मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुस्तक परिचय - The Great Game

मित्रहो ·

Marathi_Mulgi 20/06/2020 - 13:22
या पुस्तकाविषयी थोडेफार ऐकून होते. फारच उत्कंठावर्धक आहे हे सारं. पुढची भाग लवकर टाका.

शशिकांत ओक 21/06/2020 - 00:28
अफगाणी बंडखोरांनी बर्नेसची हत्या केली. ब्रिटिशांच्या छावनीला वेढा घातला. युद्ध झाले परंतु संख्येने अफगाण ब्रिटिश सैन्यापेक्षा जास्त होते. ब्रिटिश माघारी परतायला लागले. हेच ते इतिहासातील काळे पान. जवळ जवळ साडेचार हजार ब्रिटिश ज्यात सैनिक, नोकर, मुल, बायका सामील होते काबूलवरुन जलालाबादकडे निघाले. जलालाबादला ब्रिटिशांची छावणी होती. या साडेचार हजारापैकी फक्त एक व्यक्ती डॉ. विल्यम बेफोर्ड जलालाबादला पोहचू शकली. बाकी सारे प्रवासात मारल्या गेले.
त्यांचे एक चित्र सर्जन कमांडर कोट्स यांच्या धाग्यावर सादर केले होते.

एस 21/06/2020 - 11:16
हे पुस्तक जबरदस्त आहेच. परिचयदेखील आवडला. सवांतर - या विषयावर श्री. जयंत कुलकर्णी यांनी एक लेखमाला लिहावयास सुरुवात केली होती. पण पहिल्या भागानंतर काही लिहिलेले दिसत नाही. कुणाकडे लिंक असल्यास कृपया डकविणे.

मित्रहो 21/06/2020 - 16:03
धन्यवाद Marathi_Mulgi, कुमार१, शशिकांत ओक, एस (खूप दिवसानंतर). ओक सर मला हे चित्र विकिपिडीयावर सापडले. the great game

Marathi_Mulgi 20/06/2020 - 13:22
या पुस्तकाविषयी थोडेफार ऐकून होते. फारच उत्कंठावर्धक आहे हे सारं. पुढची भाग लवकर टाका.

शशिकांत ओक 21/06/2020 - 00:28
अफगाणी बंडखोरांनी बर्नेसची हत्या केली. ब्रिटिशांच्या छावनीला वेढा घातला. युद्ध झाले परंतु संख्येने अफगाण ब्रिटिश सैन्यापेक्षा जास्त होते. ब्रिटिश माघारी परतायला लागले. हेच ते इतिहासातील काळे पान. जवळ जवळ साडेचार हजार ब्रिटिश ज्यात सैनिक, नोकर, मुल, बायका सामील होते काबूलवरुन जलालाबादकडे निघाले. जलालाबादला ब्रिटिशांची छावणी होती. या साडेचार हजारापैकी फक्त एक व्यक्ती डॉ. विल्यम बेफोर्ड जलालाबादला पोहचू शकली. बाकी सारे प्रवासात मारल्या गेले.
त्यांचे एक चित्र सर्जन कमांडर कोट्स यांच्या धाग्यावर सादर केले होते.

एस 21/06/2020 - 11:16
हे पुस्तक जबरदस्त आहेच. परिचयदेखील आवडला. सवांतर - या विषयावर श्री. जयंत कुलकर्णी यांनी एक लेखमाला लिहावयास सुरुवात केली होती. पण पहिल्या भागानंतर काही लिहिलेले दिसत नाही. कुणाकडे लिंक असल्यास कृपया डकविणे.

मित्रहो 21/06/2020 - 16:03
धन्यवाद Marathi_Mulgi, कुमार१, शशिकांत ओक, एस (खूप दिवसानंतर). ओक सर मला हे चित्र विकिपिडीयावर सापडले. the great game
लेखनविषय:
लेखनप्रकार
(पुस्तकाचा परियच करुन देताना प्रत्यक्षात ग्रेट गेम म्हणजे नक्की काय होते तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास आहे म्हणूनच दोन भागात हा पुस्तक परिचय देत आहे.) पुस्तक : The Great Game लेखक : Peter Hopkirk ग्रेट गेम म्हणजे काय? ग्रेट गेम हा शब्द जरी रुडयार्ड किपलींग या इंग्रजी लेखकाच्या किम या पुस्तकामुळे लोकप्रिय झाला असला तरी त्याआधी सुद्धा हा शब्द वापरण्यात आला होता. एकोणवीसाव्या शतकात ग्रेट ब्रिटन आणि रशिया यांच्यात मध्य आशियावर वर्चस्व ठेवण्यासाठी जो संघर्ष झाला त्यालाच ग्रेट गेम असे नाव दिले गेले.

अंतर

aanandinee ·

aanandinee 18/06/2020 - 13:34
ही प्रेमकविता नाही. माझ्या इथल्या एका मैत्रिणीची आई काल रात्री अचानक गेली. आई भारतात, मुंबईत होती. तिथे तिच्या वडलांचं वय जवळ जवळ ऐशी. इथे हिच्या नवर्याला diabetes आणि blood pressure, दहा वर्षांच्या हिच्या मुलीची immunity extremely low! तिने आईला शेवटचं बघायला जावं की या साऱ्यांच्या काळजीने प्रवासाची risk न घ्यावी. मी रात्री तिच्या घरी गेले होते. ती रडत होती, मी तिला समजावलं की वडलांना आधार म्हणून भाऊ आहे ना तिथे, तू आत्ता न गेलेलं बरं म्हणून. आणि घरी येऊन मी स्वतःच रडत होते. त्यातलं किती रडणं तिच्यासाठी होतं आणि किती माझ्या स्वतःसाठीच काय माहीत!

चित्रगुप्त 19/11/2021 - 10:31
कविता आणि त्याबद्दलचे स्पष्टीकरण दोन्ही निशब्द करून गेले. कोरोना काळात अश्या असंख्य घटना घडत असतील. कठीण आहे हे सगळे.

aanandinee 18/06/2020 - 13:34
ही प्रेमकविता नाही. माझ्या इथल्या एका मैत्रिणीची आई काल रात्री अचानक गेली. आई भारतात, मुंबईत होती. तिथे तिच्या वडलांचं वय जवळ जवळ ऐशी. इथे हिच्या नवर्याला diabetes आणि blood pressure, दहा वर्षांच्या हिच्या मुलीची immunity extremely low! तिने आईला शेवटचं बघायला जावं की या साऱ्यांच्या काळजीने प्रवासाची risk न घ्यावी. मी रात्री तिच्या घरी गेले होते. ती रडत होती, मी तिला समजावलं की वडलांना आधार म्हणून भाऊ आहे ना तिथे, तू आत्ता न गेलेलं बरं म्हणून. आणि घरी येऊन मी स्वतःच रडत होते. त्यातलं किती रडणं तिच्यासाठी होतं आणि किती माझ्या स्वतःसाठीच काय माहीत!

चित्रगुप्त 19/11/2021 - 10:31
कविता आणि त्याबद्दलचे स्पष्टीकरण दोन्ही निशब्द करून गेले. कोरोना काळात अश्या असंख्य घटना घडत असतील. कठीण आहे हे सगळे.
लेखनविषय:
काव्यरस
तुझं माझं हे दूर असणं जसे नकाशावरचे दोन ठिपके. आठवण करून द्यायला जणू, की कितीही म्हटलं तरी झालोय परके. तुझ्या माझ्या ठिपक्यांना, जोडणारी ती रेषा नकाशात ती दोघांमधलं अंतर दाखवते. पण सरळसोट नाहीच ती, नात्यांसारखी तीसुद्धा नागमोडी वळते. मला त्यात नात्याची एक उसवलेली वीण दिसते... डॉ. माधुरी ठाकूर

माणूसपणाच्या आसपास!

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे आपल्याला झाडांत देव पाहता येतो. म्हणजे झाडांची पूजा करायची नाही तर झाडं लावायची. झाडांचं संगोपन करायचं. निसर्गात देव पाहता येतो. म्हणजे निसर्गचक्रात मानवी ढवळाढवळ करायची नाही. माणसात देव पाहता येतो. म्हणजे माणसाला माणसासारखं वागवायचं. एखाद्या माणसाच्या चरित्रातही देव पाहता येतो. ऐतिहासिक पुरूषात देव दिसू शकतो. संतांच्या कृतीत देव असतो. देवाच्या मुर्तीतच फक्‍त देव असतो असं नाही. मंदिरातच फक्‍त देव असतो असं नाही. देव्हार्‍यातच फक्‍त देव असतो असं नाही. पूजा केल्यानेच फक्‍त देव प्रसन्न होतो असंही नाही. म्हणून नवनवीन देवस्थाने निर्माण होऊ नयेत.

तुकोबांचे निवडक अभंग

प्रसाद गोडबोले ·

तुकोबाच्या गाथेच्या वह्या जरी नदीत बुडवल्या गेल्या असल्या तरी गाथा लोकांच्या मनामनात राहून तरली गेली असावी. काही पटकन आठवलेले अभंग... (गुगल बाबाच्या कृपेमुळे काही शब्द माहित असले तरी सगळा अभंग मिळवणे सोपे जाते...) तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध तैसेचि खळ ।। कां रे सिणलासी वाउगा । न भजता पांडुरंगा ।। मानदंभासाठी । केली अक्षराची आटी ।। तर करुनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ।। वाटिले ते धन । केली अहंता जतन ।। तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।। अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥ अर्थ इतकाचि साधिला । वेद अनंत बोलिला॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावे ॥ सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतुकाची निर्धार ॥ अठरा पुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥ मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ।पुनरपी संसारा येणे नाही ॥ मन हे शेवंती देऊ भगवंती । पुनरपी संसृती येणे नाही ॥ मन हे तुळशी देऊ हृषिकेशि । पुनरपी जन्मा येणे नाही ॥ तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥ सोनियाचे ताट क्षीरीने भरिलें । भक्षावया दिले श्वानालागी ।। मुक्ताफळहार खरासी घातला । कस्तुरी सुकराला चोचविली ।। वेदपारायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खूण काय जाणे ।। तुका म्हणे ज्याचे तोचि एक जाणे । भक्तीचे महिमान साधु जाणे || अजूनही आहेत ते पण जरा शोधुन लिहितो.. पैजारबुवा

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 15/06/2020 - 11:45
मला तरी सद्या एवढंच आठवतंय. जाला प्रेतरूप भाव | लक्षियेला ठाव स्मशानींचा || रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया | म्हणती हाय हाय यमधर्म || वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा | ज्ञानाग्नि लागला ब्रह्मत्वेसी || फिरविला घट फोडिला चरणी | महावाक्यध्वनी बोंब झाली || दिली तिलाजुळी कुळनामरूपासी | शरीर ज्याचें त्यासी समर्पीले || तुका म्हणे रक्षा जाली आपोआप | उजळला दीप गुरूकृपा ||

In reply to by शाम भागवत

आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥1॥ आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥ एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ॥2॥ फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥3॥ नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥4॥ तुका ह्मणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥5॥

बाकी आजकालच्या नव ईतिहासकारांनी फॅशन आणली आहे की तुकोबा विद्रोही होते असे म्हणायची ! अगदी हुशार सुषिक्षित लोकंही ह्या अपप्रचाराला बळी पडत आहेत हे पाहुन वाईट वाटते ! आपण मुळ ग्रंथावरुन स्वतःची मते केव्हा बनवायला शिकणार ? तुकोबांनी धर्मातील वाईट प्रथांवर जरुर आसूड ओढले आहेत पण मुळ वेदोक्त धर्माला कोठेही धक्का लावल्याचे दिसत नाही , उलट वेदेक्त धर्माचे समर्थनच दिसते काही काही अभंगात >>> 1340 मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥1॥ वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥ अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥2॥ तुका ह्मणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥3॥ 1467 वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अिग्न एक ॥3॥ तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥ ११८ अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥

In reply to by प्रसाद गोडबोले

शाम भागवत 15/06/2020 - 12:23
बाकी आजकालच्या नव ईतिहासकारांनी फॅशन आणली आहे की तुकोबा विद्रोही होते असे म्हणायची !
असं चालू आहे हे खरंय. पण आता तर तुकाराम महाराजांचा खून झाला असंही म्हणायला सुरवात झालीय.

In reply to by प्रसाद गोडबोले

एखाद्या विषिष्ठ जातीविरुध्द विषाची शेती करायची म्हणलावर ती कशीही करता येते , त्यात तुकोबांच्यासारख्या सज्जन माणासाला वापरले जाते हे पाहुन वाईट वाटते ! पण असो. तुकोबांनी वेद विरुध्द , धर्म उच्छेदक असे लिहिलेले मला तरी अजुन काहीच सापडले नाहीये , आपण शोधत राहु :) ! ११८ अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि एक म्हणजे ते " तुकोबांनी व्यवस्थेविरुध्द बंड वगैरे केले." असे जे म्हणातात त्यालाही काहीही आधार सापडत नाही . ब्रह्मवृंदांनी कवित्व इंद्रायणीत बुडावावे असे सांगितल्यावर तुकोबांनी त्रागा केल्याचे किंव्वा " नाही बुडवत जा गेलास खड्ड्यात " अशा आषयाचे अभंग मला तरी सापडले नाहीयेत. उलट तुकोबांनी तो आदेश शिरसावंद्य मानुन वह्या इंद्रायणीत बुडवल्या ही वस्तुस्थिती आहे. वह्या परत मिळाल्यावर तुकोबांनी केला अभंग पुरेसा आहे : 2231 थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥1॥ भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥ अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥2॥ उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका ह्मणे ब्रीद साच केलें आपुलें ॥3॥

विद्रोही तुकाराम माझा आवडता संत कवी. एखाद्या शुद्राने ब्राह्मणांच्या अधिकाराविरुद्ध बंड करायची गोष्ट सतराव्या शतकात कोणी ऐकली नसेल. तुकारामाला मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगण्याचा अधिकार आहे काय यावर धर्ममार्तण्डाकडून योग्य निर्णय तेव्हाच्या ब्रम्हवृंदाना हवा होता अखेरीस गावच्या पाटलाकडून तुकारामाविरुद्ध दावा चालवावा लागला हेतु एकच की तुकारामांचे अभंग बंदी व्हावी. तुकाराम विद्रोही का वाटतात त्यासाठी तो काळ तेव्हाचे अधिकार आणि तुकारामाची अभंगरचना समजून घ्यावी लागते, तेव्हा विद्रोही तुकारामाची ओळख होते. ''बरा देवा कुणबी केलो नाही तरि दंभेची असतो मेलो'' ''वेदाचा तो अर्थ आम्हासिच ठावा येरांनी वाहावा भार माथा खादल्याची गोड, देखिल्यास नाही. भार धन वाही मजुरीच .... ..... तुका म्हणे आम्हा सापडले मुळ आपण चि फळ आले हाता.'' संत तुकाराम माझा आवडता कवी म्हणून या धाग्यात हजेरी. ''सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहूमता तुका म्हणे होय मनाशी संवाद|आपुलाची वाद आपनाशी''. -दिलीप बिरुटे (विद्रोही तुकारामाचा फ्यान)

In reply to by कंजूस

''जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा'' वारकरी संप्रदायातील संतांच्या बहुसंख्य अभंगातून विठ्ठल आणि विठ्ठलभक्ती, नामस्मरण,संत, लक्षणे, नितितत्वांचा उपदेश असेच विषय आढळतात. चातुर्वण्य व्यवस्थेतले हे सर्व सामाजिक विषमतेने पोळलेले घटक, अठराविश्वे दारिद्र्य प्रस्थापित व्यवस्थेने हद्दपार केलेले महार, माळी, सोनार, शिंपी, स्त्रीशुद्र असे सर्व आणि हे सर्व परमेश्वरी इच्छेने म्हणून वाटेला आलेलं म्हणून स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही असे. संत तुकाराम मात्र अपवाद. वरील विषय होतेच पण, अंधश्रद्धा, कर्मकांड, कर्मठजीवनपद्धती, दांभिकता यावर हल्ला चढवतात. व्यक्तीचं स्वत:चं आचरण चांगलं असलं पाहिजे यावर त्यांचा फ़ोकस होता. ’पुन्हा तुकाराम’ या दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांच्या पुस्तकात तुकारामांची ही सर्व रुपे आहेत. कवी, माणूस, भक्त, ज्ञानी असणे, अशी अतिशय सुंदर. संत तुकाराम आपल्यासारखा संसारातला फ़्रेंडली माणूस वाटतो. ”संसार तापे तापले मी देवा करितो सेवा या कुटुंबाची म्हणून येवो आठवले तुझे पाय येवो माझे माय पांडुरंगे” ( शब्द मागे पुढे चुभू देघे) आणि हे सर्व मांडायचं शब्दांच्या माध्यमातून ”आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु” तुकारामांवर एक स्वतंत्र चांगला लेख लिहायचा असा खुप दिवसांपासून संकल्प आहे, राहून जातो. फ़िर कभी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 15/06/2020 - 14:28
तुकारामांवर एक स्वतंत्र चांगला लेख लिहायचा असा खुप दिवसांपासून संकल्प आहे, राहून जातो. फ़िर कभी.
लिहा ना भो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महासंग्राम 01/07/2020 - 17:09
कारामांवर एक स्वतंत्र चांगला लेख लिहायचा असा खुप दिवसांपासून संकल्प आहे, राहून जातो. फ़िर कभी.
लिहाच एक लेख वाट पाहतोय

In reply to by कंजूस

गॉडजिला 16/08/2021 - 11:30
जे सांगायचे ते सांगुदेत त्यांना... वस्तुस्थिती ही आहे मनाची निर्व्याजता, निष्कामता, चित्ताचा सात्विकपणा, निव्वळ सद्गुणांचा अट्टहास हे सर्व मृत्युची वाट पहायचे डोहाळे आहेत. आपण वरील गोश्टीचा मनापासुन पुरस्कार करणार्‍या कोणत्याही सामान्य व्यक्तीस भेटा आतुन तो काहीसा जगाला त्रासलेला अन मुक्तिस (मृत्युस) आसुसलेला प्राणिच दिसेल. जो मृत्युस आसुसलेला नाही तो वरील बाबींचा अनाठायी अट्टहास करणारा कधीच दिसणार नाही

तुम्ही लिहिता, "आपल्याला अर्थाशी घेणे आहे" तर ह्या अभंगांचा अर्थ कुठे मिळेल तेही लिहा बुवा. मला २११४ व २११७, दोहोंचाही अर्थ पूर्ण कळला नाही. मी फार वर्षे ऐकत आलोय ज्ञानेश्वरी आणि गाथेची महती. पहिली तर ह्या आयुष्यात तरी समजेल असे वाटत नाही. तुकाराम तुलनेने सोपा म्हणतात तो तरी समजावा असे वाटते.

कोहंसोहं१० 16/06/2020 - 00:58
माझे आवडते काही प्रचलित अभंग हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥ न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥ तुका ह्मणे गर्भवासी । सुखें घालावें आह्मांसी ॥४॥ आम्ही वैकुंठवासी | आलो याची कारणासी || बोलिले जे ऋषी | साच भावे वर्तावया || सध्या वारीचा काळ आहे त्यासाठी खेळ मांडीयेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाईं रे | होतो जयजयकार गर्जत अंबर मातले हे वैष्णव वीर रे | तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे ||

आदेश007 16/06/2020 - 20:01
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु || मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ || भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ || मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ || अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ || तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ ||

In reply to by आदेश007

महासंग्राम 01/07/2020 - 14:46
भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ ||
हा अगदी ओरिजनल अभंग दिलाय तुम्ही, नाहीतर सध्या बऱ्याच ठिकाणी बरेच बदललेले शब्द घातलेले आहेत

स्वधर्म 17/06/2020 - 12:49
तीर्थी धोंडा पाणी , देव रोकडा सज्जनी भगवतगीता, ज्ञानेश्वरी, वेद यातून देव सापडेलही कदाचित, पण ते सर्व पुढल्या तारखेचे धनादेश आहेत. कधी वटतील सांगता येत नाही. तुकाराम संत सज्जन हाच रोकडा देव असल्याचे सांगतात. ही मला तुकारामांची सर्वात आवडलेली ओळ. तीर्थी धोंडा पाणी म्हणणारे तुकाराम, त्यावरच ज्यांचा धंदा आहे, त्यांना कसे आवडणार? त्यांनी प्रचलित अध्यात्म, देवाची संकल्पना याविरुध्द बंड केले, म्हणून ते विद्रोही असे वाटते.

In reply to by स्वधर्म

वाह सुंदर ! हा अभंग क्रमांक ११४ आहे : ११४ तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥ मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥ तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥ तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥
तीर्थी धोंडा पाणी म्हणणारे तुकाराम, त्यावरच ज्यांचा धंदा आहे, त्यांना कसे आवडणार? त्यांनी प्रचलित अध्यात्म, देवाची संकल्पना याविरुध्द बंड केले, म्हणून ते विद्रोही
बाकी आपण ११३ वा अभंग जरुर वाचुन पहा नक्की आणि आपले काही मत बदलल्यास कळवा! तळटीपः मला कोणालाही काहीही पटवुन द्यायचे नाही की वादविवाद करयची इछा नाहीये (नाहीतर तसे ११४ सोबत ११३ कॉपीपेस्ट करुन इथे टाकणे अवघड नव्हते). तुकोबा आभाळायेवढे मोठ्ठे आहेत, ज्याला जितके जसे भावतील त्याने तितके तसे घ्यावेत ! पांडुरंग पांडुरंग _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 17/06/2020 - 18:19
वाचला. खरे तर त्यात पंढरीचा महिमा सांगितला आहे. तसाच आणखी एक म्हणजे, जयाचिये घरी | पंढरीची वारी. किंवा आावा चालली पंढरपुरा हा एक दुसरा. मला वाद घालण्यात काही रस नाही, पण अनेक गाथा, ग्रंथ यात, परस्परविरोधी वचने संदेश असतातच. सॅम हॅरीस यांनी असा बायबलमधील परस्परविरोधी वचनांचा अभ्यास केला आहे, आणि आक्षेपही घेतले आहेत. आपल्याकडेही राजीव साने यांनी गीतेमधील अशा वचनांची उदाहरणे दिली आहेत. यू ट्यूबवर त्यांची गीतेबाबतची मालिका आहे. असो. माझ्या दृष्टीने तुकाराम हे अलौकिक प्रतिभावंत आणि कमालीचे प्रामाणिक संत आहेत. त्यांचा भक्तीमार्ग मात्र मला भावत नाही. ११३ वा अभंग सर्वांसाठी पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥ आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥ तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥

In reply to by स्वधर्म

:) ११३ आणि ११४ एकत्रित वाचल्यावर "पंढरीपुढे अन्यतीर्थे काहीही कामाची नाहीत " असा अर्थ लागतो , म्हणजे किमान मला तरी. हे तुकोबांच्या अनन्य भक्तीचे लक्षण वाटते , कोणत्याही प्रकारचे बंड किंव्वा विद्रोह मला तरी दिसत नाही ह्यात! बाकी वाद विवाद करण्यात आता मलाही रस उरला नाहीये कोठेच, ज्याला जे भावते ते त्याने घ्यावे . :) तुम्ही ११३ वा अभंग दिल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद _/\_ 3414 नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥1॥ आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥ येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥2॥ मागे आजिवरी । जालें माप नेलें चोरी॥3॥ सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकन ॥4॥ पडों नेदी तुका । आड गुंपूं कांहीं चुका ॥5॥ पांडुरंग पांडुरंग !!

जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥1॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥2॥ देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्निचिया सृष्टी चेविल्या जेवीं ॥2॥ तुका ह्मणे ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥4॥ पांडुरंग पांडुरंग

तेजस आठवले 26/06/2020 - 20:27
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे दोनही जणू अप्रतिम तेजाने तळपणारा रत्नेच आहेत. माझा आवडणारा अभंग म्हणजे भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥ पौर्णिमेचा चन्द्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥१॥ दिवाळीच्या मुळा लेकि आसावली, पाहतसे वाटूनी पंढरीसी ॥२॥ भुकेलिया बाळ अति शोक करी वाट पाहे परी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा ॥४॥ तसंच आम्ही जातो आमुच्या गावा हे ही पद अत्यंत आवडीचे. अजूनही बरेच अभन्ग आवडतात इतिहासातल्या प्रत्येक गोष्टीत जातीभेद आणून बघा "ह्यांनी" कसा तुमच्यावर अन्याय केला हे क्षणोक्षणी ओरडून सांगणे हाच बऱ्याच जणांचा धंदा आहे. आणि "ते" विशिष्ट् लोक वरणभात, गूळतूप पोळी खाणारे असले की त्यान्च्याकडून शारीरिक तर दूरच, पण शाब्दिक प्रतिक्रिया पण येणार नाही हे अशा अजेन्डाधारकांच्या पथ्यावरच पडते. हेच लोकं देवळे फोडणाऱ्या आणि सर्व जातींतील हिंदूंना बाटवणाऱ्या आणि त्यातच आपला धर्म बघणार्यांशी पडद्यामागे संधान बांधून असतात. तीनशे वर्षांपूर्वी काय घडले ह्याचा कुठलाही पुरावा नसताना आताच्या काळात काही विशिष्ट जातींना लक्ष करणे आणि धाकटपशा दाखवण्यासाठी रिकामटेकड्यांची फौज कामी लावणे ह्यात काही लोक माहीर आहेत. आपल्या मिपावर पण संत रामदासांना आदिलशाहाचे हेर आणि स्वराज्याचे शत्रू म्हणणारे दिवटे होतेच की. आता काही संघटनांचा हा उघड उघड अजेन्डा आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने ही चर्चा पुढे जाऊ नये. अशांसाठी कदाचित खालील अभंग लागू पडावा काय? जाळे घातले सागरी । बिंदु न राहे भीतरी ॥१॥ तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥ गाढव गंगेसी न्हाणिले । जाउनि उकरड्यावरी लोळे ॥२॥ तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥ प्रीती पोसिले काउळे । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥ तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥ माझ्या वाचनाप्रमाणे, मोरे घराण्याचा पिढीजात सावकारीचा धंदा होता आणि सर्व पिढ्यानी तो उत्तम चालवला. तुकारामांनीही तो उत्तम प्रकारे चालवला. पण पुढे दुष्काळात येणेकर्यांनी पाठ फिरवली आणि देणेकर्यांचे देणे द्यावे लागले तसेच दुष्काळातले लोकांचे हाल पाहून तुकारामांनी धान्याची कोठारे खुली केली. एकूणच विषण्णता आणि आत्यंतिक निराशेचा तो काळ. त्यातच पहिली पत्नी आणि अपत्याचा मृत्यू ह्यामुळे झालेले दुःख पाहता तुकारामांना किती सोसावे लागले ह्याची कल्पना करून पाहावी. ह्या अशा प्रतिकूल परिस्थितीतूनच उदारमतवादी विचारांचा श्लोकांवाटे सुंदर विसर्ग झाला असावा.

१५ आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥ तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥

माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥1॥ आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥ वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन जालों देवा ॥2॥ तुका ह्मणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥3॥

In reply to by प्रसाद गोडबोले

राघव 16/08/2021 - 11:03
नमन. उगाच काही गोड शब्दांत सांगणे वगैरे नाही.. बुवांचे अभंग म्हणजे.. अगदी सरळसोट भाषा आहे! सटासट थोतरीत बसतात. मनाला असं अगदी गदगदा हलवून जागं करण्याचा अनुभव येतो! खूप खूप धन्यवाद!

