्या खुराड्यात रहाणारा पप्पू अंकल

अभिदेश 07/11/2017 - 22:13
खरा दवणीय लेख. खरंतर हेच ४थे अंडे म्हणून प्रकशित करायला हरकत नाही. हा. घ्या. -- :)
अंगण म्हणजे घराचंच एक अंग जे घराबाहेर असूनही घराइतकंच जिव्हाळ्याचं असत. ऊन, पाऊस, दव झेलत आकाशाच्या प्रेमात पडलेलं असत. प्राजक्ताच्या सड्याच्या सुगंधी रांगोळीने ते बहरलेलं असत, रातराणीच्या सुगंधाने दरवळलेलं असत, गार गार वार्‍याच्या झुळूकेने शहारलेलं असत, कधी चंद्रदीपात तेवत असत तर कधी चांदण्यांचं शीतल पांघरूण घेऊन शांत पहुडलेलं असत. हल्ली वाढत चाललेल्या बिल्डिंगमुळे अंगणं लोप पावत चालली आहेत व आधुनिक घर/बंगल्यांच्या रचनेतील अंगणांचे स्वरूप बदलले आहे. आमच्या उरणमध्ये अजून काही पारंपरिक तर काही बदलत्या स्वरूपातली अंगण संस्कृती कुठे कुठे जपली आहे ह्याच समाधान वाटत.