Skip to main content

५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका - भाग २

लेखक विकास यांनी रविवार, 08/12/2013 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका हा श्रीगुरुजी यांचा धागा दोन पानाहून जास्त झालेला असल्याने निवडणुकांचे काही तासात लागणारे निकाल ट्रॅकींग करणे आणि त्यावर / त्यासंदर्भात चर्चा करणे अवघड जाऊ शकते. म्हणून हा धागा काढत आहे आणि त्या धाग्याऐवजी हा धागा वापरण्याची विनंती करत आहे. काही मुलभूत माहिती:

२०१३ अंदाज

राज्य २००८


  काँग्रेस भाजप
मध्य प्रदेश ७१ १४३
राजस्थान ९६ ७८
दिल्ली ४३ २३
छत्तीसगड ३८ ५०

 


वाचने 35325
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

मतमोजणी सुरू झाली आहे (बरोबर ८ वाजता).पहिले कल अजून १५ मिनिटात येणे अपेक्षित आहे.

पहिला कल मध्य प्रदेशातून. टिकमगढमधून कॉंग्रेस आघाडीवर. २००८ मध्ये कॉंग्रेसने ही जागा ९ हजार मतांनी जिंकली होती.

मध्य प्रदेश: भाजप-११, कॉंग्रेस-८ राजस्थान: भाजप-२, कॉंग्रेस-३ छत्तिसगड: भाजप-६, कॉंग्रेस-५ दिल्ली: आआपा: १ अजून पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी चालू आहे आणि मशीनमधील मतांची मोजणी सगळीकडे सुरू झालेली नाही.

In reply to by क्लिंटन

शीला दिक्षित पुढे आहेत. याचा अर्थ केजरीवाल मागे आहेत का त्या दोन ठिकाणाहून उभ्या राहील्या आहेत? तसेच पोस्टातून आलेली मते हा प्रकार कायम असतो का? आधी कधी ऐकल्याचे आठवत नाही...

In reply to by विकास

शीला दिक्षित नवी दिल्लीमधून पुढे आहेत. केजरीवाल आणि भाजपचे विजेंद्र गुप्ता मागे आहेत. पोस्टाने पाठवलेली मते नेहमी असतात. लष्करात नोकरी करणार्‍या मतदारांसाठी पोस्टाने मते पाठवता येतात. इतर कोणी अशी मते पोस्टाने पाठवू शकतो की नाही माहित नाही. अर्थातच अशी मते फार नसतात.आणि ही मते मतपत्रिकेच्या स्वरूपात असल्याने ती मते मोजायला वेळ लागतो.

In reply to by क्लिंटन

पोस्टाने पाठवलेली मते नेहमी असतात. लष्करात नोकरी करणार्‍या मतदारांसाठी पोस्टाने मते पाठवता येतात. इतर कोणी अशी मते पोस्टाने पाठवू शकतो की नाही माहित नाही. अर्थातच अशी मते फार नसतात.
सध्या परिस्थिती थोडी वेगळी आहे. आता निर्वाचन प्रक्रियेत सहभाग असलेल्या सगळ्या लोकांना म्हणजे Presiding Officers, Polling officers (Polling Party), Drivers, Handymen अश्या सगळ्यांनापण पोस्टल बॅलट द्यावं लागतं.. अटीतटीच्या लढतीत ही मतं आता फार महत्त्वाची ठरु शकतात.. आमच्याइथे एक निकाल पोस्टल बॅलेटच्या मोजणीनंतर पलटला होता..

मध्य प्रदेश: भाजप-२१, कॉंग्रेस-१० राजस्थान: भाजप-३१, कॉंग्रेस-७ छत्तिसगड: भाजप-९, कॉंग्रेस-९ दिल्ली: भाजप:१०, कॉंग्रेस:५ आआप: ५, बसप आणि इतर: ५ छत्तिसगड आणि दिल्ली इंटरेस्टींग वाटत आहेत. छत्तिसगडमध्ये राज्याच्या दक्षिण भागात भाजप मागच्या वेळेपेक्षा पिछाडीवर आहे.भाजपसाठी ही वाईट बातमी आहे.

