गोष्ट लग्नाची
हुंडा देणे, घेणे गैर आहे हे माहित असूनही अजूनही हे प्रकार सर्रास चालूच आहेत.
याविषयावर अनेक चर्चाही होतात.
पण काही ठिकाणी चांगल्या प्रथाही पहावयास मिळतात.
जसे,.काही समाजात (कोकण भागातील) अशी प्रथा आहे ,लग्नाचा खर्च उभय पक्षांनी समान वाटून घ्यायचा.
हि पद्धत न अवलंबिल्यास त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात येते.
अशा पद्धतींचे अनुकरण सगळ्यांनी करणे गरजेचे आहे.
परंतु आजकाल टीव्ही,सिनेमा पाहून इतर समाजाच्या पद्धतीने नटणे,त्याच पद्धतीचे जेवणाचे अनेक पदार्थ,अन्नाची नासधूस यातच समाज अडकत चालला आहे.
यात वेळ,पैसा, श्रम यांचा विनाकारण अपव्यय होतो.