वेळ आल्यास देवालाही ठणकावायला मागे पुढे न बघणारे तुकोबा आपले आवडते आहेत. सरळसाधा संसारी माणुस ठरवले तर परमार्थात कशी प्रगती करु शकतो याचे रोकडे उदाहरण म्हणजे तुकोबा. येउद्या अजुन अभंग

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गॉडजिला 16/08/2021 - 19:11
सहमत... केवळ भौतिक कौशल्यधारीत लाभ मिळवायला विशेष उपयोग होत नाही अन अध्यात्मिक लाभासाठी हाच एक पर्याय असेही नाही म्हणुनच मी नाईलाजाने अभंग वाचन बंद केले... अन्यथा एक एक ओळ, त्यातून सूचित होणारा अर्थ, तो वाचून मनात उठणारे ज्ञानाचे काहूर अन डोळ्यात विठ्ठलाची मूर्ती तरळल्याने आपसूक जोडल्या जाणाऱ्या हाताची न थांबणारी थरथर, आजही नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच येतात... डोळ्यातून आनंदाश्रू घळा घळ वाहायला सुरुवात होते, मग मनाने माझा मी रहात नाही अन् विठ्ठलाचा मी होत नाही, अशा त्या शब्दात व्यक्त न करतां येण्या जोग्या अवस्था आयुष्यात फार मोठी अनुभूती देऊन जातात... पण आजही जेंव्हा कोणाच्या तोंडून अथवा लेखणीतून मी महाराजांचे अभंग बघतो, मला माझ्या अनुभूतीला पोरके झाल्याचा फिल येतो

राघव 16/08/2021 - 21:23
एक एक ओळ, त्यातून सूचित होणारा अर्थ, तो वाचून मनात उठणारे ज्ञानाचे काहूर अन डोळ्यात विठ्ठलाची मूर्ती तरळल्याने आपसूक जोडल्या जाणाऱ्या हाताची न थांबणारी थरथर, आजही नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच येतात... डोळ्यातून आनंदाश्रू घळा घळ वाहायला सुरुवात होते, मग मनाने माझा मी रहात नाही अन् विठ्ठलाचा मी होत नाही, अशा त्या शब्दात व्यक्त न करतां येण्या जोग्या अवस्था आयुष्यात फार मोठी अनुभूती देऊन जातात...
अतीव सुंदर! _/\_

In reply to by राघव

गॉडजिला 16/08/2021 - 21:56
मी वरील प्रतिसाद काल्पनिक लिहला आहे, थाप मारली आहे. मला असे काही होत नाही, प्रतिसाद फक्त हे सिध्द करायला लिहला की माझे बुड स्वांत सुखात लोळत आहे अशी बतावणी मी आत्ता पासून पुढील वीस हजार वर्ष पिढ्यान पिढ्या चालू ठेवू शकतो... आणि लोकांच्या भक्तिभावनेला साद घालून त्यांची, माझी, देवाची अन सर्वांची अशी फसवणूक, प्रसंगी पिळवणूकही सहजी करु शकतो. आणि तरीही चार चौघात माझे बुड स्वांत सुखात गेली वीस हजार वर्षे पिढ्यान् पिढ्या लोळत आहे असे निर्लज्ज्जपणे मिरवूही शकतो आणि इतरेजन माझ्या या थापांना सहजी बळी पडू शकतात, माझे विवेचन सत्य मानू शकतात प्रसंगी जगण्याचे ते प्रमाणही बनू शकते... मी स्वतःला एक नंबर घोषित करु शकतो . पण वस्तूता ही सर्व माझी बोलबच्चन आहे, स्वतःची व इतरांची फसवणुक, पिळवणूक अथवा इतर काही हेतू साध्य करायला लीहलेली...

In reply to by गॉडजिला

राघव 17/08/2021 - 15:40
ठीक आहे. थाप असो किंवा नसो. पण जर हा अनुभव कुणाचा खरा असला तर? त्याच्यासाठी ही थाप ठरत नाही. :-) आणि शेवटी कशातून काय घ्यायचे हे ज्याचे त्याने स्वतः ठरवायचे असते. कुणी सांगून विशेष फरक पडत नसतो. मला तुकोबांच्या अभंगांतून तळमळ जाणवते, जी अक्षरशः काळजाला भिडते. स्तिमित करते. त्यांना आलेले अनुभव आपल्यालाही मिळावेत हा अट्टाहास कशासाठी असणार? जास्तीत जास्त असे वाटू शकते की आपल्या साध्यासाठी [ मग ते कोणतेही असो! ] तशी तळमळ आपल्या चित्तवृत्तीत उतरावी. बाकी जो प्रदेश माहीतच नाही त्याबद्दल आणिक काय बोलणार? इत्यलम्.

शाम भागवत 17/08/2021 - 19:21
अन्यथा एक एक ओळ, त्यातून सूचित होणारा अर्थ, तो वाचून मनात उठणारे ज्ञानाचे काहूर अन डोळ्यात विठ्ठलाची मूर्ती तरळल्याने आपसूक जोडल्या जाणाऱ्या हाताची न थांबणारी थरथर, आजही नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच येतात... डोळ्यातून आनंदाश्रू घळा घळ वाहायला सुरुवात होते, मग मनाने माझा मी रहात नाही अन् विठ्ठलाचा मी होत नाही, अशा त्या शब्दात व्यक्त न करतां येण्या जोग्या अवस्था आयुष्यात फार मोठी अनुभूती देऊन जातात...
खरोखरच अतिसुंदर अवस्था असते ती. तृप्तता इतकी काठोकाठ भरलेली असते की बस्स्. सगळीकडे मांगल्य भरलेले असते. त्यावेळेस मी फक्त आणि फक्त विठ्ठलाचा असतो. त्याच्याशिवाय मला दुसरं काहीहि नको असतं. कारण दुसरं काही हवंस वाटायला अतृप्तिच शिल्लक राहिलेली नसते. असो.

🙏

In reply to by शाम भागवत

शाम जी , राघवा , मला तुमचं मनापासुन कौतुक वाटतं ! गॉडजिला ह्यांनी जाणीवपुर्वक थाप मारली आहे , तुमचा श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले आहे हे त्यांनी कबुल करुनही तुम्ही त्या लेखनात चांगले तेच शोधता ! हे असं वाईटातुन चांगलं शोधता आलं पाहिजे , हा असा नीरक्षीरविवेक असायला हवा ! सादर दंडवत स्वीकारा आमचा ! बाकी सगळ्यांनाच अनुभव येईल असे नाही , रादर साधनेच्या पहिल्या पायर्‍यांवर अनुभव नसतो तेव्हा चिकाटीने गुरुनिष्ठेने साधना करत रहाणे हाच एक उपाय आहे ! ह्या बाबतीतही तुकोबांचा खुप सुंदर अभंग आहे >>> अनुभव तो नाहीं अमुचिया दरषणें । अइकिलें कानें वदे वाणी । जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । ह्मणतां मांडे पुरी काय होतें ॥1॥ नाहींनाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरिहरा चाळविलें ॥ध्रु.॥ पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येइल मानूं । अंतरीं सबाह्यी कां नाहीं सारिखें । धरूनि पारिखें वर्त्ततसां॥2॥ आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडतयास काय द्यावें । तुका ह्मणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुह्मी कोठें॥3॥ बाकी ह्या भक्तीमार्गाचे एक उत्तम आहे , इथे खोटे बोलुन , थाप मारत जरी देवाची आठवण काढली तरीही सद्गतीच लाभते !! आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरि स्मरला नाहीं तुज ॥1॥ प्राण जातेवेळे ह्मणे नारायण । त्यासाटीं विमान पाठविलें ॥ध्रु.॥ बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥2॥ तुका ह्मणे भक्तकाज तूं कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥3॥ पांडुरंग पांडुरंग ______________________/\_______________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 17/08/2021 - 22:34
तुम्ही तर माझ्या मनातले विचारच लिहुन काढले. तुम्ही जो प्रतिसाद लिहलात नेम्का तसाच विचार करायला लोक बांधलेले असतील, नाही तसे घडले तर कोणितरी येउन त्यांना उपदेशांम्रुत पाजुन त्यांना बांधुन जाइल व माझ्या थापा त्यांच्या अंतकरणाचा अविभाज्य भाग बनतीलच हे उमजुनच माझे थाप मारायचे मन झाले आणी महत्वाचे म्हणजे मी थाप मारली हे उघड बोलायचे धाडसही झाले

In reply to by गॉडजिला

चला , येथील लोकांचा सात्विक भाव पाहुन तुमचेही मन परिवर्तन होत आहे पाहुन खुप आनंद झाला . २ कडुन १ कडे प्रवास सुरु झालेला पाहुन खरेच धाग्याचे सार्थक झाल्याचे वाटले ! नाहीतर काहीकाही लोकं असे असतात की त्यांना कितीही सांगितलं तरी कळत नाही अन वळतही नाही ! अशा लोकांविषयी तुकोबा म्हणतात : किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥1॥ शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥ नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥2॥ तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥3॥

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 17/08/2021 - 22:49
आम्हाला कोणी काय समजावे हे ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबुन असल्याने आमच्या थापा तुम्हाला आनंद देतात व पुढिल विस हजार वर्षे आनंद देतच राहतील यात तुम्हीही सामाविश्ट होणार हे हे माहित असल्याने... गड्या आम्ही पर्फेक्ट दोनच बरे रे बाबा... १ वाल्यांच भामटेपणा जास्त झेपणार नाही म्हणुन लगेच सत्यही बोलुन मोकळा झालो

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 17/08/2021 - 22:57
एखादा प्रभावी वाटु लागला भलेही विरोधक भासला तरी त्याला लगेच आपल्यातलाच म्हणुन जाहीर करतात... आमचीच री ओढतोय कोकलत सुटतात, वस्तुतः भामटे फक्त भामटे असतात... त्यांचा परमार्थ स्वार्थाशी जोडलेला असतो आणी म्हणुन जे जे खरे संत होउन गेले, दिव्य पुरुष होउन गेले त्यांना ते सर्वात आधी जवळ करतात सामान्य सद्गुणी श्रध्दाळु लोकांचा बुध्दीभ्रम करण्यासाठी

In reply to by प्रसाद गोडबोले

शाम भागवत 18/08/2021 - 07:44
हे असं वाईटातुन चांगलं शोधता आलं पाहिजे
मला वाटते माझ्या अनुभवाच्या विरोधात जाणारा भाग मला जाणवला तो मी स्पष्ट केला. फक्त त्या अगोदर माझ्या अनुभवाला दुजोरा देणारा भागाशी सहमती दाखवली. श्रध्देच्या जोरावर किंवा तर्काच्या जोरावर अध्यात्माचा अभ्यास करताना श्रध्दा दुखावणे हा प्रकार असू शकतो. राग येऊ शकतो. जोरदार प्रतिवाद करावासा वाटतो. पण अनुभवाच्या आधारे व तीही सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल चालू असताना हे सगळे प्रकार अगदी हलक्या हाताने बाजूला करून वाटचाल चालू ठेवता येते. हे सगळे बाजूला करताना त्या हातालाही काही चिकटत नाही तर मनाला काय होणारेय? त्यामुळे काळजीच नसते. स्वान्त सुखाय असंही काही नसतं. फक्त वाटचाल असते. कोणीतरी वाट कशी आहे या बाबत बोललेले असते त्यात काही वेगळं वाटलं तर, फक्त त्याबद्दल दोन शब्द उच्चारून थांबायचं इतकच. ज्याला कळायचं त्याला कळतं. असो. _/\_

In reply to by शाम भागवत

गॉडजिला 18/08/2021 - 08:17
तयारी झाली की सदगुरु आपणास लवकरच जे जसं आहे तसंच स्विकारायची दिक्षा देतिल तोवर धिर धरावा. अन्यथा थोरामोठ्यांच्या रचना आपल्या बुध्दिच्या कक्षेत सोडवायच्या मोहजालात असे फसाल की गुरु एक दीवस मलाच आपल्या समोर उभे करतील. _/\_ अर्थात कोणी काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही, मी फक्त आपलं एक निरीक्षण नोंदवले.

गॉडजिला 17/08/2021 - 22:43
तुमचा श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले आहे हे त्यांनी कबुल करुनही तुम्ही त्या लेखनात चांगले तेच शोधता
मी श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले नाही. मी फक्त खोटेनाटे श्रध्देने लिहुन कोणीही श्रध्दावान लोक त्याचे बळी ठरु शकतात इतकेच प्रतिपादीत केले आहे.

In reply to by गॉडजिला

शाम भागवत 18/08/2021 - 07:25
तुम्ही प्रामाणिक आहात हे मागेच बोललो आहे. तुम्ही पोलीसासारखे काम करत आहात हेही बोललोय.
मी श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले नाही.
त्यामुळे सहमत आहे.
मी फक्त खोटेनाटे श्रध्देने लिहुन कोणीही श्रध्दावान लोक त्याचे बळी ठरु शकतात इतकेच प्रतिपादीत केले आहे
हे पोलीसांचे कामच आहे. एखादा माणूस चांगला आहे याची खात्री पटेपर्यंत त्याला चोर समजायचे असते, ही पोलीसांची पध्दत असते. तेही बरोबर आहे. पण प्रामाणिक पोलीस एखादा माणूस चांगला आहे हे कळल्यावर त्या माणसाप्रतीचे वर्तन आमूलाग्र बदलतो. असो. जास्ती लिहीत नाही. कारण मलाच विषय वाढवण्यात रस नाही. माझी श्रध्दा कुणी दुखवू शकेल, असे आता मलाच वाटत नाही. _/\_

In reply to by शाम भागवत

गॉडजिला 18/08/2021 - 08:09
असे स्वतापुरते मर्यादीत रहाय्चे प्रतिसाद कुचकामी नसले तरी उपयोगी देखिल नाहीत. असो, मराठीत सांगायचे तर मला कोणाचीच श्रध्दा बदलवायची नाहीये... मि फक्त भामट्यांच्या कार्यपध्दतीवर प्रकाश टाकला आहे. एखाद्याची श्रध्दा समुळ भेदणे हा डाव्या हातचा मळ आहे, म्हणुनच मी ते लिलया पुन्हा पुन्हा केलेही असते. पण त्यातुन साध्य काय ? श्रध्दा नाहीसी झाल्याने एखादा सुखि होइल का ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही म्हणुन ओशो सारख्यांचा तो उद्योग मी निरुद्योगासमान मानतो. इथे मि फक्त भामट्यांच्या कार्यपध्दतीवर प्रकाश टाकला आहे.
प्रामाणिक पोलीस एखादा माणूस चांगला आहे हे कळल्यावर त्या माणसाप्रतीचे वर्तन आमूलाग्र बदलतो. असो.
प्रमाणिक पोलीस मी नाही. मी तर प्रवृत्तिने पोलीसही नाही. मी एक भामटा आहे. माझे सर्वात जास्त वापरलेले गेलेले कौशल्य कोणते तर भामटेगीरी. अन्यथा माझे रोजगाराचे वांदे झाले असते... भामटेगीरी केलि नाही तेंव्हा मी बेरोजगारी अनुभवली आहेच. मग म्हटल आता हेच करायचे.

In reply to by शाम भागवत

शाम जी, कदाचित तुम्हाला ह्या गॉडजिला ने चालवलेल्या प्रकाराबद्दल , म्हणजे खोटे बोलणे , थापा मारणे , पोलिसगिरी वगैरे वगैरे वितंडवादामागील संदर्भ माहीत नसावा म्हणुन इथे देऊन ठेवतो : माझ्या एका लेखात मी म्हणालो होतो की : भारतातील हिंदु समाजा मध्ये ढोबळमानाने दोन गट आहेत , एक ज्यांना २५०० -३००० वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे, ज्यात साहित्य आहे संगीत आहे कला आहे तत्वज्ञान आहे उपनिषदे आहेत आनंद आहे ८०० १००० वर्षांचा अस्तित्वाचा संघर्ष आहे आणि त्या संघर्षात टिकुन उरलेले तावुन सुलाखुन निघालेले साहित्य आहे ! आणि दुसरा गट आहे की ज्यांच्यासाठी इतिहास म्हणजे केवळ शोषणाचा इतिहास आहे. अन नजिकचा २०० वर्षाचा इतिहास आहे ज्यात पाश्चिमात्य तत्वज्ञानाशी ओळख झालेली आहे अन नवीन निहिलिस्टिक विचारधारा पुन्हा उमगायला लागली आहे ! आता पहिल्या गटाला दुसर्‍याच्या आनंदाच्या व्याख्या कळणार नाहीत अन दुसर्‍याला पहिल्याचा कळणार नाहीत ! न कळो बापडे, आपण आधीच म्हणालो तसे - आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे ! आणि नंतर माझ्या जे लक्षात आलं की गॉडजिला हे गट क्रमांक २ मधील आहेत ते मी त्यांच्या निदर्शानास आणुन दिले. त्याचा त्यांनी राग धरलाय, तेव्हा पासुन माझ्या प्रत्येक लिखाणावर जाऊन असंबध्द प्रतिसाद देत असतात ! असो. आपल्याला काय फरक पडतो! बाकी गट क्रमांक २ मध्ये असण्यात वाईट काय , त्याने इतका राग का यावा हे मला अजुन तरी कळलेले नाही. असो. सत्य आह्मां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥1॥ ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥ देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥2॥ तुका ह्मणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें॥3॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 18/08/2021 - 10:28
आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे ! बरोबर माऊली एवढं लक्षात ठेवलं की माणूस माणसात येतो आणि समाज म्हणून एवढे कळायलाच पाहिजे.

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 18/08/2021 - 10:28
आपल्याला न दिलेल्या प्रतिसादांवरही आपण वरील गैर्समज मनात धरुन अधुन मधुन परफेक्ट दोन, २ असे रिप्लाय मला दिले आहेत. मी तर आपल्याशी काय बोलणे झाले हे विसरुन गेल्याने पुन्हा पुन्हा २ म्हण्जे काय आपला प्रतिसाद समजला नाही जरा विस्तारुन लिहता का असे विनवले आहे, त्यांमुळे विनाकारण असंब्ध्दता जि आपण विवीध ठिकाणी घुसडलीत याला मी न्हवे तुमची कोती मानसिकता कारणीभुत आहे याची नोंद घ्यावी. बाकी तुम्हाला हवा तो गैर्समज बाळगायला तुम्ही मुक्त आहात

In reply to by प्रसाद गोडबोले

शाम भागवत 18/08/2021 - 10:28
मी तुम्हा दोघांचे सर्व संवाद शांतपणे वाचलेले आहेत. पण कोणाचे विचार बदलायचे हे माझे उद्दिष्ट नसल्याने किंवा जो कोणी मार्ग अनुसरत आहे त्याला एखादा पर्याय सुचवायचा माझा कोणताही प्रयत्न नसतो. मी फक्त माझ्या अनुभवातून जे शिकत आहे ते मांडण्यासारखे असल्यास व कोणालात॑री उपयोग होईल असे वाटल्यास मांडतो. थोडक्यात, माझा संतावर विश्वास आहे. निहिलिस्टिक वगैरे विचार तुकारामांच्या किंवा ज्ञानेश्वरांवरांच्या विचारावर मात करतील असे मला वाटत नाही. त्यामुळे माझा पास. मला वाचनाचे अनोनात वेड. त्यातून अध्यात्मिक वाचनाची पण गोडी लागली. पण १९९४ साली मला सत्गुरूंनी अध्यात्मिक वाचनाची बंदी केली व नामस्मरणावर भर द्यायला सांगितला. त्यानंतर आजतागायत मी अध्यात्मिक काहीही वाचत नाही. वाचनाने माहितीचा साठा वाढतो हे आता अनुभवाने कळले आहे. तर ज्ञान आतच असते त्यामुळे बाहेरून काहीही मिळवायचे नसते व मिळतही नाही हेही चांगलेच कळले आहे. हे आतील ज्ञान नामस्मरणाने खुले होते असा अनुभव असल्याने ती वाटचाल चालू ठेवली आहे. अपवाद फक्त २००७-२००८ मधला दीड वर्षांचा कालावधी. ज्या कालावधीत मी जिवनविद्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायला सांगितला म्हणून केला. त्याबाबतचा उल्लेख मी अप्रिय आठवणींपासून सुटका मधे केला होता. त्यावेळेस लिहावेसे वाटत होते म्हणून लिहिले. पण शुभचिंतना ऐवजी समोर पहा किंवा गांजा ओठा वगैरे पर्याय पुढे यायला लागल्यावर टंकाळा यायला लागला. खरे तर दुसर्‍या भागात, आपल्या स्मृतीवरील मी व माझे याचे ओझे कमी झाले की विचार कसे सुसंगत होतात हे लिहिणार होतो. इतकेच नव्हे तर आपले विचार किती आमुलाग्र बदलात हे माझ्याच अनुभवावरून तिसर्‍या भागात लिहिणार होतो. पण थांबायचे ठरवले. असो. प्रतिसाद धाग्याशी संबंधीत असावा व तो माझ्या अनुभवाशी प्रत्यक्ष वागण्याशीही संबंधीत असावा म्हणून तुकोबांचा एक अभंग देऊन माझा सहभाग थांबावायचा विचार आहे. वाचन थांबवूनही मला माझी प्रगती होत आहे असे वाटते याचे कारण मला वाटते तुकोबांचा हा खालील अभंग आहे. न कळे ते कळो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न दिसे ते दिसो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न बोलो ते बोलो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न भेटे ते भेटो येईल आपण | करिता चिंतन विठोबाचे || अलभ्य तो लाभ होईल अपार | नाम निरंतर म्हणता वाचे || तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावे | तरतील नावे विठोबाच्या ||

🙏

In reply to by शाम भागवत

गॉडजिला 18/08/2021 - 10:35
माझा संतावर विश्वास आहे. निहिलिस्टिक वगैरे विचार तुकारामांच्या किंवा ज्ञानेश्वरांवरांच्या विचारावर मात करतील असे मला वाटत नाही. त्यामुळे माझा पास
जेब्ब्बात भागवत जी... पण यावर भामटे मात करत आलेत व राहतील. आपण शक्य तेव्हडे भामटे ओळखायचे व त्यांच्या बोलबच्चन पासुन इतरांच्या मनात विष कालवायच्या प्रवृत्तीपासुन स्वताला वाचवायचे इतकेच काय ते आपल्या हातात आहे.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 08/09/2021 - 10:51
न कळे ते कळो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न दिसे ते दिसो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न बोलो ते बोलो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न भेटे ते भेटो येईल आपण | करिता चिंतन विठोबाचे || अलभ्य तो लाभ होईल अपार | नाम निरंतर म्हणता वाचे || तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावे | तरतील नावे विठोबाच्या ||
यावर बाबा बेलसरेंनी सुंदर निरूपण येथे केले आहे.

In reply to by शाम भागवत

यावर बाबा बेलसरेंनी सुंदर निरूपण येथे केले आहे.
नक्की ऐकतो. बेलसरे सरांचा खुप मोठ्ठा फॅन आहे मी ! त्यांची संवाद शैली अफलातुन आहे ! इतक्या सोप्प्या भाषेत सांगणारे अजुन कोणीच मला माहीत नाही , एक गोंदवलेकर महाराज आहेत पण बेलसरे सर आणि गोंदवलेकर महाराज्यांच्यात अद्वैत झालेले दिसते , बेलसरे सरांच्या मुखातुन खुद्द महाराजच बोलत आहेत असे वाटते ! ह्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग यायला पाहिजे होता ! आजच आलोय सातार्‍यात, आता गोंदवल्याला एकदा जाऊन हे महाराजांना सांगुन येतो !

In reply to by Bhakti

गॉडजिला 18/08/2021 - 10:32
आमचे बंधु मार्कस मात्र आमचेबाबत विनाकाराण आकस जाहिर करत फिरत असतात, नक्कि ते का चिडतात ते त्यांना समजले तरी माझ्यासाठी आनंदाचा दिनु असेल

In reply to by गॉडजिला

कसला आलाय आकस =)))) तुमचा एकही प्रतिसाद उपयोगाचा नाहीये . तुम्ही तुम्हाला आवडलेला एकही तुकोबांचा अभंग दिलेला नाहीये . केवळ खोटे बोलणे , थापा मारणे , पोलीसगीरी , भामटेगिरी वगैरे असंबध्द बरळत आहात . तुम्ही म्हणजे अगदीच गट क्रमांक २ मधील असल्याचे सारखे सारखे दाखवुन देता बुवा ! बाकी आपण धाग्याचे वर्गीकरण पाहिले तर ते " काथ्याकुट" असे नसुन "लेख" / "जनातलं मनातलं" असे आहे. त्यामुळे तुम्ही तुकोबांचे तुमचे आवडते अभंग , त्यातुन तुम्हाला उमगलेला अर्थ दिलात तर आनंद होईल , बाकी सगळे असंबध्द प्रतिसाद "पोलिसगिरी अन भामटेगिरी " वगैरे वगैरे वितंडवाद प्रतिसाद कचरा काहीही उपयोगाचा नाही. सदर प्रतिसाद हटावले जावेत अशी मी संपादकांना विनंतीही केलेली आहे, पण बहुतेक ते सध्या सुट्टीवर असावेत तस्मात ह्या कोपर्‍यात लावलेल्या ज्ञाबोबा तुकोबांच्या फोटोवर जळमटे जमली आहेत ! योग्यवेळी निरथक २ नंबरी प्रतिसादांचा कचरा हटवला जाईल असा माझा ठाम विश्वास आहे ! नाही गेला तरी हरकत नाही , तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || =)))) _____________/\____________

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 18/08/2021 - 11:08
तसे आमचे बंधु मार्कस भौ फार सैरभैर झाल्यासारखे लिखीत होत आहेत असे वाटते त्यांनी बहुतेक माझा डेमो फार वैयक्तीक घेतलेला दिस्तो. खरे तर त्यांना प्रतिसादही दिलेला न्हवता, भामट्यांना भामटे म्हटल्याने त्यांना नेमके कुठे त्रास झाला समजले तर औषध तरी काय द्यावे याचा विचार करता आला असता पण सध्या ते त्यांची जखम दाखवायच्या मनस्थितीतही दिसत नाहीत.. ते लवकर शांत होवो व मला त्यांच्या जखमेवर मलम लावुन त्यांची वेदनामुक्ती करायचे सदभाग्य लाभो हीच कालीमातेच्या चरणी माझी प्रार्थना आहे... त्यांना यत्र तत्र सर्वत्र प्रतिसादात (जे त्यांना दुरुनही दिलेले नाहीत) तिथे मिच दिसत आहे हे भाग्य म्हणावे की दुर्दैव की त्यांचा केमिकल लोच्या हे कोडे ते बरे झाल्याखेरीज सुटेल असे मला आता वाटत नाही. मार्कस माय ब्रदर from another mother गेट वेल सुन भाउ. काळजी भासु लागली आहे.