शीला दिक्षित पुढे आहेत ते... म.टा. / टाईम्स नाऊ मधे आलेल्या फोटो प्रमाणे त्यांच्या घरी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्या जिंकून याव्यात म्हणून होम-हवन चालू आहे. Sheela Dikshit Home बरं झालं त्या महाराष्ट्रात नाहीत नाहीतर अंधश्रद्धा निर्मूलन वटहुकूमाखाली उगाच कारवाई झाली असती! ;)

छत्तिसगडमध्ये २००३ आणि २००८ मध्येही अशीच चुरस होती.या राज्यातील निकाल केरळप्रमाणे थोड्या फरकाने ठरविले जातात.दोन्ही वेळा कधी भाजप पुढे होता तर कधी कॉंग्रेस. शेवटी भाजपने दोन्ही वेळा विजय मिळवला. यावेळी बघू काय होते ते.

दिल्ली - एनडीटिव्ही ९:१८ एएमः आम आदमी १७ आणी भाजपा २० ने पुढे आहेत तर काँग्रेस ८ ने (गेल्या वेळपेक्षा २३ ने मागे) छत्तीसगढ मधे काँग्रेस पुढे आहे काँग्रेस १६ भाजपा १५ (गेल्या वेळ पेक्षा ४ ने मागे)

मध्य प्रदेश: भाजप-५८, कॉंग्रेस-२१, इतर:३ राजस्थान: भाजप-७२, कॉंग्रेस-२१, इतर:५ छत्तिसगड: भाजप-१६, कॉंग्रेस-१८, इतर:१ दिल्ली: भाजप:२२, कॉंग्रेस:८ आआप: १८, बसप आणि इतर: ३ मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला landslide विजय मिळणार असे दिसते. कालच फेसबुकवर माझे स्टेटस होते: In 1998, no exit/opinion poll gave more than 120 seats to Congress and fewer than 70 seats to BJP in Rajasthan. What was the result? Congress won 153 and BJP won 33!! Similarly no exit/opinion poll gave more than 120 seats to Congress and fewer than 170 seats to BJP in MP (including Chhattisgarh back then). What was the result? Congress won 172 and BJP won 118!!. Exit/opinion polls had failed to judge the level of anger against Vajpayee government at the center, which was grappling with onion crisis and continuous threats by Jayalalitha's AIADMK. In the state assembly elections of December 2013, IMO exit/opinion polls seem to have failed to gauge the level of anger against Manmohan Singh's UPA government at the center. I would not be surprised if BJP actually wins 160 seats in MP and 140 seats in Rajasthan. Let's wait till tomorrow to see if this actually comes true or not. तेव्हा I am feeling vindicated :)

आत्ता केजरीवाल म्हणत आहेत की कोणालाच पाठिंबा देणार नाही पण मला वाटतं की आताचा कल पाहता (२१-१८-८)काँग्रेस ३ नंबरला राहील आणि शेवट कोणत्याच पक्षाच्या बाजूने स्पष्ट निकाल नसल्यामुळे केजरीवालंना सरकार बनवायला बाहेरून मदत करील.

In reply to by पैसा

तात्विकदृष्ट्या जर केजरीवाल कुणाला पाठींबा देत नसतील तर त्यांनी कुणाचा पाठींबा घेऊ देखील नये. पण जर अशी वेळ आली तर अजून एक व्हेरीएबल असेलः ते स्वतः हरणार आहेत असे दिसते त्यामुळे त्यांचे स्वतःचे वजन किती राहू शकेल हे पहावे लागेल.

छत्तिसगडमध्ये काँग्रेस आता बर्‍यापैकी पुढे आहे. काँग्रेसला २८ आणि भाजपला १७.

In reply to by क्लिंटन

नक्षलवाद्यांनी केलेल्या कॉन्ग्रेसी नेत्यांच्या हत्येमुळे मिळालेल्या सहानुभूतीचा परीणाम असू शकतो काय?

