आधुनिक तीर्थक्षेत्र
https://www.misalpav.com/node/50561/backlinks
छायाचित्रे राज्गुरुनगरवासी आणी अन्तर्जालावरून
सर्वान्चे आभार
*****
https://www.misalpav.com/node/50561/backlinks
छायाचित्रे राज्गुरुनगरवासी आणी अन्तर्जालावरून
सर्वान्चे आभार
*****
राजगुरुनगर ते हुसैनीवाला......
"मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि, मैं ‘इश्क’ भी लिखना चाहूं तो ‘इंकलाब’ लिखा जाता है..."
- हुतात्मा भगतसिंग
२३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणी सुखदेव यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी दिली.ही बातमी रत्नागिरी येथे स्थानबद्ध आसलेल्या स्वातंत्र्यवीरांना दुसरे दिवशी कळाली.निर्माण झालेल्या मनःक्षोभातून खालील कविता त्यांनी लिहीली आणी देशप्रेमी तरूणांनी गुपचूप कठंस्थ करून रत्नागिरीत प्रभातफेरी काढली आणी सारे नगर देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून सोडले होते.
व्यायामशाळेचं रहस्य
-------------------------
( ही कथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित आहे . स्वातंत्र्य चळवळीचे काही संदर्भ सोडता कथा काल्पनिक आहे . )
बालकथा - मोठा गट
"टू बी ऑर नॉट टू बी?" असा गहन प्रश्न रॉबर्ट वेलिंग्टनकर या माणसाला पडला होता म्हणे. अहो, "नावात काय आहे?" हेसुध्दा तोच म्हणाला होता ना!
पण हाच प्रश्न मला पोह्यांमध्ये लिंबू पिळतांना नेहेमी पडतो. पण मला पडलेल्या प्रश्नातील बी म्हणजे लिंबाची बी बरं का!
करायला गेले नारळाची वडी झाली नारळाची चिक्की
असो.
साहित्य:
एक फुलपात्रं ओल्या नारळाचा चव
अर्धे फुलपात्रं साखर
दोन चमचे तूप
विलायची पावडर
रोझ सिरप २-४ चमचे
मिल्क पावडर/दुधाची साय
सजावटीसाठी सुका मेवा
नानस्टिक कढईत साजूक तूप किंचित गरम करायचे.
ओल्या नारळाचा चव (काळा भाग नको शक्यता) आणि साखर एकत्रित करून कढईत परतायची.मंद आच ठेवायची.
साखर विरघळली की त्यात विलायची पूड,रोझ सिरप टाकायचा.मिश्रण परतत राहायचे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे.
अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर)
गोसावी समाज साधू मंदीर
नवनाथ मंदीर
मोहाडेश्वर मंदीर
अहिल्यादेवी बारव
मोहाडमल्ल देवस्थान
सोमवंशी वाडा
ग्रामपंचायत कार्यालय
सह्याद्री फार्म कारखाना भेट व
तेथेच जेवण
(जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल)
परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल.
तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे.
संदीपची गाडी भरधाव वेगाने ओल्ड सिटी रॉड वर जात होती. संदीप अतिशय शिताफीने वळणे घेत होता. त्या अरुंद रस्त्यावर तशी वर्दळ नव्हतीच. संदीप शहराच्या मुख्य भागी आला तेंव्हा त्याला आधीप्रमाणेच एक ओढ जाणवली. मेघदूत कॅफे चालू होता. गाडी सावकाश चालवत संदीप ने दोन्ही बाजूने पाहत कुरियर कंपनी चे ऑफिस शोधायचा प्रयत्न केला. आणि नंतर त्याला आठवले की ते ऑफिस अगदी शेवटी होते. बेलकीन अँड वॉरेन कुरिअर सर्विस. "अजब आहे" संदीप पुटपुटला. त्याला DHL ठाऊक होते, Bluedart ठाऊक होते. अगदी पाळंदे कुरियर सुद्धा ठाऊक होते पण बेलकीन अँन्ड वॉरेन अगदी प्रत्येक रेल्वेस्टेशन वर जसे व्हीलर बुक शॉप असते तसे इंग्रजी वाटत होते.
सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले.
जंगली जयगड ट्रेक २२.०५.२०२२
जंगली जयगड हा किल्ला अतिशय घनदाट वनश्रीने नटलेल्या Koyna Wild Life Sanctuary (Koyna WLS) मधे वसलेला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नवजा हे किल्याचे पायथ्याचे गाव. १०-१५ घरांचे अतिशय सुंदर टुमदार गाव. प्रत्येक घरापुढे अंगण, अंगणात फणस, आंबे, पेरू आणि भरपूर फुलझाडे. नवजा हे तेच गाव जिथे गेल्या पावसाळ्यात एका दिवसात देशातील सर्वाधिक पाऊस पडला होता आणि अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. अजूनही गावातील लोक ह्या पावसाळ्यात काय होईल ह्या भीतीच्या छायेत आहेत.
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी
शालू हिरवा नेसूनी
ओली मेंदी रेखूनी
उभी ही सृष्टी अंगणी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|
पायवाट मृदगंधी भिजूनी
इंद्रधनू कमान बांधूनी
डोळी श्रावण सरी भरूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|
सरली शेतातली पेरणी
फुलले ताटवे जल धारांनी
पानांवर स्पर्शबिंदू गोठूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|