श्रीगणेश लेखमाला: समारोप
नमस्कार मंडळी,
येणार येणार म्हणून वर्षभर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत असतो ते गणराय आले, वाजत गाजत आले, या उत्सवी धामधुमीत दहा-बारा दिवस कुठे निघून गेले आणि बाप्पांचा निरोप घ्यायची वेळ कधी जवळ आली, कळलेही नाही. गणेशोत्सवाच्या काळात आपल्या घरांसारखंच पूर्ण शहरात, सगळ्या वातावरणातच एक भारलेपण, मंतरलेपण जाणवत असतं. आपलंच शहर तेव्हा ओळखू न येण्याइतपत बदललेलं दिसतं. अर्थात त्यात आता अफाट गर्दी, बेसुमार ट्रॅफिक इ. गोष्टींचीही भर पडत असते, पण त्याला इलाज नाही, गणेशोत्सवाचं स्वरूप दिवसेंदिवस पालटत चाललं आहे, त्यात चांगल्याबरोबर वाईटही आलंच. असो.