In reply to by प्रचेतस

असे आत्ता एनडीटिव्हीवर म्हणले जात आहे. जर छत्तिसगढ मधे भाजपा हरले आणि दिल्लीत त्रिशंकू आले तर काँग्रेसचे नेते म्हणू लागले आहेत की मोदी फॅक्टर नाही म्हणून. मोदी फॅक्टर आहे का नाही माहीत नाही, पण राहूल फॅक्टर जबरीच दिसत आहे. ;)

In reply to by विकास

अगदी. :) बाकी नवी दिल्लीचे सध्याचे स्टॅटस काय? शीलाबेन पुढे आहेत का केजरीवाल अण्णा?

In reply to by प्रचेतस

तसे नक्कीच वाटत आहे. अर्थात महेंद्र कर्मा आणि इतर नेते असते तर काँग्रेसने किती जागा जिंकल्या असत्या हे सांगता येणे शक्य नाही पण राज्याच्या दक्षिण भागात काही प्रमाणात काँग्रेसला नक्कीच फायदा झाला असावा असे वाटते.

छत्तिसगढ काँग्रेसच्या पारड्यात जाऊ शकते अशी चिन्हे दिसत आहेत.

अभिषेक मनू सिंघवी म्हणतातः नरेंद्र मोदींचा काहीच परिणाम दिसत नाही. अगदी हीच गोष्ट कोणाकडून तरी ऐकायची वाट मी बघत होतो. आता ते मिपावर कोण म्हणतो तेच बघायचे. :)

मध्य प्रदेश: भाजप-८१, कॉंग्रेस-३२, इतर:४ राजस्थान: भाजप-९६, कॉंग्रेस-२७, इतर:९ छत्तिसगड: कॉंग्रेस-३३, भाजप:२५ दिल्ली: भाजप:२८, आआप: २०, कॉंग्रेस:१२, बसप आणि इतर: २

छत्तिसगडमध्ये आता काँग्रेस ३४ आणि भाजप ३१. तेव्हा छत्तिसगडमध्ये जोरदार चुरस चालू आहे.हे बघता अगदी २००३ ची आठवण येत आहे.

In reply to by क्लिंटन

दिल्लीत भाजपा ३३ आप २३ काँग्रेस ९

मध्य प्रदेश: भाजप-९९, कॉंग्रेस-४५, इतर:६ राजस्थान: भाजप-११९, कॉंग्रेस-२९, इतर:१८ छत्तिसगड: कॉंग्रेस-३७, भाजप:३३ दिल्ली: भाजप:३३, आआप: २४, कॉंग्रेस:९, बसप आणि इतर: २

In reply to by विकास

हो छत्तिसगडमध्ये शेवटचा निकाल येईपर्यंत कोणतेही अनुमान काढणे घाईचे ठरेल. अजून एक-दोन वेळा राज्यातील कल वरखाली झाले तरी त्यात आश्चर्य वाटायला नको. दिल्लीमध्ये ६८ पैकी ३४ ठिकाणी भाजप पुढे.

दिल्लीत कॉन्ग्रेसचा पूर्ण सफाया झालेला दिसतोय. 'आप' ने भाजपापेक्षा कान्ग्रेसी मते खाल्लेली दिसत आहेत.

मध्य प्रदेश: भाजप-१२५, कॉंग्रेस-५६, इतर:१० राजस्थान: भाजप-१३१, कॉंग्रेस-२६, इतर:२० छत्तिसगड: कॉंग्रेस-३९, भाजप:३४ दिल्ली: भाजप:३२, आआप: २४, कॉंग्रेस:१२, इतर: १

दिल्लीमध्ये भाजपा ३१ आम २४ आणि काँग्रेस १४ अपक्ष ३(सकाळचे १०:१९) जर असेच सगळे फायनल निकाल आले तर भाजपाला राज्य करण्यासाठी ३ अपक्षांचा पाठींबा लागेल आणि काँग्रेस/आम ची अलिप्तता.. इंटरेस्टींग!

