कविता
कविता
कविता लिहिणे अन कविता बनवणे
यात काय फरक असावा??
शब्दरचना अन व्याकरण जमेलहि पण
विचारसरणीतील 'नेमकेपणा' कुठून यावा !!
फक्त कमी शब्द वापरून भावना पोचवणे
हेच कवितेचे यश आहे
पण त्या भावना नीट समजावून घेणे
हेच रसिक मनाचे लक्षण आहे
कुणी भावनांना महत्व देईल तर कुणी शब्दांना
वय आणि अनुभव यावर हे अवलंबून आहे
पण कुठून ना कुठून भावनांना वाट सापडतेच
वास्तविकतेत यालाच महत्व आहे
शब्द न शब्द जोडून
ओळ न ओळ बनेलहि
डोकं थोSSड वापरून यमक
पण जुळेलहि…………