मामाचं पत्र

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
7 Aug 2022 - 2:59 pm

(विद्यार्थीदशेतील भाचे मंडळींसाठी)
----

विद्यार्थीदशेतील एक टप्पा मागे सरून चढणीचा प्रवास सुरू होईल आता. धुकं असेलही प्रवासात आणि मनातही, पण ते थोडंसं निवळावं म्हणून हे चार शब्द.
----

साहित्यिकविचार

ओस का मोती

देवू's picture
देवू in जनातलं, मनातलं
7 Aug 2022 - 11:41 am

अरे तुझी पहीली भजी अजून संपली नाही? आईने गरमागरम कांदाभजीचा दुसरा घाना काढून माझ्या प्लेट मध्ये टाकताना प्रश्न केला. मी प्लेट फ्रिजवर ठेवून कांदाभजीचा एकच तुकडा खाऊन भजांमध्ये बोट फिरवत होतो. अरे कसला विचार करतोय ? तब्येत ठीक आहे ना? आईने विचारले. अगं आई अमिषा सोडून गेली. आई एकदम गोंधळून गेली.
हातातील झारा ताटात ठेवला आणि गॅस बंद केला. काय झालं नेमके तुमच्यात सोडून जाण्यासारखे?

कथालेख

अमरनाथ यात्रा-बेचाळीस वर्षापूर्वीची -१

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
6 Aug 2022 - 3:46 pm

जुलै-ऑगस्ट महिना सुरू झाला की कश्मीर मधील अमरनाथ यात्रेच्या बातम्या सुरू होतात. बेचाळीस वर्षापुर्वी केलेल्या यात्रेची आठवण जरूर येते. यावर्षी जवळचे एक नातेवाईक अमरनाथ यात्रेला चालले होते. माझ्या अनुभवा बद्दल विचारत होते. अर्थात तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीची तुलनाच करू शकत नाही. आता भरपुर सुखसोई पण तरीदेखील यात्रा अजूनही कठीण आहे. यानिमित्त काही आठवणी व नातेवाईकांनी पाठवलेले आताचे त्यांच्या यात्रेचे फोटो आपल्या समोर मांडत आहे.

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
5 Aug 2022 - 6:07 pm

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ४

गोवा.
सुमारे साडे चारशे वर्षे पोर्तुगिज अंमलाखाली राहीलेले आणि १९६१ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३० मे १९८७ रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळालेले भारताच्या नकाशावरील एक छोटेसे राज्य.

नकोस विसरू

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Aug 2022 - 7:30 am

नकोस विसरू-
कोसळणार्‍या
प्रपातातल्या
जलबिंदूच्या
खोल आतवर
कल्लोळाच्या
अब्जांशाचा
निनाद असतो

नकोस विसरू-
माथ्यावरती
ओणवलेल्या
निळ्यासावळ्या
घुमटावरल्या
नक्षत्रांच्या
दंतकथांना
शेवट नसतो

नकोस विसरू-
दाट धुक्याच्या
पल्याडचे जग
धूसरताना
अस्तित्वाच्या
काचेवरती
आभासाचा
चरा उमटतो

नकोस विसरू-
पैलतिराच्या
अनाहताशी
ऐलतिराच्या
कणाकणातील
कोलाहलही
रुणझुणणारे
ध्रुपद साधतो

मुक्तक

"राहुल द्रविड- The Unsung Hero Of Indian cricket"

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
4 Aug 2022 - 2:34 pm

कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यापासून नेहमी त्याच्या वाट्याला साईड हिरोचीच भूमिका आली. त्याने कसोटी पदार्पणात क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ९५ धावा काढल्या पण दुर्दैवाने सौरव गांगुलीची पण ती डेब्यू (debut) मॅच होती आणि गांगुली ने त्या सामन्यात १३१ धावा केल्या... 2001 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ दिवस मैदानावर तग धरून त्याने ३५३ चेंडूत १८० धावा केल्या पण दुर्दैवाने त्याच सामन्यात व्ही. व्ही. एस लक्षमणने २८१ धावा काढल्या.. १९९९ च्या विश्वचषकात त्याने १२९ चेंडूत १४५ धावा काढल्या हीपण खेळी कुणाच्या लक्षात राहिली नाही कारण त्या सामन्यात गांगुलीने १८३ धावा काढल्या होत्या.

क्रीडालेखप्रतिभा

"प्रचंडगड" तोरणा

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
4 Aug 2022 - 1:13 pm

२४ जुलै २०२२

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात स्थित एक बळकट, भर-भक्कम, मोठा विस्तार असणारा प्रचंड किल्ला म्हणजे तोरणा. रायरेश्वरला स्वराज्य स्थापनेचा संकल्प केल्यानंतर शिवरायांनी पाय रोवलेला पहिला-वहिला किल्ला, समुद्रसपाटीपासून अदमासे चौदाशे मीटर इतकी धडकी भरवणारी उंची, दक्षिणेला वेळवंडी तर उत्तरेला कानद नदीचे खोरे, उशाला काहीचं वर्षांपुर्वी झालेलं गुंजवणी धरण तर एका डोंगरधारेने विलग केलेली पायथ्याची घेरा वेल्हे आणि भट्टी ही गावं.

तृष्णा भयकथा भाग -३

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
4 Aug 2022 - 12:32 pm

तृष्णा भयकथा भाग -३

जुन्या शहरांत संदीपला जो अनुभव आला तो त्याने चित्राला कथन केला नाही. नक्की का ? ह्या प्रश्नाचे उत्तर खरे तर त्याला सुद्धा ठाऊक नव्हते. चित्रा तशी घाबरणारी नव्हती. पण त्या मुलीच्या संदर्भांत आपण तिच्या सोबत चहा वगैरे पिणे तिला नक्की कसे वाटले असते हे त्याला ठाऊक नव्हते. त्याशिवाय अपघात झाला हि गोष्ट सुद्धा त्याला लपवणे आवश्यक वाटल.

कथा

श्रीमंत राजगड

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
4 Aug 2022 - 12:32 pm

१९ फेब्रुवारी २०२२

दुर्गराज राजगड हा तसा अगदी हृदयाच्या जवळचा किल्ला, रायगडापेक्षाही प्रिय.....नेहमीचं आपलासा वाटणारा, कोवळ्या वयात चालत सर केलेला व मुक्कामी राहिलेला हा पहिला किल्ला म्हणूनही असेल कदाचित पण राजगड हा नेहमीच सर्वात वेगळा वाटत आलाय. राजगडाला २००९ पासून वर्ष-दोन वर्षातून एखादी फेरी होतेच होते पण कोरोनाआधी दीड वर्षं व कोरोनातील दीड वर्ष असा 3 वर्षांचा खंड पडल्यामुळे ह्या वर्षीची शिवजयंती राजगडावरचं साजरी करायची असा ठाम निश्चय केला व मित्रांच्या साथीनं तो अंमलातही आणला.