३५ रियाल
वेंकटने तीन हजार रियाल खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनवर पाहिले. सिगरेट क्रश केली. उठला. पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला, असं उद्या बॉसला दमात घेऊन सांगायचं, असा विचार करून तो पार्किंगकडे वळला.
वेंकटने तीन हजार रियाल खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनवर पाहिले. सिगरेट क्रश केली. उठला. पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला, असं उद्या बॉसला दमात घेऊन सांगायचं, असा विचार करून तो पार्किंगकडे वळला.
या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग
या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371
त्यांचं प्रेम दुधासारखे सफेद होते
मस्त पैकी उतू जात होते
आनंदाची साय जाऊन जाऊन
भांडण एवढे वाढते
कि त्याचे घट्ट दही होते
विचारांची पकड सैल होतं जाते
रंगवलेलं काय वेगळंच पण घडत मात्र दुसरंच असते
आता प्रेम, प्रेम नसते , तर त्याच ताक झालेलं असते
हेवेदावे मांडले जातात ,
वादावर वाद घातले जातात
भावना घुसळून घुसळून वर येतात
" शिल्लक राहिलेल्या आठवणी "
प्रेम आता प्रेम नसतं, तर बनतं त्याचं लोणी
असंच काही काळ साठवलं जातं
"मी कशाला जाऊ ? ती येईल हवंतर "
नमस्कार वाचक मंडळी ...
आज मराठी भाषेच्या दिनानिमित्ताने सर्व वाचक बंधू आणि भगिनींना , प्रियजनांना , गुरुजनांना आणि साहित्य संपादक मंडळातील आजी आणि माजी सभासदांना लाख लाख शुभेच्छा ....
सर्व प्रथम आभार त्यांचे मानतो ,, ज्यांनी हे ज्वलंत व्यासपीठ निर्माण केले .. मनापासून आभार ...
प्रिय मायमराठी,
तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी.
तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात.
माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही
मस्त आलिशान घर होतं
दिमतीला गाडी न नोकर होते
अन मी सारखी तुझ्यामागं पळत होते ॥
लग्नही असंच पळून केलं
पण तुझं घर बघताच, मन पार गळून गेलं
जणू सुरु झालं नाही तोवरच संपलं
एवढयाश्या घरातच सारं सुरु झालं
जिथे चूल होती तिथेच मोरी होती
आपल्याच घरात मुतायची चोरी होती
चहा झाला कि हात लांब करून दिला
जमीन जशी पावला पावलांसाठी भिकारी होती ॥
जोरात बोललं तर शेजारून यायचं उत्तर
भांडं पडलं तरी शेजारी जमायचे सत्तर
घर पार भरून जायचं
भारतातील आरक्षणावर खासगीत आणि आंतरजालावर बरीच चर्चा केली जाते , परंतु बर्याचदा चुकीच्या माहितीच्या आधारावर ह्या चर्चा चालतात म्हणूनच आरक्षणाविरोधातील काही चुकीच्या युक्तिवादांना उत्तर देण्यासाठी केलेला हा प्रयत्न.
१) आजकाल कुणीही जातपात पाळत नाही.
परंतु खालील सर्व्हे बघता अजूनही भारतात जातीव्यवस्था अस्तित्वात असल्याचे आढळते . शहरांमध्ये सुदधा .
तू
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
हळूहळू लिहित जातोस,
तेव्हा
मी तुझे
राजस हात
लोभस डोळे
पहात राहते.
तुझ्यात इतका जीव का गुंतावा?
तू माझ्या हातांचे
देवनागरी चुंबन
घेऊन म्हणावे,
मातृभाषा कि काय
तिच्यातच जीव अडकतो बघ,
आई गंssss म्हटल्याशिवाय
प्राणसुद्धा जात नाही....
शाईचे बोट धरुन
तू परत रात्रीच्या
शांतप्रहरी
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
तुझेमाझे हितगुज
हळूहळू लिहित राहतोस...
हा चंद्र ना स्वयंभू,रवितेज वाहतो हा |ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा ||
जे न पाहे रवी ते पाहे कवी असे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. इथे कवी ने नुसती कविकल्पनाच केली नाहीये तर, या कविकल्पनेतुन एक खगोलीय सिध्दांत देखील व्यवस्थित मांडला आहे.