प्रेमाचा वर्षाव
व्याकूळ चातक
विरही मीरा
दग्ध धरती
भूक बळीची.
आसुसलेल्या
डोळ्यांना
एकच आस
प्रेमाचा वर्षाव.
व्याकूळ चातक
विरही मीरा
दग्ध धरती
भूक बळीची.
आसुसलेल्या
डोळ्यांना
एकच आस
प्रेमाचा वर्षाव.
पाप पुण्य अन् काल आजच्या
पल्याडही जर असेल काही,
अनादि, आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी ...
काळाची विक्राळ कातरी
कापू पाहते त्या धाग्याला..
जळजळीत कधी चटके देतो
तीव्र अतीव दु;खाचा प्याला..
गळ्यात बेडी अंध भक्तीची
प्राण तिचे कंठाशी येती..
डोळस, निर्दय नास्तिकतेचे
घाव बैसती माथ्यावरती ..
पण
अतूट आहे टिकून अजुनी
जीर्ण बकुळीसम ती ताजी..
अनादि आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी..
ओलसर भिंतिंच माजघर
खांबास टेकुन ति बसलेली
कंदिलाच्या धुरकट प्रकाशात
काय शोधतेस समोरच्या पत्रांत??
कसा शोधते गंध त्या निर्माल्यात??
झाडावर पिंगळ्याच्या चालल्या गप्पा,
तु तशाच ऎकत रहाणार..
अन सकाळपासुन परत वाट पहात रहाणार..
त्याच्या न येणा~या पत्राची,,
छान छान जावे दिवस
छान छान व्हावी भेट
दिवस जसा रात्रीला
येऊन भिडतो थेट थेट
मग होते रोजची सकाळ
सूर्य येताे प्रकाशात
दिवसभर थकून भागून
रात्री मिटतो आकाशात
असाच दिवस अशीच रात्र
मला खूप आवडते
मन माझं भेटीच्या त्या
सोनसंध्येला निवडते
आवडेल तुला जीवनात
अशी भेट झाली तर?
रात्री सोबत दिवसाला
नवी पालवी आली तर!?
मैत्रीच्या या फुलामधला
परागकण मी व्हावे
अश्या भेटिच्या पूर्णत्वाला
वर्षे ने ही यावे
.............................
निरोप घेऊन जाता जाता
क्षणभर बाप्पा मागे फिरला
खांद्यावरती हात ठेऊन
मनामधल सार बोलला
गड्या मला घरी सोडून
मंडळामध्ये शोधतोस
नावावरल्या व्यापाराला
तुही चालना देतोस
वाटल होत जोडीन
गप्पा मारत दिवस काढू
नैवेद्याच्या जोडीने
तुझ माझ ताट वाढू
सोडून वेड्या घरात मला
चौकामध्ये फिरतोस
मनामधल मागण्यासाठी
बाहेर नवस बोलतोस?
नको मला हार-तुरे
नकोत असल्या सजावटी
भक्त मिळावा साख्यासारखा
नकोत चेहरे बनावटी
तिला काट्यात घर सापडले
बाभळ तिथे गवसतो म्हणे...
गिधाडांची काळी ज्वाला
सतत असतो लचक्याचा घाला....
तिचा आत्मा गुहेत अडकून राहिला
काळ सरून देऊळ पडून गेला...
तिने हाती मग फुल उजळले
त्यात आत्मीक अत्तर गवसले…
सोडविना तो गंध नेई चंद्रापलीकडे
तेथे असतो राणा सांगती सगळे….
ती निघाली लाटेच्या हाकेवरती
जो घेऊन गेला कमळ डोईवरती…
तिच्यात आला निघून काळ आडोश्याला
पाझर फुटला चंद्र माखला आज वसुंधरेला…
नका घेऊ गळफास
किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!
जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!
छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू
पायाखाली तुडवत जाऊ, साऱ्या अडथळ्यांस ....!
कैफ होता धुंदीचा...
अन् धुंद होती रात ही
हवा-हवासा स्पर्श होता...
अतृप्त प्रीत बहरली
कमनिय तू कामिनी ग
अन्.. पुरुरवा मी तुझा
चुंबिता ती नयनपुष्पे
चंद्रही नाभिचा लाजला
ये प्रिये.. नच दूर लोटु
मी चकोर तू चांदणी
गगन भरल्या चांद राति
विरघळू दे तुझ्यात मी
सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो.
(जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे!
तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती
तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती
तू कल्याणी, नीरदायिनी
तुलाच नमितो सांबसदाशिव,
हरहर गंगे तुलाच स्मरती
भगिरथाचे पुत्र चिरंजीव
प्रकटयोगिनी बिकटगामिनी
तुझ्या तटाचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या किनारी शांत निमाले
एक गोष्ट तुझी
एक गोष्ट माझी
आहे एक गोष्ट
तुझ्यामाझ्या गोष्टीची
एक प्रीत तुझी
एक प्रीत माझी
जुळली एक प्रीत
तुझ्यामाझ्या मनीची
एक आभाळ तुझे
एक आभाळ माझे
भेटले एक आभाळ
तुझ्यामाझ्या प्रेमाचे
एक रात्र तुझी
एक रात्र माझी
सजली एक रात्र
तुझ्यामाझ्या स्वप्नांची
एक चंद्र तुझा
एक चंद्र माझा
साक्षी एक चंद्र
तुझ्यामाझ्या मीलनाचा
एक साथ तुझी
एक साथ माझी
सुटली एक साथ
तुझ्यामाझ्या सोबतीची