गॉडजिला 18/08/2021 - 11:22
सदर प्रतिसाद हटावले जावेत अशी मी संपादकांना विनंतीही केलेली आहे, पण बहुतेक ते सध्या सुट्टीवर असावेत तस्मात ह्या कोपर्‍यात लावलेल्या ज्ञाबोबा तुकोबांच्या फोटोवर जळमटे जमली आहेत ! योग्यवेळी निरथक २ नंबरी प्रतिसादांचा कचरा हटवला जाईल असा माझा ठाम विश्वास आहे !
मला शक्य असतं तर माझ्या हाताने हे पुण्यकर्म केले असते... तुर्तास माझे प्रतिसाद हटवण्यास अनुमोद्न आहे अशी निसंधिग्द खात्री बाळगावी. आमचे बंधुंच्या आनंदासाठी अधिकारी व्यक्तीनी त्यांची विनंती तत्काळ अमलात आणावी... फक्त आम्हाल २ म्हनायचा उद्योग आपण केलाच आहे त्याच्या वरताण परत २-१ करुन आम्हाला पुन्हा १ च्या जवळ न्यायचा जो जावइ बाणा आपण दाखवलात तो ऐतिहासीक आहे हे नक्कि. पण गड्या आम्हाला पर्फेक्ट दोन मधेच राहुद्या ही विनंती वर केली होतीच ती विसरला असाल तर पुन्हा एकदा ती विनंती हात जोडुन हा सेवक आपल्याला करतो आहे_/\_

गॉडजिला 18/08/2021 - 11:55
मार्कस ऑरेलियसजी मी या ध्याग्यावर चुकलोच तुम्हाला समजूनच घेतलं नाही मी. माझ्या सारखा करंटा मीच हेचं काय अंतिम सत्य बाकि सर्व झूठ... दादा मी स्वतःला भामटा बनवल्याने तूझ्या मनाला इतक्या यातना होतील याची मला जराशीही कल्पना न्हवती रे, आपण माझ्यावर इतके प्रेम करता की मी स्वतःला भामटा बनवल्यांने तुम्हाला असह्य त्रास होहून माझे प्रतिसाद तूम्ही संपादकाकडून उडवून लावायला गेलात ? तुमचे निर्मळ मन, निर्व्याज प्रेम बघून माझे अंतकरण गलबलून गेले आहे. तुकोबा आपण वाचले आहात आसे न्हवे तर अनुभवत आहात असेच आता राहून राहून म्हणावेसे वाटते.... चल बस कर पागले अब रुलायेगा क्या ? (झालं गेलं विसरून जाऊ एक नवी सुरुवात करु असे वाचावे) मेरे सारे प्रतिसाद इस धागेसे तत्काल उडा दिये जाय अशी माझी मनापासून हातजोडून विनंती आहे... माझ्या बंधूंच्या दुख्खास मी कारणीभूत झालो, आता मी तीर्थयात्रा करेन तेंव्हाच या पापातून मुक्त होईन अशी प्रतिज्ञा मी समस्त मिपाकरांच्यासाक्षीने करत आहे...

राघव 18/08/2021 - 13:46
बापरे.. काय ती चर्चा. :-) पण त्यानिमित्तानं आणिक काही खटांसि खट असे तुकोबांचे अभंग वाचायला मिळालेत! असो. जगात भामटे असणारच आणि त्याला माझ्यासारखे सामान्यजन बळीही पडणारच. अहो साक्षात ठाकुरांनाही ते चुकलेले नाही, त्यात माझ्यासारख्यांची काय हो कथा! पण एके ठिकाणी ठाकुरच स्वतः सांगतात, "ब्रह्म अजून उष्टे झालेले नाही". म्हणजे कुणालाही त्याचे शब्दांत वर्णनच करता आलेले नाही. ते अक्षरशः अवर्णनीय आहे! आता कुणी भामटा या तत्वाबद्दल काही बोलायला जाईल सुद्धा, तर काय बोलेल? जे काही त्याबद्दल थोरामोठ्यांनी लिहिलंय/सांगीतलंय तेच ना? मग त्यानं विशेष अपाय होत नाही. अपाय तेव्हा होईल जेव्हा तो विरुद्ध मत व्यक्त करेल आणि तेदेखील पटण्यायोग्य असेल. दोन्ही बाजू बरोबर वाटून गोंधळ उडून, बुद्धीभेद होईल/होऊ शकेल. अशावेळेस आपण विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न येतो. विश्वास डळमळला की भक्तीमार्गात पुढे जाणेच अशक्य. इथं बुद्धीभेद करणार्‍याचा दोष कमी असून बुद्धीभेद करून घेणार्‍याचा दोष जास्त आहे! असो. बाकी, कसोटीचा प्रसंग आल्यावर आपला विश्वास किती दृढ आहे ते आपले आपल्याला जाणवतेच. त्यामुळे ज्याने त्याने आपापली पायरी ओळखावी आणि वृत्ती अंतर्मुख ठेवून आपल्यातले दोष बाजूला करण्यास वेळ द्यावा हे ईष्ट. इत्यलम्

आपले संत नक्की संत कसे झाले, ने नक्की काय वाचन करत होते ह्या विषयी फार म्हणजे फार कमी माहीती उपलब्ध्द आहे. तरी समर्थांनी दासबोधात लिस्ट देऊन ठेवली आहे संदर्भ ग्रंथांची पण बाकी अन्य संत काय वाचत होते ह्या विषयी काहीच माहीती नाही . (कदाचित आपला अभ्यास कमी आहे.) आज एक तुकोबांचा अभंग सापडला अन त्यावरुन असे वाटले की तुकोबांनी अमृतानुभव वाचला असावा . ( अर्थात हा एक अंदाज आहे , कोणतेही लेखन न वाचता समान अनुभव येणे हे अध्यात्माचा क्षेत्रात काही विशेष बाब नाही !) तुकाराम गाथा - ५८१ गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥ आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥ उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥ हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥ अमृतानुभव : गोडी आणि गुळु । कापुरु आणि परिमळु । निवडूं जातां पांगुळु । निवाडु होये ॥ १-२३ ॥ नाना कापुरु आणि परिमळु । कापुरचि केवळु । गोडी आणि गुळु । गुळुचि जेवीं ॥ २-६३ ॥ जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं । म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ ७-२३७ ॥ नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण । घेतां तरी सुवर्ण । घेईजे कीं ॥ ९-१२ ॥ म्हणोनि भजतां भजावें । मा न भजतां कय नव्हे ? । ऐसें नाहीं स्वभावें । श्रीशिवुचि असे ॥ ९-४९ ॥ || पांडुरंग पांडुरंग ||

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 21/08/2021 - 20:25
असे वाटले की तुकोबांनी अमृतानुभव वाचला असावा
अमृतानुभव सुरेखच आहे. आपलं फेवरीट आहे.
कोणतेही लेखन न वाचता समान अनुभव येणे हे अध्यात्माचा क्षेत्रात काही विशेष बाब नाही
+१ नक्कीच. मला स्वतःला संत संत का बनतात याचे विशेश कुतुहल आहे कारण समान जीवनपध्दत विचारधारा राखूनही प्रत्येकजण संत बनत नाही... अर्थात अध्यात्मात त्याचे उत्तर पूर्वसुकृत असे आहेच पण त्याचा कसलाही पडताळा घेणे शक्य होत नाही त्यामूळे प्रश्न अनुभवाच्या कसोटीवर अनुत्तरीत राहतो आणि श्रध्दा कसोटीची मागणी करत नाही. म्हणून प्रश्नच निर्माण होत नाही त्यामुळं कुतुहल अजून जिवंत आहे.

भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥ भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥ध्रु.॥ होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥ तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥

In reply to by गॉडजिला

राघव 08/09/2021 - 10:23
हे सांगण्याचे तुकोबारायांचे काय कारण असावे? दुसर्‍या एका अभंगात ".. नाठाळाचे माथी हाणू काठी" असेही ते म्हणतात. मग हे परस्पर विरोधी मत त्यांनी का बरे मांडले असेल? :-)

गॉडजिला 10/09/2021 - 15:22
ऐसें कैसे झाले भोंदू। कर्म करुनि म्हणती साधू | अंगा लावुनि राख। डोळे झाकुनि करिती पाप। दावी वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा। तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती।

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥ मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥

मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥ हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥1॥ जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥2॥ ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥3॥

काय वृंदावन मोहियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥1॥ तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥ न कळे विंचवासी कुरवाळीलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥2॥ तुका ह्मणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥3॥

चौथा कोनाडा 16/02/2025 - 13:40
होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥1॥ निंदिती कदान्न इिच्छती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥2॥ तुका ह्मणे ऐसें दांभिक भजन । तया जनादऩन भेटे केवीं ॥3॥ -

देहभाव आह्मी राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥1॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तो चि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥ ह्मणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥2॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥3॥ तुका ह्मणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे ॥4॥

राम ह्मणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥1॥ ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥2॥ तुका ह्मणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥3॥

जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तहान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥

तुकोबाच्या गाथेच्या वह्या जरी नदीत बुडवल्या गेल्या असल्या तरी गाथा लोकांच्या मनामनात राहून तरली गेली असावी. काही पटकन आठवलेले अभंग... (गुगल बाबाच्या कृपेमुळे काही शब्द माहित असले तरी सगळा अभंग मिळवणे सोपे जाते...) तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध तैसेचि खळ ।। कां रे सिणलासी वाउगा । न भजता पांडुरंगा ।। मानदंभासाठी । केली अक्षराची आटी ।। तर करुनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ।। वाटिले ते धन । केली अहंता जतन ।। तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।। अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥ अर्थ इतकाचि साधिला । वेद अनंत बोलिला॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावे ॥ सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतुकाची निर्धार ॥ अठरा पुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥ मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ।पुनरपी संसारा येणे नाही ॥ मन हे शेवंती देऊ भगवंती । पुनरपी संसृती येणे नाही ॥ मन हे तुळशी देऊ हृषिकेशि । पुनरपी जन्मा येणे नाही ॥ तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥ सोनियाचे ताट क्षीरीने भरिलें । भक्षावया दिले श्वानालागी ।। मुक्ताफळहार खरासी घातला । कस्तुरी सुकराला चोचविली ।। वेदपारायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खूण काय जाणे ।। तुका म्हणे ज्याचे तोचि एक जाणे । भक्तीचे महिमान साधु जाणे || अजूनही आहेत ते पण जरा शोधुन लिहितो.. पैजारबुवा

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 15/06/2020 - 11:45
मला तरी सद्या एवढंच आठवतंय. जाला प्रेतरूप भाव | लक्षियेला ठाव स्मशानींचा || रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया | म्हणती हाय हाय यमधर्म || वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा | ज्ञानाग्नि लागला ब्रह्मत्वेसी || फिरविला घट फोडिला चरणी | महावाक्यध्वनी बोंब झाली || दिली तिलाजुळी कुळनामरूपासी | शरीर ज्याचें त्यासी समर्पीले || तुका म्हणे रक्षा जाली आपोआप | उजळला दीप गुरूकृपा ||

In reply to by शाम भागवत

आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥1॥ आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥ एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ॥2॥ फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥3॥ नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥4॥ तुका ह्मणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥5॥

बाकी आजकालच्या नव ईतिहासकारांनी फॅशन आणली आहे की तुकोबा विद्रोही होते असे म्हणायची ! अगदी हुशार सुषिक्षित लोकंही ह्या अपप्रचाराला बळी पडत आहेत हे पाहुन वाईट वाटते ! आपण मुळ ग्रंथावरुन स्वतःची मते केव्हा बनवायला शिकणार ? तुकोबांनी धर्मातील वाईट प्रथांवर जरुर आसूड ओढले आहेत पण मुळ वेदोक्त धर्माला कोठेही धक्का लावल्याचे दिसत नाही , उलट वेदेक्त धर्माचे समर्थनच दिसते काही काही अभंगात >>> 1340 मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥1॥ वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥ अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥2॥ तुका ह्मणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥3॥ 1467 वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अिग्न एक ॥3॥ तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥ ११८ अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥

In reply to by प्रसाद गोडबोले

शाम भागवत 15/06/2020 - 12:23
बाकी आजकालच्या नव ईतिहासकारांनी फॅशन आणली आहे की तुकोबा विद्रोही होते असे म्हणायची !
असं चालू आहे हे खरंय. पण आता तर तुकाराम महाराजांचा खून झाला असंही म्हणायला सुरवात झालीय.

In reply to by प्रसाद गोडबोले

एखाद्या विषिष्ठ जातीविरुध्द विषाची शेती करायची म्हणलावर ती कशीही करता येते , त्यात तुकोबांच्यासारख्या सज्जन माणासाला वापरले जाते हे पाहुन वाईट वाटते ! पण असो. तुकोबांनी वेद विरुध्द , धर्म उच्छेदक असे लिहिलेले मला तरी अजुन काहीच सापडले नाहीये , आपण शोधत राहु :) ! ११८ अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि एक म्हणजे ते " तुकोबांनी व्यवस्थेविरुध्द बंड वगैरे केले." असे जे म्हणातात त्यालाही काहीही आधार सापडत नाही . ब्रह्मवृंदांनी कवित्व इंद्रायणीत बुडावावे असे सांगितल्यावर तुकोबांनी त्रागा केल्याचे किंव्वा " नाही बुडवत जा गेलास खड्ड्यात " अशा आषयाचे अभंग मला तरी सापडले नाहीयेत. उलट तुकोबांनी तो आदेश शिरसावंद्य मानुन वह्या इंद्रायणीत बुडवल्या ही वस्तुस्थिती आहे. वह्या परत मिळाल्यावर तुकोबांनी केला अभंग पुरेसा आहे : 2231 थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥1॥ भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥ अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥2॥ उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका ह्मणे ब्रीद साच केलें आपुलें ॥3॥

विद्रोही तुकाराम माझा आवडता संत कवी. एखाद्या शुद्राने ब्राह्मणांच्या अधिकाराविरुद्ध बंड करायची गोष्ट सतराव्या शतकात कोणी ऐकली नसेल. तुकारामाला मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगण्याचा अधिकार आहे काय यावर धर्ममार्तण्डाकडून योग्य निर्णय तेव्हाच्या ब्रम्हवृंदाना हवा होता अखेरीस गावच्या पाटलाकडून तुकारामाविरुद्ध दावा चालवावा लागला हेतु एकच की तुकारामांचे अभंग बंदी व्हावी. तुकाराम विद्रोही का वाटतात त्यासाठी तो काळ तेव्हाचे अधिकार आणि तुकारामाची अभंगरचना समजून घ्यावी लागते, तेव्हा विद्रोही तुकारामाची ओळख होते. ''बरा देवा कुणबी केलो नाही तरि दंभेची असतो मेलो'' ''वेदाचा तो अर्थ आम्हासिच ठावा येरांनी वाहावा भार माथा खादल्याची गोड, देखिल्यास नाही. भार धन वाही मजुरीच .... ..... तुका म्हणे आम्हा सापडले मुळ आपण चि फळ आले हाता.'' संत तुकाराम माझा आवडता कवी म्हणून या धाग्यात हजेरी. ''सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहूमता तुका म्हणे होय मनाशी संवाद|आपुलाची वाद आपनाशी''. -दिलीप बिरुटे (विद्रोही तुकारामाचा फ्यान)

In reply to by कंजूस

''जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा'' वारकरी संप्रदायातील संतांच्या बहुसंख्य अभंगातून विठ्ठल आणि विठ्ठलभक्ती, नामस्मरण,संत, लक्षणे, नितितत्वांचा उपदेश असेच विषय आढळतात. चातुर्वण्य व्यवस्थेतले हे सर्व सामाजिक विषमतेने पोळलेले घटक, अठराविश्वे दारिद्र्य प्रस्थापित व्यवस्थेने हद्दपार केलेले महार, माळी, सोनार, शिंपी, स्त्रीशुद्र असे सर्व आणि हे सर्व परमेश्वरी इच्छेने म्हणून वाटेला आलेलं म्हणून स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही असे. संत तुकाराम मात्र अपवाद. वरील विषय होतेच पण, अंधश्रद्धा, कर्मकांड, कर्मठजीवनपद्धती, दांभिकता यावर हल्ला चढवतात. व्यक्तीचं स्वत:चं आचरण चांगलं असलं पाहिजे यावर त्यांचा फ़ोकस होता. ’पुन्हा तुकाराम’ या दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांच्या पुस्तकात तुकारामांची ही सर्व रुपे आहेत. कवी, माणूस, भक्त, ज्ञानी असणे, अशी अतिशय सुंदर. संत तुकाराम आपल्यासारखा संसारातला फ़्रेंडली माणूस वाटतो. ”संसार तापे तापले मी देवा करितो सेवा या कुटुंबाची म्हणून येवो आठवले तुझे पाय येवो माझे माय पांडुरंगे” ( शब्द मागे पुढे चुभू देघे) आणि हे सर्व मांडायचं शब्दांच्या माध्यमातून ”आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु” तुकारामांवर एक स्वतंत्र चांगला लेख लिहायचा असा खुप दिवसांपासून संकल्प आहे, राहून जातो. फ़िर कभी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 15/06/2020 - 14:28
तुकारामांवर एक स्वतंत्र चांगला लेख लिहायचा असा खुप दिवसांपासून संकल्प आहे, राहून जातो. फ़िर कभी.
लिहा ना भो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महासंग्राम 01/07/2020 - 17:09
कारामांवर एक स्वतंत्र चांगला लेख लिहायचा असा खुप दिवसांपासून संकल्प आहे, राहून जातो. फ़िर कभी.
लिहाच एक लेख वाट पाहतोय

In reply to by कंजूस

गॉडजिला 16/08/2021 - 11:30
जे सांगायचे ते सांगुदेत त्यांना... वस्तुस्थिती ही आहे मनाची निर्व्याजता, निष्कामता, चित्ताचा सात्विकपणा, निव्वळ सद्गुणांचा अट्टहास हे सर्व मृत्युची वाट पहायचे डोहाळे आहेत. आपण वरील गोश्टीचा मनापासुन पुरस्कार करणार्‍या कोणत्याही सामान्य व्यक्तीस भेटा आतुन तो काहीसा जगाला त्रासलेला अन मुक्तिस (मृत्युस) आसुसलेला प्राणिच दिसेल. जो मृत्युस आसुसलेला नाही तो वरील बाबींचा अनाठायी अट्टहास करणारा कधीच दिसणार नाही

तुम्ही लिहिता, "आपल्याला अर्थाशी घेणे आहे" तर ह्या अभंगांचा अर्थ कुठे मिळेल तेही लिहा बुवा. मला २११४ व २११७, दोहोंचाही अर्थ पूर्ण कळला नाही. मी फार वर्षे ऐकत आलोय ज्ञानेश्वरी आणि गाथेची महती. पहिली तर ह्या आयुष्यात तरी समजेल असे वाटत नाही. तुकाराम तुलनेने सोपा म्हणतात तो तरी समजावा असे वाटते.

कोहंसोहं१० 16/06/2020 - 00:58
माझे आवडते काही प्रचलित अभंग हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥ न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥ तुका ह्मणे गर्भवासी । सुखें घालावें आह्मांसी ॥४॥ आम्ही वैकुंठवासी | आलो याची कारणासी || बोलिले जे ऋषी | साच भावे वर्तावया || सध्या वारीचा काळ आहे त्यासाठी खेळ मांडीयेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाईं रे | होतो जयजयकार गर्जत अंबर मातले हे वैष्णव वीर रे | तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे ||

आदेश007 16/06/2020 - 20:01
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु || मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ || भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ || मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ || अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ || तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ ||

In reply to by आदेश007

महासंग्राम 01/07/2020 - 14:46
भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ ||
हा अगदी ओरिजनल अभंग दिलाय तुम्ही, नाहीतर सध्या बऱ्याच ठिकाणी बरेच बदललेले शब्द घातलेले आहेत

स्वधर्म 17/06/2020 - 12:49
तीर्थी धोंडा पाणी , देव रोकडा सज्जनी भगवतगीता, ज्ञानेश्वरी, वेद यातून देव सापडेलही कदाचित, पण ते सर्व पुढल्या तारखेचे धनादेश आहेत. कधी वटतील सांगता येत नाही. तुकाराम संत सज्जन हाच रोकडा देव असल्याचे सांगतात. ही मला तुकारामांची सर्वात आवडलेली ओळ. तीर्थी धोंडा पाणी म्हणणारे तुकाराम, त्यावरच ज्यांचा धंदा आहे, त्यांना कसे आवडणार? त्यांनी प्रचलित अध्यात्म, देवाची संकल्पना याविरुध्द बंड केले, म्हणून ते विद्रोही असे वाटते.

In reply to by स्वधर्म

वाह सुंदर ! हा अभंग क्रमांक ११४ आहे : ११४ तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥ मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥ तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥ तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥
तीर्थी धोंडा पाणी म्हणणारे तुकाराम, त्यावरच ज्यांचा धंदा आहे, त्यांना कसे आवडणार? त्यांनी प्रचलित अध्यात्म, देवाची संकल्पना याविरुध्द बंड केले, म्हणून ते विद्रोही
बाकी आपण ११३ वा अभंग जरुर वाचुन पहा नक्की आणि आपले काही मत बदलल्यास कळवा! तळटीपः मला कोणालाही काहीही पटवुन द्यायचे नाही की वादविवाद करयची इछा नाहीये (नाहीतर तसे ११४ सोबत ११३ कॉपीपेस्ट करुन इथे टाकणे अवघड नव्हते). तुकोबा आभाळायेवढे मोठ्ठे आहेत, ज्याला जितके जसे भावतील त्याने तितके तसे घ्यावेत ! पांडुरंग पांडुरंग _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 17/06/2020 - 18:19
वाचला. खरे तर त्यात पंढरीचा महिमा सांगितला आहे. तसाच आणखी एक म्हणजे, जयाचिये घरी | पंढरीची वारी. किंवा आावा चालली पंढरपुरा हा एक दुसरा. मला वाद घालण्यात काही रस नाही, पण अनेक गाथा, ग्रंथ यात, परस्परविरोधी वचने संदेश असतातच. सॅम हॅरीस यांनी असा बायबलमधील परस्परविरोधी वचनांचा अभ्यास केला आहे, आणि आक्षेपही घेतले आहेत. आपल्याकडेही राजीव साने यांनी गीतेमधील अशा वचनांची उदाहरणे दिली आहेत. यू ट्यूबवर त्यांची गीतेबाबतची मालिका आहे. असो. माझ्या दृष्टीने तुकाराम हे अलौकिक प्रतिभावंत आणि कमालीचे प्रामाणिक संत आहेत. त्यांचा भक्तीमार्ग मात्र मला भावत नाही. ११३ वा अभंग सर्वांसाठी पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥ आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥ तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥

In reply to by स्वधर्म

:) ११३ आणि ११४ एकत्रित वाचल्यावर "पंढरीपुढे अन्यतीर्थे काहीही कामाची नाहीत " असा अर्थ लागतो , म्हणजे किमान मला तरी. हे तुकोबांच्या अनन्य भक्तीचे लक्षण वाटते , कोणत्याही प्रकारचे बंड किंव्वा विद्रोह मला तरी दिसत नाही ह्यात! बाकी वाद विवाद करण्यात आता मलाही रस उरला नाहीये कोठेच, ज्याला जे भावते ते त्याने घ्यावे . :) तुम्ही ११३ वा अभंग दिल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद _/\_ 3414 नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥1॥ आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥ येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥2॥ मागे आजिवरी । जालें माप नेलें चोरी॥3॥ सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकन ॥4॥ पडों नेदी तुका । आड गुंपूं कांहीं चुका ॥5॥ पांडुरंग पांडुरंग !!

जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥1॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥2॥ देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्निचिया सृष्टी चेविल्या जेवीं ॥2॥ तुका ह्मणे ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥4॥ पांडुरंग पांडुरंग

तेजस आठवले 26/06/2020 - 20:27
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे दोनही जणू अप्रतिम तेजाने तळपणारा रत्नेच आहेत. माझा आवडणारा अभंग म्हणजे भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥ पौर्णिमेचा चन्द्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥१॥ दिवाळीच्या मुळा लेकि आसावली, पाहतसे वाटूनी पंढरीसी ॥२॥ भुकेलिया बाळ अति शोक करी वाट पाहे परी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा ॥४॥ तसंच आम्ही जातो आमुच्या गावा हे ही पद अत्यंत आवडीचे. अजूनही बरेच अभन्ग आवडतात इतिहासातल्या प्रत्येक गोष्टीत जातीभेद आणून बघा "ह्यांनी" कसा तुमच्यावर अन्याय केला हे क्षणोक्षणी ओरडून सांगणे हाच बऱ्याच जणांचा धंदा आहे. आणि "ते" विशिष्ट् लोक वरणभात, गूळतूप पोळी खाणारे असले की त्यान्च्याकडून शारीरिक तर दूरच, पण शाब्दिक प्रतिक्रिया पण येणार नाही हे अशा अजेन्डाधारकांच्या पथ्यावरच पडते. हेच लोकं देवळे फोडणाऱ्या आणि सर्व जातींतील हिंदूंना बाटवणाऱ्या आणि त्यातच आपला धर्म बघणार्यांशी पडद्यामागे संधान बांधून असतात. तीनशे वर्षांपूर्वी काय घडले ह्याचा कुठलाही पुरावा नसताना आताच्या काळात काही विशिष्ट जातींना लक्ष करणे आणि धाकटपशा दाखवण्यासाठी रिकामटेकड्यांची फौज कामी लावणे ह्यात काही लोक माहीर आहेत. आपल्या मिपावर पण संत रामदासांना आदिलशाहाचे हेर आणि स्वराज्याचे शत्रू म्हणणारे दिवटे होतेच की. आता काही संघटनांचा हा उघड उघड अजेन्डा आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने ही चर्चा पुढे जाऊ नये. अशांसाठी कदाचित खालील अभंग लागू पडावा काय? जाळे घातले सागरी । बिंदु न राहे भीतरी ॥१॥ तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥ गाढव गंगेसी न्हाणिले । जाउनि उकरड्यावरी लोळे ॥२॥ तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥ प्रीती पोसिले काउळे । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥ तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥ माझ्या वाचनाप्रमाणे, मोरे घराण्याचा पिढीजात सावकारीचा धंदा होता आणि सर्व पिढ्यानी तो उत्तम चालवला. तुकारामांनीही तो उत्तम प्रकारे चालवला. पण पुढे दुष्काळात येणेकर्यांनी पाठ फिरवली आणि देणेकर्यांचे देणे द्यावे लागले तसेच दुष्काळातले लोकांचे हाल पाहून तुकारामांनी धान्याची कोठारे खुली केली. एकूणच विषण्णता आणि आत्यंतिक निराशेचा तो काळ. त्यातच पहिली पत्नी आणि अपत्याचा मृत्यू ह्यामुळे झालेले दुःख पाहता तुकारामांना किती सोसावे लागले ह्याची कल्पना करून पाहावी. ह्या अशा प्रतिकूल परिस्थितीतूनच उदारमतवादी विचारांचा श्लोकांवाटे सुंदर विसर्ग झाला असावा.

१५ आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥ तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥

माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥1॥ आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥ वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन जालों देवा ॥2॥ तुका ह्मणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥3॥

In reply to by प्रसाद गोडबोले

राघव 16/08/2021 - 11:03
नमन. उगाच काही गोड शब्दांत सांगणे वगैरे नाही.. बुवांचे अभंग म्हणजे.. अगदी सरळसोट भाषा आहे! सटासट थोतरीत बसतात. मनाला असं अगदी गदगदा हलवून जागं करण्याचा अनुभव येतो! खूप खूप धन्यवाद!

