बातमी

शरद जोशी पुन्हा रणांगणात उतरणार!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
14 Jul 2014 - 2:34 pm

शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत

             दिनांक १० जुलै २०१४ ला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत देशातील एकूण राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेची बलस्थाने असलेल्या काही मोजक्या जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sharad Joshi

राजकारणबातमी

बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
2 Jul 2014 - 12:43 pm

गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात. सध्या जांभूळ सुमारे १०० ते १२० रुपये किलो आहे.

धोरणजीवनमानतंत्रऔषधोपचारप्रवासअर्थकारणशिक्षणमौजमजाप्रतिसादबातमीमाहितीमदतविरंगुळा

ट्रफिक जाम

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Jul 2014 - 11:04 am

गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.

हे ठिकाणबातमी

रस्त्यांवरील अपघात आणि वाहन संस्कृती

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Jun 2014 - 10:25 am

गोपिनाथ मुंडे यांचे काल सकाळी रस्यावरील अपघातात दुख्खःद निधन झाले. भारतभरात रोज दररोज शेकडो अपघात होतात. गोपिनाथ मुंडेंसारखा जाणता नेता काळा आड होतो तेव्हा देशाची मह्त्वपूर्ण हानी होते तेव्हा आपण हळहळतो आणि आपापल्या दिनक्रमास लागतो.

गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच. पण या निमीत्ताने तरी सर्वच भारतीयांनी आपली वाहन चालवण्याची संस्कृती तपासून पहावयास हवी असे वाटते.

दोन चाकं झपाटलेली !

सतीश आंबेरकर's picture
सतीश आंबेरकर in जनातलं, मनातलं
28 May 2014 - 6:20 am

३२० दिवसांची ती सायकल सफर मी जेव्हा पूर्ण केली तेव्हा एका स्वप्नपूर्तीचे समाधान मला लाभले . ह्या सफरीने मला बरेच काही शिकवले ,अनुभव दिले. तो नुसताच प्रवास नव्हता तो एक अभ्यास होता ह्या जगाचा आणि त्यातील वैविध्याचा. त्या परीक्रमेतले माझे अभुभव मी व्याख्यानामधून किंवा मित्र प्ररीवारासोबत बरेचदा बोलण्यातून मांडले. हे अनुभव पुस्तकरूपाने मांडण्याची इछा फार काळ मनात घर करून होती. काही ना काही कारणामुळे त्या इच्छेला मी बगल देत होतो. गेली २ वर्ष मात्र मी त्या इछेचा पाठपुरावा केला आणि तो जगप्रवास आज "दोन चाकं झपाटलेली " ह्या पुस्तकामध्ये शब्धबद्ध झाला आहे.

प्रवासदेशांतरबातमी

भारतीय कैद्यांची सुटका

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
26 May 2014 - 1:54 pm

नरेंद्र मोदींनी शपथविधीला पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना आमंत्रण दिले, त्यांनी ते स्वीकारले, आणि येण्यापूर्वी १५१ भारतीय कैदी सोडले.
आतापर्यंतचा इतिहास बघता हे पाकिस्तान च्या अश्या वागण्याने मला धक्का बसलाय, पण हा नरेंद्र मोदींचा "करिश्मा" आहे यावर देखील माझा विश्वास नाही. हा नरेंद्र मोदींचा एक राजनैतिक विजय आहे याबद्दल दुमत नाही. पण पाकिस्तानच्या अश्या वागण्यात पडद्यामागे बरेच राजकारण झालेले असणार हे स्पष्ट आहे.

गांधीजींबद्दलची भुमिका डावे-समाजवादी स्पष्ट करतील का?

विकास's picture
विकास in काथ्याकूट
14 May 2014 - 6:38 am

आज निवडणुकींच्या निकालाच्या (अगदी अगदी) पूर्वसंध्येस एका बातमीत खालील वाक्ये वाचनात आली:

"....गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो...त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला... 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत नेमके काय केले, याबाबतच इतिहास पुन्हा समोर आला पाहिजे', "

दिल्लीतील पहिला वहिला कट्टा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
27 Apr 2014 - 4:41 pm

चित्रगुप्त उवाच:
दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.

समाजजीवनमानमौजमजाबातमी