दिव्यास्त्रांची मर्यादा आणि अंधश्रद्धा निर्मूलन
रामायणात एक सुन्दर गोष्ट आहे.
विश्वामित्रांनी दशरथाकडून राम-लक्ष्मणांना राक्षसांच्या वधासाठी मागून नेले, तेव्हा त्यांना वनात प्रथम बला-अतिबला या दोन विद्या शिकवल्या. त्यानंतर जेव्हा त्यांना दिव्यास्त्रे देण्याची वेळ आली तेव्हा काही अस्त्रे विश्वामित्रांनी दोघांना दिली आणि त्यानंतर ते म्हणाले,
यानंतर काही अस्त्रे मी फक्त रामालाच देणार आहे. कारण त्यांचा वापर करण्यासाठी लागणारा संयम फक्त त्याच्याकडेच आहे.
महाभारतातही अशीच काहीतरी गोष्ट आहे.अर्जुन आणि अश्वत्थाम्याची.