वेळ आल्यास देवालाही ठणकावायला मागे पुढे न बघणारे तुकोबा आपले आवडते आहेत. सरळसाधा संसारी माणुस ठरवले तर परमार्थात कशी प्रगती करु शकतो याचे रोकडे उदाहरण म्हणजे तुकोबा. येउद्या अजुन अभंग

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गॉडजिला 16/08/2021 - 19:11
सहमत... केवळ भौतिक कौशल्यधारीत लाभ मिळवायला विशेष उपयोग होत नाही अन अध्यात्मिक लाभासाठी हाच एक पर्याय असेही नाही म्हणुनच मी नाईलाजाने अभंग वाचन बंद केले... अन्यथा एक एक ओळ, त्यातून सूचित होणारा अर्थ, तो वाचून मनात उठणारे ज्ञानाचे काहूर अन डोळ्यात विठ्ठलाची मूर्ती तरळल्याने आपसूक जोडल्या जाणाऱ्या हाताची न थांबणारी थरथर, आजही नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच येतात... डोळ्यातून आनंदाश्रू घळा घळ वाहायला सुरुवात होते, मग मनाने माझा मी रहात नाही अन् विठ्ठलाचा मी होत नाही, अशा त्या शब्दात व्यक्त न करतां येण्या जोग्या अवस्था आयुष्यात फार मोठी अनुभूती देऊन जातात... पण आजही जेंव्हा कोणाच्या तोंडून अथवा लेखणीतून मी महाराजांचे अभंग बघतो, मला माझ्या अनुभूतीला पोरके झाल्याचा फिल येतो

राघव 16/08/2021 - 21:23
एक एक ओळ, त्यातून सूचित होणारा अर्थ, तो वाचून मनात उठणारे ज्ञानाचे काहूर अन डोळ्यात विठ्ठलाची मूर्ती तरळल्याने आपसूक जोडल्या जाणाऱ्या हाताची न थांबणारी थरथर, आजही नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच येतात... डोळ्यातून आनंदाश्रू घळा घळ वाहायला सुरुवात होते, मग मनाने माझा मी रहात नाही अन् विठ्ठलाचा मी होत नाही, अशा त्या शब्दात व्यक्त न करतां येण्या जोग्या अवस्था आयुष्यात फार मोठी अनुभूती देऊन जातात...
अतीव सुंदर! _/\_

In reply to by राघव

गॉडजिला 16/08/2021 - 21:56
मी वरील प्रतिसाद काल्पनिक लिहला आहे, थाप मारली आहे. मला असे काही होत नाही, प्रतिसाद फक्त हे सिध्द करायला लिहला की माझे बुड स्वांत सुखात लोळत आहे अशी बतावणी मी आत्ता पासून पुढील वीस हजार वर्ष पिढ्यान पिढ्या चालू ठेवू शकतो... आणि लोकांच्या भक्तिभावनेला साद घालून त्यांची, माझी, देवाची अन सर्वांची अशी फसवणूक, प्रसंगी पिळवणूकही सहजी करु शकतो. आणि तरीही चार चौघात माझे बुड स्वांत सुखात गेली वीस हजार वर्षे पिढ्यान् पिढ्या लोळत आहे असे निर्लज्ज्जपणे मिरवूही शकतो आणि इतरेजन माझ्या या थापांना सहजी बळी पडू शकतात, माझे विवेचन सत्य मानू शकतात प्रसंगी जगण्याचे ते प्रमाणही बनू शकते... मी स्वतःला एक नंबर घोषित करु शकतो . पण वस्तूता ही सर्व माझी बोलबच्चन आहे, स्वतःची व इतरांची फसवणुक, पिळवणूक अथवा इतर काही हेतू साध्य करायला लीहलेली...

In reply to by गॉडजिला

राघव 17/08/2021 - 15:40
ठीक आहे. थाप असो किंवा नसो. पण जर हा अनुभव कुणाचा खरा असला तर? त्याच्यासाठी ही थाप ठरत नाही. :-) आणि शेवटी कशातून काय घ्यायचे हे ज्याचे त्याने स्वतः ठरवायचे असते. कुणी सांगून विशेष फरक पडत नसतो. मला तुकोबांच्या अभंगांतून तळमळ जाणवते, जी अक्षरशः काळजाला भिडते. स्तिमित करते. त्यांना आलेले अनुभव आपल्यालाही मिळावेत हा अट्टाहास कशासाठी असणार? जास्तीत जास्त असे वाटू शकते की आपल्या साध्यासाठी [ मग ते कोणतेही असो! ] तशी तळमळ आपल्या चित्तवृत्तीत उतरावी. बाकी जो प्रदेश माहीतच नाही त्याबद्दल आणिक काय बोलणार? इत्यलम्.

शाम भागवत 17/08/2021 - 19:21
अन्यथा एक एक ओळ, त्यातून सूचित होणारा अर्थ, तो वाचून मनात उठणारे ज्ञानाचे काहूर अन डोळ्यात विठ्ठलाची मूर्ती तरळल्याने आपसूक जोडल्या जाणाऱ्या हाताची न थांबणारी थरथर, आजही नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच येतात... डोळ्यातून आनंदाश्रू घळा घळ वाहायला सुरुवात होते, मग मनाने माझा मी रहात नाही अन् विठ्ठलाचा मी होत नाही, अशा त्या शब्दात व्यक्त न करतां येण्या जोग्या अवस्था आयुष्यात फार मोठी अनुभूती देऊन जातात...
खरोखरच अतिसुंदर अवस्था असते ती. तृप्तता इतकी काठोकाठ भरलेली असते की बस्स्. सगळीकडे मांगल्य भरलेले असते. त्यावेळेस मी फक्त आणि फक्त विठ्ठलाचा असतो. त्याच्याशिवाय मला दुसरं काहीहि नको असतं. कारण दुसरं काही हवंस वाटायला अतृप्तिच शिल्लक राहिलेली नसते. असो.

🙏

In reply to by शाम भागवत

शाम जी , राघवा , मला तुमचं मनापासुन कौतुक वाटतं ! गॉडजिला ह्यांनी जाणीवपुर्वक थाप मारली आहे , तुमचा श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले आहे हे त्यांनी कबुल करुनही तुम्ही त्या लेखनात चांगले तेच शोधता ! हे असं वाईटातुन चांगलं शोधता आलं पाहिजे , हा असा नीरक्षीरविवेक असायला हवा ! सादर दंडवत स्वीकारा आमचा ! बाकी सगळ्यांनाच अनुभव येईल असे नाही , रादर साधनेच्या पहिल्या पायर्‍यांवर अनुभव नसतो तेव्हा चिकाटीने गुरुनिष्ठेने साधना करत रहाणे हाच एक उपाय आहे ! ह्या बाबतीतही तुकोबांचा खुप सुंदर अभंग आहे >>> अनुभव तो नाहीं अमुचिया दरषणें । अइकिलें कानें वदे वाणी । जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । ह्मणतां मांडे पुरी काय होतें ॥1॥ नाहींनाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरिहरा चाळविलें ॥ध्रु.॥ पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येइल मानूं । अंतरीं सबाह्यी कां नाहीं सारिखें । धरूनि पारिखें वर्त्ततसां॥2॥ आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडतयास काय द्यावें । तुका ह्मणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुह्मी कोठें॥3॥ बाकी ह्या भक्तीमार्गाचे एक उत्तम आहे , इथे खोटे बोलुन , थाप मारत जरी देवाची आठवण काढली तरीही सद्गतीच लाभते !! आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरि स्मरला नाहीं तुज ॥1॥ प्राण जातेवेळे ह्मणे नारायण । त्यासाटीं विमान पाठविलें ॥ध्रु.॥ बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥2॥ तुका ह्मणे भक्तकाज तूं कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥3॥ पांडुरंग पांडुरंग ______________________/\_______________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 17/08/2021 - 22:34
तुम्ही तर माझ्या मनातले विचारच लिहुन काढले. तुम्ही जो प्रतिसाद लिहलात नेम्का तसाच विचार करायला लोक बांधलेले असतील, नाही तसे घडले तर कोणितरी येउन त्यांना उपदेशांम्रुत पाजुन त्यांना बांधुन जाइल व माझ्या थापा त्यांच्या अंतकरणाचा अविभाज्य भाग बनतीलच हे उमजुनच माझे थाप मारायचे मन झाले आणी महत्वाचे म्हणजे मी थाप मारली हे उघड बोलायचे धाडसही झाले

In reply to by गॉडजिला

चला , येथील लोकांचा सात्विक भाव पाहुन तुमचेही मन परिवर्तन होत आहे पाहुन खुप आनंद झाला . २ कडुन १ कडे प्रवास सुरु झालेला पाहुन खरेच धाग्याचे सार्थक झाल्याचे वाटले ! नाहीतर काहीकाही लोकं असे असतात की त्यांना कितीही सांगितलं तरी कळत नाही अन वळतही नाही ! अशा लोकांविषयी तुकोबा म्हणतात : किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥1॥ शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥ नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥2॥ तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥3॥

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 17/08/2021 - 22:49
आम्हाला कोणी काय समजावे हे ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबुन असल्याने आमच्या थापा तुम्हाला आनंद देतात व पुढिल विस हजार वर्षे आनंद देतच राहतील यात तुम्हीही सामाविश्ट होणार हे हे माहित असल्याने... गड्या आम्ही पर्फेक्ट दोनच बरे रे बाबा... १ वाल्यांच भामटेपणा जास्त झेपणार नाही म्हणुन लगेच सत्यही बोलुन मोकळा झालो

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 17/08/2021 - 22:57
एखादा प्रभावी वाटु लागला भलेही विरोधक भासला तरी त्याला लगेच आपल्यातलाच म्हणुन जाहीर करतात... आमचीच री ओढतोय कोकलत सुटतात, वस्तुतः भामटे फक्त भामटे असतात... त्यांचा परमार्थ स्वार्थाशी जोडलेला असतो आणी म्हणुन जे जे खरे संत होउन गेले, दिव्य पुरुष होउन गेले त्यांना ते सर्वात आधी जवळ करतात सामान्य सद्गुणी श्रध्दाळु लोकांचा बुध्दीभ्रम करण्यासाठी

In reply to by प्रसाद गोडबोले

शाम भागवत 18/08/2021 - 07:44
हे असं वाईटातुन चांगलं शोधता आलं पाहिजे
मला वाटते माझ्या अनुभवाच्या विरोधात जाणारा भाग मला जाणवला तो मी स्पष्ट केला. फक्त त्या अगोदर माझ्या अनुभवाला दुजोरा देणारा भागाशी सहमती दाखवली. श्रध्देच्या जोरावर किंवा तर्काच्या जोरावर अध्यात्माचा अभ्यास करताना श्रध्दा दुखावणे हा प्रकार असू शकतो. राग येऊ शकतो. जोरदार प्रतिवाद करावासा वाटतो. पण अनुभवाच्या आधारे व तीही सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल चालू असताना हे सगळे प्रकार अगदी हलक्या हाताने बाजूला करून वाटचाल चालू ठेवता येते. हे सगळे बाजूला करताना त्या हातालाही काही चिकटत नाही तर मनाला काय होणारेय? त्यामुळे काळजीच नसते. स्वान्त सुखाय असंही काही नसतं. फक्त वाटचाल असते. कोणीतरी वाट कशी आहे या बाबत बोललेले असते त्यात काही वेगळं वाटलं तर, फक्त त्याबद्दल दोन शब्द उच्चारून थांबायचं इतकच. ज्याला कळायचं त्याला कळतं. असो. _/\_

In reply to by शाम भागवत

गॉडजिला 18/08/2021 - 08:17
तयारी झाली की सदगुरु आपणास लवकरच जे जसं आहे तसंच स्विकारायची दिक्षा देतिल तोवर धिर धरावा. अन्यथा थोरामोठ्यांच्या रचना आपल्या बुध्दिच्या कक्षेत सोडवायच्या मोहजालात असे फसाल की गुरु एक दीवस मलाच आपल्या समोर उभे करतील. _/\_ अर्थात कोणी काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही, मी फक्त आपलं एक निरीक्षण नोंदवले.

गॉडजिला 17/08/2021 - 22:43
तुमचा श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले आहे हे त्यांनी कबुल करुनही तुम्ही त्या लेखनात चांगले तेच शोधता
मी श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले नाही. मी फक्त खोटेनाटे श्रध्देने लिहुन कोणीही श्रध्दावान लोक त्याचे बळी ठरु शकतात इतकेच प्रतिपादीत केले आहे.

In reply to by गॉडजिला

शाम भागवत 18/08/2021 - 07:25
तुम्ही प्रामाणिक आहात हे मागेच बोललो आहे. तुम्ही पोलीसासारखे काम करत आहात हेही बोललोय.
मी श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले नाही.
त्यामुळे सहमत आहे.
मी फक्त खोटेनाटे श्रध्देने लिहुन कोणीही श्रध्दावान लोक त्याचे बळी ठरु शकतात इतकेच प्रतिपादीत केले आहे
हे पोलीसांचे कामच आहे. एखादा माणूस चांगला आहे याची खात्री पटेपर्यंत त्याला चोर समजायचे असते, ही पोलीसांची पध्दत असते. तेही बरोबर आहे. पण प्रामाणिक पोलीस एखादा माणूस चांगला आहे हे कळल्यावर त्या माणसाप्रतीचे वर्तन आमूलाग्र बदलतो. असो. जास्ती लिहीत नाही. कारण मलाच विषय वाढवण्यात रस नाही. माझी श्रध्दा कुणी दुखवू शकेल, असे आता मलाच वाटत नाही. _/\_

In reply to by शाम भागवत

गॉडजिला 18/08/2021 - 08:09
असे स्वतापुरते मर्यादीत रहाय्चे प्रतिसाद कुचकामी नसले तरी उपयोगी देखिल नाहीत. असो, मराठीत सांगायचे तर मला कोणाचीच श्रध्दा बदलवायची नाहीये... मि फक्त भामट्यांच्या कार्यपध्दतीवर प्रकाश टाकला आहे. एखाद्याची श्रध्दा समुळ भेदणे हा डाव्या हातचा मळ आहे, म्हणुनच मी ते लिलया पुन्हा पुन्हा केलेही असते. पण त्यातुन साध्य काय ? श्रध्दा नाहीसी झाल्याने एखादा सुखि होइल का ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही म्हणुन ओशो सारख्यांचा तो उद्योग मी निरुद्योगासमान मानतो. इथे मि फक्त भामट्यांच्या कार्यपध्दतीवर प्रकाश टाकला आहे.
प्रामाणिक पोलीस एखादा माणूस चांगला आहे हे कळल्यावर त्या माणसाप्रतीचे वर्तन आमूलाग्र बदलतो. असो.
प्रमाणिक पोलीस मी नाही. मी तर प्रवृत्तिने पोलीसही नाही. मी एक भामटा आहे. माझे सर्वात जास्त वापरलेले गेलेले कौशल्य कोणते तर भामटेगीरी. अन्यथा माझे रोजगाराचे वांदे झाले असते... भामटेगीरी केलि नाही तेंव्हा मी बेरोजगारी अनुभवली आहेच. मग म्हटल आता हेच करायचे.

In reply to by शाम भागवत

शाम जी, कदाचित तुम्हाला ह्या गॉडजिला ने चालवलेल्या प्रकाराबद्दल , म्हणजे खोटे बोलणे , थापा मारणे , पोलिसगिरी वगैरे वगैरे वितंडवादामागील संदर्भ माहीत नसावा म्हणुन इथे देऊन ठेवतो : माझ्या एका लेखात मी म्हणालो होतो की : भारतातील हिंदु समाजा मध्ये ढोबळमानाने दोन गट आहेत , एक ज्यांना २५०० -३००० वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे, ज्यात साहित्य आहे संगीत आहे कला आहे तत्वज्ञान आहे उपनिषदे आहेत आनंद आहे ८०० १००० वर्षांचा अस्तित्वाचा संघर्ष आहे आणि त्या संघर्षात टिकुन उरलेले तावुन सुलाखुन निघालेले साहित्य आहे ! आणि दुसरा गट आहे की ज्यांच्यासाठी इतिहास म्हणजे केवळ शोषणाचा इतिहास आहे. अन नजिकचा २०० वर्षाचा इतिहास आहे ज्यात पाश्चिमात्य तत्वज्ञानाशी ओळख झालेली आहे अन नवीन निहिलिस्टिक विचारधारा पुन्हा उमगायला लागली आहे ! आता पहिल्या गटाला दुसर्‍याच्या आनंदाच्या व्याख्या कळणार नाहीत अन दुसर्‍याला पहिल्याचा कळणार नाहीत ! न कळो बापडे, आपण आधीच म्हणालो तसे - आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे ! आणि नंतर माझ्या जे लक्षात आलं की गॉडजिला हे गट क्रमांक २ मधील आहेत ते मी त्यांच्या निदर्शानास आणुन दिले. त्याचा त्यांनी राग धरलाय, तेव्हा पासुन माझ्या प्रत्येक लिखाणावर जाऊन असंबध्द प्रतिसाद देत असतात ! असो. आपल्याला काय फरक पडतो! बाकी गट क्रमांक २ मध्ये असण्यात वाईट काय , त्याने इतका राग का यावा हे मला अजुन तरी कळलेले नाही. असो. सत्य आह्मां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥1॥ ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥ देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥2॥ तुका ह्मणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें॥3॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 18/08/2021 - 10:28
आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे ! बरोबर माऊली एवढं लक्षात ठेवलं की माणूस माणसात येतो आणि समाज म्हणून एवढे कळायलाच पाहिजे.

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 18/08/2021 - 10:28
आपल्याला न दिलेल्या प्रतिसादांवरही आपण वरील गैर्समज मनात धरुन अधुन मधुन परफेक्ट दोन, २ असे रिप्लाय मला दिले आहेत. मी तर आपल्याशी काय बोलणे झाले हे विसरुन गेल्याने पुन्हा पुन्हा २ म्हण्जे काय आपला प्रतिसाद समजला नाही जरा विस्तारुन लिहता का असे विनवले आहे, त्यांमुळे विनाकारण असंब्ध्दता जि आपण विवीध ठिकाणी घुसडलीत याला मी न्हवे तुमची कोती मानसिकता कारणीभुत आहे याची नोंद घ्यावी. बाकी तुम्हाला हवा तो गैर्समज बाळगायला तुम्ही मुक्त आहात

In reply to by प्रसाद गोडबोले

शाम भागवत 18/08/2021 - 10:28
मी तुम्हा दोघांचे सर्व संवाद शांतपणे वाचलेले आहेत. पण कोणाचे विचार बदलायचे हे माझे उद्दिष्ट नसल्याने किंवा जो कोणी मार्ग अनुसरत आहे त्याला एखादा पर्याय सुचवायचा माझा कोणताही प्रयत्न नसतो. मी फक्त माझ्या अनुभवातून जे शिकत आहे ते मांडण्यासारखे असल्यास व कोणालात॑री उपयोग होईल असे वाटल्यास मांडतो. थोडक्यात, माझा संतावर विश्वास आहे. निहिलिस्टिक वगैरे विचार तुकारामांच्या किंवा ज्ञानेश्वरांवरांच्या विचारावर मात करतील असे मला वाटत नाही. त्यामुळे माझा पास. मला वाचनाचे अनोनात वेड. त्यातून अध्यात्मिक वाचनाची पण गोडी लागली. पण १९९४ साली मला सत्गुरूंनी अध्यात्मिक वाचनाची बंदी केली व नामस्मरणावर भर द्यायला सांगितला. त्यानंतर आजतागायत मी अध्यात्मिक काहीही वाचत नाही. वाचनाने माहितीचा साठा वाढतो हे आता अनुभवाने कळले आहे. तर ज्ञान आतच असते त्यामुळे बाहेरून काहीही मिळवायचे नसते व मिळतही नाही हेही चांगलेच कळले आहे. हे आतील ज्ञान नामस्मरणाने खुले होते असा अनुभव असल्याने ती वाटचाल चालू ठेवली आहे. अपवाद फक्त २००७-२००८ मधला दीड वर्षांचा कालावधी. ज्या कालावधीत मी जिवनविद्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायला सांगितला म्हणून केला. त्याबाबतचा उल्लेख मी अप्रिय आठवणींपासून सुटका मधे केला होता. त्यावेळेस लिहावेसे वाटत होते म्हणून लिहिले. पण शुभचिंतना ऐवजी समोर पहा किंवा गांजा ओठा वगैरे पर्याय पुढे यायला लागल्यावर टंकाळा यायला लागला. खरे तर दुसर्‍या भागात, आपल्या स्मृतीवरील मी व माझे याचे ओझे कमी झाले की विचार कसे सुसंगत होतात हे लिहिणार होतो. इतकेच नव्हे तर आपले विचार किती आमुलाग्र बदलात हे माझ्याच अनुभवावरून तिसर्‍या भागात लिहिणार होतो. पण थांबायचे ठरवले. असो. प्रतिसाद धाग्याशी संबंधीत असावा व तो माझ्या अनुभवाशी प्रत्यक्ष वागण्याशीही संबंधीत असावा म्हणून तुकोबांचा एक अभंग देऊन माझा सहभाग थांबावायचा विचार आहे. वाचन थांबवूनही मला माझी प्रगती होत आहे असे वाटते याचे कारण मला वाटते तुकोबांचा हा खालील अभंग आहे. न कळे ते कळो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न दिसे ते दिसो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न बोलो ते बोलो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न भेटे ते भेटो येईल आपण | करिता चिंतन विठोबाचे || अलभ्य तो लाभ होईल अपार | नाम निरंतर म्हणता वाचे || तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावे | तरतील नावे विठोबाच्या ||

🙏

In reply to by शाम भागवत

गॉडजिला 18/08/2021 - 10:35
माझा संतावर विश्वास आहे. निहिलिस्टिक वगैरे विचार तुकारामांच्या किंवा ज्ञानेश्वरांवरांच्या विचारावर मात करतील असे मला वाटत नाही. त्यामुळे माझा पास
जेब्ब्बात भागवत जी... पण यावर भामटे मात करत आलेत व राहतील. आपण शक्य तेव्हडे भामटे ओळखायचे व त्यांच्या बोलबच्चन पासुन इतरांच्या मनात विष कालवायच्या प्रवृत्तीपासुन स्वताला वाचवायचे इतकेच काय ते आपल्या हातात आहे.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 08/09/2021 - 10:51
न कळे ते कळो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न दिसे ते दिसो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न बोलो ते बोलो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न भेटे ते भेटो येईल आपण | करिता चिंतन विठोबाचे || अलभ्य तो लाभ होईल अपार | नाम निरंतर म्हणता वाचे || तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावे | तरतील नावे विठोबाच्या ||
यावर बाबा बेलसरेंनी सुंदर निरूपण येथे केले आहे.

In reply to by शाम भागवत

यावर बाबा बेलसरेंनी सुंदर निरूपण येथे केले आहे.
नक्की ऐकतो. बेलसरे सरांचा खुप मोठ्ठा फॅन आहे मी ! त्यांची संवाद शैली अफलातुन आहे ! इतक्या सोप्प्या भाषेत सांगणारे अजुन कोणीच मला माहीत नाही , एक गोंदवलेकर महाराज आहेत पण बेलसरे सर आणि गोंदवलेकर महाराज्यांच्यात अद्वैत झालेले दिसते , बेलसरे सरांच्या मुखातुन खुद्द महाराजच बोलत आहेत असे वाटते ! ह्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग यायला पाहिजे होता ! आजच आलोय सातार्‍यात, आता गोंदवल्याला एकदा जाऊन हे महाराजांना सांगुन येतो !

In reply to by Bhakti

गॉडजिला 18/08/2021 - 10:32
आमचे बंधु मार्कस मात्र आमचेबाबत विनाकाराण आकस जाहिर करत फिरत असतात, नक्कि ते का चिडतात ते त्यांना समजले तरी माझ्यासाठी आनंदाचा दिनु असेल

In reply to by गॉडजिला

कसला आलाय आकस =)))) तुमचा एकही प्रतिसाद उपयोगाचा नाहीये . तुम्ही तुम्हाला आवडलेला एकही तुकोबांचा अभंग दिलेला नाहीये . केवळ खोटे बोलणे , थापा मारणे , पोलीसगीरी , भामटेगिरी वगैरे असंबध्द बरळत आहात . तुम्ही म्हणजे अगदीच गट क्रमांक २ मधील असल्याचे सारखे सारखे दाखवुन देता बुवा ! बाकी आपण धाग्याचे वर्गीकरण पाहिले तर ते " काथ्याकुट" असे नसुन "लेख" / "जनातलं मनातलं" असे आहे. त्यामुळे तुम्ही तुकोबांचे तुमचे आवडते अभंग , त्यातुन तुम्हाला उमगलेला अर्थ दिलात तर आनंद होईल , बाकी सगळे असंबध्द प्रतिसाद "पोलिसगिरी अन भामटेगिरी " वगैरे वगैरे वितंडवाद प्रतिसाद कचरा काहीही उपयोगाचा नाही. सदर प्रतिसाद हटावले जावेत अशी मी संपादकांना विनंतीही केलेली आहे, पण बहुतेक ते सध्या सुट्टीवर असावेत तस्मात ह्या कोपर्‍यात लावलेल्या ज्ञाबोबा तुकोबांच्या फोटोवर जळमटे जमली आहेत ! योग्यवेळी निरथक २ नंबरी प्रतिसादांचा कचरा हटवला जाईल असा माझा ठाम विश्वास आहे ! नाही गेला तरी हरकत नाही , तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || =)))) _____________/\____________

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 18/08/2021 - 11:08
तसे आमचे बंधु मार्कस भौ फार सैरभैर झाल्यासारखे लिखीत होत आहेत असे वाटते त्यांनी बहुतेक माझा डेमो फार वैयक्तीक घेतलेला दिस्तो. खरे तर त्यांना प्रतिसादही दिलेला न्हवता, भामट्यांना भामटे म्हटल्याने त्यांना नेमके कुठे त्रास झाला समजले तर औषध तरी काय द्यावे याचा विचार करता आला असता पण सध्या ते त्यांची जखम दाखवायच्या मनस्थितीतही दिसत नाहीत.. ते लवकर शांत होवो व मला त्यांच्या जखमेवर मलम लावुन त्यांची वेदनामुक्ती करायचे सदभाग्य लाभो हीच कालीमातेच्या चरणी माझी प्रार्थना आहे... त्यांना यत्र तत्र सर्वत्र प्रतिसादात (जे त्यांना दुरुनही दिलेले नाहीत) तिथे मिच दिसत आहे हे भाग्य म्हणावे की दुर्दैव की त्यांचा केमिकल लोच्या हे कोडे ते बरे झाल्याखेरीज सुटेल असे मला आता वाटत नाही. मार्कस माय ब्रदर from another mother गेट वेल सुन भाउ. काळजी भासु लागली आहे.

गॉडजिला 18/08/2021 - 11:22
सदर प्रतिसाद हटावले जावेत अशी मी संपादकांना विनंतीही केलेली आहे, पण बहुतेक ते सध्या सुट्टीवर असावेत तस्मात ह्या कोपर्‍यात लावलेल्या ज्ञाबोबा तुकोबांच्या फोटोवर जळमटे जमली आहेत ! योग्यवेळी निरथक २ नंबरी प्रतिसादांचा कचरा हटवला जाईल असा माझा ठाम विश्वास आहे !
मला शक्य असतं तर माझ्या हाताने हे पुण्यकर्म केले असते... तुर्तास माझे प्रतिसाद हटवण्यास अनुमोद्न आहे अशी निसंधिग्द खात्री बाळगावी. आमचे बंधुंच्या आनंदासाठी अधिकारी व्यक्तीनी त्यांची विनंती तत्काळ अमलात आणावी... फक्त आम्हाल २ म्हनायचा उद्योग आपण केलाच आहे त्याच्या वरताण परत २-१ करुन आम्हाला पुन्हा १ च्या जवळ न्यायचा जो जावइ बाणा आपण दाखवलात तो ऐतिहासीक आहे हे नक्कि. पण गड्या आम्हाला पर्फेक्ट दोन मधेच राहुद्या ही विनंती वर केली होतीच ती विसरला असाल तर पुन्हा एकदा ती विनंती हात जोडुन हा सेवक आपल्याला करतो आहे_/\_

गॉडजिला 18/08/2021 - 11:55
मार्कस ऑरेलियसजी मी या ध्याग्यावर चुकलोच तुम्हाला समजूनच घेतलं नाही मी. माझ्या सारखा करंटा मीच हेचं काय अंतिम सत्य बाकि सर्व झूठ... दादा मी स्वतःला भामटा बनवल्याने तूझ्या मनाला इतक्या यातना होतील याची मला जराशीही कल्पना न्हवती रे, आपण माझ्यावर इतके प्रेम करता की मी स्वतःला भामटा बनवल्यांने तुम्हाला असह्य त्रास होहून माझे प्रतिसाद तूम्ही संपादकाकडून उडवून लावायला गेलात ? तुमचे निर्मळ मन, निर्व्याज प्रेम बघून माझे अंतकरण गलबलून गेले आहे. तुकोबा आपण वाचले आहात आसे न्हवे तर अनुभवत आहात असेच आता राहून राहून म्हणावेसे वाटते.... चल बस कर पागले अब रुलायेगा क्या ? (झालं गेलं विसरून जाऊ एक नवी सुरुवात करु असे वाचावे) मेरे सारे प्रतिसाद इस धागेसे तत्काल उडा दिये जाय अशी माझी मनापासून हातजोडून विनंती आहे... माझ्या बंधूंच्या दुख्खास मी कारणीभूत झालो, आता मी तीर्थयात्रा करेन तेंव्हाच या पापातून मुक्त होईन अशी प्रतिज्ञा मी समस्त मिपाकरांच्यासाक्षीने करत आहे...

