Whatsapp Romantic Shayari
Whatsapp Romantic Shayari
खामोश दिल हमारा
सब कुछ सह लेता है….
तेरी याद मे शायद
ये दिल युही रोये जाता है…
Whatsapp Romantic Shayari
खामोश दिल हमारा
सब कुछ सह लेता है….
तेरी याद मे शायद
ये दिल युही रोये जाता है…
ते विस्मृत गाणे
धूसर होऊन
विरून जाते
पण नेणीवेच्या
अथांग डोही
अवचित दिसते
मग पुन्हा गीत ते
शब्दांच्याही
पल्याड नेते
अन् नकळत अश्रु
झरताना
ओठांवर येते
मग पुन्हा पुन्हा मी
घाव सोसुनी
लढत राहतो
अन् कितीही हरलो
तरी खळाळून
प्रसन्न हसतो
शब्दांनी केला शब्दांवर घाव
विसरलो शब्द राहिला नाही ठाव
माणसांनी केला शब्दांचाच खेळ
आता कसा घालू शब्दांना मेळ
अवधानांनेे झाला शब्दांवरच वार
कशी लावू आता शब्दांना धार
अविश्वासाने केला शब्दांचाच घात
शब्दांनी करायची अविश्वासा वर मात
शब्दांनी केला नात्यातच बुद्धिभेद
एकत्र येऊन सारू नात्यातील मनभेद
बाटाट्याचे उपयोग
स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा
अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता ||
माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा ||
"
खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे
तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे
नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच
तोटा ||
कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव
चढ्या दराने गंजले सारे रंकराव
आता मला आला आहे मान मोठा ||
ती सर ओघळता सोबतीस मी झरतो
तो मेघ झुरावा तैसा मीही झुरतो
आपुलेच काही तुटुन ओघळून जावे
खेदात तशा मी कणा कणाने विरतो...
ती सर ओघळता विझती स्वप्नदिवेही
अन दिवसासंगे विझून जातो मीही
अन लख्ख काजळी गगनी दाटून येता
मी आशेचे कण शोधित भिरभिर फिरतो
ती ओघळता मी सुना एकटा पक्षी
पंखांच्या जागी असाह्यतेची नक्षी
शेवटास मीही काव्यपंख लेवून
आठवांभोवती तिच्या नित्य भिरभिरतो
ती सर ओघळता उरे न काही बाकी
सहवास सरे अन अंती मी एकाकी
ती सरीसारखी चंचल आर्त प्रवाही
तिज धरू पाहता मीच दिवाणा ठरतो
©अदिती जोशी
झेलल्या जरी कितीही
शत्रूने दिलेल्या जखमा
भारतमातेचे रक्षण करण्या
मी पुन्हा येईल..
बळीराजा आज ठरला
अन्यायाचा जरी बळी
शेते हिरवीगार करण्या
मी पुन्हा येईल..
सत्य लिहावे लेखणीतून
लेखणी पडली मोडून
सत्याचा आग्रह धरण्यास
मी पुन्हा येईल..
केली जरी लक्तरे
माझ्या शरीराची त्यांनी
चंडीचं रूप घेऊनी
मी पुन्हा येईल..
जातीधर्माच्या आंधळ्या लढाईत
मोडून पडलो मी
एकसंध समाज बनविण्या
मी पुन्हा येईल..
अथांग, उत्कट, उधाणले तरि
किनार ओढुन जसा समिंदर..
स्थितप्रज्ञ कधि सळसळणारे
जळाकाठचे वा औदुंबर..
प्रेमळ, नाजुक, पोक्त, समंजस
प्राजक्तासम हळवे लोभस..
काजळ रेखुन कधि भिडणारे
खट्याळ हट्टी अवखळ ओजस..
कितीहि काही आत उकळले
संतापाला घट्ट आवरे.
शालिन कधि तर भळभळणारे
मिटल्या ओठी दु:ख गोजिरे..
.......
असे देखणे, असे बोलके
मौनाइतके कुणीच नाही.... कुणीच नाही.
आठवणींना उजाळा
भावनांचा उमाळा
शब्दात जिव्हाळा
दोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची…
मित्रांची सतत मस्ती
कधी मस्तीची सक्ती
सख्याची जीवापाड दोस्ती
कधी दोस्तीत कुस्ती…. भेट मित्रांची…
मित्र कमी बोलणारा
परी डोळ्यात जपणारा
दोस्त शब्दात खेळणारा
पण शब्दासाठी धावणारा…. भेट मित्रांची…
ज्या प्रश्नांना उत्तर नसते, वा ज्यांचे ना उत्तर सुचते,
चौरस घेउन कागद काही, लिहून घ्यावे सुबक नेटके.
करून होडी त्या सा-यांची, पाण्यावरती सोडुन द्यावी.
काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी..
कुणी खोडकर खट्याळ मुलगा त्या होडीला उचलुन घेइल.
हसेल क्षणभर.. पान जाळिचे शीड म्हणूनी वरती ठेविल.
फुंकर घालुन हलके हलके पाण्यामध्ये लोटुन देइल ..
त्या पानाचा भार केवढा?? इवली होडी कशास साहिल?
डुबकी मारील एखादी वा लटपट लटपट पुढेहि जाइल..
नवीन पाणी नवा किनारा, दूरदूर वा-याने न्यावी ..
काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी..
जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो
रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो
ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो
नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो
आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो
सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो
सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी
बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी
दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शिवकन्या