पुणे कट्टा वृत्तांत - २० मार्च २०१६ पाताळेश्वर मंदीर, पुणे
एक मस्त स्नेहसंमेलन झाले आज पुणॆ कट्ट्याच्या निमित्ताने .
एक मस्त स्नेहसंमेलन झाले आज पुणॆ कट्ट्याच्या निमित्ताने .
मिपावरील मित्र आणि मैत्रिणींनो,
इंटरनेटमुळे आजकाल कुठल्याही गोष्टीबद्दलची माहिती अगदी सहजपणे उपलब्ध झाली आहे. पण ही माहिती विखुरलेली असते आणि मुख्य म्हणजे ही माहिती इंग्रजीमध्ये असते. अशी माहिती संकलित करून ती मराठीमध्ये मिळाली तर वाचायचा आनंद काही औरच.
भारताबाहेरील काही ऐतिहासिक हिंदू मंदिरांविषयी माहिती संकलित करून (अर्थातच इंटरनेटवर) एक लेखांची मालिका लिहावी असा विचार मनात आला आणि मिपावरील एका मित्राच्या प्रोत्साहनाने थोडे फार लिखाण पूर्ण केले आहे.
याच मालिकेतील पहिला लेख आपल्यापुढे मांडत आहे.
मान्य आहे रे लोकानो की दिसतो तुम्हाला माझा पाच आकड़ी पगार
त्या पैशामुळेच वाढनारे वैभव नि हात जोडून उभी असलेली भौतिक सुखेही खुपतातच तुम्हाला
पण एकदा फक्त एकदाच त्यापलीकडे बघाल का हो तुम्ही
एक तारखेचा पगार फक्त ऑफिसची कामे हातावेगळी करून् नाही येत हो
त्याच बरोबर आम्ही हातावेगळे करून येतो आमचे लेकरु
कधी सोडून येतो त्याची ट्रिप तर कधी parents meeting
अगदी aanual dayच्या दिवशीही अगदी आपल्या डान्सला तरी आपली आई नक्की येईल ही आशा नि अगदी डान्स चालू असतानाही भर गर्दीत खुप parents मधे आपलिहि आई असेल नक्की ही लेकराचि आशा ही निराशेत बदलून टाकतो आम्ही
नमस्कार मंडळी
मी मिपाची नवीन सदस्य नि बऱ्यापैकी जुनी वाचक आहे.खरे म्हणजे माझी लेखनात फार गती नाही पण वाचन मात्र मला भरपुर, खुप ,अतिशय आवडते.पण बरेच दिवस मी वाचनापासून बरीच लांब गेले होते .मला पुन्हा खुप छान छान वाचनीय धागे दिल्याबद्दल मिपाकरांचे आभार
जसजसे जगणे सुखासिन होत आहे
दु:ख अधिकाधीक नमकिन होत आहे
सोसले मी जे,मला ना खंत त्याची
पण पहा दुनिया उदासिन होत आहे
केवढी शहरात आता शिस्त आहे
बोलणे अपराध संगिन होत आहे
घेतला आश्रय जिथे कोठे मिळाला
देवही आता पराधिन होत आहे
तू किती सांभाळ आता तावदाने
ते पहा वादळ दिशाहिन होत आहे
पांढरे काळे प्रतीदिन होत आहे
अन तुझे भवितव्य रंगिन होत आहे
डॉ.सुनील अहिरराव
।। जय शिवराय ।।
मित्र मैत्रिणीनो
येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती.
कट्ट्यावर:
१. सर्वांचा संक्षिप्त परिचय
२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा
३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ
४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा
५. अनौपचारिक गप्पा
६. बालगंधर्व कलादालनास भेट
"ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे; उत्पादक, व्यापारी, सेवांचे पुरवठादार इ. वर्गांचा तो पोशिंदा आहे, त्याच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती मिळते इ. वाक्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचतांना मन सुखावते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाला कशी वागणूक दिली जाते याचे दर्शन याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांवरून घडते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती स्थान आणि त्याचे मूलभूत हक्क यांचा प्रथम उच्चार केला तो अमेरिकेचे प्रे. जॉन एफ. केनेडी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून तेथील प्रतीनिधीगृहात १५ मार्च १९६२ रोजी केलेल्या पहिल्या भाषणात! आपण सर्वजण ग्राहक आहोत.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा -----

.