नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन
नरेंद्र मोदी भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेऊ इच्छितात, विकासासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य गरजेचे आहे हे सर्वच खरे आहे. भारतातील अधीकतम जनतेला डिजीटल क्रांतीत सहभागी करून घेणे हि स्वागर्ह बाब आहे.
नरेंद्र मोदी भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेऊ इच्छितात, विकासासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य गरजेचे आहे हे सर्वच खरे आहे. भारतातील अधीकतम जनतेला डिजीटल क्रांतीत सहभागी करून घेणे हि स्वागर्ह बाब आहे.
नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार, स्वप्नाली लाड ही मुलगी, जी गेले वीस दिवस कोमात होती, ती शुद्धीवर आलेली आहे. हे वाचून एक अनामिक दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी या मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तोच जीव धोक्यात घालत रिक्षातून उडी मारली होती. रिक्षावाल्याने सांगितलेल्या रस्त्यावरून रिक्षा न नेता भलत्या रस्त्यावर वळवली आणि मग स्वप्नाली ने चालत्या रिक्षातून उडी घेतली. अर्थातच रिक्षावाला फरार झाला. मग तिला तिथल्या नगरसेविकेने इस्पितळात नेले, ती कोमात गेली, आता ती शुद्धीवर आली हा सगळा पुढचा प्रवास.
आजकाल वर्तमानपत्र वाचताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्याच्या बर्याचशा बातम्या दिसतात. या खात्याचे पोलिस महासंचालक ( Director General) श्री. प्रवीण दिक्षित यांनी नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची वाट न पाहता आपल्याच अधिकार्यांना सरकारी कार्यालयात पेरून लाचखोर मंडळींची माहिती काढावयास लावली आणि अटकसत्र आरंभले. तरीदेखील लाच मागण्याच्या घटना कमी होत नाहीत किंवा कार्यालयाबाहेर केलेल्या देवाणघेवाणीचीही अँटी करप्शन ब्युरोला माहिती मिळणे थोडे अवघड होते.
१. "India" हे नाव "Indus" ह्या नदीमुळे पडले आणि सिंंधु व हिंंदु एकञ येउन " हिंंदुस्तान".
२. बुध्दिबळ हा खेळ भारतात उदयास आला.
३. बीजगणित, ञिकोणमिती आणि कलनशास्ञ हे विषय भारतात निर्माण झाले.
४. संख्या मुळ पद्धत आणि दशांश पद्धत भारतात तयार झाल्या.
५. जगातले पहिले ग्रेनाइट मंदिर Brihadeshwara मंदिर, तनजावूर , तामिळनाडु येथे आहे. ८० टनाच्या एका
ग्रेनाइट दगडापासुन त्याचा कळस बांधला आहे.
६. सापशिडी हा खेळ १३ व्या शतकात कवी संत ङ्यानदेव Gyandev यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव मोक्षपट
आहे. त्यामध्ये शिडीचा उपयोग केलातर स्वर्गाचे तसेच सापाने गिळल्यावर नर्काचे दार भेटते असा समज असे.
७. जगामधले सर्वात उंची वरचे क्रिकेटचे मैदान चैल, हिमाचल प्रदेश येथे आहे. ते डोंगरची सपाटि करुन १८९३
मध्ये बांधले आहे. ते समुद्रसपाटी पासुन २४४४ मीटर उंच आहे.
८. ७०० व्या शतकात जगातील सर्वात मोठे विद्यापीठ तक्षशीला येथे निर्माण झाले.
तेथे जगातुन १०५०० पेक्शा जास्त विद्यार्थी १६० पेक्शा जास्त विषयांचा अभ्यास करायाचे.
९. नौकावाहन आणि नौकापरिवहन हि कला ६००० वर्षांपुर्वी सिंधु नदीच्या खोर्यात जन्माला आली.
१०. १८९६ मध्ये भारत हा जगामध्ये एकमेव देश होता की जिथे हिरे सापडायचे.
बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या छापायचा उद्योग!
बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या *shok*
Shock
भारतीय अर्थिक गंगाजळीच्या नाड्या ढिल्या करणाऱ्या कुटिरोद्योगाच्या दानी मालदारांनी मालदा मुक्कामी एका वर९-९शून्ये इतक्या नोटा छापायचा उद्योग केल्याची बातमी वाचली असेल. *smile* इतक्या हिरीरीने विदेशातील नोटाछपाई तज्ज्ञांनी चालवलेला प्रयास व नंतर तो भारतीय चलनाच्या गंगाप्रवाहात हलके हल्के सोडायची कसोशी व अथक कोशिश पाहून मन धन्य पावले. *biggrin*
आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे.
नवं सरकार सत्तेवर येतं तेव्हा लोकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात – मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो. लोकांच्या आशा-आकांक्षांशी नाळ जोडलेली असणं हे खरं तर सरकारला लोकाभिमुख कारभारासाठी आवश्यक आहे याबाबत मतभेद असू नयेत. असा प्रयत्न होत असतो; त्याला मर्यादा असतात आणि तरीही काही प्रमाणात त्याचा उपयोगही असतो.
महाराष्ट्र शासनाने साहसी खेळ आयोजित करणार्या संस्था व व्यक्तींसाठी एक मार्गदर्शक नियमावली बनवली आहे.
या संदर्भातली म.टा. मधली बातमी
या संदर्भात मला पडलेले प्रश्र्ण
ह्या नियमाची नक्की व्यप्ती काय?
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील अनागोंदी कारभाराला कावलेल्या शिवसेना खासदारांनी राडा केला आणि त्यांच्या न्याय्य आणि उचित मागण्या मागे पडल्या आणि एका सच्चा रोझेदार मुस्लिमाला त्याचा रोजा भंग करायला लावण्याचे महामहामहापाप त्यांच्या डोक्यावर बसले. मूळ समस्या साफ मागे पडली आणि नसते लचांड गळ्यात पडले. आता दादापुता करुन आपण मुस्लिमांचे तारणहार कसे आहोत. सर्व धर्मांचा आपण कसा आदर करतो वगैरे फालतू आणि खोटारडी बडबड शिवसेनेच्या विविध नेत्यांच्या तोंडून ऐकावी लागत आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांमधील मुख्य सचिवांना पत्र पाठवून '7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट', या काळात संस्कृत सप्ताह पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पत्रानंतर ऐका राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानी केंद्राच्या या सूचनेला विरोध करत, त्यामध्ये सुधारणा करण्याची विनंती केंद्राला केली आहे. "आमच्या राज्यात सरकारी स्तरावर अधिकृतपणे संस्कृत सप्ताह पाळणे अत्यंत चुकीचे आहे. याउलट, प्रत्येक राज्याच्या भाषिक परंपरेनुसार त्या त्या राज्यांमध्ये अभिजात भाषा सप्ताह पाळणे योग्य ठरेल,' असे त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.