राघव 18/08/2021 - 13:46
बापरे.. काय ती चर्चा. :-) पण त्यानिमित्तानं आणिक काही खटांसि खट असे तुकोबांचे अभंग वाचायला मिळालेत! असो. जगात भामटे असणारच आणि त्याला माझ्यासारखे सामान्यजन बळीही पडणारच. अहो साक्षात ठाकुरांनाही ते चुकलेले नाही, त्यात माझ्यासारख्यांची काय हो कथा! पण एके ठिकाणी ठाकुरच स्वतः सांगतात, "ब्रह्म अजून उष्टे झालेले नाही". म्हणजे कुणालाही त्याचे शब्दांत वर्णनच करता आलेले नाही. ते अक्षरशः अवर्णनीय आहे! आता कुणी भामटा या तत्वाबद्दल काही बोलायला जाईल सुद्धा, तर काय बोलेल? जे काही त्याबद्दल थोरामोठ्यांनी लिहिलंय/सांगीतलंय तेच ना? मग त्यानं विशेष अपाय होत नाही. अपाय तेव्हा होईल जेव्हा तो विरुद्ध मत व्यक्त करेल आणि तेदेखील पटण्यायोग्य असेल. दोन्ही बाजू बरोबर वाटून गोंधळ उडून, बुद्धीभेद होईल/होऊ शकेल. अशावेळेस आपण विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न येतो. विश्वास डळमळला की भक्तीमार्गात पुढे जाणेच अशक्य. इथं बुद्धीभेद करणार्‍याचा दोष कमी असून बुद्धीभेद करून घेणार्‍याचा दोष जास्त आहे! असो. बाकी, कसोटीचा प्रसंग आल्यावर आपला विश्वास किती दृढ आहे ते आपले आपल्याला जाणवतेच. त्यामुळे ज्याने त्याने आपापली पायरी ओळखावी आणि वृत्ती अंतर्मुख ठेवून आपल्यातले दोष बाजूला करण्यास वेळ द्यावा हे ईष्ट. इत्यलम्

आपले संत नक्की संत कसे झाले, ने नक्की काय वाचन करत होते ह्या विषयी फार म्हणजे फार कमी माहीती उपलब्ध्द आहे. तरी समर्थांनी दासबोधात लिस्ट देऊन ठेवली आहे संदर्भ ग्रंथांची पण बाकी अन्य संत काय वाचत होते ह्या विषयी काहीच माहीती नाही . (कदाचित आपला अभ्यास कमी आहे.) आज एक तुकोबांचा अभंग सापडला अन त्यावरुन असे वाटले की तुकोबांनी अमृतानुभव वाचला असावा . ( अर्थात हा एक अंदाज आहे , कोणतेही लेखन न वाचता समान अनुभव येणे हे अध्यात्माचा क्षेत्रात काही विशेष बाब नाही !) तुकाराम गाथा - ५८१ गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥ आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥ उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥ हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥ अमृतानुभव : गोडी आणि गुळु । कापुरु आणि परिमळु । निवडूं जातां पांगुळु । निवाडु होये ॥ १-२३ ॥ नाना कापुरु आणि परिमळु । कापुरचि केवळु । गोडी आणि गुळु । गुळुचि जेवीं ॥ २-६३ ॥ जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं । म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ ७-२३७ ॥ नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण । घेतां तरी सुवर्ण । घेईजे कीं ॥ ९-१२ ॥ म्हणोनि भजतां भजावें । मा न भजतां कय नव्हे ? । ऐसें नाहीं स्वभावें । श्रीशिवुचि असे ॥ ९-४९ ॥ || पांडुरंग पांडुरंग ||

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 21/08/2021 - 20:25
असे वाटले की तुकोबांनी अमृतानुभव वाचला असावा
अमृतानुभव सुरेखच आहे. आपलं फेवरीट आहे.
कोणतेही लेखन न वाचता समान अनुभव येणे हे अध्यात्माचा क्षेत्रात काही विशेष बाब नाही
+१ नक्कीच. मला स्वतःला संत संत का बनतात याचे विशेश कुतुहल आहे कारण समान जीवनपध्दत विचारधारा राखूनही प्रत्येकजण संत बनत नाही... अर्थात अध्यात्मात त्याचे उत्तर पूर्वसुकृत असे आहेच पण त्याचा कसलाही पडताळा घेणे शक्य होत नाही त्यामूळे प्रश्न अनुभवाच्या कसोटीवर अनुत्तरीत राहतो आणि श्रध्दा कसोटीची मागणी करत नाही. म्हणून प्रश्नच निर्माण होत नाही त्यामुळं कुतुहल अजून जिवंत आहे.

भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥ भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥ध्रु.॥ होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥ तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥

In reply to by गॉडजिला

राघव 08/09/2021 - 10:23
हे सांगण्याचे तुकोबारायांचे काय कारण असावे? दुसर्‍या एका अभंगात ".. नाठाळाचे माथी हाणू काठी" असेही ते म्हणतात. मग हे परस्पर विरोधी मत त्यांनी का बरे मांडले असेल? :-)

गॉडजिला 10/09/2021 - 15:22
ऐसें कैसे झाले भोंदू। कर्म करुनि म्हणती साधू | अंगा लावुनि राख। डोळे झाकुनि करिती पाप। दावी वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा। तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती।

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥ मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥

मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥ हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥1॥ जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥2॥ ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥3॥

काय वृंदावन मोहियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥1॥ तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥ न कळे विंचवासी कुरवाळीलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥2॥ तुका ह्मणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥3॥

चौथा कोनाडा 16/02/2025 - 13:40
होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥1॥ निंदिती कदान्न इिच्छती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥2॥ तुका ह्मणे ऐसें दांभिक भजन । तया जनादऩन भेटे केवीं ॥3॥ -

देहभाव आह्मी राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥1॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तो चि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥ ह्मणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥2॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥3॥ तुका ह्मणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे ॥4॥

राम ह्मणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥1॥ ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥2॥ तुका ह्मणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥3॥

जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तहान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥
लेखनविषय:
लेखनप्रकार
|| पांडुरंग पांडुरंग || तुकोबा ग्रेट म्हणजे ग्रेट होते राव ! तुकोबांचे अभंग इतके साध्या सोप्प्या भाषेत मनातलं बोलुन जातात कि आपल्याला अजुन जास्त भारी बोलताच येत नाही. आणि हे इतके सोप्पे असल्याने ते कधीही कुठेही आठवतात ! ह्या इंटरनेटने अन गुगल ने शोधाशोध करायची अफलातुन सोय करुन दिली असल्याने अभंगातील एखादा चरण किंव्वा धृवपद जरी आठवत असेल तरी अख्खा अभंग शोधता येतो . नाहीतर हार्ड कॉपी उघडुन पहाण्यचा योगच आला नसता !

गनिमी कावा

आपला अभिजित ·

शेर भाई 08/06/2020 - 23:34
"डीपी मस्त आहे गं. बारीक झालेली वाटतेयंस", ह्याच टायमिंग जरा मागे पुढे झाल कि मात्र बेक्कार वाट लागू शकते. तुमचा कावेबाजपणा आवडला

तुर्रमखान 09/06/2020 - 02:43
भूत, प्रेत और मासूम बीवी मन का वहम है, ऐसा कुछ नहीं होता.

शेर भाई 08/06/2020 - 23:34
"डीपी मस्त आहे गं. बारीक झालेली वाटतेयंस", ह्याच टायमिंग जरा मागे पुढे झाल कि मात्र बेक्कार वाट लागू शकते. तुमचा कावेबाजपणा आवडला

तुर्रमखान 09/06/2020 - 02:43
भूत, प्रेत और मासूम बीवी मन का वहम है, ऐसा कुछ नहीं होता.
लेखनप्रकार
``तू पहिल्यासारखा राहिला नाहीस.`` पहिल्याच वाक्यानं त्याचं कामातलं लक्ष उडालं. ``आता काय झालं?`` त्यानं काळजीनं विचारलं. ``काही नाही. जाऊ दे.`` तिनं दोनचार तोंडवाकडे, लालबुंदे, भुवईउडवे इमोजी टाकले. अशा प्रसंगी काय करायचं असतं, हे त्याला लग्नाच्या दहा आणि व्हॉट्स अपच्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर नीटच माहीत झालेलं होतं. ``अगं सांग ना, काल तुला फोन केला नाही, त्याचा राग आलाय का तुला?`` ``कालचं काय विशेष? हल्ली फोनच करावासा वाटत नाही तुला! चॅट करायलाही वेळ नसतो!`` ``….`` ``आता काही बोलणार नाहीस, माहितेय मला. मी इकडे एकटी असते, सगळं घर सांभाळते, काही कुरकुर न करता.

ढासळला वाडा

पाषाणभेद ·

रागो 31/05/2020 - 09:56
छान लिहिले आहे. माझे गाव आणि आमचे घर डोळ्यासमोर उभे राहिले

निनाद 01/06/2020 - 05:56
चित्रदर्शी आणि स्पर्श करून जाणारे लिखाण. अनेक बारीक सारीक बदल खुप छान टिपले आहेत.

सुमीत 02/06/2020 - 14:35
शब्द शः कळकळ जाणवली. इतके सुरेख लिहिले आहे की आपला हात धरून ते गाव पाहात आहोत असे वाटले.

सौंदाळा 05/06/2020 - 14:23
सुंदर प्रकटन. सारे प्रवासी घडीचे मधले पाहिले आणि शेवटचे प्रकरण आठवले. जर काल्पनिक लेख म्हणून लिहिला असेल तर सलाम जर खरा अनुभव असेल तर तुम्हाला किती दुःख झाले असेल याची कल्पना करवत नाही.

रागो 31/05/2020 - 09:56
छान लिहिले आहे. माझे गाव आणि आमचे घर डोळ्यासमोर उभे राहिले

निनाद 01/06/2020 - 05:56
चित्रदर्शी आणि स्पर्श करून जाणारे लिखाण. अनेक बारीक सारीक बदल खुप छान टिपले आहेत.

सुमीत 02/06/2020 - 14:35
शब्द शः कळकळ जाणवली. इतके सुरेख लिहिले आहे की आपला हात धरून ते गाव पाहात आहोत असे वाटले.

सौंदाळा 05/06/2020 - 14:23
सुंदर प्रकटन. सारे प्रवासी घडीचे मधले पाहिले आणि शेवटचे प्रकरण आठवले. जर काल्पनिक लेख म्हणून लिहिला असेल तर सलाम जर खरा अनुभव असेल तर तुम्हाला किती दुःख झाले असेल याची कल्पना करवत नाही.
संदर्भ:- ढासळला वाडा - कविता ढासळला वाडा नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता.

महर्षी गीता - भगवान रमण महर्षी कृत गीता-सार

मूकवाचक ·

त्यातून निवडक काही काढणं त्याहून अवघडे सांख्ययोगातले दोन श्लोक > नैनं च्छिंदंती शस्त्राणी आणि या निशा सर्व भूतानां, त्यातल्या त्यात बरे आहेत; म्हणजे साधकाला मार्गदर्शक ठरु शकतात. जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात हा सर्वोत्तम ष्लोक म्हणून निवडला गेला हे आश्चर्य आहे. पहिली ओळ जरा तरी बरोबर आहे कारण ती काहीप्रमाणात का होईना सत्याच्या कालातीततेकडे निर्देश करते. पण दुसरी ओळ गंडली आहे. सत्य स्थानबद्ध नाही त्यामुळे हृदयाकडे निर्देश केवळ भावना जागृत करेल पण ती वस्तुस्थिती नाही.

राघव 22/05/2020 - 15:38
ब्लॉगवर वाचलेच होते. तशी अनेकांनी अनेक भाषांतरे, अनुवाद केलेले आहेतच गीतेचे. आपापल्या परीने ते योग्यही असतीलच. पण अधिकारी व्यक्ती जेव्हा एखादं सुचवते ते खास असते. भावार्थ दीपीका अशीच अतीव सुंदर. भावार्थ गीताही तशीच आहे. ज्या ज्या विषयाकडे धावते मन चंचल अस्थिर ते तेथतेथुनी झणि आवरूनी स्व-वश करावे त्याते जरी स्वभावे स्थिर न च होई तरी सुखे सोडावे आणि पुनरपि तसे स्व-रूपी हळूचि परतू द्यावे सवय लागता अशी सहज ते आत्म-रूपी रंगेल आत्म-रूप ते होता स्थिरता कधी न मग भंगेल -- किती सहज सोप्या भाषेत मांडलंय! वाह! बाकी गीतासार म्हणजे "मीच सर्वत्र व्यापून आहे" असंच महर्षी सुचवताहेत, नाही?

मूकवाचक 22/05/2020 - 18:21
आनन्दा, कुमाऊचा नरभक्षक, संजय क्षीरसागर, राघव आणि प्रा. डॉ. बिरूटे सर यांना मन:पूर्वक धन्यवाद.

मूकवाचक 28/05/2020 - 12:01
भगवद्गीतेतील सगळ्यात महत्वाचा श्लोक कोणता या बद्दल कित्येकांना कुतुहल असते. एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी पुढील श्लोकाचा उल्लेख केला होता: हे पांडवा (अर्जुना), सगळ्या भूतांचा (सजीव सृष्टीचा) आदि, मध्य आणि अंत मीच आहे. सर्व जीवांच्या अंतःकरणात अहंस्फुरणेच्या रूपात वास्तव्य करून असलेला आत्मा मीच आहे. (भगवद्गीता १०.२०) पुढे महर्षींनी गीता-सार सांगण्यासाठी भगवद्गीतेतल्या निवडक ४२ श्लोकांची सुसंगत आणि क्रमवार मांडणीदेखील केली (इथे हा श्लोक चौथ्या क्रमांकावर येतो). परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीमत भावार्थ गीतेतील श्लोकांचा त्याच क्रमाने संदर्भ घेत महर्षी गीता गद्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे: (१ - भगवद्गीता 2.1) संजयाने धृतराष्ट्रांना कुरूक्षेत्रावरील वृत्तांत कथन करताना सांगितले, "उद्विग्न झालेला पार्थ आपल्या रथामधे मान खाली घालून बसला आहे. त्याच्या अश्रूंचा बांध फुटलेला आहे. अवेळी करुणेचा पाझर फुटून सारासार विचारशक्ती गमावल्याने तो दीनवाणा झालेला आहे, तसेच त्याचे मनोधैर्य पूर्णपणे खचलेले आहे." (२ - भगवद्गीता 13.1) अर्जुनाची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण त्याला उपदेश करत आहेत, "हे पार्था, अध्यात्मातले जाणकार विद्वान या देहाला 'क्षेत्र', तसेच त्याला जो जाणतो त्याला 'क्षेत्रज्ञ' असे संबोधतात. (३ - भगवद्गीता 13.2) हे किरीटी (अर्जुना), सर्व क्षेत्रांमधे वसत असलेला क्षेत्रज्ञ मीच आहे असे जाण. तसेच हे लक्षात घे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणणे हेच खरे ज्ञान आहे असे मी मानतो. (4 - भगवद्गीता 10.20) हे पांडवा (अर्जुना), सगळ्या भूतांचा (सजीव सृष्टीचा) आदि, मध्य आणि अंत मीच आहे. सर्व जीवांच्या अंतःकरणात अहंस्फुरणेच्या रूपात वास्तव्य करून असलेला आत्मा मीच आहे. (भगवद्गीता १०.२०) (5 - भगवद्गीता 2.27) निसर्गाचा नियमच असा आहे की उगवलेला दिवस मावळतो आणि अस्तंगत झालेला सूर्य पुन्हा उगवतो. जन्माला आलेल्या प्रत्येक गोष्टीचा विनाश होतो आणि नाश पावलेली वस्तु पुन्हा उत्पन्न होते. हे अर्जुना, हा निसर्गनियम अटळ आहे हे लक्षात घेता अनाठायी शोक करणे तुला शोभत नाही. (6 - भगवद्गीता 2.20) आत्म्याचा जन्म होणे किंवा मृत्यु होणे संभवत नाही. तो अज, शाश्वत, नित्य आणि पुराणपुरूष आहे. त्यामुळे तो कधी काळी अस्तित्वात होता किंवा भविष्यात अस्तित्वात येईल असे घडत नाही. एखाद्या व्यक्तीच्या सावलीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले तर त्याच्या देहाला जखमा होत नाहीत. तद्वतच मरणधर्मा असलेला असलेला देह मृत्युमुखी पडला तरी आत्मा अभंगच राहतो. (7 - भगवद्गीता 2.24) आत्मा सर्वव्यापी तसेच नित्य असल्याने तुटणे, जळणे, भिजणे किंवा वाळणे असे क्रियाकलाप त्याच्या बाबतीत संभवत नाहीत. तो अचल (आपल्या स्थितीपासून न ढळणारा), स्थिर, सनातन (स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे असलेला), अव्यक्त (प्रकट स्वरूपात नसलेला) आणि अचिंत्य (ज्या विषयी चिंतन करता येत नाही) असतो. (8 - भगवद्गीता 2.17) आत्मा हे एक अव्यय (ज्यात कधीच घट होत नाही) तत्व आहे, ज्याचा विनाश करणे कुणालाच त्रिकाली शक्य नाही. सारे जग त्या अविनाशी तत्वाने व्यापलेले आहे असे जाण. (9- भगवद्गीता 2.16) अस्तित्वाचे नसणे तसेच नास्तित्वाचे अस्तित्वात येणे संभवत नाही. त्यामुळे तत्वज्ञ लोक या दोन्हींबाबत योग्य तो निर्णय घेतात. राजहंस जसे दूध आणि जल वेगळे करतो, तद्वतच तत्वज्ञानी लोक या विश्वात गुप्त स्वरूपात असलेल्या सारभूत तत्वाचा शोध घेताना दिसतात. एकाद्या बुद्धिमान व्यक्तीने सुवर्ण आणि हीण वेगवेगळे करावे, तद्वतच उपाधींमधून संतजन संतजन सार शोधून काढतात. धान्य पाखडून त्यातील भुस्सा टाकून देत आपण जसे फक्त धान्यकण वेगळे करतो, तद्वतच मायेचा त्याग करून ज्ञानी ब्रह्मपदी विराजमान होतो. (10 - भगवद्गीता 13.32) आकाश सर्वव्यापी असले तरी सूक्ष्म असल्याने ते कुठेही लिप्त होत नाही, तद्वतच देहामधे सगळीकडे नांदत असूनही आत्मा अलिप्तच असतो. (11 - भगवद्गीता 15.6) माझे परंधाम (निवासस्थान) हे एक स्वयंप्रकाशित, तेजोमय आणि परिपूर्ण असे एक गंतव्य आहे. सूर्य, चंद्र किंवा अग्नि त्याला प्रकाशित करू शकत नाहीत. या ठिकाणी पोचलेला जीव स्वर्ग, नरक आणि संसाराची येरझार करण्यापासून कायमचा मुक्त होतो. हे अर्जुना, जिथे (द्वैताद्वैतविलक्षण असलेल्या) परतत्वाशी जीव सामरस्य साधतो, तेच माझे परंधाम आहे असे जाण. (12 - भगवद्गीता 8.21) या परतत्वाने अवघे विश्व व्यापून टाकलेले असले, ते स्वत:च विश्वरूपाने नांदत असले तरी संपूर्ण विश्व लयाला गेले तरी तत्वतः या परतत्वाचा नाश होत नाही! या अव्यक्त (प्रकट न झालेल्या) आणि अक्षर तत्वालाच 'परम गति' असे म्हणतात. हे अर्जुना, माझे परंधाम प्राप्त झाले की जीवाचा जन्म आणि मृत्युचा फेरा कायमचा टळतो. (13 - भगवद्गीता 15.5) मुसळधार वर्षा झाल्यावर मेघ जसे आभाळातून नाहीसे होतात, तितक्याच सहजतेने मोह आणि अभिमान ज्ञान्याला सोडून जातात. अध्यात्मात तल्लीन झालेला ज्ञानी स्वभावत:च सगळ्या भौतिक वस्तुंच्या बाबतीत अनासक्त होतो. त्याची बुद्धी अत्यंत निर्मळ असल्याने तो वासनांच्या आधीन होत नाही. सुख आणि दु:खासारखे द्वंद्व निर्माण करणारे आणि बंधनात टाकणारे अनुभाव ज्ञान्याला येत नाहीत. असे ज्ञाते अगदी सहजतेने माझ्या अव्यय अशा परमपदाला पोहोचतात. (14 - भगवद्गीता 16.23) भौतिक सुखांच्या मागे लागलेल्या, भोगविलासी जीवन जगण्यासाठी वेडेपिसे झालेल्या तसेच विधिनिषेधांची तमा न बाळगता स्वैराचारात रममाण झालेल्यांना कल्पांत होण्याची वेळ आली तरी परम गती प्राप्त होत नाही. अशा जीवांना ब्रह्म किंवा निर्वाण लाभणे तर दूरच, खरे सात्विक सुखदेखील कदापि प्राप्त होत नाही. (15 - भगवद्गीता 13.27) हे अर्जुना, या विविधतेने नटलेल्या जीवसृष्टीत देखील जो समत्वभावाने अविनाशी असलेल्या ईश्वरालाच पाहतो तोच खरा ज्ञानी आहे असे नि:संशयपणे जाण. (16 - भगवद्गीता 11.54) या जगात उगमस्थानापासून अखंड वाहत आलेली नदी जशी शेवटी सागरातच विलीन होताना दिसते, तद्वतच अनन्य भावाने भक्ती करणारा भक्त अंती माझ्यात विलीन होतो. आगीत टाकलेले इंधन जसे पृथकतेने न राहता अग्निरूप होते, तद्वतच साक्षात्कार झाल्यानंतर देव आणि भक्त हे नाते संपून अवघे अस्तित्वच हरिमय होते. हे अर्जुना, माझ्यात समर्पित झाल्यावर 'मी' आणि 'तो' (ईश्वर) असे द्वैत तत्वतः शिल्लकच उरत नाही, त्यामुळे तू मत्स्वरूप होउन माझ्याशी एकरूप होत मातेच्या गर्भात सुखेनैव पहुडावे तसा निवांत रहा! (17 भगवद्गीता 17.3) ज्याचा जसा स्वभाव त्याची तशी श्रद्धा असते हे लक्षात घे. तसेच श्रद्धामय असलेला कुठलाही जीव त्याची जशी श्रद्धा असते तसाच होतो असे जाण. (18 भगवद्गीता 4.39) संयमी असलेल्या, शीलवान असलेलेल्या आणि ब्रह्मनिष्ठ होण्यात तत्पर असलेल्या साधकाला ज्ञान प्राप्त होते. अशा साधकाला मग परम शांती प्राप्त करण्यासाठी फार वेळ लागत नाही. (19 भगवद्गीता 10.10) प्रेमभावाने माझ्या ठायी जे सतत रंगलेले असतात, अशा भक्तांना ज्ञान तसेच भक्तीचे सोलीव सुख देत निजधामाप्रत नेणे हेच माझे ब्रीद आहे. (20 भगवद्गीता 10.11) हे अर्जुना, अशा भक्तांविषयी करूणा असल्याने मी स्वतः त्यांच्या अंतःकरणात प्रकट होत त्यांना तत्क्षणी तेजस्वी अशा ज्ञानदीपाचे दर्शन घडवतो. भ्रांतीच्या स्वरूपात अस्तित्वात असलेल्या अंध:काराचा ज्ञानदीपाच्या प्रकाशात नाश झाल्याने तो तत्वतः मागे उरत नाही. अशा प्रकारे माझे भक्त जन्म, मरण तसेच संसारातून मुक्त होतात. (21 भगवद्गीता 5.16) आत्मज्ञान झाल्याने ज्यांचे अज्ञान हरपले आहे अशा भक्तांसमोर सूर्यप्रकाशासारख्या दीप्तीमान असलेल्या ज्ञानप्रकाशात परतत्व प्रकट होते. पहाटवेळी पूर्व दिशा उजळल्यावर जशा दाही दिशा उजळून निघतात, तद्वतच आत्मप्रचितीची पहाट झाल्यावर स्वभावतःच या विश्वाच्या प्रांगणात परके असे काही उरत नाही. जिथे पहावे तिथे आत्मरूपाचेच प्राकट्य अनुभवता येत असल्याने साधक त्यात तल्लीन होऊन जातात. (22 भगवद्गीता 3.42) इंद्रिये बलवान असतात, त्यांच्यापेक्षा मन बलवान असते आणि मनापेक्षाही बुद्धीचे सामर्थ्य मोठे असते. बुद्धीबरोबर तुलना केली असता उपाधी रहित असलेल्या ईश्वरी सत्तेचे किंवा आत्मिक सत्तेचे सामर्थ्य तुलनेने कित्येक पटीने जास्त असते. (23 भगवद्गीता 3.43) अशा आत्म्याला जाणून घे आणि आत्मबलाने आत्मस्वरूपातच स्थिर हो, तसेच ज्यांच्यावर मात करणे अशक्य आहे असे भासते त्या विषयवासनांचा देखील संहार करून टाक. (24 भगवद्गीता 4.37) प्रज्वलित झालेल्या आगीत लाकडी ओंडके जसे जळून भस्मसात होतात, तद्वतच ज्ञानरूपी वणवानलात सगळी कर्मे जळून जातात अशी खात्री बाळग. (25 भगवद्गीता 4.19) 'मी कर्ता आहे' 'मी अमुक एक गोष्ट साध्य करेनच' असे संकल्प ज्याचा मनात उद्भवतच नाहीत, तसेच सगळी कर्मे पार पाडत असताना जो कर्मफलाच्या आशेत गुंतून पडत नाही, अणि परिणामस्वरूप ज्ञानरूपी अग्नित ज्याची सारी कर्मे जळून जातात, अशाच व्यक्तीला सुजाण लोक विद्वान असे म्हणतात. (26 भगवद्गीता 5.26) निष्काम वृत्तीच्या तसेच यतीप्रमाणे आचरण असलेल्या आत्मज्ञान्याचे अंतःकरण त्याच्या स्वाधीन असते. जो निरंतर क्रोध रहित भावनेने विहरत असतो अशा ज्ञानियाला सर्वत्र ब्रह्मनिर्वाणच प्रचितीला येत असते. हे भारता, योगी जन 'याचि देही याचि डोळा' ब्राह्मी स्थिती कशी प्राप्त करतात या मागचे मर्म मी आता तुला थोडक्यात सांगतो. (27 भगवद्गीता 6.25) योगारूढ होण्यासाठी जसजशी उपरती होत जाईल तसा बुद्धीचा निग्रह करून मनाला आत्मस्थित करणे, तसेच इतर कुठलेही चिंतन करणे थांबवणे आवश्यक आहे. (28 भगवद्गीता 6.26) मन हे जात्याच अस्थिर आणि चंचल असल्याने ते ज्या ज्या विषयाकडे धाव घेईल, त्या त्या विषयातून तत्क्षणी त्याला परावृत्त करत आपल्या ताब्यात आणावे लागते. असे प्रयत्न करत असता ते सहजतेने स्थिर होत नसल्याने त्याला काही काळ सुखेनैव विहार करायला मोकळे सोडावे आणि हळुवारपणे पुन्हा निजस्वरूपाकडे परत वळू द्यावे. अभ्यासाची अशी सवय अंगी बांणवली की मन हळूहळू आत्मरंगात रंगायला लागेल, ते पूर्णपणे आत्मरूपच झाले की मग त्याचे स्थैर्य कधीच भंगणार नाही. (29 भगवद्गीता 5.28) ज्याने वायुने अवकाशात विलीन व्हावे तसा मनाला आत्मस्वरूपात विलीन करण्याचा योग साधला; ज्याने एकाग्र चित्ताने मोक्षप्राप्ती हेच ध्येय मानून तहान, भूक, भय अथवा क्रोध या सारख्या आवेगांपासून मुक्ती मिळवली; मन आणि बुद्धीसहित इंद्रियांच्या उर्मींना महाशून्यात विलीन केले; अशा संयमी सत्पुरूषालाच अंती जीवन्मुक्त अशी ब्राह्मी स्थिती प्राप्त होते. (30 भगवद्गीता 6.29) असा योग साधलेल्या जीवन्मुक्त सत्पुरूषाला त्याच्या आत्म्यातच सारे जीव नांदत आहेत, तसेच प्रत्येक जीवात तोच आत्मा नांदतो आहे अशी प्रचिती येत असल्याने तो समत्व भावनेनेच सगळ्या जीवसृष्टीकडे बघत असतो. (31 भगवद्गीता 9.22) जे भक्त अंतर्यामी सतत माझेच अनुसंधान ठेवत माझी उपासना करतात; क्षणभराचाही खंड पडू न देता अनन्य भावाने माझ्याशी समरस होतात; त्यांच्या भक्ती आणि प्रेमभावामुळे त्यांना मी आपल्या सायुज्य सदनी घेऊन जातो. अशा अनन्य भक्तांचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी देखील मी आपल्या शिरावर घेतो! (32 भगवद्गीता 7.17) एकनिष्ठपणे नित्य अनुसंधान साधणारा भक्तच सर्वश्रेष्ठ असतो. अशा भक्तांना जसा मी प्रिय असतो, तितकेच ते देखील मला प्रिय असतात! जो निरंतर तसेच अनन्य भावाने सहजतेने मत्स्वरूप होत मला भजतो, असा भक्त 'देहि असोनि विदेहि' अशा आत्मस्थितीत स्थित होतो. (33 भगवद्गीता 7.19) कित्येक जन्म लोटल्यावर मला सर्वभावे शरण आलेला भक्तच योगी तसेच ज्ञानी होतो, अशा भक्ताचीच जन्म आणि मृत्युच्या येरझारीतून कायमची सुटका होते! अशा भक्ताला डोळे उघडून बघताना किंवा डोळे मिटून निवांत पहुडलेले असताना सबाह्य-अभ्यंतरी मी सोडून इतर काहीही दिसत नाही. अशा आत्मानुभवी भक्तासाठी अवघे विश्व वासुदेवमय होते. अत्यंत दुर्लभ असलेला असा महंत या विश्वात विश्वरूप होत लीलया विहार करत असतो. (34 भगवद्गीता 2.55) नानाविध मनःकामनांचा त्याग करून जो आत्म्याद्वारे आत्मरूपातच संतुष्ट राहतो त्या 'स्थितप्रज्ञ' असे म्हणतात. (35 भगवद्गीता 2.71) असा स्थितप्रज्ञ नि:स्पृहतेने, निष्काम वृत्तीने तसेच कुठल्याही उपाधीने लिप्त न होता जगात वावरत असतो. अहंकारापासून तसेच माया ममत्वाच्या पाशापासून मुक्त असलेल्या अशा व्यक्तीलाच परम शांती संपादन करता येते. (36 भगवद्गीता 12.15) सर्व भूतमात्रात (प्रत्येक जीवात) भगवंत आहे असा भाव अंगी बाणलेल्या अशा व्यक्तीचा इतरेजनांना उबग येत नाही, तसेच अशा व्यक्तीला तिच्या सहवासात येत असलेल्या कुठल्याही व्यक्तीचा उबग येत नाही. विषय वासना शांतवल्याने तसेच आत्म्याच सर्वव्यापी आहे हे जाणल्याने अशा व्यक्तीच्या मनात हर्षोन्माद किंवा विषाद या भावनांना थाराच मिळत नाही. हे पार्था, आत्मस्वरूप सोडून जगात काहीच नाही हे जाणल्याने जो भय आणि क्रोध या विकारांपासून मुक्त होत सहजतेने वावरत असतो, असा सम्यक बोध असलेला योगी मला प्राणापेक्षाही प्रिय होतो! (37 भगवद्गीता 14.25) मान आणि अपमान यांना समान मानणारा, शत्रु आणि मित्र यांच्याविषयी समभाव ठेवणारा; निश्चल राहून विश्वात आत्मरूपच कोंदाटले आहे असे अनुभवणारा, ब्राह्मी स्थितीचा बोध झाल्याने ज्याने नव्या कर्माचा प्रारंभ करणे थांबवले आहे; अशा योग्यालाच हे अर्जुना, त्रिगुणातीत (सत्व, रज आणि तमोगुणांच्या बंधनापासून मुक्त) असे म्हणतात. (38 भगवद्गीता 3.17) जो आत्मसुखात रंगलेला आहे, जो निजस्वरूपातच पूर्णपणे तृप्त आणि संतुष्ट आहे अशा ज्ञानियाला या जगात कुठलेच कर्तव्य कर्म उरत नाही. 'देहि असोनि विदेहि' अशा स्थितीत असलेला आत्मतृप्त ज्ञानी कर्तव्यांच्या बंधनांपासून सहजतेने मुक्त होतो. (39 भगवद्गीता 3.18) अशा ज्ञानियाने जगात वावरत असताना कर्म केले काय किंवा न केले काय, हे धनंजया अशा नि:संग व्यक्तीच्या दृष्टीने त्या गोष्टीचे काही महात्म्यच उरत नाही! जो देहतादात्म्य विसरून अखंड आत्मानंदात रंगलेला असतो असा ज्ञानी कुठल्याही जीवाबद्दल मोह, ममत्व आणि आसक्तीने बांधला जात नाही. असे असले, तरी हे अर्जुना, जोवर हे ज्ञान प्राप्त होत नाही, तोवर जनसामान्यांसाठी कर्म-साधनाच योग्य आहे असे माझे ठाम मत आहे. (40 भगवद्गीता 18.61) जे मिळेल त्यातच जो संतुष्ट राहतो, ज्याला कुणाचाही मत्सर वाटत नाही अशा ज्ञानियाला सुख दु:खासारखी द्वंद्व भावना स्पर्श देखील करू शकत नाही. यश प्राप्त झाले किंवा अपयश मिळाले तरी ज्याची समतोल वृत्ती कधीच ढळत नाही, असा ज्ञानी सगळ्या कर्मांचे आचरण करूनही कर्मबंधापासून मोकळाच राहतो. (41 भगवद्गीता 18.61) हे पार्था, सगळ्या जीवांच्या अंतःकरणात वसलेल्या ईश्वराचे दर्शन घे. या जगात घडत असलेल्या सगळ्या कार्यकलापांचा खेळ आपल्या मायेने रचणारा सूत्रधार तोच तर आहे. सगळे जीव कठपुतळ्यांच्या खेळातल्या बाहुल्याप्रमाणे आहेत, आणि आपल्याच मायेच्या धाग्याने त्यांना बांधून आपल्या तालावर तो परमेश्वरच नाचवतो आहे हे लक्षात घे. (42 भगवद्गीता 18.62) हे अर्जुना, नदीतल्या पाण्याचा प्रवाह जसा सागराच्या दिशेने सतत धाव घेत असतो, तसा हृदयस्थ असलेल्या त्या ईश्वरालाच काळ वेळ न पाहता सर्वभावे शरण जा. त्याची कृपा संपादन करताच तू स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होशील. परम शांती असलेले दिव्य आणि अव्यय असे अढळ ध्रुवपद देखील तुला प्राप्त होईल. भगवद्गीतेचे सारतत्व संक्षिप्त स्वरूपात ४२ निवडक श्लोकांमधून सांगून झाल्यावर फलश्रुती किंवा सांगता या स्वरूपात भगवान रमण महर्षींनी एक श्लोक स्वतः रचला, त्याचा भावानुवाद असा करता येईलः ज्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असताना शाश्वत सत्याचा सहजतेने उपदेश केला, अर्जुनाच्या भवतापाचे लीलया निवारण केले, मानवी देहाच्या स्वरूपात अवतरलेल्या हे कृपासिंधू श्रीकृष्णा, तू आमचे रक्षण कर.