सौ बातो की एक बात. कांग्रेस चा धुव्वा उडाला आहे. देशाच्या या भागात कांग्रेस विरोधी लाट आहे हे स्पष्ट आहे. पण मोदी लाट आहे का याबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत . मध्य प्रदेश मधल्या विजयाचे श्रेय शिवराज सिंग चौहान याना जाइल . त्यांनी सरकार खूप चांगल्या प्रकारे चालवले. दिल्ली आणि छत्तीसगड मध्ये मोदी factor फारसा चालला नाही हे तर स्पष्टच आहे . राजस्थान मध्ये मात्र मोदी factor चालला असे मानायला भरपूर वाव आहे. या विजयाने भाजप हुरळून जाणार असेल तर ती मोठी चूक ठरेल . २००३ मध्ये भाजप ने विधानसभा निवडणुकात असाच clean स्वीप केला होता मात्र लोकसभा निवडणुकीत त्याना पराभव स्वीकारावा लागला . यावेळेस्चे भाजप नेतृत्व अति आत्मविश्वास मोड मध्ये जाण्याची चूक करणार नाही हि अपेक्षा . बाकी दोन मोठ्या पक्षाना उरावर घेऊन दिल्ली मध्ये घवघवीत यश मिळवणारे अरविंद केजरीवाल आणि सुशासन देऊन आक्रस्ताळा प्रचार न करता सलग ३ री टर्म मिळवणारे शिवराज सिंग चौहान हे पप्पू आणि फेकू पेक्षा या निवडणुकांचे मोठे नायक . बाकी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही भ्रष्ट पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे रास्त मत असणार्या अनेक लोकांच्या मनात आप च्या यशाने आशा पालवल्या आहेत .

In reply to by पिंपातला उंदीर

मी तर म्हणेल कि मोदी फॅक्टर कुठेच चालला नाहि... तसा तो चालायचं काहि कारणच नाहि. हि चारही राज्ये त्यांच्या स्वभावानुसारच वागलीत. राजस्थान आलटुन पालटुन सत्ता फिरवत असतो. म.प्र. मधे आरएसेसचा प्रभाव बर्‍यापैकी आहे व चौहान साहेबांनी कामही चांगलं केलं म्हणतात. मग मतदार आपला कौल का बदलतील... छ.गडची केमेस्ट्री फार वेगळी आहे व त्यात गुजराथी मोदी फॅक्टरचा तसाही काहि रोल नाहि... आणि दिल्लीत यंदा काँग्रेसची पिछेहाट अटळ होती... मोदींनी एक धक्का जास्तीचा दिला बस. या निवडणुकांवर मोदी इफेक्ट काय होता यापेक्षा मोदींवर या निवडणुकीचा काय परिणाम होणार हे महत्वाचं आहे. तसच राहुल गांधींचं देखील... ज्या परिस्थितीत सोनीया गांधींनी काँग्रेसचा ताबा घेतला तशीच कमकुवत काँग्रेस राहुलची वाट बघतेय का कोण जाणे. नॉट गुड फॉर राहुल. काँग्रेस हालाखीच्या परिस्थितीत असताना गांधी फॅमिलीने तारणहार पाठवणं हा फॉर्म्युला कामाचा आहे...पण त्या घराण्याचे दोन मेंबर्स सर्वोच्च पदी असताना जर काँग्रेस हरली तर युवा गांधी नेतृत्वाकरता ते शुभ नाहि.

