विचार

शुल्बसूत्रामधील भूमिति - भाग २.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
18 Dec 2017 - 6:28 am

’२’ चे वर्गमूळ.

प्रमाणं तृतीयेन वर्धयेत्तच्च चतुर्थेनात्मचतुस्त्रिंशोनेन। सविशेष:।बौधायन २.१२.

संस्कृतीविचार

चीनचा भारतावर हल्ला

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
14 Dec 2017 - 11:49 pm

चीनचा हल्ला
चीनने एका युद्धात आपल्यावर हल्ला केलेलाच आहे. आपण तो अद्याप विसरू शकलेलो नाही. आता यामधे नव्या अस्त्रांची भर पडली आहे. ती म्हणजे संपर्क माध्यमे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने मोबाईलमधल्या धोकादायक अशा जवळ जवळ ४२ सॉफ्टवेयर प्रॉग्रॅमची यादी जाहीर केली आहे. त्यांच्यामते हे प्रॉग्रॅम मोबाईलमधील माहिती आपल्या नकळत चोरतात. त्यामधे आपले पत्ते, मोबाईल नंबर्स असतात. व्हॉट्स अप किंवा मेलवरील आपले संभाषण असू शकते. या गोष्टी सर्वरकडे पाठवल्या जातात.
ashutoshjog@yahoo.com

धोरणविचार

शुल्बसूत्रामधील भूमिति - भाग १

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
14 Dec 2017 - 4:11 am

प्राचीन भारताच्या काळात जे यज्ञ केले जात त्या यज्ञाचे इच्छित फल प्राप्त होण्यासाठी यज्ञ तंतोतंत मुळाबरहुकूम केला जाणे अपेक्षित होते आणि त्यामुळे यज्ञविधीमधील मन्त्रोच्चारण, त्यांचे व्याकरण, शब्दांचे अर्थ कळण्यासाठी व्युत्पत्ति, ऋक्-छन्दांचे ज्ञान, यज्ञास योग्य काळ आणि यज्ञांमधील कृति अशा सहा गोष्टी शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छन्दस्, ज्योतिष आणि कल्प ह्या सहा निरनिराळ्या वेदांगांनी नियमित केल्या गेल्या आहेत. ह्या सहा वेदांगांपैकी कल्प हे वेदांग नाना यज्ञांचे विधि कसे करावेत हे सांगण्यासाठी निर्माण झाले आहे. कल्पसूत्रांचे मुख्यत: दोन विभाग आहेत.

संस्कृतीविचार

मराठी शाळांतील घटती पटसंख्या

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
6 Dec 2017 - 8:25 pm

मराठी शाळांतील घटती पटसंख्या हा कोण्या चर्चेचा विषय होऊ शकतो असे आम्हास बिलकुल वाटत नाही. किंबहुना त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे असाच विचार आमच्या मनात येतो.

तसे पाहता मराठी ही फार प्राचीन भाषा आहे. कित्येक मराठी भाषाकोविदांप्रमाणे संस्कृत पश्चात जी भाषा जन्मास आली ती मराठीच. यापेक्षा पुढे जाऊन काही (अतिरेकी) मराठी प्रेमी मराठी ही अश्मयुगीन कालखंडापासून असल्याचे पुरावे देखील सादर करू शकतील. (सध्या तर या अशाच अतिरेक्यांचे पेव फुटलेले दिसते. कालांतराने ही मंडळी मंडळांतून फुटतात किंवा यांना कोणीतरी हातापायाने फोडते ती गोष्ट वेगळी). असो....

हे ठिकाणसंस्कृतीसमाजजीवनमानविचारप्रतिक्रियालेखमत

सलगीराह मुबारक हो गुलाम अली साहब

स्वलिखित's picture
स्वलिखित in जनातलं, मनातलं
5 Dec 2017 - 12:55 pm

गुलाम अली साहब...
सालगीराह मुबारक हो ,
तुमच्या बद्दल सर्व काही माहित असूनही काय लिहावं हेच कळत नाही, कारण तुम्हाला आजपर्यंत जे काही ओळखले ते फक्त संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये.. स्वतःला व्यक्त करायचं म्हटले तरी श्यक्य नसणारे कित्येक जण तुम्हाला गुणगुणत असतात..

संगीतगझलविचारशुभेच्छाआस्वादप्रतिभाविरंगुळा

इस्लामची हिजरी कालगणना.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
5 Dec 2017 - 7:24 am
संस्कृतीविचार

'सिद्धार्थ' आणि शशी कपूर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
5 Dec 2017 - 2:24 am

'सिद्धार्थ' आणि शशी कपूर
(आपला आवडता अभिनेता दिवंगत झाला कि च त्याच्या आठवणीत काही लिहावे हे वाईट आहे! पण तसं होतंय खरं. )

मला त्याचा आवडून गेलेला चित्रपट म्हणजे 'सिद्धार्थ'.
नोबेल परितोषिक विजेत्या Hermann Hesse या जर्मन लेखकाच्या 'Siddhartha' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा Conrad Rooks ने निर्माण केला.
तरुण सिद्धार्थ आत्मशोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो.... आणि मग त्याला येत गेलेले अनुभव, आणि शेवटी त्याला उमगलेले सत्य, असा सगळा प्रवास या चित्रपटात टिपला आहे.

संस्कृतीकलाप्रकटनविचारसद्भावनामाध्यमवेधलेखबातमीप्रतिभा

मराठी नव्या वळणाची

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
4 Dec 2017 - 12:36 pm

आजकाल विरोधाभासात्मक उपमा देणे फारसे प्रचलित नाही. कोणे एके काळी हा प्रवादच होता. परंतु त्याचे दुष्परिणामच जास्त व्हावयाचे. एखाद्यास त्या वाक्याचे मर्म समजणे कष्टप्रद झाल्याने तो मार्मिकटोला न राहता भीमटोला समजून उगाच कुस्त्यांचे फड रंगत, अगदीच उदाहरणादाखल एखाद्या सुंदरीच्या सौंदर्याचे वर्णन जर निरलसपणे "भयंकर सुंदर" असे केले तर त्यातील सौंदर्याचे पान करण्या ऐवजी अपमानाचे पान खिलवल्याचा गैर समज होण्याची शक्यता वाटते. परिणामी..... असो!

संस्कृतीप्रकटनविचार

तुलना

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
4 Dec 2017 - 12:04 am

कावळा विमानावर शिटला तुच्छतेने, म्हणून विमानाच्या गर्वात कमीपणा येत नाही.
त्याचा वेग, त्याचा डौल, त्याचा झपाटा कमी होत नाही.
जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एका दमात जाण्याची कावळ्याला खाज मिटवता येऊच शकत नाही.
त्याच्या साठी समाधानाची गोष्ट म्हणजे तो दुसऱ्याच्या मनाचा ताबेदार नसतो....!

समीर...

मांडणीविचार