लेखात पहिला अनुवाद असा होता > जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात(भावार्थ गीता १०.२०) आता प्रतिसादात तो असा दुरुस्त केला आहे > हे पांडवा (अर्जुना), सगळ्या भूतांचा (सजीव सृष्टीचा) आदि, मध्य आणि अंत मीच आहे. सर्व जीवांच्या अंतःकरणात अहंस्फुरणेच्या रूपात वास्तव्य करून असलेला आत्मा मीच आहे. (भगवद्गीता १०.२०) हेच मी सुरुवातीला सांगत होतो: आपण सर्व ज्याला मी म्हणतो तो आपल्या सर्वांचा मी एकच आहे तो स्थानबद्ध नाही, त्यामुळे : नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात ही पहिल्या अनुवादात चूक झाली आहे पण मजा अशी की मी हा शब्द आला की सगळे बिथरतात ! इतर श्लोकांचं नंतर बघू

Prajakta२१ 29/05/2020 - 00:01
आहे कुठे हे परंधाम? माझे परंधाम (निवासस्थान) हे एक स्वयंप्रकाशित, तेजोमय आणि परिपूर्ण असे एक गंतव्य आहे. सूर्य, चंद्र किंवा अग्नि त्याला प्रकाशित करू शकत नाहीत. या ठिकाणी पोचलेला जीव स्वर्ग, नरक आणि संसाराची येरझार करण्यापासून कायमचा मुक्त होतो. हे अर्जुना, जिथे (द्वैताद्वैतविलक्षण असलेल्या) परतत्वाशी जीव सामरस्य साधतो, तेच माझे परंधाम आहे असे जाण.>>>>>>>>>प्रत्येक देवाचे exclusive आहे का? शिवाचे कैलास,विष्णूचे वैकुंठ ,ब्रह्म्याचे ब्रह्मलोक,इंद्राचा स्वर्ग एवढे असतील तर ते एकच परंधाम कसे?????????? सगळ्या स्तोत्रात शेवटी अशीच गाजरे दाखवतात सुखसंपत्ती दीर्घायुष्य लाभेल आणि शेवटी त्या त्या देवासोबत त्याच्या लोकात आनंदाने वास करता येईल मग परंधाम कसे काय ? परंधामे आहे कि काय भारंभार? आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आला नाहीये माणसांनी दुःख सहन करण्यासाठी (दुःख हे तुमच्या पूर्वकर्माचे फळ आणि त्या परंधामाचे ध्येय ठेवले कि दुःखाचा विसर पडतो म्हणून )अशी गाजरे दाखवली जातात काही काही श्लोक वाचून तर झगा मगा मला बघा नाहीतर मला पहा फुले वहा असाच थाट वाटतो (देवाचा, लेखकाचा नव्हे) कृ ह घ्या भाषांतर चांगले केलेय धन्यवाद पु ले शु अवांतर -मागे अन्यत्र एका संस्थळावर अशीच चर्चा होती त्यात एक प्रश्न होता कि देव जर आहे तर तो इतका सॅडीस्ट कसा काय?सध्याची परिस्थिती बघून असेच वाटतेय

In reply to by Prajakta२१

मूकवाचक 29/05/2020 - 12:55
कुठे आहे हे परंधाम ... माझी साधी १ बी एच के सदनिका आहे. त्यामुळे पास. पण संत साहित्यातील काही गोष्टी या 'अमूर्त संकल्पना' असू शकतात, तदनुषंगिक विचार केल्याने मन आणि बुद्धीच्या एका वेगळ्याच पैलूचा विकास होऊ शकतो अथवा होतो एवढेच विनम्रपणे सुचवतो. अर्थातच एखादी अमूर्त संकल्पना आपण नमूद केल्याप्रमाणे दु:ख सहन करण्यासाठी उपयुक्त ना वाटता ती त्रासदायक वाटली तर ती दुर्लक्षीत करणेच श्रेयस्कर आहे. तिचा त्रास करून घ्यावा असा माझा तरी अजिबात आग्रह नाही. शिवाचे कैलास,विष्णूचे वैकुंठ ,ब्रह्म्याचे ब्रह्मलोक,इंद्राचा स्वर्ग ... ही इष्टदैवते आहेत. त्यांची परंधामे ही आगळेवेगळे सौंदर्य असणारी प्रतिकात्मकता आहे. (व्यक्तीपरत्वे असे भेद असतात हे लक्षात घेत सुसंवादित्व येण्यासाठी आचार्यांनी पंचायतन पूजा सुचवली असावी असे वाटते). व्यक्तीपरत्वे 'परसेप्शन' वेगळे असले (उदा. आंधळ्या व्यक्ती आणि हत्तीची गोष्ट) तत्वतः परंधाम एक असायला काय हरकत आहे? माझ्या अनुभवाप्रमाणे अद्वैताचा अर्थ एकच गोष्ट मग ते इष्टदैवत असेल, निर्गुण निराकार असेल किंवा जावा/ पायथॉन भाषा असेल ती सगळ्यांवर लादण्याचा अनुदार दृष्टीकोन स्वीकारणे असा नसून विभिन्न वाटत असलेल्या गोष्टीतले एकत्व पाहणे आणि त्यात सुसंवादित्व स्थापन करणे असा होतो. सगळ्या व्यक्ती कितीही वेगवेगळे वर्णन करत असल्या तरी त्या एकाच हत्तीबद्दल बोलत आहेत असा डोळस दृष्टीकोन यावा या साठीच सत्पुरूषांचे मार्गदर्शन मोलाचे असते. असो. आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आलेला नाहिये ... अमूर्त संकल्पनांचे तसेच असते. तदनुषंगिक मते व्यक्तिनिष्ठ असतात, वस्तुनिष्ठ असू शकत नाहीत. देवाच्या/ ईश्वरी शक्तीच्या निव्वळ अस्तित्वात असण्याने विनाअट आणि सरसकट सगळे आलबेल होईल असे असते तर त्याला 'संभवामी युगे युगे' असे का म्हणावे लागले असते? त्याउपर सगळे 'आलबेल' असणे म्ह़णजे काय या बद्दल प्रत्येक व्यक्ती (उदा. साम्यवादी, हिंदुत्ववादी, समाजवादी, इहवादी, भोगवादी, शून्यवादी, अस्तित्ववादी वगैरे तसेच बायपोलार, नार्सिसिस्ट, बॉर्डरलाईन वगैरे व्यक्तिमत्व दोष असलेल्या व्यक्ती, गरीब बिचार्‍या व्यक्ती) आपापले वेगळेच मत व्यक्त करेल हे आलेच. असो.

In reply to by मूकवाचक

मराठी_माणूस 29/05/2020 - 15:23
पण संत साहित्यातील काही गोष्टी या 'अमूर्त संकल्पना' असू शकतात, तदनुषंगिक विचार केल्याने मन आणि बुद्धीच्या एका वेगळ्याच पैलूचा विकास होऊ शकतो अथवा होतो एवढेच विनम्रपणे सुचवतो.
धन्यवाद, ह्या संकल्पने कडे एका वेगळ्या दृष्टीकोनातुन पहाण्याचा परिचय करुन दिल्याबद्दल.

In reply to by मूकवाचक

> संत साहित्यातील काही गोष्टी या 'अमूर्त संकल्पना' असू शकतात, तदनुषंगिक विचार केल्याने मन आणि बुद्धीच्या एका वेगळ्याच पैलूचा विकास होऊ शकतो ? देव या निराधार कल्पनेचा मन आणि बुद्धीच्या विकासाला काय उपयोग आहे ? > अद्वैताचा अर्थ एकच गोष्ट मग ते इष्टदैवत असेल, निर्गुण निराकार असेल किंवा जावा/ पायथॉन भाषा असेल ती सगळ्यांवर लादण्याचा अनुदार दृष्टीकोन स्वीकारणे असा नसून विभिन्न वाटत असलेल्या गोष्टीतले एकत्व पाहणे आणि त्यात सुसंवादित्व स्थापन करणे असा होतो ? अद्वैताचा अर्थ सत्यापरता इथे काहीही नाही असा होतो. अद्वैत म्हणजे तुम्ही वर्णन केलेला समन्वयवाद नाही. ती वस्तुस्थिती आहे. > सगळ्या व्यक्ती कितीही वेगवेगळे वर्णन करत असल्या तरी त्या एकाच हत्तीबद्दल बोलत आहेत असा डोळस दृष्टीकोन यावा या साठीच सत्पुरूषांचे मार्गदर्शन मोलाचे असते हत्ती आणि आंधळे या गोष्टीचा इथे काहीही संबंध नाही. सत्य एक आहे आणि फक्त दोनच शक्यता आहेत : उलगडा झाला किंवा नाही झाला. सत्यात तिसरी शक्यता नाही आणि फालतू टाइमपास नाही. > आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आलेला नाहिये ... अमूर्त संकल्पनांचे तसेच असते. तदनुषंगिक मते व्यक्तिनिष्ठ असतात. कल्पनेचा अनुभव येणं याला भ्रम म्हणतात. > देवाच्या/ ईश्वरी शक्तीच्या निव्वळ अस्तित्वात असण्याने विनाअट आणि सरसकट सगळे आलबेल होईल असे असते तर त्याला 'संभवामी युगे युगे' असे का म्हणावे लागले असते? ही Waiting for the Godot थिअरी आहे. अशी फार युगं गेली कुणी काही येत नाही आणि येण्याची शक्यताही नाही.

In reply to by Prajakta२१

सगळा निव्वळ भोंगळ कारभार आहे. असे परमधाम वगैरे कुठेही नाही. > प्रत्येक देवाचे exclusive आहे का? देवही कल्पना आहे आणि मानवाच्या मेंदूपलिकडे ती कुठेही अस्तित्वात नाही. > सगळ्या स्तोत्रात शेवटी अशीच गाजरे दाखवतात... प्रत्येकी एक पोलीस नेमणं शक्य नसल्यानं, प्रत्येकाच्या मनात एक मॉरल पोलीस उभा करण्याचं काम देवही संकल्पना करते. गाजरामुळे लोक त्या पोलीसाचा स्वीकार करतात. यामुळे देवभोळे लोक कायम दबून राहतात आणि बेरकी त्यांना नडून आपलं जीवन बिनधास्त जगतात. > आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आला नाहीये कल्पना सत्य वाटणं या भ्रमाला लोक देवाचा अनुभव म्हणतात. बुद्धी शाबूत असणार्‍याला असे अनुभव येत नाहीत. > माणसांनी दुःख सहन करण्यासाठी (दुःख हे तुमच्या पूर्वकर्माचे फळ आणि त्या परंधामाचे ध्येय ठेवले कि दुःखाचा विसर पडतो म्हणून ) अशी गाजरे दाखवली जातात. एकदम बरोब्बर ! देव-देव करणार्‍यावर आपत्ती ओढवली तर तो स्वतःची समजूतही घालून घेतो, देवामुळे इतकाच राडा झाला नाही तर यापेक्षा जास्त वाट लागली असती. > काही काही श्लोक वाचून तर झगा मगा मला बघा नाहीतर मला पहा फुले वहा असाच थाट वाटतो अत्यंत योग्य निरिक्षण ! > देव जर आहे तर तो इतका सॅडीस्ट कसा काय ? देवही माणसाची निराधार कल्पना आहे. त्या कल्पनेत काहीही घडवण्याचं किंवा थोपवण्याचं सामर्थ्य नाही. प्रत्येकाला स्वतःची बुद्धी, वस्तुनिष्ठता, विज्ञानवादी दृष्टीकोन, जे काही असेल ते शारिरिक सामर्थ्य आणि जमेल तशी इतरांची मदत घेऊन आयुष्याला बिनधास्त सामोरं जायचं आहे. ______________________________________ तुमचा दृष्टीकोन योग्य आहे. लगी रहो !

In reply to by Prajakta२१

अर्धवटराव 01/06/2020 - 20:02
आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आला नाहीये
त्याविषयी कुणी आपले अनुघव सांगितले तर तो केवळ कल्पनाविलास म्हणुन अगोदरच कन्क्लुड केले आहे काय? सर्वात मुख्य म्हणजे त्यावर केवळ विश्वास न ठेवता तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष्य अनुघव घ्यायची इच्छा आहे का? त्याकरता थोडे प्रयत्न करायला लागतील... आर यु ऑन फॉर दॅट ?
माणसांनी दुःख सहन करण्यासाठी (दुःख हे तुमच्या पूर्वकर्माचे फळ आणि त्या परंधामाचे ध्येय ठेवले कि दुःखाचा विसर पडतो म्हणून )अशी गाजरे दाखवली जातात
गाजरांची कमी नाहि. अनेक आकार, उकार, इकार, निराकारांची गाजरं बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येकाची चव अणि मजा वेगळी आहे. आपल्याला फक्त एण्टरटेन्मेण्ट हवे असल्यास अक्खं आयुष्य कमी पडेल इतकी मजा आहे.
काही काही श्लोक वाचून तर झगा मगा मला बघा नाहीतर मला पहा फुले वहा असाच थाट वाटतो (देवाचा, लेखकाचा नव्हे)
राखी सावंत सर्वत्र असते. इथे मिपावर पण आहे :)
अवांतर -मागे अन्यत्र एका संस्थळावर अशीच चर्चा होती त्यात एक प्रश्न होता कि देव जर आहे तर तो इतका सॅडीस्ट कसा काय?सध्याची परिस्थिती बघून असेच वाटतेय
अवांतरावर अवांतर :) :- अंतु बर्वा उवाच... "अहो दिडशे वर्षे तुमचे... ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचेतला काटा सेकंदाने हलन नाहित हज्जर वर्ष झाल्या शिवाय..."

In reply to by अर्धवटराव

Prajakta२१ 02/06/2020 - 23:54
धन्यवाद अवांतरावर अवांतर :) :- अंतु बर्वा उवाच... "अहो दिडशे वर्षे तुमचे... ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचेतला काटा सेकंदाने हलन नाहित हज्जर वर्ष झाल्या शिवाय...">>>>>>> मग त्या ब्रह्मदेवाचा उपयोग काय ???? कृ ह घ्या

In reply to by Prajakta२१

अर्धवटराव 03/06/2020 - 03:27
ब्रह्मदेवाने तसे बरेच उद्योग केले... पण माणसाला सर्वात जात उपयोगी ठरणार्‍या दोन गोष्टी.. एक म्हणजे चार पायांचे गाढव दुसरे म्हणजे माणसासारखे दिसणारे दोन पायांचे गाढव. चार पायांचे गाढव तसं उपयोगी. निदान त्याला हे कळतं कि आपण केवळ भार वाहायच्या कामाचे आहोत. दोन पायांच्या गाढवांना हे कळतच नाहि कि त्यांना ज्ञानाचे ओझे झालेय. मग ते आपल्या खिंकाळण्याला 'एकसोएक बहारदार' गायकी समजतात, आणि लाथा झाडण्याला मुक्तीच्या मार्गावरचं पदलालित्य (ते ही 'अफलातुन' वगैरे विशेषणांनी नटलेलं) एव्हढं मनोरंजन करुन ठेवलय ब्रह्मदेवाने आपल्यासाठी ;)

मूकवाचक 29/05/2020 - 19:32
भगवद्गीतेसारखा विषय चर्चिला जात असेल तर मतमतांतरे असणे साहजिकच आहे, नव्हे ते गृहीतच धरावे लागते. महर्षी गीतेचा शेवटचा श्लोक १८.६२ आहे. भगवद्गीतेतल्या त्याच्या पुढच्याच श्लोकाचा संदर्भ घेतला तर वक्त्याची श्रोत्याबद्दलची, सद्गुरूंची शिष्याविषयी (तसेच भगवद्गेतीविषयी मिपावर धागा काढलेल्याची वाचकांबद्दल) भूमिका कशी असावी या बद्दल दिशा मिळते: इति ते ज्ञानमाख्यानं गुह्यादगुह्यतरं मया, विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरू (भगवद्गीता १८.६३) - याचा ढोबळमानाने अर्थ असा होतो की हे अर्जुना, गुह्यात गुह्य असे हे ज्ञान मी तुला कथन केले, आता त्यावर सांगोपांग विचार करून तुला उचित वाटेल ते तू कर. माझी भूमिका आता साधारण या प्रकारची झालेली आहे. असो. ज्या प्रतिसादांविषयी मी काहीच लिहीलेले नाही त्यात व्यक्त झालेली मते माझ्या समन्वयवादी विचारसरणीत नानाविध विचारप्रणालींपैकी एक या दृष्टीने फक्त स्वीकारार्हच नव्हेत तर स्वागतार्ह आहेत असे जाणावे. कोविड - १९ च्या संकटातून सुखरूप पार पडंण्यासाठी तसेच नजिकच्या कालखंडात सर्व मिपाकरांच्या जीवनात यश, मांगल्य आणि सौख्य यावे अशा शुभेच्छा!

In reply to by मूकवाचक

तुम्ही आवरतं घेतलंय ! > ज्या प्रतिसादांविषयी मी काहीच लिहीलेले नाही त्यात व्यक्त झालेली मते माझ्या समन्वयवादी विचारसरणीत नानाविध विचारप्रणालींपैकी एक या दृष्टीने फक्त स्वीकारार्हच नव्हेत तर स्वागतार्ह आहेत असे जाणावे. सत्य सर्वसमावेशक आहे, समन्वयवादी नाही आणि पलायनवादी तर नक्कीच नाही !

Prajakta२१ 30/05/2020 - 00:16
@मुकवाचक-शंकानिरसनाबद्दल धन्यवाद @संजय क्षीरसागर सर-धन्यवाद अवांतर -ह्याबाबतीत एकेश्वरवाद असल्यामुळे अब्राहमीक धर्म आणि सिख जास्त पुढारलेले वाटतात पण निर्गुण निराकाराची उपासना अवघड असल्याने आपल्या पद्धतीत सगुण साकार आणि त्यांचे वेगवेगळे ऑपशन्स (तुम्हाला जो आवडेल त्याची पूजा करा ) दिले आहेत आणि हेच आपले महान वैशिष्ट्य आहे असे माझ्या परिचयातील बऱ्याच लोकांचे मत आहे चांगल्या चर्चेबद्दल सर्वांचे धन्यवाद रमण महर्षींचे काही निवडक श्लोक चांगले आहेत (निवड चांगली आहे)

In reply to by Prajakta२१

> निर्गुण निराकाराची उपासना अवघड असल्याने आपल्या पद्धतीत सगुण-साकारा आणि त्यांचे वेगवेगळे ऑपशन्स (तुम्हाला जो आवडेल त्याची पूजा करा ) दिले आहेत आणि हेच आपले महान वैशिष्ट्य आहे. असे माझ्या परिचयातील बऱ्याच लोकांचे मत आहे निराकराची उपासना करायला लागत नाही. तो उलगडा आहे. __________________________________ हा उलगडा न झालेले लोक सगुण-साकाराचा गोंधळ माजवून आहेत. या सगुण-साकारामुळेच मानवता अनेक धर्मात विभागली गेली आहे आणि मानवी इतिहासात धर्मविस्तारास्तव आजपर्यंत अनेक युद्धे होऊन नाहक प्राण हानी आणि संपती विनाश झाला आहे. त्यामुळेच शतकानुशतके झालेली प्रगती पुन्हा धुवून काढली गेली आहे. ____________________________ लेखक म्हणतो त्याप्रमाणे सगुणोपासकात समन्वय असंभव आहे. उभे गंध लावणारे, आडवं गंध लावणार्‍यांच्या विरुद्ध आहेत. भगवे हिरव्यांच्या विरुद्ध, हिरवे, पांढर्‍या आणि भगव्यांच्या विरुद्ध, पांढरे पैश्याच्या जोरावर या दोघांना आपल्यात सामिल करतायंत ! असा सगळा सावळा गोंधळ आहे. _____________________________ थोडक्यात, सगुण-साकार हा भंपक कल्पनाविलास आहे. हटवादी निराकर हा सुद्धा पराकोटीचा विचार आहे. आणि निराकाराचा उलगडा होत नाही म्हणून हा सगळा उत्पात चालू आहे.

