बरसणाऱ्या सरी|
नभावरची साय
ऊतू ऊतू जाई,
गंधवेडी अवनी
बहरली रानो वनी||१||
फेसाळला नदीकाठ
ऋतू फुलांची गर्दी दाट
हिरव्या पदरावरती
दव मोती भरती ||२||
भिरभिरणाऱ्या अंगणात
फडफडती भिंगोरी पंखात
बरसणाऱ्या सरी धारा
काळजाचा गार निवारा||३||
-भक्ती
नभावरची साय
ऊतू ऊतू जाई,
गंधवेडी अवनी
बहरली रानो वनी||१||
फेसाळला नदीकाठ
ऋतू फुलांची गर्दी दाट
हिरव्या पदरावरती
दव मोती भरती ||२||
भिरभिरणाऱ्या अंगणात
फडफडती भिंगोरी पंखात
बरसणाऱ्या सरी धारा
काळजाचा गार निवारा||३||
-भक्ती
घृणा देखील एक प्रक्रिया आहे. जन्माने कूणीही कोणाचीही घृणा करत नाही. लहाम मुलाला आपल्या विष्ठेचीही घृणा वाटत नाही आणि मुलाला फटकारून पालकांना हात लावू नको असं सांगावं लागतं. पेरियार यांच्यातील द्वेष एका दिवसात जन्माला आलेला नव्हता. ती एक प्रक्रिया होती.
रात्रीचे साडेअकरा वाजले, आणि मी फोनाफोनी सुरू केली. पोलीस कंट्रोल, महापालिका, फायर ब्रिगेड, अन्य वर्तमानपत्रातल्या रात्रपाळीच्या रिपोर्टरांशीही फोनवर बोललो. नवी एडिशन काढावी लागेल असं काही फारसं घडलं नाहीये, याची खात्री करून घेतली, आणि मी आवराआवर केली. तो १९८९ सालातला गणेशचतुर्थीच्या आधीचा दिवस होता. चतुर्थीला सुट्टी होती. ‘उद्या अंक नाही’ अशी चौकट पेपरात ज्या मोजक्याच दिवशी छापली जाते, त्यापैकी हा एक दिवस! मी तयार होऊन थांबलो आणि काही वेळातच एक जाडजूड पिशवी खांद्यावर घेऊन सन्मित्र तानाजी कोलते Tanaji Kolte दाखल झाले. तानाजी तेव्हा माझा सीनियर सहकारी होता.
नेताजीचे सहवासात - भाग २ - अ

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश
कार्यबाहुल्यामुळे हा भाग लिहिण्यास खूपच उशीर झाला..
पहिल्या भागाची लिंक देत आहे..
पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर.
रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली.
नुकत्याच होऊन गेलेल्या
वर्षावाला, निथळून टाकणारी
हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई.
सकाळचे कोवळे ऊन पिऊन
तजेलदार झालेली नवी पालवी.
स्वच्छ धुऊन निघालेले,
लाल मातीच्या चिखलावर,
रेखीव छान वळणदार रांगोळीची
जणू निळीशार रेघच असलेले रस्ते.
त्यावरून वळणे घेत घेत मी
निवांतपणे,
आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत,
मजेत आवडीचे गाणे गुणगुणत,
घाटमाथ्यावर चढून जातो
आणि,
पुढे तसाच खाली उतरून जातो.
दिवसभर राबायला,
सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला.
परत येताना पुन्हा तेच सारं.
लघुकथा
अलक 1
आजोबांपासून चालत आलेला गाण्याचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेतोय याबद्दल गायत्रीताईना समाधान होते. एवढंच नव्हे तर पंतांची मुलगी अशी ओळख संपून गायत्री दांडेकर अशी ओळख निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो याचा त्यांना अभिमानच होता. पण एक खंत मात्र होती. प्रेमाने ज्याच नाव त्यांनी गंधार ठेवलं होतं, दुर्दैवाने तो मुलगा मुका होता. आपला कलेचा वारसा इथेच संपला या जाणीवेने त्या अस्वस्थ होत. पण वयाच्या तिसर्या वर्षापासून गंधार आई रियाजाला बसली कि समोर बसायचा. खरं तर गायत्रीताईना ते आवडायचं नाही. पण आधीच व्यंग असलेल्या मुलाला आणखी काय बोलणार म्हणून सोडून द्यायच्या.
पांचाली आपल्या आजी-आजोबांसोबत कोलकत्ता शहरांत राहत असते. त्या तिघांच्या नात्यांत प्रेम, आपुलकी, काळजी तर आहेच पण त्यापलीकडेही जाऊन मोकळी मैत्रीही आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील एका विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला आहे. तिची अमेरिकेत येण्याची तयारी सुरु असतांनाच त्या कुटुंबाला एका दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागते. आणि खास आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पांचाली लखनऊला येते. तिला तिच्या आजीची बिर्याणीची (सिक्रेट) रेसिपी शोधायची आहे. त्यासाठी ती तिच्या आजीच्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटते. या प्रवासात तिला तिच्या आजी-आजोबांची प्रेमकहाणी हळुवारपणे उलगडत जाते.
ऐक.. दरवाजा उघडू नकोस!
(गूढकथा)