काबो पॅलेस / राजभवन आणि गोव्यातील किल्ल्यांचा आढावा
गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, हिरव्या गर्द माडांच्या गर्दीतून डोकावणारे मंदिरांचे रंगीत कळस आणि चर्चेचे पांढरे मनोरे,मासळीचा स्वाद दुणा... आणि बरोबरची झिंग आणणारी पेयं.
सरतील कधी शोष शोषितांचे!
खंड पहिला
भाग – २.
भिक्षां देहि च पार्वति
अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥
मी पाहिलंय...
मी पाहिल्यात इच्छा आकांक्षांच्या कळ्या.
उमलताना फुलताना, मस्त बहरताना.
काहींना झाडावरच कोमेजताना.
काहींना निर्माल्य होताना.
मी पाहिलेत निर्धाराचे पाषाण.
अविचल स्तब्ध असताना.
प्रयत्नांचे घण चिकाटीने सोसतांना.
मूर्ती बनून श्रद्धास्थानी बसताना.
मी पाहिलंय सदा भुकेल्या अहंकाराला.
अधाशीपणे सुख उपभोगताना.
कधी सोयीस्कर मस्तक झुकवताना.
कधी दैवाकडे जोगवा मागताना.
मी पाहिलेत बुद्धीचे गगनचुंबी मनोरे.
अंतराळाला गवसणी घालताना.
हव्व्यासाच्या नादी लागताना.
जमिनीशी नातं तोडून टाकताना.
सरतील कधी शोष शोषितांचे!
एक दीर्घकथा सुरू करीत आहे. हजारो वर्षांच्या कालपटावर ही घडली आहे, व पुढे घडणार आहे. माणसे बदलतील, स्थलकाल बदलतील.. पण माणूस बदलणार नाही.. नक्की? बघूयात..
आरसा
झालं गेलं गंगेला मिळालं,
विचार करू नये फारसा.
बाकी सगळे ऐकतात हो,
पण ऐकत नाही तो फक्त आरसा.
आरशाची एक मोठी गंमत असते,
त्यात पाहिल्यावाचून राहवत नाही.
प्रतिबिंब नव्हे प्रखर सत्य ते,
अधिक काळ पाहवत नाही.
आरशावर का चिडू मी,
तो थोडीच आठवणी साठवत होता.
पण त्याच्या कडे पाहताना नेहेमी,
मला माझा भूतकाळ आठवत होता.
हल्ली आरशात मी बघतच नाही,
कारण मग नंतर मन रमतच नाही.
आता कल्पनेतच जगीन म्हणतो,
सत्याला सामोरं जाणं जमतच नाही.
मामलेदार नावाचं गारूड
काल मामलेदार मिसळ चे जनक गेले आणि प्रकर्षाने तात्याची आठवण झाली. ज्या संकेतस्थळाचं नाव मिसळपाव आहे त्यावर मामलेदार मिसळ विषयी काही तरी लिहावे अशी अतीव इच्छा झाली.
या संकेतस्थळाचा जनक तात्या अभ्यंकर आणि मामलेदार मिसळ म्हणजे तात्याचा जीव की प्राण.
बाहेरून आलेल्या कुण्या जालमित्राला मामलेदार ला घेऊन जाणं हा तात्याचा छंदच.
काल लक्ष्मण शेठ गेले आणि सर्व प्रसारमाध्यमांनी त्याची आवर्जून दखल घेतली, खास करून व्हॉट्स ॲप वर अनेकांनी मामलेदार मिसळ वर भरभरून लिहिलं. मामलेदार मिसळ ही ठाणे शहराची एक ओळखच.
गोव्याचा इतिहास भाग -२ ( शिवोत्तर काल )
संभाजी राजांचा उदय
चंद्रायण..!
ही रात निळीशार,
ओतीत चंद्र-धार...
स्वप्नातल्या कळ्यांना
देते नवा आकार!
पाण्यात चंद्र-पक्षी,
मांडून सौख्य-नक्षी...
किरणावरी शशीच्या
होतात मंद स्वार!
पाहून चंद्र-मेळा,
क्षितिजास ये उमाळा...
नक्षत्र बांधतात
तारांस एक-तार!
स्वप्नील चंद्र-गाणे
मधु-मीलनी उखाणे...
गातात फूल, वारे
छेडीत गंध-तार!
एकांत चंद्र-वेडा,
वितळून जात थोडा...
देतो अनामिकेला
अलगूजशी पुकार!
उचलून चंद्र-मेणा,
र्हदयात चंद्र-वेणा...
कित्येक चंद्र-वेळा,
करतात येरझार!
— सत्यजित