दु:खद बातमी
प्रतिभावान संगितकार -श्री.आनंद मोडक यांचं निधन...
प्रतिभावान संगितकार -श्री.आनंद मोडक यांचं निधन...
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत.
येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे.
तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा.
समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.
"तुम बीन जाऊं कहां" या गाण्याचा विषय निघाला कि रफी आणि किशोरचे चाहते तलवारी पाजळुन बसतात आणि मग खणखणाट सुरु होतो. राजेशखन्नाच्या जमान्यात चित्रपट पाहायला सुरुवात केलेली पिढी निर्विवादपणे या गाण्यात किशोरच वरचढ आहे असा निवाडा देते. मला या वादात पडायचं नाहीय. माझं रफीप्रेम मला रफीच वरचढ आहे असं म्हणायला लावणार. मात्र चित्रपटापुरतं बोलायचं झालं तर किशोरवर अन्याय झाला आहे असं नक्कीच वाटतं. चित्रपट पाहताना गाणं बेमालुमपणे सिच्युएशन मध्ये मिसळलं असेल तर त्याची लज्जत काही औरच असते. त्याचं चित्रिकरण सुरेख झालं असेल, त्यात प्रसंगाला गडद करणारं दिग्दर्शन असेल तर पाहायलाच नको.
प्रेरणा: ते काय सांगायलाच पाहिजे का! तरीही क्लिंटन यांचे निवडणुकीचे विश्लेषण आणि अंदाज आणि इस्पीकचा एक्का यांचा हा प्रतिसाद
___________________________________________________________________
सुरुवातीला मिपावर २०१०-२०१२ आणि २०१२-२०१४ मध्ये काय झालेलं ते पाहू, ( शतकी धागे अनेक झालेत पण सेफ्टी मार्जीन ठेवण्यासाठी आपण आकडेवारी मध्ये फक्त दीड शतकी धाग्यांबद्दल चर्चा करू.
नमस्कार..
गायक संगीतकार श्रीवत्स सोबत सादर करतोय ’तुला भेटलो’
तुला भेटलो
दुव्यावर टिचकी मारून गाणं ऐका..
रचना आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा..
संतूर - जम्मू काश्मिरमधले तिथल्या 'सुफीयाना मौसिकी' या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर परंपरा होती, पण काश्मिर नरेशांच्या पदरी असलेल्या राजपुरोहितांच्या घराण्यात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेल्या पं. उमादत्त शर्मांच्या मनात मात्र या वाद्याच्या भविष्याबद्दल काही वेगळेच मनसुबे आकार घेत होते. वास्तविक पाहता त्या काळात तरी राजपुरोहितांच्या घराण्यात गाणे बजावणे या प्रकाराला फारशी प्रतिष्ठा नव्हती. राजपुरोहिताने गाणे बजावणे करणे शिष्टसंमतही नव्हते.
टिव्हीपुर्व काळातील महाराष्ट्रात जेव्हा रेडिओ केवळ जिवंत नव्हते, तर आकाशवाणीही भारतीय संस्कृतीच्या जिवंतपणाच प्रतीक होती; त्या काळात भक्तीसंगीताच्या सूरांच्या रोज सकाळी आकाशवाणीवरून होणार्या भावपूर्ण मैफिलीत, गीतरामायणातल एखाद पद अचानक कानावर पडल की सकाळच नाही आख्खा दिवस रम्य होऊन जात असे.
'क्वीन' हा कंगना रनावतचा नवीन सिनेमा. याचे कथानक काय आहे,त्याला किती स्टार मिळालेत, अन्य अभिनेते कोण कोण आहेत, संगीत कुणाचे, वगैरे काहीही माहिती नसताना निव्वळ त्यात 'कंगना आहे' म्हणून हा सिनेमा बघितला, आणि अगदी कृतकृत्य झालो.
(प्रास्ताविक: काही काळापूर्वी एक जुना मित्र भेटला. तो नि मी पूर्वी बरोबर असताना जसा 'मी' होतो तोच त्याच्या डोळ्यासमोर होता हे उघड होते. त्यावेळी माझी शारीरिक, मानसिक स्थिती, माझी रहाणी, माझ्या आवडीनिवडी, माझी राजकीय सामाजिक मते इ. बाबत आता मी बराच बदलून गेलो आहे याची जाणीव करून देणारी ती भेट होती. मग सहज विचार करू लागलो की हे जे बदल एका व्यक्तीमधे होतात, 'असा मी' चा 'तसा मी' होतो तो नक्की कसा? काय काय घटक यावर परिणाम करतात. यावर आमचे ज्येष्ठ मित्रांशी थोडे बोलणे झाले. त्यांनी याबाबत सरळ धागाच टाकावा असे सुचवले.
नमस्कार; माझ्या अलिकडील मिपा वास्तव्यात मिपाकर अमेय यांच्याकडून मराठी विकिपीडियाकरीता विकिमिडिया कॉमन्सवर मराठी गायक अजित कडकडे यांच प्राप्त झालेल छायाचित्र अशात लावल आहे.