नर बळी

देवू's picture
देवू in जनातलं, मनातलं
18 Aug 2022 - 5:23 pm

ह्या वाक्यातील क्रियापद कोण सांगू शकेल?
अख्ख्या वर्गाने हात वर केले , फक्त मी सोडून.
उत्तर येत नसले तरी सर्वांबरोबर आपणही हात वर केल्यास आपल्याला विचारण्याची शक्यता कमी होत असल्याने बरेच जण तसे करायचे. मी हात वर न केल्याने मला बाई नक्कीच उत्तर देण्यासाठी विचारतील ह्याची खात्री होती. त्याला कारणही तसेच होते.

मी कुठलेही मराठी व्याकरण न शिकता बालवाडीची मुलाखत मराठीत देऊन प्रवेश मिळवला होता. सगळं काही सुरळीत चालू होते, परंतु पुढे वरच्या वर्गात ह्या मातृभाषेच्या व्याकरणाने मला " दे माय धरणी ठाय " करून सोडले.

विनोदविरंगुळा

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
17 Aug 2022 - 6:35 pm

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

"कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत, आल्हाददायक हवा खात थोडावेळ घालवल्यावर लॉंचसाठीची गर्दी कमी झाल्याचे पाहून आम्ही तिथून निघालो आणि काही मिनिटांत किनाऱ्यावर पोचलो. ठरलेल्या वेळी बहीणही तिथे आली आणि वीस-पंचवीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिच्या करमळीच्या घरी पोचलो. तिने तयार करून ठेवलेला इडली सांबार भरपेट खाऊन रात्रभराच्या जागरणामुळे झोप अनावर झाल्याने सरळ झोपून गेलो... "
-----

बिग बुल

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
17 Aug 2022 - 2:31 pm

वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, मार्जिन कॉल ते स्कॅम १९९२. जवळपास प्रत्येक सिनेमा आणि टीव्ही सिरिजने शेअर बाजाराला सट्टा बाजार स्वरूपात दाखवलं आहे. हा सट्टा खेळून नुकसान करून ठेवल्याचे एक तरी उदाहरण प्रत्येक घरात असते. या सर्व प्रकारात, बहुतांश ठिकाणी राकेश झुनझुनवाला नाव माहीती असलं तरी कामाबद्दल फार कमी माहीती असते. नाव माहीती असल्याचं कारण म्हणजे बनलेला पैसा. कामाबद्दलची माहीती तशी कमी प्रकाशझोतात असते. बाजारातले काम आणि त्याचे महत्व मेन स्ट्रीम मध्ये फार कमी वेळा दिसते.

तंत्रगुंतवणूकप्रकटनविचारमत

हर घर तिरंगा, घर घर तिरंगा

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
16 Aug 2022 - 7:22 pm

नुकत्याच पार पडलेल्या ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ ह्या उपक्रमाला भारतीय जनतेने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहिला व मन आनंदाने व अभिमानाने भरून आले. ज्या पिढीने १९४७ ते २०२२, हा पंचाहत्तर वर्षांचा कालावधी प्रत्यक्ष पाहिला, अनुभवाला व उपभोगीला ती पिढी भाग्यवानच म्हणायची, त्याच प्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली आमची पिढी देखील तितकीच नशीबवान म्हणायची. ज्या तिरंग्याने आम्हाला हा बहुमान दिला त्याचे आभार मानावेत तेव्हढे कमीच आहेत.

समाजविचार

अमरनाथ यात्रा--१

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
16 Aug 2022 - 6:13 pm

अमरनाथ यात्रा-बेचाळीस वर्षापुर्वीची आणी आताची.

https://www.misalpav.com/node/50542/backlinks

१. सन ऐंशीमधे अनुभवलेल्या अमरनाथ यात्रेतील अडचणी, सुखसोई व यात्रेकरूस आज उपलब्ध असलेल्या सोईंचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.

२. क्लिक ३ कॅमेरात कैद केलेली छायाचित्रे काळाच्या ओघात लुप्त झाली, यंदा गेलेल्या यात्रेकरूने काही छायाचित्रे पाठवली आहेत व काहीअंतरजाला वरून घेऊन जुन्या आठवणींना उजळा द्यायचा प्रयत्न आहे. यात्रेकरूचे आणी आन्तर्जालाचे आभार.

मागील भागातून...

येऊर - सोपी पावसाळी भटकंती

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
16 Aug 2022 - 11:58 am

येऊर - सोपी पावसाळी भटकंती

आपण यूट्यूबवर पावसाळी भटकंती, धबधबे याचे विडिओ पाहतो ते सर्व बहुतेक मोठ्या लोकांसाठी असतात. दहा वर्षांखालील लहान मुलांना नेण्यासाठी एखादी सोपी भटकंती करायची असेल तर ठाण्यातला येऊर/येवूर डोंगर म्हणता येईल. बरेच जण एखाद्या रिझॉटला किंवा वॉटरपार्कात जातात. तिथे सर्व कृत्रिम सोयी असतात पाण्यात खेळायच्या. पण खरेखुरे डोंगर,रान,पायवाट,झरे,आणि अधुनमधून येणारा पाऊस याची मजा थोडक्यात ,स्वस्तात घ्यायची असेल तर येवूरचा नक्की विचार करा.

भारत माझा देश आहे

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
15 Aug 2022 - 12:31 am

तुमच्या घरात कुणी तिसराच राहायला येऊन "आता हे घर माझं आणि तुम्ही नोकर", असं म्हणाला तर तुम्ही काय कराल? काही आक्रमण करणाऱ्यावर हल्ला करतील, काही वाटाघाटी करतील आणि काही मलाही तसं सगळं सांभाळायला अवघड जात होतं असा विचार करून चक्क त्या त्रयस्थ माणसाची गुलामी स्वीकारतील. थोडं वरच्या पातळीवर जाऊ. त्या शेवटच्या माणसासारखा गावचा सरपंच वागला तर गावचा कारभार तिसऱ्याच माणसाच्या ताब्यात जाणार. आजपासून सुमारे सव्वा चारशे वर्षांपूर्वी, इसवी सन १६०० साली असंच काहीसं घडलं.

इतिहाससमाजजीवनमान