In reply to by अर्धवटराव

>>>मी तर म्हणेन कि मोदी फॅक्टर कुठेच चालला नाही... तसा तो चालायचं काहि कारणच नाही. खरंच आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीवेळी चित्र फार वेगळं असणार नाही असं वाटतं. पूर्ण प्रभाव असलेली राज्ये : दिल्ली , राजस्थान , मध्यप्रदेश , पंजाब (शि अ द बरोबर) , गुजरात , उत्तराखंड , हिमाचल प्रदेश , छत्तीसगड, गोवा (६५% जागा) अंशतः : महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्र , बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, हरयाणा, ओरिसा (२०-२५% जागा) एवढ्या राज्यांच्या जोरावर भाजपा वैयक्तिक सरकार बनवू शकतो? नाही. तसं झालं तर पुन्हा एन डी ए कडबोळे: तेलगू देसम, जयललिता, शिवसेना, अजितसिंग, सु स्वामी, नवीन पटनाईक इ.इ. त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये सहमती होऊन मोदी पंतप्रधान बनणं हे चेपुवरच्या स्टेटस अपडेटएवढं सोपं नक्कीच नाही.

In reply to by प्यारे१

सहमत. मोदी फॅक्टरपेक्षाहि लोकांच्या मनात काँग्रेसविषयीचा संताप आणि त्याहीपेक्षा पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली तर काय हाल करेल याची भीती याचा परीणाम नक्कीच ह्या निकालावर झाला आहे.

In reply to by अधिराज

भाजप च्या यशात मोदी फॅक्टर कमी असावा. पण मोदींसारखा वक्ता पक्षाकडे असणे फार गरजेचे आहे. चिदम्बरम, सिब्ब्ल, दिग्विजय ई कडे ते कौशल्य तर नाहीच पण पक्षाला अडचणीत आणण्याचे कसब मात्र आहे. मनमोहन सिंग व सोनिया यानी तर या कलेचे पाठ घ्यावेत अशी स्थिति आहे. लोकांशी प्रेमाने संवाद साधणारा नेता ऐहिक पातळीवर काहीसा अपयशी असला तरी चालतो. मोदींवर दंगलीचा काळा डाग त्यासाठीच सामान्य माणूस विसरायला लागला आहे. आता मोदीनी आपल्या देशाचे नक्की काय चुकतेय याचा उल्ल्लेख वारंवार लोकांसमोर करून त्यावरील उपाय सुचविले तरच त्यांचा फॅक्टर चालेल नुसती इतर पक्षांवर टीका करण्याच्या भारतीय जनतेला उबग आलेला आहे .

मध्य प्रदेश: भाजप-१४५, कॉंग्रेस-५९, इतर:१४ राजस्थान: भाजप-१३३, कॉंग्रेस-३२, इतर:१९ छत्तिसगड: भाजप:४४, कॉंग्रेस: ४४ दिल्ली: भाजप:३४, आआप: २४, कॉंग्रेस:९, इतर: ३ छत्तिसगडमध्ये खूपच चुरस चालू आहे.नक्की काय होणार हे सांगता येणार नाही.मागच्या वेळी अपडेट लिहिल्यापासून दोन वेळा कल पुढे-मागे झाले.

In reply to by विटेकर

भाजपा.... काँग्रेस ................. इतर दिल्ली ३५..... ७ ..... २५ (आआपा).... ३ == ७०/७० मप्र १५१ .... ६२ .... == २२९/२३० राज १३८ .... ३२ .... == १८९/१९९ छत्तीसगड ४५ .... ४५ .... == ९०/९०

मध्य प्रदेश: भाजप-१५०, कॉंग्रेस-६२, इतर:१७ राजस्थान: भाजप-१३७, कॉंग्रेस-३१, इतर:२२ छत्तिसगड: भाजप:४५, कॉंग्रेस: ४५ दिल्ली: भाजप:३५, आआप: २५, कॉंग्रेस:७, इतर: ३ छत्तिसगडमध्ये फोटोफिनीश होणार बहुतेक.

In reply to by क्लिंटन

छत्तीसगड मध्ये ४५-४५ अशी स्थिती असेल आणि आमदारांची फोडाफोडी झाली नाही तर राज्यपाल कोणाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देऊ शकतील? दोन्ही पक्ष समान आणि एकही अपक्ष अथवा इतर नाही. मजेशीर स्थिती आहे ब्वॉ.

