बातमी
राम गोपाल वर्माने लावलेली आग!
अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे.
ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे.
काही नमुने इथे आहेत.
http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/ra...
ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा
BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे
अधिवेशन गीत स्पर्धा
हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे
गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी. विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन
नरेंद्र मोदी भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेऊ इच्छितात, विकासासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य गरजेचे आहे हे सर्वच खरे आहे. भारतातील अधीकतम जनतेला डिजीटल क्रांतीत सहभागी करून घेणे हि स्वागर्ह बाब आहे.
'ती' कोमातून बाहेर आली
नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार, स्वप्नाली लाड ही मुलगी, जी गेले वीस दिवस कोमात होती, ती शुद्धीवर आलेली आहे. हे वाचून एक अनामिक दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी या मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तोच जीव धोक्यात घालत रिक्षातून उडी मारली होती. रिक्षावाल्याने सांगितलेल्या रस्त्यावरून रिक्षा न नेता भलत्या रस्त्यावर वळवली आणि मग स्वप्नाली ने चालत्या रिक्षातून उडी घेतली. अर्थातच रिक्षावाला फरार झाला. मग तिला तिथल्या नगरसेविकेने इस्पितळात नेले, ती कोमात गेली, आता ती शुद्धीवर आली हा सगळा पुढचा प्रवास.
लाचलुचपत प्रतिबंधक खाते आता फेसबुकवर..
आजकाल वर्तमानपत्र वाचताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्याच्या बर्याचशा बातम्या दिसतात. या खात्याचे पोलिस महासंचालक ( Director General) श्री. प्रवीण दिक्षित यांनी नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची वाट न पाहता आपल्याच अधिकार्यांना सरकारी कार्यालयात पेरून लाचखोर मंडळींची माहिती काढावयास लावली आणि अटकसत्र आरंभले. तरीदेखील लाच मागण्याच्या घटना कमी होत नाहीत किंवा कार्यालयाबाहेर केलेल्या देवाणघेवाणीचीही अँटी करप्शन ब्युरोला माहिती मिळणे थोडे अवघड होते.
भारतातील १० वैशिष्ठपुर्ण बाबी
१. "India" हे नाव "Indus" ह्या नदीमुळे पडले आणि सिंंधु व हिंंदु एकञ येउन " हिंंदुस्तान".
२. बुध्दिबळ हा खेळ भारतात उदयास आला.
३. बीजगणित, ञिकोणमिती आणि कलनशास्ञ हे विषय भारतात निर्माण झाले.
४. संख्या मुळ पद्धत आणि दशांश पद्धत भारतात तयार झाल्या.
५. जगातले पहिले ग्रेनाइट मंदिर Brihadeshwara मंदिर, तनजावूर , तामिळनाडु येथे आहे. ८० टनाच्या एका
ग्रेनाइट दगडापासुन त्याचा कळस बांधला आहे.
६. सापशिडी हा खेळ १३ व्या शतकात कवी संत ङ्यानदेव Gyandev यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव मोक्षपट
आहे. त्यामध्ये शिडीचा उपयोग केलातर स्वर्गाचे तसेच सापाने गिळल्यावर नर्काचे दार भेटते असा समज असे.
७. जगामधले सर्वात उंची वरचे क्रिकेटचे मैदान चैल, हिमाचल प्रदेश येथे आहे. ते डोंगरची सपाटि करुन १८९३
मध्ये बांधले आहे. ते समुद्रसपाटी पासुन २४४४ मीटर उंच आहे.
८. ७०० व्या शतकात जगातील सर्वात मोठे विद्यापीठ तक्षशीला येथे निर्माण झाले.
तेथे जगातुन १०५०० पेक्शा जास्त विद्यार्थी १६० पेक्शा जास्त विषयांचा अभ्यास करायाचे.
९. नौकावाहन आणि नौकापरिवहन हि कला ६००० वर्षांपुर्वी सिंधु नदीच्या खोर्यात जन्माला आली.
१०. १८९६ मध्ये भारत हा जगामध्ये एकमेव देश होता की जिथे हिरे सापडायचे.
बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या
बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या छापायचा उद्योग!
बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या *shok*
Shock
भारतीय अर्थिक गंगाजळीच्या नाड्या ढिल्या करणाऱ्या कुटिरोद्योगाच्या दानी मालदारांनी मालदा मुक्कामी एका वर९-९शून्ये इतक्या नोटा छापायचा उद्योग केल्याची बातमी वाचली असेल. *smile* इतक्या हिरीरीने विदेशातील नोटाछपाई तज्ज्ञांनी चालवलेला प्रयास व नंतर तो भारतीय चलनाच्या गंगाप्रवाहात हलके हल्के सोडायची कसोशी व अथक कोशिश पाहून मन धन्य पावले. *biggrin*
जिल्हा - पालघर
आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे.
माझे सरकार
नवं सरकार सत्तेवर येतं तेव्हा लोकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात – मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो. लोकांच्या आशा-आकांक्षांशी नाळ जोडलेली असणं हे खरं तर सरकारला लोकाभिमुख कारभारासाठी आवश्यक आहे याबाबत मतभेद असू नयेत. असा प्रयत्न होत असतो; त्याला मर्यादा असतात आणि तरीही काही प्रमाणात त्याचा उपयोगही असतो.