समाज

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

गॅरी शोमन's picture
गॅरी शोमन in जनातलं, मनातलं
23 Mar 2016 - 11:23 am

"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते.

धर्मसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियासमीक्षामाध्यमवेधलेखबातमी

गाव बदललाय!

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जे न देखे रवी...
21 Mar 2016 - 3:25 am

परवा बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी जाउन आलो,
सगळं बदललय!
हल्ली फाट्यावरून तासभर डोंगर वाट तुडवत जावं लागत नाही,
सगळ्यांकडे गाड्या आहेत.
सुर्य मावळल्यावर वेशीतल्या पिंपळाच्या पारावरही गर्दी होत नाही,
घराघरात टीवी आलेयत.
पहिल्यासारखा पहाटे चंद्राच्या प्रकाशात गाव उजळून निघत नाही,
सगळीकडे बल्ब लागलेयत.
शाळा सुटल्यावर मुले पटांगणात गोट्या आणि विटी दांडू खेळत नाहीत,
शिकवण्या असतात.
मारुतीच्या देवळापुढे शेकोट्या करून तरुण गप्पा मारत बसत नाहीत,
स्मार्टफोन आलेयत.

मुक्त कवितासमाज

यमुनाकाठी दैवीय शांती संमेलन आणि आसुरी अहिष्णुता

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Mar 2016 - 10:42 am

द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर दैवीय प्रेरणेने सर्व पंथीय धार्मिक नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते. या सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्या अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति.

समाजआस्वाद

राजाराम सीताराम....... भाग १५... सूट्टीसाठी आतूर

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
17 Mar 2016 - 6:48 pm
कथासमाजमौजमजाविचारलेखविरंगुळा

हे अशक्य नाही!

उल्का's picture
उल्का in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 3:13 pm

साधारण पंधरा वर्षांपूर्वी तारापूर येथे माझे वास्तव्य होते. मुले लहान असल्यामुळे त्यांना शाळेत सोडायला मी जात असे. त्यांच्या शाळेच्या नोटीस बोर्डवर एक ‘बोलके’ चित्र लावले होते. जेव्हा एक चित्र अनेक शब्दांचे काम करते तेव्हा त्या चित्राला बोलकेच म्हणावे लागते.

समाजविचार

प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 1:00 pm

फेब्रुवारीच्या ९ तारखेला रशीद जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली.

समाजराजकारणविचारप्रतिक्रिया

कोषातून बाहेर (Ice-Breaker)

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 12:56 am

मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear)
मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting)
मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation)
मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech)

वावरसमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारप्रतिसादआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखअनुभवशिफारसमाहितीसंदर्भविरंगुळा

वेताळकथा: तर त्यांचे नाते काय असावे?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
13 Mar 2016 - 3:28 pm

मिसळपाव.कॉम वरील वाचकाने आपला हट्ट सोडला नाही. नेहमीसारखाच नविन काय वाचायला आले आहे ते पाहण्यासाठी तो पुन्हा ऑनलाईन आला. ते पाहून वेताळ त्याला म्हटला, "हे वाचका, असाही तू वेळ घालवण्यासाठी येथे आला आहेस. या जगात मानवप्राणी अगदी वेगळा आहे. थोडा विचित्र आहे असे म्हटले तरी चालेल. तर मग मी अशाच प्रकारातील एक सत्यकहाणी सांगतो ती तू ऐक म्हणजे तुझा वेळ मजेत जाईल." असे म्हणून वेताळ सत्यकहाणी सांगू लागला-----

कथासमाजजीवनमानप्रवासमतप्रश्नोत्तरेविरंगुळा

अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद हवा विसंवाद नको

अनिकेत एस जोशी's picture
अनिकेत एस जोशी in जनातलं, मनातलं
12 Mar 2016 - 8:44 pm

राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचा पहिला आठवडा तीन दिवसातच समाप्त झाला. 9 मार्चला सुरु झालेल्या या अधिवेशनाचे कामकाज 17 एप्रिलपर्यंत दाखवण्यात आले आहे. तसे पाहिले तर हे अधिवेशन चक्क चाळीस दिवस चालेल असे म्हणावे लागेल. पण प्रत्यक्षात कमाचे दिवस आहेत फक्त तेवीस!! दि. 17 एप्रिल पर्यंतचे अधिवेशन असे दाखवलेले आहे, पण त्यात दि. 13 एप्रिल नंतर साऱ्या सुट्याच आहेत. पहिला आठवडा तीन दिवसातच संपल्या नंतर पुढचा, म्हणजे दुसरा सप्ताह, हा कामाकजाच्या पूर्ण पाच दिवसांचा आठवडा आहे. त्या नंतरचा तिसरा आठवडा पुन्हा तीन दिवसांचा आहे.

समाजमाध्यमवेध

रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
12 Mar 2016 - 2:16 pm

जानेवारी २०१६ मध्ये 'ज्ञानयोद्धा' नावाची काही एक व्याख्यानमाला झाली असावी, रमेश ओझा नावाचे कुणि एक गांधीवादी आहेत त्यांचे या व्याख्यानमालेत रास्वसंघाची ९० वर्षे या विषयावर भाषण झाले असावे; ज्याचे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने वृत्तांकन केले होते. , रमेश ओझांनी रा.स्व.

समाजविचार