तुम्हाला एखाद्या व्यक्ती बद्दल मन कलुषित करायच आहे, सोप्प आहे, आपण आपल्या परिचितांच्या कानात फक्त एव्हढच बोलायचं कि “बाबारे त्या अमुक तमुक पासून जरा जपून बरं!!” बस्स, ती व्यक्ती कितीही चांगली असली सगळ्यांशी किती हि आपुलकीने वागू दे, सगळे जण त्या व्यक्ती पासून थोडं फटकूनच वागतात. तुम्ही म्हणाल कि आता हे काय मध्येच. पण मंडळी हो, मागील काही दिवस Selective Ignorance चा इतका दीर्घ अनुभव घेत आहे.
आपल्या भारत देशात तुम्ही सरळमार्गी असणे म्हणजे जगण्यासाठी नालायक. आणि सध्या जे काही तज्ञ त्यांचे ज्ञान पाजळतात ते एकदम दिव्य.