त्यातून निवडक काही काढणं त्याहून अवघडे सांख्ययोगातले दोन श्लोक > नैनं च्छिंदंती शस्त्राणी आणि या निशा सर्व भूतानां, त्यातल्या त्यात बरे आहेत; म्हणजे साधकाला मार्गदर्शक ठरु शकतात. जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात हा सर्वोत्तम ष्लोक म्हणून निवडला गेला हे आश्चर्य आहे. पहिली ओळ जरा तरी बरोबर आहे कारण ती काहीप्रमाणात का होईना सत्याच्या कालातीततेकडे निर्देश करते. पण दुसरी ओळ गंडली आहे. सत्य स्थानबद्ध नाही त्यामुळे हृदयाकडे निर्देश केवळ भावना जागृत करेल पण ती वस्तुस्थिती नाही.

राघव 22/05/2020 - 15:38
ब्लॉगवर वाचलेच होते. तशी अनेकांनी अनेक भाषांतरे, अनुवाद केलेले आहेतच गीतेचे. आपापल्या परीने ते योग्यही असतीलच. पण अधिकारी व्यक्ती जेव्हा एखादं सुचवते ते खास असते. भावार्थ दीपीका अशीच अतीव सुंदर. भावार्थ गीताही तशीच आहे. ज्या ज्या विषयाकडे धावते मन चंचल अस्थिर ते तेथतेथुनी झणि आवरूनी स्व-वश करावे त्याते जरी स्वभावे स्थिर न च होई तरी सुखे सोडावे आणि पुनरपि तसे स्व-रूपी हळूचि परतू द्यावे सवय लागता अशी सहज ते आत्म-रूपी रंगेल आत्म-रूप ते होता स्थिरता कधी न मग भंगेल -- किती सहज सोप्या भाषेत मांडलंय! वाह! बाकी गीतासार म्हणजे "मीच सर्वत्र व्यापून आहे" असंच महर्षी सुचवताहेत, नाही?

मूकवाचक 22/05/2020 - 18:21
आनन्दा, कुमाऊचा नरभक्षक, संजय क्षीरसागर, राघव आणि प्रा. डॉ. बिरूटे सर यांना मन:पूर्वक धन्यवाद.

मूकवाचक 28/05/2020 - 12:01
भगवद्गीतेतील सगळ्यात महत्वाचा श्लोक कोणता या बद्दल कित्येकांना कुतुहल असते. एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी पुढील श्लोकाचा उल्लेख केला होता: हे पांडवा (अर्जुना), सगळ्या भूतांचा (सजीव सृष्टीचा) आदि, मध्य आणि अंत मीच आहे. सर्व जीवांच्या अंतःकरणात अहंस्फुरणेच्या रूपात वास्तव्य करून असलेला आत्मा मीच आहे. (भगवद्गीता १०.२०) पुढे महर्षींनी गीता-सार सांगण्यासाठी भगवद्गीतेतल्या निवडक ४२ श्लोकांची सुसंगत आणि क्रमवार मांडणीदेखील केली (इथे हा श्लोक चौथ्या क्रमांकावर येतो). परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीमत भावार्थ गीतेतील श्लोकांचा त्याच क्रमाने संदर्भ घेत महर्षी गीता गद्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे: (१ - भगवद्गीता 2.1) संजयाने धृतराष्ट्रांना कुरूक्षेत्रावरील वृत्तांत कथन करताना सांगितले, "उद्विग्न झालेला पार्थ आपल्या रथामधे मान खाली घालून बसला आहे. त्याच्या अश्रूंचा बांध फुटलेला आहे. अवेळी करुणेचा पाझर फुटून सारासार विचारशक्ती गमावल्याने तो दीनवाणा झालेला आहे, तसेच त्याचे मनोधैर्य पूर्णपणे खचलेले आहे." (२ - भगवद्गीता 13.1) अर्जुनाची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण त्याला उपदेश करत आहेत, "हे पार्था, अध्यात्मातले जाणकार विद्वान या देहाला 'क्षेत्र', तसेच त्याला जो जाणतो त्याला 'क्षेत्रज्ञ' असे संबोधतात. (३ - भगवद्गीता 13.2) हे किरीटी (अर्जुना), सर्व क्षेत्रांमधे वसत असलेला क्षेत्रज्ञ मीच आहे असे जाण. तसेच हे लक्षात घे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणणे हेच खरे ज्ञान आहे असे मी मानतो. (4 - भगवद्गीता 10.20) हे पांडवा (अर्जुना), सगळ्या भूतांचा (सजीव सृष्टीचा) आदि, मध्य आणि अंत मीच आहे. सर्व जीवांच्या अंतःकरणात अहंस्फुरणेच्या रूपात वास्तव्य करून असलेला आत्मा मीच आहे. (भगवद्गीता १०.२०) (5 - भगवद्गीता 2.27) निसर्गाचा नियमच असा आहे की उगवलेला दिवस मावळतो आणि अस्तंगत झालेला सूर्य पुन्हा उगवतो. जन्माला आलेल्या प्रत्येक गोष्टीचा विनाश होतो आणि नाश पावलेली वस्तु पुन्हा उत्पन्न होते. हे अर्जुना, हा निसर्गनियम अटळ आहे हे लक्षात घेता अनाठायी शोक करणे तुला शोभत नाही. (6 - भगवद्गीता 2.20) आत्म्याचा जन्म होणे किंवा मृत्यु होणे संभवत नाही. तो अज, शाश्वत, नित्य आणि पुराणपुरूष आहे. त्यामुळे तो कधी काळी अस्तित्वात होता किंवा भविष्यात अस्तित्वात येईल असे घडत नाही. एखाद्या व्यक्तीच्या सावलीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले तर त्याच्या देहाला जखमा होत नाहीत. तद्वतच मरणधर्मा असलेला असलेला देह मृत्युमुखी पडला तरी आत्मा अभंगच राहतो. (7 - भगवद्गीता 2.24) आत्मा सर्वव्यापी तसेच नित्य असल्याने तुटणे, जळणे, भिजणे किंवा वाळणे असे क्रियाकलाप त्याच्या बाबतीत संभवत नाहीत. तो अचल (आपल्या स्थितीपासून न ढळणारा), स्थिर, सनातन (स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे असलेला), अव्यक्त (प्रकट स्वरूपात नसलेला) आणि अचिंत्य (ज्या विषयी चिंतन करता येत नाही) असतो. (8 - भगवद्गीता 2.17) आत्मा हे एक अव्यय (ज्यात कधीच घट होत नाही) तत्व आहे, ज्याचा विनाश करणे कुणालाच त्रिकाली शक्य नाही. सारे जग त्या अविनाशी तत्वाने व्यापलेले आहे असे जाण. (9- भगवद्गीता 2.16) अस्तित्वाचे नसणे तसेच नास्तित्वाचे अस्तित्वात येणे संभवत नाही. त्यामुळे तत्वज्ञ लोक या दोन्हींबाबत योग्य तो निर्णय घेतात. राजहंस जसे दूध आणि जल वेगळे करतो, तद्वतच तत्वज्ञानी लोक या विश्वात गुप्त स्वरूपात असलेल्या सारभूत तत्वाचा शोध घेताना दिसतात. एकाद्या बुद्धिमान व्यक्तीने सुवर्ण आणि हीण वेगवेगळे करावे, तद्वतच उपाधींमधून संतजन संतजन सार शोधून काढतात. धान्य पाखडून त्यातील भुस्सा टाकून देत आपण जसे फक्त धान्यकण वेगळे करतो, तद्वतच मायेचा त्याग करून ज्ञानी ब्रह्मपदी विराजमान होतो. (10 - भगवद्गीता 13.32) आकाश सर्वव्यापी असले तरी सूक्ष्म असल्याने ते कुठेही लिप्त होत नाही, तद्वतच देहामधे सगळीकडे नांदत असूनही आत्मा अलिप्तच असतो. (11 - भगवद्गीता 15.6) माझे परंधाम (निवासस्थान) हे एक स्वयंप्रकाशित, तेजोमय आणि परिपूर्ण असे एक गंतव्य आहे. सूर्य, चंद्र किंवा अग्नि त्याला प्रकाशित करू शकत नाहीत. या ठिकाणी पोचलेला जीव स्वर्ग, नरक आणि संसाराची येरझार करण्यापासून कायमचा मुक्त होतो. हे अर्जुना, जिथे (द्वैताद्वैतविलक्षण असलेल्या) परतत्वाशी जीव सामरस्य साधतो, तेच माझे परंधाम आहे असे जाण. (12 - भगवद्गीता 8.21) या परतत्वाने अवघे विश्व व्यापून टाकलेले असले, ते स्वत:च विश्वरूपाने नांदत असले तरी संपूर्ण विश्व लयाला गेले तरी तत्वतः या परतत्वाचा नाश होत नाही! या अव्यक्त (प्रकट न झालेल्या) आणि अक्षर तत्वालाच 'परम गति' असे म्हणतात. हे अर्जुना, माझे परंधाम प्राप्त झाले की जीवाचा जन्म आणि मृत्युचा फेरा कायमचा टळतो. (13 - भगवद्गीता 15.5) मुसळधार वर्षा झाल्यावर मेघ जसे आभाळातून नाहीसे होतात, तितक्याच सहजतेने मोह आणि अभिमान ज्ञान्याला सोडून जातात. अध्यात्मात तल्लीन झालेला ज्ञानी स्वभावत:च सगळ्या भौतिक वस्तुंच्या बाबतीत अनासक्त होतो. त्याची बुद्धी अत्यंत निर्मळ असल्याने तो वासनांच्या आधीन होत नाही. सुख आणि दु:खासारखे द्वंद्व निर्माण करणारे आणि बंधनात टाकणारे अनुभाव ज्ञान्याला येत नाहीत. असे ज्ञाते अगदी सहजतेने माझ्या अव्यय अशा परमपदाला पोहोचतात. (14 - भगवद्गीता 16.23) भौतिक सुखांच्या मागे लागलेल्या, भोगविलासी जीवन जगण्यासाठी वेडेपिसे झालेल्या तसेच विधिनिषेधांची तमा न बाळगता स्वैराचारात रममाण झालेल्यांना कल्पांत होण्याची वेळ आली तरी परम गती प्राप्त होत नाही. अशा जीवांना ब्रह्म किंवा निर्वाण लाभणे तर दूरच, खरे सात्विक सुखदेखील कदापि प्राप्त होत नाही. (15 - भगवद्गीता 13.27) हे अर्जुना, या विविधतेने नटलेल्या जीवसृष्टीत देखील जो समत्वभावाने अविनाशी असलेल्या ईश्वरालाच पाहतो तोच खरा ज्ञानी आहे असे नि:संशयपणे जाण. (16 - भगवद्गीता 11.54) या जगात उगमस्थानापासून अखंड वाहत आलेली नदी जशी शेवटी सागरातच विलीन होताना दिसते, तद्वतच अनन्य भावाने भक्ती करणारा भक्त अंती माझ्यात विलीन होतो. आगीत टाकलेले इंधन जसे पृथकतेने न राहता अग्निरूप होते, तद्वतच साक्षात्कार झाल्यानंतर देव आणि भक्त हे नाते संपून अवघे अस्तित्वच हरिमय होते. हे अर्जुना, माझ्यात समर्पित झाल्यावर 'मी' आणि 'तो' (ईश्वर) असे द्वैत तत्वतः शिल्लकच उरत नाही, त्यामुळे तू मत्स्वरूप होउन माझ्याशी एकरूप होत मातेच्या गर्भात सुखेनैव पहुडावे तसा निवांत रहा! (17 भगवद्गीता 17.3) ज्याचा जसा स्वभाव त्याची तशी श्रद्धा असते हे लक्षात घे. तसेच श्रद्धामय असलेला कुठलाही जीव त्याची जशी श्रद्धा असते तसाच होतो असे जाण. (18 भगवद्गीता 4.39) संयमी असलेल्या, शीलवान असलेलेल्या आणि ब्रह्मनिष्ठ होण्यात तत्पर असलेल्या साधकाला ज्ञान प्राप्त होते. अशा साधकाला मग परम शांती प्राप्त करण्यासाठी फार वेळ लागत नाही. (19 भगवद्गीता 10.10) प्रेमभावाने माझ्या ठायी जे सतत रंगलेले असतात, अशा भक्तांना ज्ञान तसेच भक्तीचे सोलीव सुख देत निजधामाप्रत नेणे हेच माझे ब्रीद आहे. (20 भगवद्गीता 10.11) हे अर्जुना, अशा भक्तांविषयी करूणा असल्याने मी स्वतः त्यांच्या अंतःकरणात प्रकट होत त्यांना तत्क्षणी तेजस्वी अशा ज्ञानदीपाचे दर्शन घडवतो. भ्रांतीच्या स्वरूपात अस्तित्वात असलेल्या अंध:काराचा ज्ञानदीपाच्या प्रकाशात नाश झाल्याने तो तत्वतः मागे उरत नाही. अशा प्रकारे माझे भक्त जन्म, मरण तसेच संसारातून मुक्त होतात. (21 भगवद्गीता 5.16) आत्मज्ञान झाल्याने ज्यांचे अज्ञान हरपले आहे अशा भक्तांसमोर सूर्यप्रकाशासारख्या दीप्तीमान असलेल्या ज्ञानप्रकाशात परतत्व प्रकट होते. पहाटवेळी पूर्व दिशा उजळल्यावर जशा दाही दिशा उजळून निघतात, तद्वतच आत्मप्रचितीची पहाट झाल्यावर स्वभावतःच या विश्वाच्या प्रांगणात परके असे काही उरत नाही. जिथे पहावे तिथे आत्मरूपाचेच प्राकट्य अनुभवता येत असल्याने साधक त्यात तल्लीन होऊन जातात. (22 भगवद्गीता 3.42) इंद्रिये बलवान असतात, त्यांच्यापेक्षा मन बलवान असते आणि मनापेक्षाही बुद्धीचे सामर्थ्य मोठे असते. बुद्धीबरोबर तुलना केली असता उपाधी रहित असलेल्या ईश्वरी सत्तेचे किंवा आत्मिक सत्तेचे सामर्थ्य तुलनेने कित्येक पटीने जास्त असते. (23 भगवद्गीता 3.43) अशा आत्म्याला जाणून घे आणि आत्मबलाने आत्मस्वरूपातच स्थिर हो, तसेच ज्यांच्यावर मात करणे अशक्य आहे असे भासते त्या विषयवासनांचा देखील संहार करून टाक. (24 भगवद्गीता 4.37) प्रज्वलित झालेल्या आगीत लाकडी ओंडके जसे जळून भस्मसात होतात, तद्वतच ज्ञानरूपी वणवानलात सगळी कर्मे जळून जातात अशी खात्री बाळग. (25 भगवद्गीता 4.19) 'मी कर्ता आहे' 'मी अमुक एक गोष्ट साध्य करेनच' असे संकल्प ज्याचा मनात उद्भवतच नाहीत, तसेच सगळी कर्मे पार पाडत असताना जो कर्मफलाच्या आशेत गुंतून पडत नाही, अणि परिणामस्वरूप ज्ञानरूपी अग्नित ज्याची सारी कर्मे जळून जातात, अशाच व्यक्तीला सुजाण लोक विद्वान असे म्हणतात. (26 भगवद्गीता 5.26) निष्काम वृत्तीच्या तसेच यतीप्रमाणे आचरण असलेल्या आत्मज्ञान्याचे अंतःकरण त्याच्या स्वाधीन असते. जो निरंतर क्रोध रहित भावनेने विहरत असतो अशा ज्ञानियाला सर्वत्र ब्रह्मनिर्वाणच प्रचितीला येत असते. हे भारता, योगी जन 'याचि देही याचि डोळा' ब्राह्मी स्थिती कशी प्राप्त करतात या मागचे मर्म मी आता तुला थोडक्यात सांगतो. (27 भगवद्गीता 6.25) योगारूढ होण्यासाठी जसजशी उपरती होत जाईल तसा बुद्धीचा निग्रह करून मनाला आत्मस्थित करणे, तसेच इतर कुठलेही चिंतन करणे थांबवणे आवश्यक आहे. (28 भगवद्गीता 6.26) मन हे जात्याच अस्थिर आणि चंचल असल्याने ते ज्या ज्या विषयाकडे धाव घेईल, त्या त्या विषयातून तत्क्षणी त्याला परावृत्त करत आपल्या ताब्यात आणावे लागते. असे प्रयत्न करत असता ते सहजतेने स्थिर होत नसल्याने त्याला काही काळ सुखेनैव विहार करायला मोकळे सोडावे आणि हळुवारपणे पुन्हा निजस्वरूपाकडे परत वळू द्यावे. अभ्यासाची अशी सवय अंगी बांणवली की मन हळूहळू आत्मरंगात रंगायला लागेल, ते पूर्णपणे आत्मरूपच झाले की मग त्याचे स्थैर्य कधीच भंगणार नाही. (29 भगवद्गीता 5.28) ज्याने वायुने अवकाशात विलीन व्हावे तसा मनाला आत्मस्वरूपात विलीन करण्याचा योग साधला; ज्याने एकाग्र चित्ताने मोक्षप्राप्ती हेच ध्येय मानून तहान, भूक, भय अथवा क्रोध या सारख्या आवेगांपासून मुक्ती मिळवली; मन आणि बुद्धीसहित इंद्रियांच्या उर्मींना महाशून्यात विलीन केले; अशा संयमी सत्पुरूषालाच अंती जीवन्मुक्त अशी ब्राह्मी स्थिती प्राप्त होते. (30 भगवद्गीता 6.29) असा योग साधलेल्या जीवन्मुक्त सत्पुरूषाला त्याच्या आत्म्यातच सारे जीव नांदत आहेत, तसेच प्रत्येक जीवात तोच आत्मा नांदतो आहे अशी प्रचिती येत असल्याने तो समत्व भावनेनेच सगळ्या जीवसृष्टीकडे बघत असतो. (31 भगवद्गीता 9.22) जे भक्त अंतर्यामी सतत माझेच अनुसंधान ठेवत माझी उपासना करतात; क्षणभराचाही खंड पडू न देता अनन्य भावाने माझ्याशी समरस होतात; त्यांच्या भक्ती आणि प्रेमभावामुळे त्यांना मी आपल्या सायुज्य सदनी घेऊन जातो. अशा अनन्य भक्तांचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी देखील मी आपल्या शिरावर घेतो! (32 भगवद्गीता 7.17) एकनिष्ठपणे नित्य अनुसंधान साधणारा भक्तच सर्वश्रेष्ठ असतो. अशा भक्तांना जसा मी प्रिय असतो, तितकेच ते देखील मला प्रिय असतात! जो निरंतर तसेच अनन्य भावाने सहजतेने मत्स्वरूप होत मला भजतो, असा भक्त 'देहि असोनि विदेहि' अशा आत्मस्थितीत स्थित होतो. (33 भगवद्गीता 7.19) कित्येक जन्म लोटल्यावर मला सर्वभावे शरण आलेला भक्तच योगी तसेच ज्ञानी होतो, अशा भक्ताचीच जन्म आणि मृत्युच्या येरझारीतून कायमची सुटका होते! अशा भक्ताला डोळे उघडून बघताना किंवा डोळे मिटून निवांत पहुडलेले असताना सबाह्य-अभ्यंतरी मी सोडून इतर काहीही दिसत नाही. अशा आत्मानुभवी भक्तासाठी अवघे विश्व वासुदेवमय होते. अत्यंत दुर्लभ असलेला असा महंत या विश्वात विश्वरूप होत लीलया विहार करत असतो. (34 भगवद्गीता 2.55) नानाविध मनःकामनांचा त्याग करून जो आत्म्याद्वारे आत्मरूपातच संतुष्ट राहतो त्या 'स्थितप्रज्ञ' असे म्हणतात. (35 भगवद्गीता 2.71) असा स्थितप्रज्ञ नि:स्पृहतेने, निष्काम वृत्तीने तसेच कुठल्याही उपाधीने लिप्त न होता जगात वावरत असतो. अहंकारापासून तसेच माया ममत्वाच्या पाशापासून मुक्त असलेल्या अशा व्यक्तीलाच परम शांती संपादन करता येते. (36 भगवद्गीता 12.15) सर्व भूतमात्रात (प्रत्येक जीवात) भगवंत आहे असा भाव अंगी बाणलेल्या अशा व्यक्तीचा इतरेजनांना उबग येत नाही, तसेच अशा व्यक्तीला तिच्या सहवासात येत असलेल्या कुठल्याही व्यक्तीचा उबग येत नाही. विषय वासना शांतवल्याने तसेच आत्म्याच सर्वव्यापी आहे हे जाणल्याने अशा व्यक्तीच्या मनात हर्षोन्माद किंवा विषाद या भावनांना थाराच मिळत नाही. हे पार्था, आत्मस्वरूप सोडून जगात काहीच नाही हे जाणल्याने जो भय आणि क्रोध या विकारांपासून मुक्त होत सहजतेने वावरत असतो, असा सम्यक बोध असलेला योगी मला प्राणापेक्षाही प्रिय होतो! (37 भगवद्गीता 14.25) मान आणि अपमान यांना समान मानणारा, शत्रु आणि मित्र यांच्याविषयी समभाव ठेवणारा; निश्चल राहून विश्वात आत्मरूपच कोंदाटले आहे असे अनुभवणारा, ब्राह्मी स्थितीचा बोध झाल्याने ज्याने नव्या कर्माचा प्रारंभ करणे थांबवले आहे; अशा योग्यालाच हे अर्जुना, त्रिगुणातीत (सत्व, रज आणि तमोगुणांच्या बंधनापासून मुक्त) असे म्हणतात. (38 भगवद्गीता 3.17) जो आत्मसुखात रंगलेला आहे, जो निजस्वरूपातच पूर्णपणे तृप्त आणि संतुष्ट आहे अशा ज्ञानियाला या जगात कुठलेच कर्तव्य कर्म उरत नाही. 'देहि असोनि विदेहि' अशा स्थितीत असलेला आत्मतृप्त ज्ञानी कर्तव्यांच्या बंधनांपासून सहजतेने मुक्त होतो. (39 भगवद्गीता 3.18) अशा ज्ञानियाने जगात वावरत असताना कर्म केले काय किंवा न केले काय, हे धनंजया अशा नि:संग व्यक्तीच्या दृष्टीने त्या गोष्टीचे काही महात्म्यच उरत नाही! जो देहतादात्म्य विसरून अखंड आत्मानंदात रंगलेला असतो असा ज्ञानी कुठल्याही जीवाबद्दल मोह, ममत्व आणि आसक्तीने बांधला जात नाही. असे असले, तरी हे अर्जुना, जोवर हे ज्ञान प्राप्त होत नाही, तोवर जनसामान्यांसाठी कर्म-साधनाच योग्य आहे असे माझे ठाम मत आहे. (40 भगवद्गीता 18.61) जे मिळेल त्यातच जो संतुष्ट राहतो, ज्याला कुणाचाही मत्सर वाटत नाही अशा ज्ञानियाला सुख दु:खासारखी द्वंद्व भावना स्पर्श देखील करू शकत नाही. यश प्राप्त झाले किंवा अपयश मिळाले तरी ज्याची समतोल वृत्ती कधीच ढळत नाही, असा ज्ञानी सगळ्या कर्मांचे आचरण करूनही कर्मबंधापासून मोकळाच राहतो. (41 भगवद्गीता 18.61) हे पार्था, सगळ्या जीवांच्या अंतःकरणात वसलेल्या ईश्वराचे दर्शन घे. या जगात घडत असलेल्या सगळ्या कार्यकलापांचा खेळ आपल्या मायेने रचणारा सूत्रधार तोच तर आहे. सगळे जीव कठपुतळ्यांच्या खेळातल्या बाहुल्याप्रमाणे आहेत, आणि आपल्याच मायेच्या धाग्याने त्यांना बांधून आपल्या तालावर तो परमेश्वरच नाचवतो आहे हे लक्षात घे. (42 भगवद्गीता 18.62) हे अर्जुना, नदीतल्या पाण्याचा प्रवाह जसा सागराच्या दिशेने सतत धाव घेत असतो, तसा हृदयस्थ असलेल्या त्या ईश्वरालाच काळ वेळ न पाहता सर्वभावे शरण जा. त्याची कृपा संपादन करताच तू स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होशील. परम शांती असलेले दिव्य आणि अव्यय असे अढळ ध्रुवपद देखील तुला प्राप्त होईल. भगवद्गीतेचे सारतत्व संक्षिप्त स्वरूपात ४२ निवडक श्लोकांमधून सांगून झाल्यावर फलश्रुती किंवा सांगता या स्वरूपात भगवान रमण महर्षींनी एक श्लोक स्वतः रचला, त्याचा भावानुवाद असा करता येईलः ज्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असताना शाश्वत सत्याचा सहजतेने उपदेश केला, अर्जुनाच्या भवतापाचे लीलया निवारण केले, मानवी देहाच्या स्वरूपात अवतरलेल्या हे कृपासिंधू श्रीकृष्णा, तू आमचे रक्षण कर.