In reply to by प्रचेतस

क्लोज मार्जीनने जींकणारे २-४ कॉग्रेस आमदार राजीनामा देतील व भाजपतर्फे निवडुन येतील.

In reply to by प्रचेतस

काही प्रमाणात अशी परिस्थिती १९८९ मध्ये गोव्यात आली होती. ४० पैकी कॉंग्रेसला १९, म.गो.पक्षाला १९ आणि २ जागा अपक्षांना होत्या.एका अपक्षाचा पाठिंबा कॉंग्रेसला तर दुसऱ्याचा पाठिंबा म.गो.पक्षाला होता.त्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला होता.त्यानंतर महिनाभर राष्ट्रपती राजवट होती.दोन्ही अपक्षांनी आमदारकीचे राजीनामे दिले आणि तिथे पोटनिवडणुक होऊन दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले.त्यानंतर जानेवारी १९९० मध्ये कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री झाले. छत्तिसगडमध्ये अजूनही काहीही होऊ शकते.तरी जर ४५-४५ अशी परिस्थिती आली तर भाजपला राज्यपालांनी सरकार बनवायला पाचारण करू नये असे माझे वैयक्तिक मत आहे.याचे कारण बहुमत (अर्ध्यापेक्षा एक जास्त) मिळविण्यात अपयश येणे हा सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव मानला जावा.त्यातही त्रिशंकू विधानसभा असेल आणि इतरांचा पाठिंबा घेऊन सध्याचे मुख्यमंत्री परत सरकार स्थापन करू शकत असतील तर ती गोष्ट वेगळी आहे.पण ही परिस्थिती तसेही नाही.

सध्या सत्ताबदलाची स्थिती अशी आहे - मध्यप्रदेश - भाजपाला ७ जागा गेल्यावेळपेक्षा जास्त. कॉंग्रेसला ३ जागा कमी. सत्ताबदल - नाही. सत्ताधारी पक्षाची स्थिती थोडी बळकट. (भाजपा +) राजस्थान - भाजपाला ५५ जागा गेल्यावेळपेक्षा जास्त. कॉंग्रेसला ३४ जागा कमी. सत्ताबदल - हो. सत्ताधारी पक्षाचा धुव्वा. (कॉंग्रेसचा धुव्वा) छत्तीसगड - भाजपाला ५ जागा गेल्यावेळपेक्षा कमी. कॉंग्रेसला ७ जागा जास्त. सत्ताबदल - ? सत्ताधारी पक्षाची स्थिती थोडी कमकुवत. (भाजपा -) दिल्ली - भाजपाला १४ जागा गेल्यावेळपेक्षा जास्त. कॉंग्रेसला ३१ जागा कमी. सत्ताबदल - हो. सत्ताधारी पक्षाचा धुव्वा. (कॉंग्रेसचा धुव्वा) एकंदरीत कॉंग्रेस सत्ताधारी आहे तिथे धुव्वा, सत्ताबदल दिसतो आहे. आणि भाजपा सत्ताधारी आहे तिथे थोडासाच बदल दिसतो आहे.

मध्य प्रदेश: भाजप-१५२, कॉंग्रेस-६६, इतर:१२ राजस्थान: भाजप-१४०, कॉंग्रेस-३५, इतर:२३ छत्तिसगड: कॉंग्रेस: ४९, भाजप: ३९ दिल्ली: भाजप:३२, आआप: २४, कॉंग्रेस:११, इतर: ३

चछत्तिस ग ड गेल" ब्याड.न्यूज

मध्य प्रदेश: भाजप-१५०, कॉंग्रेस-६९, इतर:११ राजस्थान: भाजप-१४३, कॉंग्रेस-३२, इतर:२५ छत्तिसगड: भाजप: ४५, कॉंग्रेस: ४२ दिल्ली: भाजप:३२, आआप: २८, कॉंग्रेस:८, इतर: २ बराच वेळ छत्तिसगडमध्ये कॉंग्रेस पक्ष पुढे होता आता भाजप पुढे दिसत आहे. एकूणच छत्तिसगड सगळ्यात इंटरेस्टींग वाटत आहे.