लेखात पहिला अनुवाद असा होता > जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात(भावार्थ गीता १०.२०) आता प्रतिसादात तो असा दुरुस्त केला आहे > हे पांडवा (अर्जुना), सगळ्या भूतांचा (सजीव सृष्टीचा) आदि, मध्य आणि अंत मीच आहे. सर्व जीवांच्या अंतःकरणात अहंस्फुरणेच्या रूपात वास्तव्य करून असलेला आत्मा मीच आहे. (भगवद्गीता १०.२०) हेच मी सुरुवातीला सांगत होतो: आपण सर्व ज्याला मी म्हणतो तो आपल्या सर्वांचा मी एकच आहे तो स्थानबद्ध नाही, त्यामुळे : नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात ही पहिल्या अनुवादात चूक झाली आहे पण मजा अशी की मी हा शब्द आला की सगळे बिथरतात ! इतर श्लोकांचं नंतर बघू

Prajakta२१ 29/05/2020 - 00:01
आहे कुठे हे परंधाम? माझे परंधाम (निवासस्थान) हे एक स्वयंप्रकाशित, तेजोमय आणि परिपूर्ण असे एक गंतव्य आहे. सूर्य, चंद्र किंवा अग्नि त्याला प्रकाशित करू शकत नाहीत. या ठिकाणी पोचलेला जीव स्वर्ग, नरक आणि संसाराची येरझार करण्यापासून कायमचा मुक्त होतो. हे अर्जुना, जिथे (द्वैताद्वैतविलक्षण असलेल्या) परतत्वाशी जीव सामरस्य साधतो, तेच माझे परंधाम आहे असे जाण.>>>>>>>>>प्रत्येक देवाचे exclusive आहे का? शिवाचे कैलास,विष्णूचे वैकुंठ ,ब्रह्म्याचे ब्रह्मलोक,इंद्राचा स्वर्ग एवढे असतील तर ते एकच परंधाम कसे?????????? सगळ्या स्तोत्रात शेवटी अशीच गाजरे दाखवतात सुखसंपत्ती दीर्घायुष्य लाभेल आणि शेवटी त्या त्या देवासोबत त्याच्या लोकात आनंदाने वास करता येईल मग परंधाम कसे काय ? परंधामे आहे कि काय भारंभार? आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आला नाहीये माणसांनी दुःख सहन करण्यासाठी (दुःख हे तुमच्या पूर्वकर्माचे फळ आणि त्या परंधामाचे ध्येय ठेवले कि दुःखाचा विसर पडतो म्हणून )अशी गाजरे दाखवली जातात काही काही श्लोक वाचून तर झगा मगा मला बघा नाहीतर मला पहा फुले वहा असाच थाट वाटतो (देवाचा, लेखकाचा नव्हे) कृ ह घ्या भाषांतर चांगले केलेय धन्यवाद पु ले शु अवांतर -मागे अन्यत्र एका संस्थळावर अशीच चर्चा होती त्यात एक प्रश्न होता कि देव जर आहे तर तो इतका सॅडीस्ट कसा काय?सध्याची परिस्थिती बघून असेच वाटतेय

In reply to by Prajakta२१

मूकवाचक 29/05/2020 - 12:55
कुठे आहे हे परंधाम ... माझी साधी १ बी एच के सदनिका आहे. त्यामुळे पास. पण संत साहित्यातील काही गोष्टी या 'अमूर्त संकल्पना' असू शकतात, तदनुषंगिक विचार केल्याने मन आणि बुद्धीच्या एका वेगळ्याच पैलूचा विकास होऊ शकतो अथवा होतो एवढेच विनम्रपणे सुचवतो. अर्थातच एखादी अमूर्त संकल्पना आपण नमूद केल्याप्रमाणे दु:ख सहन करण्यासाठी उपयुक्त ना वाटता ती त्रासदायक वाटली तर ती दुर्लक्षीत करणेच श्रेयस्कर आहे. तिचा त्रास करून घ्यावा असा माझा तरी अजिबात आग्रह नाही. शिवाचे कैलास,विष्णूचे वैकुंठ ,ब्रह्म्याचे ब्रह्मलोक,इंद्राचा स्वर्ग ... ही इष्टदैवते आहेत. त्यांची परंधामे ही आगळेवेगळे सौंदर्य असणारी प्रतिकात्मकता आहे. (व्यक्तीपरत्वे असे भेद असतात हे लक्षात घेत सुसंवादित्व येण्यासाठी आचार्यांनी पंचायतन पूजा सुचवली असावी असे वाटते). व्यक्तीपरत्वे 'परसेप्शन' वेगळे असले (उदा. आंधळ्या व्यक्ती आणि हत्तीची गोष्ट) तत्वतः परंधाम एक असायला काय हरकत आहे? माझ्या अनुभवाप्रमाणे अद्वैताचा अर्थ एकच गोष्ट मग ते इष्टदैवत असेल, निर्गुण निराकार असेल किंवा जावा/ पायथॉन भाषा असेल ती सगळ्यांवर लादण्याचा अनुदार दृष्टीकोन स्वीकारणे असा नसून विभिन्न वाटत असलेल्या गोष्टीतले एकत्व पाहणे आणि त्यात सुसंवादित्व स्थापन करणे असा होतो. सगळ्या व्यक्ती कितीही वेगवेगळे वर्णन करत असल्या तरी त्या एकाच हत्तीबद्दल बोलत आहेत असा डोळस दृष्टीकोन यावा या साठीच सत्पुरूषांचे मार्गदर्शन मोलाचे असते. असो. आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आलेला नाहिये ... अमूर्त संकल्पनांचे तसेच असते. तदनुषंगिक मते व्यक्तिनिष्ठ असतात, वस्तुनिष्ठ असू शकत नाहीत. देवाच्या/ ईश्वरी शक्तीच्या निव्वळ अस्तित्वात असण्याने विनाअट आणि सरसकट सगळे आलबेल होईल असे असते तर त्याला 'संभवामी युगे युगे' असे का म्हणावे लागले असते? त्याउपर सगळे 'आलबेल' असणे म्ह़णजे काय या बद्दल प्रत्येक व्यक्ती (उदा. साम्यवादी, हिंदुत्ववादी, समाजवादी, इहवादी, भोगवादी, शून्यवादी, अस्तित्ववादी वगैरे तसेच बायपोलार, नार्सिसिस्ट, बॉर्डरलाईन वगैरे व्यक्तिमत्व दोष असलेल्या व्यक्ती, गरीब बिचार्‍या व्यक्ती) आपापले वेगळेच मत व्यक्त करेल हे आलेच. असो.

In reply to by मूकवाचक

मराठी_माणूस 29/05/2020 - 15:23
पण संत साहित्यातील काही गोष्टी या 'अमूर्त संकल्पना' असू शकतात, तदनुषंगिक विचार केल्याने मन आणि बुद्धीच्या एका वेगळ्याच पैलूचा विकास होऊ शकतो अथवा होतो एवढेच विनम्रपणे सुचवतो.
धन्यवाद, ह्या संकल्पने कडे एका वेगळ्या दृष्टीकोनातुन पहाण्याचा परिचय करुन दिल्याबद्दल.

In reply to by मूकवाचक

> संत साहित्यातील काही गोष्टी या 'अमूर्त संकल्पना' असू शकतात, तदनुषंगिक विचार केल्याने मन आणि बुद्धीच्या एका वेगळ्याच पैलूचा विकास होऊ शकतो ? देव या निराधार कल्पनेचा मन आणि बुद्धीच्या विकासाला काय उपयोग आहे ? > अद्वैताचा अर्थ एकच गोष्ट मग ते इष्टदैवत असेल, निर्गुण निराकार असेल किंवा जावा/ पायथॉन भाषा असेल ती सगळ्यांवर लादण्याचा अनुदार दृष्टीकोन स्वीकारणे असा नसून विभिन्न वाटत असलेल्या गोष्टीतले एकत्व पाहणे आणि त्यात सुसंवादित्व स्थापन करणे असा होतो ? अद्वैताचा अर्थ सत्यापरता इथे काहीही नाही असा होतो. अद्वैत म्हणजे तुम्ही वर्णन केलेला समन्वयवाद नाही. ती वस्तुस्थिती आहे. > सगळ्या व्यक्ती कितीही वेगवेगळे वर्णन करत असल्या तरी त्या एकाच हत्तीबद्दल बोलत आहेत असा डोळस दृष्टीकोन यावा या साठीच सत्पुरूषांचे मार्गदर्शन मोलाचे असते हत्ती आणि आंधळे या गोष्टीचा इथे काहीही संबंध नाही. सत्य एक आहे आणि फक्त दोनच शक्यता आहेत : उलगडा झाला किंवा नाही झाला. सत्यात तिसरी शक्यता नाही आणि फालतू टाइमपास नाही. > आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आलेला नाहिये ... अमूर्त संकल्पनांचे तसेच असते. तदनुषंगिक मते व्यक्तिनिष्ठ असतात. कल्पनेचा अनुभव येणं याला भ्रम म्हणतात. > देवाच्या/ ईश्वरी शक्तीच्या निव्वळ अस्तित्वात असण्याने विनाअट आणि सरसकट सगळे आलबेल होईल असे असते तर त्याला 'संभवामी युगे युगे' असे का म्हणावे लागले असते? ही Waiting for the Godot थिअरी आहे. अशी फार युगं गेली कुणी काही येत नाही आणि येण्याची शक्यताही नाही.

In reply to by Prajakta२१

सगळा निव्वळ भोंगळ कारभार आहे. असे परमधाम वगैरे कुठेही नाही. > प्रत्येक देवाचे exclusive आहे का? देवही कल्पना आहे आणि मानवाच्या मेंदूपलिकडे ती कुठेही अस्तित्वात नाही. > सगळ्या स्तोत्रात शेवटी अशीच गाजरे दाखवतात... प्रत्येकी एक पोलीस नेमणं शक्य नसल्यानं, प्रत्येकाच्या मनात एक मॉरल पोलीस उभा करण्याचं काम देवही संकल्पना करते. गाजरामुळे लोक त्या पोलीसाचा स्वीकार करतात. यामुळे देवभोळे लोक कायम दबून राहतात आणि बेरकी त्यांना नडून आपलं जीवन बिनधास्त जगतात. > आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आला नाहीये कल्पना सत्य वाटणं या भ्रमाला लोक देवाचा अनुभव म्हणतात. बुद्धी शाबूत असणार्‍याला असे अनुभव येत नाहीत. > माणसांनी दुःख सहन करण्यासाठी (दुःख हे तुमच्या पूर्वकर्माचे फळ आणि त्या परंधामाचे ध्येय ठेवले कि दुःखाचा विसर पडतो म्हणून ) अशी गाजरे दाखवली जातात. एकदम बरोब्बर ! देव-देव करणार्‍यावर आपत्ती ओढवली तर तो स्वतःची समजूतही घालून घेतो, देवामुळे इतकाच राडा झाला नाही तर यापेक्षा जास्त वाट लागली असती. > काही काही श्लोक वाचून तर झगा मगा मला बघा नाहीतर मला पहा फुले वहा असाच थाट वाटतो अत्यंत योग्य निरिक्षण ! > देव जर आहे तर तो इतका सॅडीस्ट कसा काय ? देवही माणसाची निराधार कल्पना आहे. त्या कल्पनेत काहीही घडवण्याचं किंवा थोपवण्याचं सामर्थ्य नाही. प्रत्येकाला स्वतःची बुद्धी, वस्तुनिष्ठता, विज्ञानवादी दृष्टीकोन, जे काही असेल ते शारिरिक सामर्थ्य आणि जमेल तशी इतरांची मदत घेऊन आयुष्याला बिनधास्त सामोरं जायचं आहे. ______________________________________ तुमचा दृष्टीकोन योग्य आहे. लगी रहो !

In reply to by Prajakta२१

अर्धवटराव 01/06/2020 - 20:02
आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आला नाहीये
त्याविषयी कुणी आपले अनुघव सांगितले तर तो केवळ कल्पनाविलास म्हणुन अगोदरच कन्क्लुड केले आहे काय? सर्वात मुख्य म्हणजे त्यावर केवळ विश्वास न ठेवता तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष्य अनुघव घ्यायची इच्छा आहे का? त्याकरता थोडे प्रयत्न करायला लागतील... आर यु ऑन फॉर दॅट ?
माणसांनी दुःख सहन करण्यासाठी (दुःख हे तुमच्या पूर्वकर्माचे फळ आणि त्या परंधामाचे ध्येय ठेवले कि दुःखाचा विसर पडतो म्हणून )अशी गाजरे दाखवली जातात
गाजरांची कमी नाहि. अनेक आकार, उकार, इकार, निराकारांची गाजरं बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येकाची चव अणि मजा वेगळी आहे. आपल्याला फक्त एण्टरटेन्मेण्ट हवे असल्यास अक्खं आयुष्य कमी पडेल इतकी मजा आहे.
काही काही श्लोक वाचून तर झगा मगा मला बघा नाहीतर मला पहा फुले वहा असाच थाट वाटतो (देवाचा, लेखकाचा नव्हे)
राखी सावंत सर्वत्र असते. इथे मिपावर पण आहे :)
अवांतर -मागे अन्यत्र एका संस्थळावर अशीच चर्चा होती त्यात एक प्रश्न होता कि देव जर आहे तर तो इतका सॅडीस्ट कसा काय?सध्याची परिस्थिती बघून असेच वाटतेय
अवांतरावर अवांतर :) :- अंतु बर्वा उवाच... "अहो दिडशे वर्षे तुमचे... ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचेतला काटा सेकंदाने हलन नाहित हज्जर वर्ष झाल्या शिवाय..."

In reply to by अर्धवटराव

Prajakta२१ 02/06/2020 - 23:54
धन्यवाद अवांतरावर अवांतर :) :- अंतु बर्वा उवाच... "अहो दिडशे वर्षे तुमचे... ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचेतला काटा सेकंदाने हलन नाहित हज्जर वर्ष झाल्या शिवाय...">>>>>>> मग त्या ब्रह्मदेवाचा उपयोग काय ???? कृ ह घ्या

In reply to by Prajakta२१

अर्धवटराव 03/06/2020 - 03:27
ब्रह्मदेवाने तसे बरेच उद्योग केले... पण माणसाला सर्वात जात उपयोगी ठरणार्‍या दोन गोष्टी.. एक म्हणजे चार पायांचे गाढव दुसरे म्हणजे माणसासारखे दिसणारे दोन पायांचे गाढव. चार पायांचे गाढव तसं उपयोगी. निदान त्याला हे कळतं कि आपण केवळ भार वाहायच्या कामाचे आहोत. दोन पायांच्या गाढवांना हे कळतच नाहि कि त्यांना ज्ञानाचे ओझे झालेय. मग ते आपल्या खिंकाळण्याला 'एकसोएक बहारदार' गायकी समजतात, आणि लाथा झाडण्याला मुक्तीच्या मार्गावरचं पदलालित्य (ते ही 'अफलातुन' वगैरे विशेषणांनी नटलेलं) एव्हढं मनोरंजन करुन ठेवलय ब्रह्मदेवाने आपल्यासाठी ;)

मूकवाचक 29/05/2020 - 19:32
भगवद्गीतेसारखा विषय चर्चिला जात असेल तर मतमतांतरे असणे साहजिकच आहे, नव्हे ते गृहीतच धरावे लागते. महर्षी गीतेचा शेवटचा श्लोक १८.६२ आहे. भगवद्गीतेतल्या त्याच्या पुढच्याच श्लोकाचा संदर्भ घेतला तर वक्त्याची श्रोत्याबद्दलची, सद्गुरूंची शिष्याविषयी (तसेच भगवद्गेतीविषयी मिपावर धागा काढलेल्याची वाचकांबद्दल) भूमिका कशी असावी या बद्दल दिशा मिळते: इति ते ज्ञानमाख्यानं गुह्यादगुह्यतरं मया, विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरू (भगवद्गीता १८.६३) - याचा ढोबळमानाने अर्थ असा होतो की हे अर्जुना, गुह्यात गुह्य असे हे ज्ञान मी तुला कथन केले, आता त्यावर सांगोपांग विचार करून तुला उचित वाटेल ते तू कर. माझी भूमिका आता साधारण या प्रकारची झालेली आहे. असो. ज्या प्रतिसादांविषयी मी काहीच लिहीलेले नाही त्यात व्यक्त झालेली मते माझ्या समन्वयवादी विचारसरणीत नानाविध विचारप्रणालींपैकी एक या दृष्टीने फक्त स्वीकारार्हच नव्हेत तर स्वागतार्ह आहेत असे जाणावे. कोविड - १९ च्या संकटातून सुखरूप पार पडंण्यासाठी तसेच नजिकच्या कालखंडात सर्व मिपाकरांच्या जीवनात यश, मांगल्य आणि सौख्य यावे अशा शुभेच्छा!

In reply to by मूकवाचक

तुम्ही आवरतं घेतलंय ! > ज्या प्रतिसादांविषयी मी काहीच लिहीलेले नाही त्यात व्यक्त झालेली मते माझ्या समन्वयवादी विचारसरणीत नानाविध विचारप्रणालींपैकी एक या दृष्टीने फक्त स्वीकारार्हच नव्हेत तर स्वागतार्ह आहेत असे जाणावे. सत्य सर्वसमावेशक आहे, समन्वयवादी नाही आणि पलायनवादी तर नक्कीच नाही !

Prajakta२१ 30/05/2020 - 00:16
@मुकवाचक-शंकानिरसनाबद्दल धन्यवाद @संजय क्षीरसागर सर-धन्यवाद अवांतर -ह्याबाबतीत एकेश्वरवाद असल्यामुळे अब्राहमीक धर्म आणि सिख जास्त पुढारलेले वाटतात पण निर्गुण निराकाराची उपासना अवघड असल्याने आपल्या पद्धतीत सगुण साकार आणि त्यांचे वेगवेगळे ऑपशन्स (तुम्हाला जो आवडेल त्याची पूजा करा ) दिले आहेत आणि हेच आपले महान वैशिष्ट्य आहे असे माझ्या परिचयातील बऱ्याच लोकांचे मत आहे चांगल्या चर्चेबद्दल सर्वांचे धन्यवाद रमण महर्षींचे काही निवडक श्लोक चांगले आहेत (निवड चांगली आहे)

In reply to by Prajakta२१

> निर्गुण निराकाराची उपासना अवघड असल्याने आपल्या पद्धतीत सगुण-साकारा आणि त्यांचे वेगवेगळे ऑपशन्स (तुम्हाला जो आवडेल त्याची पूजा करा ) दिले आहेत आणि हेच आपले महान वैशिष्ट्य आहे. असे माझ्या परिचयातील बऱ्याच लोकांचे मत आहे निराकराची उपासना करायला लागत नाही. तो उलगडा आहे. __________________________________ हा उलगडा न झालेले लोक सगुण-साकाराचा गोंधळ माजवून आहेत. या सगुण-साकारामुळेच मानवता अनेक धर्मात विभागली गेली आहे आणि मानवी इतिहासात धर्मविस्तारास्तव आजपर्यंत अनेक युद्धे होऊन नाहक प्राण हानी आणि संपती विनाश झाला आहे. त्यामुळेच शतकानुशतके झालेली प्रगती पुन्हा धुवून काढली गेली आहे. ____________________________ लेखक म्हणतो त्याप्रमाणे सगुणोपासकात समन्वय असंभव आहे. उभे गंध लावणारे, आडवं गंध लावणार्‍यांच्या विरुद्ध आहेत. भगवे हिरव्यांच्या विरुद्ध, हिरवे, पांढर्‍या आणि भगव्यांच्या विरुद्ध, पांढरे पैश्याच्या जोरावर या दोघांना आपल्यात सामिल करतायंत ! असा सगळा सावळा गोंधळ आहे. _____________________________ थोडक्यात, सगुण-साकार हा भंपक कल्पनाविलास आहे. हटवादी निराकर हा सुद्धा पराकोटीचा विचार आहे. आणि निराकाराचा उलगडा होत नाही म्हणून हा सगळा उत्पात चालू आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी भगवद्गीता १०.२० या श्लोकाचा उल्लेख केला होता: जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात (श्री स्वामी स्वरूपानंद कृत श्रीमत भावार्थ गीता १०.२०) पुढे महर्षींनी गीता-सार सांगण्यासाठी भगवद्गीतेतल्या निवडक ४२ श्लोकांची सुसंगत आणि क्रमवार मांडणीदेखील केली (त्यात हा श्लोक चौथ्या क्रमांकावर येतो).

‘मी गोष्टीत मावत नाही’: नवा प्रयोग

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

गणेशा 16/05/2020 - 10:04
'मी गोष्टीत मावत नाही’ आज तुमचा हा लेख वाचला.. मस्त. ओघवता. कादंबरी नक्कीच घेऊन वाचायची इच्छा आहे.. (कुठे मिळेल पाहतो लॉकडाऊन नंतर. ) स्वतःच्या आयुष्याला मागे वळून पाहताना छान वाटते. तुमचे आयुष्य वाचायला आवडेल. वयक्तिक अवांतर -- डायरी लिहायचा माझा प्रयास कधीच पूर्ण झाला नाही आळस. त्यामुळे येथे शब्द झाले मोती मध्ये थोडे थोडे शब्द टाकतो.. न जानो उद्या त्याची कादंबरी होईल..असे उगाच वाटले. म्हणजे असे मला नेहमी वाटते कि कविता लिहिली कि माझी मुलगी मोठी होऊन ती गायील किंवा असे काही तरी.

गणेशा 16/05/2020 - 10:04
'मी गोष्टीत मावत नाही’ आज तुमचा हा लेख वाचला.. मस्त. ओघवता. कादंबरी नक्कीच घेऊन वाचायची इच्छा आहे.. (कुठे मिळेल पाहतो लॉकडाऊन नंतर. ) स्वतःच्या आयुष्याला मागे वळून पाहताना छान वाटते. तुमचे आयुष्य वाचायला आवडेल. वयक्तिक अवांतर -- डायरी लिहायचा माझा प्रयास कधीच पूर्ण झाला नाही आळस. त्यामुळे येथे शब्द झाले मोती मध्ये थोडे थोडे शब्द टाकतो.. न जानो उद्या त्याची कादंबरी होईल..असे उगाच वाटले. म्हणजे असे मला नेहमी वाटते कि कविता लिहिली कि माझी मुलगी मोठी होऊन ती गायील किंवा असे काही तरी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘मी गोष्टीत मावत नाही’ हा आगळा आविष्कार अस्तित्वात येण्याची पार्श्वभूमी म्हणजेच निर्मिती प्रक्रिया सांगण्याचा हा प्रयत्न. १९८२ पासून मी वहीत काही मजकूर लिहीत आलो. पण मी नक्की काय लिहितोय याचं मला थेट आकलन होत नव्हतं. यात केव्हा एखादा प्रचलित नसलेला विचार असायचा. मनात नवीन तयार झालेलं एखादं सुभाषित असायचं. नंतर लिहून पूर्ण होईल या आशेने काही अचानक सुचलेल्या कवितेच्या ओळी असायच्या. काही वेळा नाटकाचे संवाद वाटावीत अशी काही सुचलेली वाक्य असायची. (निसटून किती गेलं ते मोजता येणार नाही.) या समग्र लिखाणाच्या आविष्काराला पुढे नक्की काय वळण मिळेल मला त्यावेळी माहीत नव्हतं.

फाssट्टकन !!!

बोलघेवडा ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

बोलघेवडा 02/05/2020 - 18:44
अतृप्त आत्मा साहेब, ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे. कोणत्याही प्रकारचे फॉरवर्ड मी आजपर्यंत मिसळपाव काय कोणत्याच स्थळावर टाकलेले नाही. जे आहे ते स्वतचे आहे.

आताच्या उन्हात सकाळी दहाला केलेल्या कुरडया पापड्या सूर्य मावलायच्या आत वाळत्यात. रात्री ओल्या कुरडया पापड्या म्हणजे संध्याकाळी सहा नंतर केलेल्या असणार.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बोलघेवडा 02/05/2020 - 18:44
अतृप्त आत्मा साहेब, ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे. कोणत्याही प्रकारचे फॉरवर्ड मी आजपर्यंत मिसळपाव काय कोणत्याच स्थळावर टाकलेले नाही. जे आहे ते स्वतचे आहे.

आताच्या उन्हात सकाळी दहाला केलेल्या कुरडया पापड्या सूर्य मावलायच्या आत वाळत्यात. रात्री ओल्या कुरडया पापड्या म्हणजे संध्याकाळी सहा नंतर केलेल्या असणार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"हॅलो...अगंss सग्गssळ्या सोसायटीत बभ्रा झालाय. कुणाला म्हणून तोंड दाखवायची सोय ठेवलेली नाही ह्यांनी आता." . . "पण असं केलं तरी काय जावईबापुंनी...म्हणते मी???". . "अग्ग..सत्तत नजर ठेऊन असायचे त्या शेजारच्या चीचुंद्रीवर..सवितावर!! . आता त्या सटवेला...सासरचेही नाहीत अन् नवराही परगावी!! म्हणजे ह्यांना रान मोकळं!! . बरं, कुठं होतात म्हणून विचारलं तर कावरे बावरे व्हायचे नुसते!! मी काय दिलं नसतं करून?? . काssयबाई...मेला आचरट प्रकार!!..

पवित्रतास्वरूपिणी श्री शारदा माताजी - पुस्तक परिचय

Prajakta२१ ·

गामा पैलवान 29/04/2020 - 21:42
Prajakta२१, शारदामाता या खऱ्या पतिव्रता होत्या. पतीचं व्रत पुढे तब्बल ३४ वर्षं चालवलं. 'ते गेले आणि मुंगळ्यांची फौज माझ्याकडे धाडली आहे' असं म्हणायच्या. ते म्हणजे त्यांचे पती श्रीरामकृष्ण परमहंस आणि मुंगळे म्हणजे कसलीही साधना न करता मुक्तीची अपेक्षा ठेवणारे मूढमती लोकं. असल्यांच्या बरोबर राहून त्यांचा उद्धार करणं हे निव्वळ अशक्य आहे. पण माताजींनी करून दाखवलं. त्यांना जिवंत दुर्गा म्हणून संबोधलं जात असे. आ.न., -गा.पै.

Prajakta२१ 29/04/2020 - 21:48
प्रसन्न अध्यात्म हे त्यांच्या सान्निध्यात असताना जाणवते श्री रामकृष्ण परमहंस हे शिष्यांना पारखून घेण्याबाबत खूपच कडक होते पण श्री माताजी सगळ्यांना प्रवेश देत मुक्तपणे

मायमराठी 29/04/2020 - 23:25
श्रीमाताजींच्या या परस्परावलंबी अशा त्रिविध शक्तींच्या अविष्कारामध्ये कोणी कोठे संपते आणि कोणती कोठे आरंभ होते ते आपल्या बुद्धीला उमगत नाही " - हे वाचलं की पुढे काही लिहायची बुद्धी उरतेच कोठे? अलौकिक प्रेरणादायी आयुष्य.

मन्या ऽ 05/05/2020 - 01:08
छान लेख! मला शिबिरात जाण्याचा योग अजुन आलेला नाही. पण मन उदास असेल तेव्हा पाय आपोआप शारदा मठाकडे वळतात.. तिथल्या सायंकाळच्या आरतीच्या वेळी जे धीरगंभीर वातावरणात मन अगदी प्रसन्न होत..

गामा पैलवान 29/04/2020 - 21:42
Prajakta२१, शारदामाता या खऱ्या पतिव्रता होत्या. पतीचं व्रत पुढे तब्बल ३४ वर्षं चालवलं. 'ते गेले आणि मुंगळ्यांची फौज माझ्याकडे धाडली आहे' असं म्हणायच्या. ते म्हणजे त्यांचे पती श्रीरामकृष्ण परमहंस आणि मुंगळे म्हणजे कसलीही साधना न करता मुक्तीची अपेक्षा ठेवणारे मूढमती लोकं. असल्यांच्या बरोबर राहून त्यांचा उद्धार करणं हे निव्वळ अशक्य आहे. पण माताजींनी करून दाखवलं. त्यांना जिवंत दुर्गा म्हणून संबोधलं जात असे. आ.न., -गा.पै.

Prajakta२१ 29/04/2020 - 21:48
प्रसन्न अध्यात्म हे त्यांच्या सान्निध्यात असताना जाणवते श्री रामकृष्ण परमहंस हे शिष्यांना पारखून घेण्याबाबत खूपच कडक होते पण श्री माताजी सगळ्यांना प्रवेश देत मुक्तपणे

मायमराठी 29/04/2020 - 23:25
श्रीमाताजींच्या या परस्परावलंबी अशा त्रिविध शक्तींच्या अविष्कारामध्ये कोणी कोठे संपते आणि कोणती कोठे आरंभ होते ते आपल्या बुद्धीला उमगत नाही " - हे वाचलं की पुढे काही लिहायची बुद्धी उरतेच कोठे? अलौकिक प्रेरणादायी आयुष्य.

मन्या ऽ 05/05/2020 - 01:08
छान लेख! मला शिबिरात जाण्याचा योग अजुन आलेला नाही. पण मन उदास असेल तेव्हा पाय आपोआप शारदा मठाकडे वळतात.. तिथल्या सायंकाळच्या आरतीच्या वेळी जे धीरगंभीर वातावरणात मन अगदी प्रसन्न होत..
लेखनविषय:
लेखनप्रकार
पवित्रतास्वरूपिणी श्री शारदा माताजी - पुस्तक परिचय साधारण एक दीड वर्षांपूर्वी पुण्यातल्या शारदा मठातल्या २ दिवसांच्या युवती शिबिराला जाणे झाले तो अनुभव फारच छान होता पूर्ण महाराष्ट्रातून खूप मुली आल्या होत्या एक तर nethrland हुन आली होती दोन दिवस ९-५ असे होते चहा नाश्ता जेवणासकट. युवतींना अनुसरून शिबिरातील कार्यक्रम खेळ पथनाट्य असे उपक्रम होते सोबतच स्वामी विवेकानंद,रामकृष्ण परमहंस,आणि श्री शारदा माताजी ह्यांच्या जीवनाची ओळख पण तिथल्या माताजी सांगत होत्या.