I Heartly congrats to Mr. Arvind Kejriwal !! जागृत मतदारांना जागृत केल्याबद्दल !!

मोदी प्रभाव वाटत नाही .ते सभेमध्ये बोलण्यापेक्षा बडबडतात आणि राहूलही तेच करतो . कॉन्ग्रेसने गरीबांसाठी धडाधड योजना फेकल्या त्याचे काय झाले ? जुलैमध्ये राजस्थानात महिलांना बस तिकीटांत तीस टक्के सवलत दिली ! आधार ,केशरी काडवाल्यांना दीड लाखांची वैद्य सेवा वगैरे मते फिरवणार का ?

@प्यारे 1 होय बिजेपी 49 आणी कॉग्रेस 40 आहे आता . छत्तिसगड

In reply to by जेपी

येताना बघून आलो तेव्हा बीजेपी का ४-० का सपना टूटा वगैरे जाहीर करुन झालं होतं एबीपी न्यूज वर. ह्यावेळी नक्कीच एव्हीएम मध्ये घोळ घातला गेलेला आहे. ;)

१९६९ नंतरचा चा कॉग्रेस पक्ष हा शिवसेनेसारखाच व मनसेसारखाच हुकुमशाही घराणे शाही ई ई बिरूदे मिरविणारा पक्ष आहे. पण शिवसेना वा मनसे कुटील पक्ष आहेत हे मी मानायला तयार नाही. दलित व मुस्लीम समाजांचे ( खरे नाहीच ) तुष्टीकरण व त्या पक्षाचा खरा अजेंडा.पण तो मायवती मुलायम यानी ढापला बेंका, सोसायट्या, साखर कारखाने व आता दूध उत्पादक संघ यांच्या साच्यातून फक्त कर्यकर्त्यांचे उखळ पांढरे करत जायचे ही ती संस्कृति आहे ती पण हळू हळू भाजपाने ढापली आहे. व पंचाईत सुरू झाली. त्यात त्यांचा गड असेलेल्या महाराष्ट्र राज्यात पवारानी पाडलेले खिंडार बंगाल मधे ममतानी पाडलेले खिंडार ई अनेक गोष्टी त्यांच्या विरोधात काम करू लागल्या आहेत. भाजप हा धुतल्या सारखा स्वच्छ नाहीच पण दगडापेक्षा वीट मउ आहे. आपले काही चुकते आहे हे कोंग्रेस पक्ष कधीच मानायला तयार नसतो कुमार केतकर हे त्यांचे प्रवक्ते (?) हे याचे उत्तम उदाहरण आहे. निवडणुका आल्या की सरकारी पैसा वाटत सुटायचा हे तंत्र आता चालणार नाही. जो सुशासन देणार नाही त्याला जावेच लागेल. कारण आता जातीच्या राजकारणा पेक्षा कार्यकत्यांच्या राजकारणापेक्षा रोजगाराचे, राज्यकारणाचे राजकारण येईल. अर्थात हे काही जादूने होणार नाही. कारण अजूनही दलितांचे मुस्लीमांचे मुद्दे काँगी सोडणार नाहीत अन अनिच्छेने का होईना राममंदिरासारखा भावनिक मुद्दा भाजप उगाळत राहील.

मध्य प्रदेश: भाजप-१५६, कॉंग्रेस-६४, इतर:१० राजस्थान: भाजप-१५२, कॉंग्रेस-२९, इतर:१९ छत्तिसगड: भाजप: ४७, कॉंग्रेस: ४३ दिल्ली: भाजप:३२, आआप: २९, कॉंग्रेस:८, इतर: १

जर आआपा ने कॉंग्रेसला पाठिंबा मागितला तर तो आम्ही देऊ. -शकील अहमद. अधिकृत निकालाना सुरुवात -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी खरे बोललात सर..